श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ एक प्रश्न… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

प्रश्न जगण्या मरण्याचा नाही.

जन्मतानाच मरण सोबत येत.

पण ते कधी कसं केव्हा सोबत घेऊन जाणार हे नक्की कळत नाही माणसाला.

त्याची वाट पहातच जगत असतो माणूस मरेपर्यंत.

पण जन्ममरणाच्या मधल्या काळातली उलथापालथ कधी आनंद देते, तर कधी पिळवटून टाकते मना सोबत तनालाही.

तन माणसाचं आवडत ठिकाण, कारण त्यातच त्याचा आत्मा असतो. तो त्याला बाह्यात्कारी सजवण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कारण मनाचा तसाच हुकूम असतो. मेंदू मनाचा गुलाम पण देहावरचा शासनकर्ता. मग मनाचा आदेश धुडकावून लावण्याची त्याची कुठे हिंमत चालते.

मन मुलखाचेओढाळ, त्याला आवरघालणे महाकठीण. या सगळ्या गुंत्यात मनाचेच फावते. ते सगळ्यांची भंबेरी उडवून देते. आणि जगण्याचाच बट्याबोळ करून टाकते. म्हणूनच आत्मा आणि मन यांचा वितंडवाद मिटवण्यासाठी करगर उपाय शोधून ते अमलात आणावे लागतात. पण हे कामही सोपे नसते. त्यासाठी मनालाच मारावे लागते. खडतर तप साधना करावी लागते. आत्मबल एकवटावे लागते. आणि निर्णय घ्यावे लागतात. तसे केले तरच माणसाला च्यारीत्र्य प्राप्त होते व माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो. वागतो. नाहीतर सामान्य राहूनच निघून जातो जगातून. म्हणूनच मनावर काबू मिळवा आणि जगासमोर चांगला माणूस म्हणून मिरवून निघून जा, शांतपणे. एका माहित नसलेल्या अनोळखी विश्वात.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments