☆ कवितेचा उत्सव ☆ समाधान ☆ श्री अविनाश सगरे ☆ 

 

सोड पिच्छा भौतिक सुखाचा

करतोय राज्य तो आसक्तीचा

 

नमले रे भलेंबुरेंही नियतीपुढे

काय होईल तुझ्याने वाकडे?

 

अमर असल्याचा भास तुला

ना कळेरे कधी जीव उडाला

 

पुरव कितीही भोग देहमनाचे

नाही समाधान या वाळवंटाचे

 

साठा खोट्याचा विपुल केला

झरां खर्याचा आटतच गेला

 

नाही संवाद कधी अंतःकरणा

पूजा करत राहिला बाह्यमना

 

नाही गात कोण सत्यपोवाडे

कुणांरे वेळ बघण्या तुझे मढे

 

© श्री अविनाश सगरे.

मु.पो.जयसिंगपूर.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments