सौ. माधुरी समाधान पोरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पाने आणि पानगळ… श्री वसंत वसंत लिमये ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – पाने आणि पानगळ

लेखक – श्री वसंत वसंत लिमये

पृष्ठसंख्या – 192

लेखकांना  कोकणकडा, गिर्यारोहण याची आवड आहे. ते गडकोट मोहिमांचे नेतृत्व करतात. 1989 मध्ये भारतात प्रथम निसर्ग आणि साहस अशी प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नावावर अनेक लेखसंग्रह प्रकाशीत आहेत. त्यांना 2013 सालचा ‘सहकारमहर्षी’  साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे. 

माणसाचं आयुष्य समृद्ध असतं म्हणजे नक्की काय, तर त्याने आयुष्याच्या वाटेवर जमवलेली अगणित माणसे. लेखकांनी आजवरच्या भटकंतीतून 

जी माणसं जमवली, त्यांची व्यक्तिमत्व म्हणजे ‘पाने आणि पानगळ’ हे पुस्तक. वसंत लिमये यांनी या प्रत्येक व्यक्तीच वर्णन या पुस्तकात ‘एकोणतीस’ लेखांद्वारे केले आहे. त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलची आपुलकी, प्रेम नेमकेपणाने मांडले आहे. ही पानं रूजवत ते स्वतःच एक समृद्ध झाड होऊन गेले आहेत.  

‘अस्वस्थ संध्याछाया’ या लेखात लेखकाने त्यांच्या आईबद्दल लिहिले आहे. आईचा सगळा जीवनप्रवास, त्यांची कष्टाळू वृत्ती, खंबीरपणा त्यांनी शब्दबद्ध केला आहे. त्यांची  वडीलांना भक्कम साथ होती. पण वयोमानानुसार होणारे बदल, स्वावलंबन उतारवयात सोडवत नाही. लेखकाला वाटतं आयुष्य एखाद्या वर्तुळासारखं आहे. मोठ्ठा फेरा मारून ते बालपणाच्या जवळ येतं.

‘मरीन कमांडो प्रवीण, त्रिवार वंदन’! .. खरंतर ही कहाणी अंगावर शहारा आणणारी आहे. कमांडो प्रवीण यांचा जाट कुटुंबातील जन्म.  नेव्हीमधे होते. खडतर प्रशिक्षण, एकविसाव्या वर्षी ते कमांडो झाले. 26/11 च्या काळरात्री दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी त्यांना ताजमहाल हाॅटेलमधे जाण्याचे आदेश आले. अतिरेकी एका दालनात दबा धरून बसले होते. कमांडो प्रवीण मेन असल्यामुळे आत गेले, त्यांना गोळया लागल्या अशा अवस्थेत एका अतिरेक्याला जायबंदी केले. त्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचला. नंतर कमांडो प्रवीण यांच्यावर उपचार करण्यात आले.त्यातून ते सुखरूप बाहेर पडले.  त्यांना खूप पथ्ये सांगितली. पण ते स्वस्थ बसले नाहीत,  हळूहळू लांब चालणं, सोबत योगा, पळणं, पोहणं, अशी सुरुवात केली. साउथ अफ्रिकेत  ‘Iron Man’ हा किताब मिळवला. राखेतून उठून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखी ही कहाणी आहे. 

‘अटळ, अपूर्ण तरीही परिपूर्ण’  यामधे लेखकांनी त्यांच्या बाबांच्या आठवणी सांगितल्या आहेत. साठ वर्ष त्यांना सहवास लाभला. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांच्या वडीलांचे योगदान होते. त्यांनी आपली मते इतरांवर कधीच लादली नाहीत.  मुलांवर चांगले संस्कार देऊन समृद्ध केले. यश, अपयश, त्यांनी पचवले. परिपूर्ण आयुष्य ते जगले. 

‘किनारा मला पामराला’  यामधे लेखकांनी स्वतःच्या आयुष्यातील चढउतार मांडले आहेत.  मागे वळून पाहताना त्यांना वळणावळणाचा रस्ता दिसतो. आठवीत असताना त्यांचा नंबर घसरून एकतीसवर  आला. प्रगतिपुस्तकावर सही करताना बाबा त्यांना म्हणाले, बाळकोबा यातले तीन काढता आलेतर नक्की काढा…….हा प्रसंग मनावर त्यांनी कायम कोरला. त्यांनी आयुष्यभर सर्वोत्तम हाच धडा गिरवला. अवघड शिड्या लिलया पार केल्या. डोंगरवाटा, कोकणकडा, गिर्यारोहण,  यांनी त्यांना वेड लावले. यासाठी अथक प्रयत्न केले. पत्नीची मोलाची साथ लाभली. त्यांचा मनुष्य संग्रह अफाट आहे. ते स्वतःला भाग्यवान समजतात.  लेखन हा त्यांचा शोधप्रवास आहे. जे जमतं ते करण्यात वेगळीच मजा आहे. 

The summit is what drive us, but the climb itself is what matters……

शिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे.

खरंच ‘पाने आणि पानगळ’ वाचताना लेखकांच्या आयुष्यातील ही सारे पाने खूप काही शिकवून जातात.  प्रत्येक नवीन पान काय असेल याची उत्सुकता लागून राहते. वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाची पैलूंची  ओळख झाली. यातील डोंगरवाटा, कोकणकडे, गिर्यारोहणाचे अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात.  चित्ररूपाने हा प्रवास डोळ्यांसमोरून सरकत होता.  तुम्हीही वाचा ही पाने…….

संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments