सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसुमनांजली: स्वरलतास श्रद्धांजली ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शब्द भावना दाटल्या,

 काहूर माजले अंतरंगी!

सोडून गेली काया ,

 लताचे सूर राहिले जगी!

 

स्वर लता होती ती ,

 दीनानाथांची कन्या !

सूर संगत घेऊन आली,

 या पृथ्वीतलावर गाण्या!

 

जरी अटल सत्य होते,

 जन्म-मृत्यूचे चक्र !

परी मनास उमजेना,

 कशी आली मृत्यूची हाक!

 

जगी येणारा प्रत्येक,

  घेऊन येई जीवनरेषा!

त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,

 आंदोलती आशा- निराशा!

 

मृत्यूचा अटळ तो घाला,

 कधी नकळत घाव घाली!

कृतार्थ जीवन जगता जगता,

  अलगद तो उचलून नेई !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments