श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला  मुख्य फरक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात , तर …   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात  कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

🇮🇳

2)  15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting)  म्हणतात तर…    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

🇮🇳

3) 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.         तर… 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.

🇮🇳

4)  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर * ध्वजारोहण * होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.        

🇮🇳

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

🇮🇳

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments