सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

पावसाची आळवणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(पावसाची वाट पाहून सगळेच थकले आहेत. म्हणून त्याची केलेली आळवणी)

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

कितीदा तुझी मी आर्जवे करावी

किती आमिषे मी तुला दाखवावी

बालपणीचा लपंडाव खेळणे

शोभे ना  तुला फक्त लपून रहाणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

असेल जरी काही चुकले माकले

माफ कर झणी होउन आपले

चल दोघे मिळूनी गाऊ प्रित गाणे

हात सरीत तुझ्या लपेटणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

आसावली  सृष्टी आतूर सगळे

वर्षावात लेण्या मोती नी पोवळे

छेड तूच अता संतूरी तराणे

अनुभवूदे ना फक्त चिंब होणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments