श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ जीवन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
भवसागर
भरती ओहोटी
सुख दुःखाची
आजन्म…
*
ज्ञानसूर्य
तळपला शिरी
झाले दु:खाचे
बाष्प…
*
गेले गगनांतरी
परिवर्तीत जलमेघ
काळेकभिन्न, परी अमृत
मानवाचे…
*
भवसागर हा संसार
ज्ञानसूर्य ते सदगुरु
दु:ख जाई लया, सुख येई फळा
कृपेचा पाऊस…
*
चिंब चिंब मग
तन मन चित्तही
आत्मानंदात मी
सदैवचि…
*
रहाटगाडगे हे
जनन मरण निरंतर
मधले ते जीवन
आनंदी.. सुंदर…!
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈