श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 110 – आसरा…! ☆
इवलासा जिव
फिरे गवोगाव
आस-याचा ठाव
घेत असे..
पावसाच्या आधी
बांधायला हवे
घरकुल नवे
पिल्लांसाठी..
पावसात हवे
घर टिकायला
नको वहायला
घरदार..
विचाराने मनी
दाटले काहूर
आसवांचा पूर
आटलेला..
पडक्या घराचा
शोधला आडोसा
घेतला कानोसा
पावसाचा..
बांधले घरटे
निर्जन घरात
सुखाची सोबत
होत असे..
घरट्यात आता
रोज किलबिल
सारे आलबेल
चाललेले..
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈