श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ चैतन्यदीप… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त :अनलज्वाला)

(मात्रा :८+८+८)

दिधले किती कुणाला,झोळीत काय आले

किर्दीत बंद आता, सारे हिशेब झाले !

 

सोवळा कोण कैसा ,रानात पारध्यांच्या

रक्तात माखलेले ,माझेच दोन भाले !…

 

वाजली गुहेत नित्य, माझीच शोकवीणा

आकांत त्या दिशांचे,श्रवणी कधी न आले !

 

मृग वर्षला झडीने ,आपापल्या परीने…….

भूमी न चिंब भिजली, लज्जेस दान आले !

 

दाटून खूप आले ,पण वर्षलेच नाही

आभाळ प्रार्थनेचे, वंध्याच रे निघाले !

 

गज तोडण्यात सारे, आयुष्य बाद झाले…….

तुटण्यास पिंजरा पण, झडण्यास पंख आले !

 

उदयास्त थांबलेले ,अंधार गोठलेला……

क्षण कोवळे नि हळवे, चैतन्यदीप झाले !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments