श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन☆ श्री अनिल वामोरकर ☆

भवसागर

भरती ओहोटी

सुख दुःखाची

आजन्म…

*

ज्ञानसूर्य

तळपला शिरी

झाले दु:खाचे

बाष्प…

*

गेले गगनांतरी

परिवर्तीत जलमेघ

काळेकभिन्न, परी अमृत

मानवाचे…

*

भवसागर हा संसार

ज्ञानसूर्य ते सदगुरु

दु:ख जाई लया, सुख येई फळा

कृपेचा पाऊस…

*

चिंब चिंब मग

तन मन चित्तही

आत्मानंदात मी

सदैवचि…

*

रहाटगाडगे हे

जनन मरण निरंतर

मधले ते जीवन

आनंदी.. सुंदर…!

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments