☆ जीवनरंग ☆ जंगलच्या राजाची प्रार्थना ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

एक चिमणी उडत उडत जंगलात गेली .सोबत कावळेदादा होता.त्यांना घाई गडबडीने जाताना पाहून माकडदादा उड्यामारत  त्यांचा मागे गेले.पोपट,घार, बुलबुल, त्यांच्यात सामील झाले.

जंगलच्या राजा समोर उभे ठाकले.

शहरात वावरणाऱ्या या पक्ष्यांची,प्रांण्याची झुंड बघून

सिंहराजे म्हणाले “आज शहरातील मंडळींना जंगलाची आठवण कशी झाली?”

“महाराज मोठा अनर्थ झाला आहे.शहरातील रस्ते सुनसान झाले आहेत.लोक रस्त्यावर येत नाहीत.सार कसं शांत शांत आहे.”चिमणीने खुलासा केला.

तसा कावळेदादा म्हणाला “हे काहिच नाही महाराज,रस्त्यावर गाड्या नाहीत ,फटफटी नाहीत,सायकली नाहीत,ट्रक नाहीत,जरा सुध्दा कसला आवाज म्हणून नाही.लय भारी वाटतंय.लॅकडाऊन आहे म्हणे तीन महिने मोठी महामारी आली आहे.”

“म्हणून तर आताआमचे मंजूळ आवाज त्यांच्या कानी पडायला लागले.आम्ही शहरात असतो हे आता त्यांना कळतोय.”कोकीळेने आपलं म्हणे मांडले.” मी तर हवे तिथे उड्या मारु शकतो.कुठे ही कसा ही हिंडू शकतो.कोण मला अडवत नाही.मी राजा हे शहराचा माझ्या कुटुंबाला घेऊन जावू शकतो.मी स्वंतत्र आहे आणि माणसे घरात बंद”वाकुल्या दाखवत माकडाने माहिती पुरवली

“महाराज,मी बघतोय,भाजीपाला घेण्यासाठी,दूध घेण्यासाठी,औषधे घेण्यासाठी माणस तोंडाला फडकी बांधून जीवमूठीत घेवून येतात आणि अगाऊपणा करत मोटरीवरून हिंडणाऱ्याच्या गांडीवर पोलिसांच्या काठ्या पडतात.जाम खुश हाय मी.मला काळ्या काळ्या म्हणूण चिडवत्यात चांगली खोडमोडली “कावळेदादा  तिखट मीठ लावून घटना सांग होते.बुलबुल म्हणाले “रस्त्यावर प्लस्टिक कचरा नाही,गुटक्यांची,वेफर्सची,कुरकुऱ्याची रिकामी रॅपर नाहीत,पाण्याच्या, कोल्ड ड्रिंक्स च्या बाटल्या नाहीत,रस्ते कसे स्वच्छ आहेत.माणसे किती कचरा करतात प्रदूषण वाढवतात.या लाॅकडाऊनमूळे प्रदूषण तरी कमी झाले शुध्द शाश्वस घेता येतो.’

प्रत्येकाने काही ना काही सांगीतले सिंह महाराजांनी सारं शांतपणे ऐकून घेतले.मग आपले म्हणने मांडले”या साऱ्या घटनांची कल्पना मला आहे.मानवाला कोरोना विषाणूंची बाधा झाली आहे.याला ते स्वत: कारणीभूत आहेत.मी या संदर्भात विचारपूस केली तेव्हा समजले माणसाचे वर्तन निसर्ग नियमांच्या विरूद्ध आहे.तो स्वत:च्या बुध्दीच्या जोरावर निसर्गाला आपल्या कवेत घेवू पहात आहे पण हे शक्य नाही.मनुष्य हा देखिल प्राणीच आहे त्यांने आपल्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागणार.निसर्गाचा नियम काय आहे.प्रत्येक विषाणू, जीवाणू निसर्गात सहजीवनाने राहतो.एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो.हि साखळी खंडित करण्यांचे काम मानवाकडून होत आहे.त्यांची शिक्षा त्याला मिळणार”

“करतो कोण आणि भोगतो कोण.अस झालं आहे महाराज एका देशातील मानवाच्या चूकीच्या वर्तनाची शिक्षा समस्त मानवजातीला भोगावी लागत आहे.मी तर त्यांचा अंगणातच असते.आज माझे अस्तित्व धोक्यात आले आहे.पण सगळे मानव असे नाहीत.आपल्या गोष्टी ऐकत हे मोठे होतात. आपण काही तरी केलं पाहिजे ते आपलेच आहेत.”डोळ्यात पाणी आणून चिमणी सांगत होती.

“आपण त्यांचे वैरी नाही.पण गुहेतील वटवाघळे किचनमध्ये आणू खायला कुणी सांगितले यांना, जे त्यांच अन्न नाही ते खावं कशाला? आता त्या वटवाघळाला दोष द्यायला हे समस्त मानव रिकामे.निसर्गा पुढे कुणाचे चालत नाही.निसर्गात घडणाऱ्या सगळ्या   घटनांचे आकलन होत नसते.निसर्ग स्वत:च्या नियमाने वागतो.प्रत्येक गोष्टीत संतुलन करतो.जी गोष्ट जास्त होते ती नष्ट करतो.नष्ट झालेली पुन्हा निर्माण करतो.संतुलन हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल.तो अनभिज्ञ आहे.आपण सारे सजीव सृष्टीचे भाग आहोत.म्हणून आज तरी आपण काहीच करू शकत नाही.

लवकरात लवकर या स्थितीतून संपूर्ण मानव जात बाहेर पडू दे अशी प्रार्थना विश्वकर्मा जवळ करू शकतो इतकंच.”

“खरे महाराज तुमचे.या घटनेतून आपण केलेल्या चूकांची जाणीव  मानवजातीला व्हावी आणि त्यातून बोध घेऊन पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.ही इच्छा.देव त्यांना सद्बुद्धी देवो.हीच प्रर्थना करु.मला माझ्या घरी गेलं पाहिजे माझी लेकरं वाट बघत असतील.”

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

मार्मिक बोधकथा.