श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक करायला गेलं तर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

सकाळी फिरायला गेलं तर,

साखरझोपेचं सुख राहून जातं .

 

शांततेने पेपर वाचू लागलो तर,

पूजा, प्राणायाम राहून जातो . 

 

दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर,

नाश्ताच राहून जातो .

 

धावपळ करत सगळं केले तर,

आनंद हरवतो .

 

डायट फूड मिळमिळीत लागतं,

चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं .

 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही,

पण कुटुंबासाठी नोकरी हवी.

दोन्ही सोडायच्या कल्पनेने

भिती वाटायला लागते .

 

लोकांचा विचार करता करता,

मन दुखावतं,

मनासारखं वागायला गेलो तर,

लोक दुखावतात .

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जात

 

घाईगडबडीने निघालो तर,

सामान विसरते,

सावकाश गेलो तर,

उशीर होण्याची भीती वाटते.

 

सुखात असलो की,

दुःख संपतं, आणि

दुःखात असलो की,

सुख जवळ फिरकत नाही.

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जातं .

 

पण या काहीतरी राहून जाण्यातच,

खरा जीवनातील आनंद आहे.

काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

 

कारण बाळ जन्मल्याबरोबर,

त्याच्या रडण्यात आनंद आहे,

आणि अचानक दुरावलेली व्यक्ती,

कित्येक वर्षांनी भेटल्यावर,

आनंदातही रडणे आहे.

 

कधी रडण्यातही आनंद मिळतो,

तर कधी आनंदातही रडता येतं.

 

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे

काही विशेष वाटत नाही

तो माणूस नाही,

तर यंत्रच आहे.

 

म्हणून आनंदाने

भरभरून जगून घेऊ या .

 

आजचा दिवस आहे

तो आपला आहे .

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments