श्री जगदीश काबरे

☆ “जागतिक पटलावर गांधीजी☆ श्री जगदीश काबरे ☆

✅ १९०९ सालापासून प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलेस्टॉय गांधीजींना ओळखत होते. कारण त्यांचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता.

✅ १९२० सालापासून हो चि मिन्ह यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे. ” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत, ” असेही ते म्हणाले होते.

✅ १९३१ साली जगप्रख्यात टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर गांधी झळकले होते.

✅ १९३१ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने गांधींना पत्र लिहिले. त्यात आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की, खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता. “

✅ १९३१ साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी गांधींची भेट घेतली होती.

✅ १९४० साली नेल्सन मंडेला यांना गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढता येतो हे समजलं. त्याने प्रभावित होऊन त्यांनी गांधींचा सत्याग्रही मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चोखाळला म्हणून नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हटले जाते.

✅ १९४० सालीचा मानव अधिकार कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग यांना गांधीपासून प्रेरणा मिळाली आणि ते वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. त्यांना अमेरिकेचे गांधी असे संबोधले जाते.

✅ १९४२ साली लुई फिश्चरने गांधींची भेट घेतली होती आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन १९६२ साली त्यांनी गांधी चरित्र लिहिले.

✅  १९४८ साली एका माथेफिरू हिंदू दहशतवाद्याने गांधीहत्या केली. त्याची दखल जगभरातील सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर घेणारी बातमी प्रसिद्ध केली होती.

✅  १९८२ साली बेन किंग्जले निर्मित आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ॲटनबरोला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुमच्यासमोर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, माओत्से तुंग, हिटलर असे जागतिक स्तरावरील नेते होते तरीही तुम्ही चित्रपटासाठी गांधींचीच निवड का केली?’ त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आजही विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, ‘जगातील इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात तलवार घेतली होती. फक्त हा एकच असा माणूस आहे जगात की, ज्याने नि:शस्त्र लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘

✅ जगात गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढेच काय पण जगातील बहुसंख्य देशात गांधीजींचे पुतळे उभारले गेलेले आहेत आणि टपाल तिकिटे काढलेली आहेत. जगात अनेक विद्यापीठात गांधींचे विचार शिकवले जात आहेत.

✅ गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ अशी उपाधी दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हणून त्यांना संबोधत त्यांना मानाची सलामी दिली.

✅ १५ ऑगस्ट १९४७ जेव्हा अख्खा देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद उपभोगत होता त्याच वेळेला दंगलग्रस्त नौखालीमध्ये गांधीजी निधड्या छातीने एकटे फिरत होते आणि दंगली शमविण्याचा प्रयत्न करत होते. त्यात ते यशस्वीही झाले. म्हणून माउंटबॅटन यांनी त्यांना कौतुकाने ‘वन मॅन आर्मी’ असे म्हटले.

✅ थोडक्यात मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी, उर्फ राष्ट्रपिता, उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार, उर्फ अहिंसेचे पुजारी, उर्फ सत्याग्रहाचे जनक किती मोठे होते हे जगाला माहित आहे.

 ❎ तरीही आज बापूजींचा तिरस्कार करणारे कृतघ्नपणे बापूजींच्या चित्रावर पुन:पुन्हा गोळ्या झाडत आहेत.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments