सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

औषधाच्या दुकानात हजारो औषधे असतात. त्यापैकी प्रत्येक औषध गुणकारी असतं पण प्रत्येक औषध प्रत्येकाला उपयोगी असेलच असं नाही. आपल्याला कोणता त्रास होता आहे त्याप्रमाणे आपल्याला औषध घ्यावे लागते.

समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमत दासबोध हे असंच एक ‘रामबाण’ औषधाचे दालन आहे. आपल्याला झालेल्या भवरोगांवर इथे औषधे मिळतात.

या औषधाच्या दालनात औषधांचे वीस विभाग आहेत ( या विभागांना ‘दशक’ म्हटले जाते ) तर प्रत्येक विभागात प्रत्येकी दहा उपविभाग आहेत ( या उपविभागांना ‘समास’ म्हणतात ). यातील प्रत्येक औषध हे अत्यंत गुणकारी आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक औषध लगेचच लागू पडेल असे नाही.

मात्र सध्याच्या काळात सर्व वयोगटात हमखास आढळणाऱ्या काही आजारांवर पुढील रामबाण औषधे या दालनात मिळतात. इच्छुकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.

१ ) आजाराचे लक्षण – छोट्याछोट्या गोष्टींचा गर्व होणे

औषध – मूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास पहिला 

२ ) आजाराचे लक्षण – तुटपुंज्या ज्ञानाचा आणि हुशारीचा अभिमान वाटणे 

औषध – पढतमूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास क्रमांक दहा

३ ) आजाराचे लक्षण – आपल्या कुटुंबाचा गर्व वाटणे 

औषध – स्वगुणपरीक्षा 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्र. दोन ते पाच 

४ ) आजाराचे लक्षण – स्वतःला अमर समजणे 

औषध – मृत्यूनिरूपण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्रमांक नऊ 

५ ) आजाराचे लक्षण – स्वतःविषयी अज्ञान

औषध – बद्धलक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक पाचवा समास क्रमांक सात.

६ )आजाराचे लक्षण – अत्यंत स्वार्थीपणा 

औषध – निस्पृहलक्षण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक करावा समास क्रमांक दहा 

७ ) आजाराचे लक्षण – आयुष्यात प्रगती कशी करावी हे न कळणे 

औषध – सर्वज्ञसंग निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशकअठरावा समास दुसरा 

८ ) आजाराचे लक्षण – करंटेपणा 

औषध – करंटपरीक्षा निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक अठरावा समास क्रमांक पाच

९ ) आजाराचे लक्षण – आधुनिक जगात कसे वागावे न कळणे

औषध – दशक नववा

औषध मिळण्याचे ठिकाण – संपूर्ण दशक नववा ( समास क्रमांक एक ते दहा ) 

१० ) ग्रंथाची संक्षिप्त माहिती मिळण्याचे ठिकाण : 

दशक पहिला समास पहिला 

हे सर्व करत असताना ‘ तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ‘ ही प्रार्थना समर्थांना करावीच, जेणेकरून “मला दासबोध कळला “ असा गर्व होऊन त्यातील औषधांचा ‘ साईड इफेक्ट’ होत नाही.

लेखक : श्री वीरेंद्र ताटके

पुणे फोन ९२२५५११६७४

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अपर्णा परांजपे

वाह..किती खरंय हे!
दासबोधाचा सर्वंकश अभ्यास करुन सारच दिले आहे जे आत्मपरीक्षणातून व्यक्ती ला लक्षात येईल…
जय जय रघुवीर समर्थ 🙏