☆ कवितेचा उत्सव ☆ गनीम ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

 

स्पर्धा जगण्याची ही,

की संघर्ष म्हणावे याला.

बनाव युद्धाचा जर हा,

मग मोल काय लढण्याला?

 

जिंकलो हरुन कितीदा ,

अन् जिंकुनी हरलो होतो.

अर्थहीन विसंगतीने तरीही ,

युयुत्सुच ठरलो होतो.

 

उशिराने थोड्या कळले,

जो अनर्थ घडला होता.

माझ्यातच खोल लपूनी,

गनीम दडला होता.

 

©  श्री शरद कुलकर्णी

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments