सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुभूती… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

 जीवनात विषय, प्रसंग खूप असतात

 निवडक मात्र मनाला स्पर्शतात

न स्पर्शलेले काही गौण नाही

त्यावर व्यक्त व्हायला मनाची तयारी होत नाही.

*

खूप काळ लोटूनसुदधा त्यातली एखादी

गोष्ट वा प्रसंग मनात रुंजीधरून राहतात.

तिच्या किंवा त्यांच्या नकळत मग त्यांच्या

सुंदर अशा काव्यपंक्ती घडतात.

*

बनलेल्या काव्यपंक्ती कवीच्या

अनुभवाची सत्यता असतात.

म्हणूनच वाचणार्‍याला त्या एक

निखळ आनंद देऊन जातात.

*

स्वानुभवाने डवरलेली कविता

कवीसाठी सत्यानुभव असतो,

तिला वाचणार्‍यासाठी ती मात्र

निर्मळ, शुदध असा उपहार ठरतो

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments