श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास असू दे नंदनवन पण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: वनहरिणी) – मात्रा :८+८+८+८

ध्यास असू दे नंदनवन पण  परसामधली बाग फुलू दे

नित्य नभाशी संभाषण पण  घरट्याशी संवाद असू दे !

 

स्वप्नीच्या त्या गंतव्याची   दे  पांथस्था कोण हमी रे

वळणे वळणे तीर्थस्थाने   तीर्थाटन तव धन्य होवु दे !

 

विझून जाते अंतरज्योती   गोठुन जाती झरे आतले

मूर्तिमंत हे मरण टाळण्या  एक निखारा उरी जळू दे !

 

रणांगणी ह्या जखमी जो तो  कुणि घालावे कोणा टाके

ही तर गंगा रक्ताश्रूंची  ओंजळ तुझीहि विलिन होवु दे !

 

बरीच पडझड तटबंदीची   किती गनीम नि कितीक हल्ले…

तुझ्या गढीवर पण जिवनाचा  ध्वज डौलाने नित फडकू दे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments