श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

पशुपक्षांना खायला, पाणी प्यायला देणे चांगलेच आहे. पण त्याने त्यांच्या नैसर्गिक सवयींमध्ये फरक पडतो. त्या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख. लेखक माहीत नाही पण मते मात्र पटली.********

पुण्य करताना पाप होतंय-……महापाप…..

प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना,माकडांना,पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो ! आणि कौतुक करतो आपण !!!!

प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खूश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि  सहानुभूतीचे विचार आहेत–

थोडी उसंत घ्या—आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा :—

निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय;

त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे !

वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे -सोयीचे पदार्थ, आयते भरवून, त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय, त्यांच्या पुढील पिढ्यांना आयतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा — हे सिद्ध झालंय) सवय लावतोय ! त्यामुळे ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने ! त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात.

खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरे च्या सवयी आपण लावल्या;

त्यामुळे त्यांची वजने वाढली.–झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले शेवटी. 

त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही.

परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्यापलीकडे भवितव्य उरले नाही. 

outdated ‘ पुण्य ‘ याविषयीच्या कल्पनांनी स्वतःला सुखवण्यासाठी; आणि मुलांना मजा दाखवण्यासाठी

या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे ;खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात-!!!—– आणि हे पाप आपल्या हातून होते !!

—आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय–पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग ( किंवा adict) बनवतो !

आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले, किंवा रोज कोणी 500 ची  नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील— आणि त्यात त्यांचा दोष नसेल. 

असेच झालेय बऱ्याच ठिकाणी!!!

मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक–कधी हल्लेखोरही होतात–आयत्या चमचमीत अन्नासाठी!!

अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो. 

विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती.

पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या !!

आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोपशी पण झाली आहेत-

हे पाप कोणाचे?

परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते.

आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही, कारण  अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली. म्हणजे 

इतर पक्षांवर अन्याय.

कबुतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना!!!!

कबुतरखान्याजवळच्या लोकांशी बोला—आपल्या बेगडी पक्षीप्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.

दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने तिचा आहार देणे अपेक्षित आहे.

मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात-पोट फुगते- अपचन होते हे सिद्ध झाले आहे.

या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल अशी नैसर्गिक वनसंपदा जपू या- -देशी झाडांनी ती वाढवूया.

जुन्या काळातल्या ‘  पुण्य ‘ या विषयीच्या संकल्पना तपासून योग्य तिथे विधायक बदल करूयात. 

संतांनी हेच सांगितलंय !

कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया….. 

तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका—मीही तुमच्याइतकाच प्राणिप्रेमी आहे.

पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही —त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखू या. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे. 

(सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत. त्यामुळे फॉरवर्ड करून आपले प्राणी- पक्षी प्रेम व्यक्त करा.)

 

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments