सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ दिवस आंब्याचे … ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(बाणाक्षरी)
हे
दिन
आंब्याचे,
वसंत ऋतू,
कोकिळ कूजन,
निसर्ग पूजनाचे!
आनंद
लहरी
तरंग
उमटे
मनात
आनंदाचा,
हा निसर्ग दाता
मना स्पर्शते कृतज्ञता!
(बाणाक्षरी मध्ये एक विषय घेऊन प्रथम एका शब्दाने सुरूवात करून क्रमाक्रमाने शब्द वाढवत तो विषय बाणाप्रमाणे सरळ रेषेत लिहित जाणे. व शेवट करताना पुन्हा शब्द संख्या वाढवणे. यामुळे कवितेला बाणाप्रमाणे आकार मिळतो..)
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈