☆ मनमंजुषेतून : आठवण : मोठी माणसं – प्रा. तुकाराम पाटील ☆

मनोहर शेरकर ९८च्या एम.पी.एस.सी.चा बेस्ट कंॅडिडेट.लगेचच पी.एस.आय बनला.आज तो खात्याच कर्तबगार आफिसर म्हणून  गाजतो आहे .वर्षा पूर्वीच तो बदलून इथे आला. आपल्या चोख कामगिरीने इथले बिघडलेले वातावरण नियंत्रणा खाली  आणले. आता सारा परिसर योग्य बंदोबस्तात सुरळीत झाला आहे .याही भागात कोरोना आला आणि पाठलाग करत आले लाॅकडाऊन.सगळ वातावरण तंग. जबर बंदोबस्त ठेवूनही मोकाट फिरणा-या टवाळखोरासाठी परिसरात सातत्यान दिवसरात्र गस्त घालावी लागत होती.लोक दारापर्यंत आलेल्या मरणालाही गांभिर्यान घेत नाहीत याची त्याला प्रचंड चीड आली होती.मग मात्र आदेश न पाळणारावर तो नाईलाजान कठोर कारवाई करत होता .उगाचच फिरणाराना दंडुक्याचा चांगलाच प्रसाद देत होता. त्याचा नाईलाज होता पण आता फिरणाराना याच भाषेत सांगाव लागत होत.

सकाळचे दहा वाजले असतील.मनोहरणे तीन शिपाई बरोबर घेतले.जीप स्टार्ट केली आणि  मेन चौकात येवून तो थांबला. दोन पोर बुलेट उडवत आली त्याना मनोहरन थांबवल .विचारपूस केली .पोरांची उडवाउडवीची उत्तर मिळताच त्याना दंडुके लगवून घरी पिटाळल.मग त्याच लक्ष दुकानांच्या रांगेकड गेल.सगळ्या दुकानांची दार बंद होती.पण कोप-यातल्या एका दुकानाच शटर उघड होत .एक म्हातारी खुर्ची टाकून दारात बसलेली दिसली त्याला.त्याचा पारा चढला. तो तणतणत त्या म्हातारी जवळ गेला .म्हणाला

“कशाला उघडं ठेवलय दुकान.सगळी दुकान बंद आहेत .तुझच तेवढ उघड कशाला ठेवलयस.”

म्हातारी गोंधळली. तिला कहीच बोलता येइना. तोवर मनोहर दुकानात गेला. ते दुकान नव्हत हे त्याच्या लक्षात आल. मग तो म्हातारीची विचारपुस करत ह्मणाला

“आजी कशाला शटर उघडून बसलाय. ते बंदकरून घ्या आधी नहीतर शिपाई येवून तुम्हाला त्रास देतील दुकानआहे अस समजून”. मग म्हातारी पडेल आवाजात म्हणाली

“साहेब  शटर बंदच होत इतकावेळ पण माझा म्हातारा म्हणाला उघड शटर लय उकाडा हाय, जीवाची तलकी व्हायला लागलीया. म्हणून उघडलय आत्ताच.”

“कुठ आहे  म्हातारा”

“आत बाजेवरवर पडलाय”

मनोहर आतल्या खोलीत गेला. म्हातारा टावेलान वार घेत बाजेवर बसला होता. मनोहरन बारीक नजरेन खोलीची पहाणी केली. त्या दोघाची हालत त्याच्या लक्षात आली. मनोहरन सहज विचारल.

कुणी पोरबाळ दिसत न्हाईत. म्हातारा हासत म्हणाला.”एकच पोरगा हाय. त्यो मिलिटरीत हाय.आम्ही नवरा बायको  दोघच असतो हितं.”

मनोहरला खूप काही कळून चुकल. तेवढ्यात म्हातारी  म्हणाली.” घरातल्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू  कालच संपल्या.सकाळपसन काहीच नाही खायाला.सगळच बंद हाय कुठन काय आणाव काय कळना झालया.कस दिवस काढायच पुढच?”

मनोहर हे ऐकून लगेच बाहेर पडला.त्यान एका शिपायाला बोलावल.आपल्या जवळचे दोन हजर रूपये शिपायाच्या हातावर ठेवत तो म्हणाला.”जा पेठेत तुमच्या ओळखीच्या दुकानदाराकडून घरात लागणार वाणसामान लगेच घेवून या. तुम्ही येई पर्यंत मी आहे  इथेच.”

शिपाई  तातडीने गेला साहित्य घेवून लगेच परत आला .मनोहरने आणखी हजार रूपये शिपायाला दिले.आणि म्हणाला “हे त्या आजीला देवून या.” शिपाई गेला .त्याने सामान खाली  ठेवले आजीच्या हातावर हजार रुपये ठेवत तो म्हणाला.”आमच्या साहेबानी दिलेत” ‘शिपाई  आला मनोहरने जीप स्टेशनकडे पळवली. म्हतारा म्हातारी भरल्या डोळ्यनी एका मेकाकडे नुसती पहातच बसली.

दुसरा दिवस उजाडला

म्हातारीने पुन्हा शटर खोलले आणि ती दोघ पायरीवर बसून साहेबाची वाट बघू लागली. दहाच्या सुमारास जीप आली. थांबली. मनोहरला उतरलेला पाहून म्हातारा म्हातारी साहेब  साहेब करून हाका मारू लागले.मग मनोहर नाइलाजानेच त्यांच्या जवळ  गेला .म्हातारी म्हणाली “बाळा फार उपकार झाले  तुझे .हे बघ आता तू आमच ऐक .तू दिलेल वाणसामान आमच्या गरजेच हाय. तेवढ घेतो  आम्ही. पण हे पैसे नकोत. हे तू परत घे. आणि  आमच्या सारख्या गरजूला यातन मदत कर. देव तुला उदंड यश देवो.” आता आश्चर्य करायची पाळी  मनोहरची होती.त्याला वाटल जगात गरिबालाही माणूसकीची कणव जोपासता येते . मीच फार मोठा नही कुणी. माझ्या माझ्या पेक्षाही खूप मोठ्या मनाची माणस आहेत समाजात. जपल पाहिजे त्याना. नाहीतर वाळवंटच होईल सा-या जगण्याच.

© श्री तुकाराम पाटील

चिंचवड पुणे ३३

मो .९०७५६३४८२४

२/८/२०

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

तुमच्या कविता तर नेहमीच वाचत असतो.आज लेख वाचला.कवितेप्रमाणेच सुंदर मांडणी.
आपल्या लेखनाचे स्वागतच आहे.
आपले स्वागत व अभिनंदन.