सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नववर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
कँलेंडर बदलतं नि वर्ष नवं येतं
सांगा बरं नक्की काय घडतं?
बदलतात का सूर्य-चंद्र?
नाही हो! स्रुष्टी नाही च बदलत.
बदलतं फक्त आपलं मन.
नव्या आशा,नवोन्मेष, संकल्पांचं दालन.
भविष्याचा वेध घेण्या, एक नवं कारण.
जीवनाला उभारी देतं, स्वागतोत्सुक मन
चित्तव्रुत्ती बदलण्याचं, ठरतं एक साधन.
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈