मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….

ही लढवत होती ती गढी….

गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …

महाराज मला मारा …

ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .

हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.

तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

 

आणि या शञूच्या बाईसाठी..

शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.

ताई………….

ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.

आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…

 

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..

अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.

राजा.. मी तुला शञू समजले..

मी वैरी समजले..

पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…

धन्य शिवाजी राजा..

धन्य त्याचे माता पिता..

 

ही कथा इथच संपत नाही

शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.

यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

 

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

 

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

 

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती

पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .

आणि तुम्हाला सांगायची गरज नाही

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…

आणि काय नात आहे शिवाजी राजाच.

माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

 

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…

वादाच्या पलिकडले शिवाजी …

बहिणीचा भाऊ शिवाजी …

 

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …

कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .

निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .

कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

 

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल

कारण तिला विश्वास असेल

हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.

शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.

माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

 

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा

हि विनंती ..

जय श्रीराम.

? ?

आहारात ‘सत्व’,

वागण्यात ‘तत्व’,

आणि

बोलण्यात ‘ममत्व’

असेल

तरच जीवनाला ‘महत्त्व’ येते.

?? ??

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈