महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 142
☆ अभंग… ☆
☆
बदल होतात रस्ते वळतात
झाडे वाळतात, कधीतरी.!!
☆
माणूस हसतो माणूस रुसतो
माणूस संपतो, कधीतरी .!!
☆
नात्यातला भाव, कमीकमी होतो
आहे तो ही जातो, कधीतरी.!!
☆
नदी नाले सर्व, विहीर बारव
आटतात सर्व, कधीतरी.!!
☆
वाडे पडतात, वांझोटे होतात
उग्र दिसतात, कधीतरी..!!
☆
साडे तीन हात, अखेरचे घर
सासर माहेर, अखेरचे.!!
☆
कवी राज म्हणे, शेवट कठीण
लागते निदान, कधीतरी.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈