☆ विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

काय आल डोळ्यासमोर ??

पांढरा शुभ्र सदरा, काळी पँट, दोन्हीही कडक इस्त्री मधे, वरती टाय आणि कडक सुट बूट घातलेले रूबाबदार व्यक्तिमत्व? बरोबर आहे ना? मोठ्या कंपनी मधे मोठ्या पोस्ट वर असलेली, सो कॉल्ड उच्चभ्रू वर्ग मधे प्रचंड मान सन्मान, प्रचंड पैसा असलेली,  थोडक्यात वजनदार व्यक्ति.

आपल्या समाजात अश्या व्यक्तिंना खूप मान सन्मान दिला जातो, खूप महत्व दिल जात विनाकारण, आणि त्यामुळे खरच ही माणस स्वतःला खूप वजनदार समजू लागतात. खूप पैसा जमवलेला असतो, मग तो कश्या तर्‍हेने हे महत्वाचे नसतेच मुळात. पैसा, सत्ता, नोकर चाकर जी हुजूर करायला, आणि हाताखाली गडी माणस, मुजरा करायला. आणि ऑर्डर सोडली की त्यांचा प्रतेक शब्द झेलायला.

थोडक्यात गुर्मी, मस्ती आणि पैसा हे हातात हात घालून असतात ह्यांच्या जवळ. बुद्धी असेलच असे नाही. ह्यांचा असा मग एक वेगळा क्लास तयार होतो आणि त्यांच्यातच मग सुरू होते चढाओढ आणि आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी, ठेवल्या जातात जंगी पार्टी. अन्नाची नासाडी आणि पैश्यांची  उधळपट्टी एवढाच ध्येय. आणि मी तुझ्यापेक्षा किती मोठा हे दाखवण्याची चुरस.

एरवीसुद्धा ही लोक कुठे गेली आणि त्यांना कोणी कप भर चहा दिला तरी त्यातला निम्मा वगळतात जस्ट फॉर स्टेटस सिम्बॉल.

पण हाय क्लास म्हणले, की माझ्या डोळ्यासमोर मात्र येतात त्या सुधा मूर्ती. अतिशय नम्र, बुद्धिमान आणि मान सन्मान असलेल्या. आता सुधा मूर्ती म्हणले की त्यांच्या बरोबर लंडन विमानतळावर घडलेली घटना आपल्याला आठवतेच, नाही का?  त्यांच्या पेहेराव्या वरुन त्यांचा क्लास ठरवण्यात आला होता आणि कॅटल क्लासची उपमा देण्यात आली होती. त्यांना हे ही सांगण्यात आले होते की ही विमानाची ओळ बिझनेस क्लास साठी आहे आणि ह्याचे भाडे इकॉनॉमिक क्लास पेक्षा तिप्पट आहे. आणि चुकून त्या इथे उभ्या असतिल अस समजून त्यांना इकॉनॉमिक क्लासची ओळही दाखवण्यात आली होती. हे सगळ कश्या वरुन ठरवण्यात आले? तर फक्त त्यांच्या साध्या पेहेरावा वरून. त्या दिवशी त्यांनी साधी सुती साडी परिधान केली होती आणि त्या आपल्या मातृभाषेत बोलत होत्या म्हणून?

दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. आपल सर्व आयुष्य वाहिले त्यांनी कुष्ट रोग्यांसाठी. तसच बाबासाहेब आंबेडकर हे अजून एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यानी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. ही आहेत खरी क्लासी माणसे.

एखाद्या माणसाचा क्लास त्याच्या पेहरावावरुन त्याच्या साधेपणा वरुन कसा काय ठरू शकतो??खरतर माणसाचा क्लास ठरतो तो त्याच्या विचारांवरुन  कर्तुत्वा वरुन.  केवळ पैसा आहे म्हणुन तो उडवणे हा  त्यांचा ध्येय कधीच नसतो . त्यांचा ध्येय आपल्या बरोबर आपल्या समाजाला समृद्ध बनवणे, तसच गरजवंताला मदत करणे असतो. ह्याला म्हणायचे क्लासी माणस आणि ह्यांच्या मुळे बनतो हाय क्लास.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

सुंदर, दिल को छूने वाली रचना