सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे कर्जाची मागणी केली होती आणि महाराजांनी त्यांना दान दिले आणि त्यांची अवस्था सुधारली अशी कथा आहे )

मी पावसावरील कविता लिहिताना त्यात प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यात कशा दिसतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा 12 प्रसंगांवर मी कविता लिहिल्या आहेत. त्यातील एका प्रसंगावरील ही कविता….

वरूणराजा तो झाला, राजा शिवछत्रपती

ढगांच्या घोड्यावर आरूढ़,गड़गडाच्या नौबती

सौदामिनीचे दाणपट्टे, सूर्यकिरणाच्या तलवारी

अशा मोठ्या दलासवे,राजा शोभे तालेवारी

*

आता आमचा बळीराजा,झाला छत्रसाल राजा

ऋण फिटता फिटेना,भेटू म्हणे महाराजा

शेत जमीन नांगरून गार्हाणे हे घातले

यथाशक्ती मदत व्हावी, मागणे हे मागितले

*

छत्रसालाने पसरले बाहू,शिवराय सरसावले

उराऊरी ते भेटताच, दैन्य सारे हे संपले

मृद्गंधाचे अत्तर लावले,थेंबांची ती पुष्पवृष्टी

धरे पासुनी आसमंतापर्यंत, सारी सुखावली सृष्टी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments