मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक

 श्रीमती अनुराधा फाटक

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

दत्तगुरू ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असून ती युगायुगात आहे.प्राचीन परंपरा असलेल्या या संप्रदायातील श्रेष्ठ विभूती म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ अक्कलकोट ! यांची ओळख वाचकांना व्हावी या हेतूने माझ्या अल्प बुध्दिप्रमाणे मी हे लेखन केले आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ हे संप्रदायातील एक महापुरुष ! दत्तात्रेयांचा इतिहासकालीन पहिला व नरसिंह सरस्वतींचा पूर्वावतार ! त्यांच्या लीलातून मिळालेला जीवनबोध या संप्रदायाने महत्त्वाचा मानला.

नरसिंह सरस्वती यांनी व्रते,वैकल्ये,कर्मकांड यांची पुर्नस्थापना करून सर्व सामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. पडत्या काळात विस्कळीत झालेली धर्माची वर्णाश्रम व्यवस्था टिकवून धरली.तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे नवे आदर्श स्वतःच्या आचरणाने सिद्ध केले.

श्री स्वामी समर्थांचे जीवन सदैव तृप्त असणाऱ्या महासागरासारखे होते. स्वामी सोवळे ओवळे मानणारे नव्हते. शुद्ध आचरण म्हणजे सोवळे आणि ओवळे म्हणजे अशुद्ध आचरण ही त्यांची भावना होती.

यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी केलेली ही शब्द साधना! वाचकांनी याचा अनुभव घ्यावा.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈