सुश्री अर्चना माने 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पावसानंतरचं ऊन… – लेखिका : सुश्री अरुणा ढेरे ☆ प्रस्तुती – सुश्री अर्चना माने ☆

पुस्तक – पावसानंतरचं ऊन

लेखिका- अरुणा ढेरे

 प्रकाशक- सुरेश एजन्सी.

पृष्ठ संख्या- 112. किंमत -180.

पुस्तक अगदी छोटसं आहे. एकूण नऊ कथा आहेत. त्याआधी लेखिका अरुणा ढेरे यांच्या विषयी थोडक्यात- कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहास पर, कुमारांसाठी, किशोरांसाठी इतका व्यासंग लाभलेल्या कवियीत्री अरुणा ढेरे. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध साहित्य डॉ. राची ढेरे यांचीही सुकन्या .यांना बाळकडूच मिळाले साहित्यरसाच .मराठी साहित्यातील दांडग्या  अभ्यासक म्हणून नावारूपाला आल्या. त्यांचे अतिशय गाजलेलं पुस्तक कृष्ण किनार आहे तर ते आपल्या अगदी हृदयाजवळ आहे. 

पावसानंतरच ऊन हे पुस्तक देखील तितकच सुंदर आणि छोट्या स्वरूपात आहे प्रत्येक कथा मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी  आहे .काही कथा नव्या विचारांच्या आहेत तर काही कथा या जुन्यातूनच नवं जगणं कसं शोधावे हे शिकवणारया आहेत. पावसानंतरच ऊन म्हणजे मनाला मिळालेला गारवा जसं की रात्री बराच पाऊस पडून गेलेला गॅलरीतील कुंड्यांवर छान शिडकाव झालेला सकाळचा ताज होऊन मनाबरोबर शरीरालाही निवांत करत आणि चहाचा मंद सुवास आणि अचानक कोणीतरी हातात तो आणून द्यावा बस आता आयुष्यात काही नको अशीच काहीशी जीवन कहाणी आहे या कथा नकांची *एखादा पावसाचा शिडका व्हावा आणि आणि कोवळं ऊन सुखावून जावं अगदी तसं

पहिली कथा-  ओळख- स्वतःची ओळख शोधणारी, नात्यांच्या पलीकडे जाऊन स्वीकारणं, समजून घेणं, सोसण, सावरणं, कसलं दुःख  आपल्या वाट्याला आलं आहे? उमग नाही ,अंत नाही, आकार नाही, रंग नाही वास नाही,चव नाही. एक अवाढव्य काळ ओझं, चिनूस टाकणार, घुसमटून टाकणार, त्याबरोबर एक सत्य आणि आपण स्वतः त्यातून निर्माण झालेली ओळख आणि तिची ती कथा.

दुसरी कथा- नवरात्र कथा एक सून, नव अंकुर बीज पोटी फुलतोय जणू ही घटस्थापनेच्या स्वरूपात सांगितले आहे. एक स्त्री तशीच ही पृथ्वी तिची गर्भधारणा म्हणजे नऊ दिवसाचे व्रत तिच्या कुशीतून जन्म घेणारे धान्य बीज पेरायचं ते वाढतं नऊ महिन्याचं ते प्रतीक म्हणून नऊ दिवस आपण ते वाढवायचं व्रतासारखं ते सांभाळायचं मग शेवटी पूर्णत्वाला गेले की आनंद उत्सव साजरा करायचा.  दसऱ्यासारखा सुनेच्या पोटीही ते बीज अंकुरते. आणि ती ते अनुभवते.

तिसरी कथा- नवीन. कथेत नव्या दमाची तरुणाई आणि जुन्या विचारांची पिढी. त्यांनी ह्या पिढींशी एकरूप व्हावं आणि इतर जाती पंथांच्या सुना-मुलींची जुळवून घ्यावे ही सांगणारी नवी पिढी. आता काळ आला आहे की दोन्ही पिढ्या आपले हात एकमेकांच्या हातात गुंफून आनंदाने राहावे. 

अशा प्रकारे प्रत्येक कथा वेगळी आहे. आशावाद आणि जगणं यामधील दुवा कसा शोधावा आणि स्वतःला शोधून आपलं जग कसं निर्माण करावं हे समजतं.

पावसानंतरच पडणार कोळवून कसं हवं असं वाटतं अगदी तसंच जीवनात येणाऱ्या चढ उतारा नंतर येणारा आनंदी क्षण देखील लोभस वाटतो गजबजलेल्या ढगांमधून एखादी उन्हाची तिरप चेहऱ्यावर घेताना रोमांचिक होतं अगदी तसंच असतं हे पावसानंतर ऊन म्हणून प्रत्येकानं एकदा तरी वाचावं असं आहे

परिचय : सुश्री अर्चना माने

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments