सूचनाएँ/Information ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी को मिला प्रतिष्ठित कादंबरी – स्वर्गीय माणकलाल शिवहरे सम्मान – 2022 – अभिनंदन ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹 श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी को मिला प्रतिष्ठित कादंबरी – स्वर्गीय माणकलाल शिवहरे सम्मान – 2022 – अभिनंदन🌹

🌹 पुस्तक- “चाबी वाला भूत” पुरस्कृत 🌹

Image result for चाबी वाला भूत ओमप्रकाश क्षत्रिय

रतनगढ (निप्र)। किसी रचनाकार की पुस्तक ही उस रचनाकार की असली पहचान होती है। उसकी इसी असली पहचान को पुरस्कृत किया जाना चाहिए। इसी उद्देश्य को ध्यान में रखकर देश की प्रतिष्ठित संस्था कादम्बरी द्वारा प्रतिवर्ष देश के लब्ध प्रतिष्ठित साहित्यकारों को उनकी प्रकाशित कृतियों के मूल्यांकन के आधार पर सम्मानित किया जाता है। 

इस वर्ष 2022 में कादम्बरी संस्था ने गत रविवार को अखिल भारतीय स्तर पर-अखिल भारतीय साहित्यकार-पत्रकार सम्मान समारोह, शहीद स्मारक सभागार जबलपुर में भव्यता के साथ आयोजित किया गया। जिसमें देश के प्रतिष्ठित सृजनधर्मियों को शाल, श्रीफल, नगद राशि, मानपत्र के सम्मान से अलंकृत किया गया।

इसी कड़ी में नीमच के साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को उनकी प्रकाशित कृति- चाबी वाला भूत, को स्वर्गीय माणकलाल शिवहरे सम्मान के लिए चुना गया। जिन्हें आपकी अनुपस्थिति में प्रसिद्ध बाल साहित्यकार मित्र के हाथ यह सम्मान देकर सम्मानित किया गया। 

यह सम्मान कादम्बरी संस्था के अध्यक्ष आचार्य भगवत दुबे, प्रज्ञापीठाधीश्वर साध्वी विभानंद गिरिजी, डॉ राजकुमार तिवारी सुमित्र, महासचिव राजेश पाठक प्रवीण सहित मंचस्थ अतिथियों के बीच कादंबरी संस्था के सौजन्य द्वारा प्राप्त हुआ है। किसी रचनाकार का इस संस्था द्वारा सम्मानित होना बड़े गौरव की बात है। कारण स्पष्ट है कि इस संस्था द्वारा रचनाकार को नहीं, उसकी कृति के लिए रचनाकार को सम्मानित किया जाता है।

आज के अंक में पुरस्कृत पुस्तक चाबी वाला भूत की शीर्ष कथा प्रकाशित की गई है। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्ग ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ गत जन्मीचे… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

गत जन्मीचे हिशोब चुकते करायचे तर

हवी कशाला व्यर्थ सुखाची मार्ग प्रतीक्षा?

अशा पापण्या भिजवायला हव्या तुला तर

दिलीं कशाला एकांताची जबरी दीक्षा?

पद चिन्हावर शिंपशील नयनातील पाणी

म्हणून चालतो याच पथावर मी अनवाणी

मार्ग चालता पुढे पुढे मन वळते मागे

अन पायाला घट्ट बिलगती कच्चे धागे

आशेचा तू वृक्ष लाविला होता दारी

कैक दिसानी आज बहरला मागील दारी

या वृक्षाचा बहर भिडावा. नील नभाला

मिळो सावली क्षण सौख्याची पांथस्थाला

गर्द सावली विस्ताराची भूल जगाला

भार तोलते मुळी तियेची खंत कुणाला?

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #136 ☆ संत निवृत्ती नाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 136 ☆ संत निवृत्ती नाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

दिली गहिनीनाथांनी

दिक्षा निवृत्ती नाथांस

बंधू थोरले ज्ञानाचे

गुरू लाभले सर्वांस…! १

 

धन अध्यात्मिक सारे

दिले निवृत्ती नाथांनी

दिला आदेश ज्ञानाला

लिही गीता दृष्टांतांनी…! २

 

जगामध्ये गांजलेले

सुखी केले हीन दीन

संत निवृत्तीनाथांची

सिद्धयोगी  कर्मवीण…! ३

 

ज्ञाना सोपान मुक्ताई

केला सांभाळ स्नेहाने

आधाराची कृपाछाया

दिली निवृत्ती नाथाने…! ४

 

कृष्ण तत्व गीता सार

अभंगांचे मुळ रूप

कार्य निवृत्ती नाथांचे

परब्रम्ह निजरूप…! ५

 

ग्रंथ निवृत्ती ‌साराने

गीता टीकेस उत्तर

ग्रंथ निवृत्ती देवी हा

अद्वैताचे मन्वंतर…! ६

 

योगमय अद्वैताची

गाथा कृष्ण‌भक्तीपर

तीन चारशे अभंग

हरीपाठ सुखकर…! ७

 

हस्त लिखितांची ठेव

आहे कैवल्याचे लेणे

संत निवृत्तीनाथांचे

आहे आशीर्वादी देणे….! ८

 

वारकरी संप्रदाय

असे समता संदेश

वसा विश्व कल्याणाचा

देई निवृत्ती निर्देश…! ९

 

ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी

शोकाकुल परीवार

नाथ निवृत्त जाहले

संजीवन निरंकार…! १०

 

ब्रम्हगिरी पर्वताच्या

पायथ्याशी अंतर्धान

नाथ समाधी मंदिर

वैष्णवांचे श्रद्धास्थान…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…6 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत नाटककार ‛भास’ याने एकूण तेरा नाटके लिहिली. त्याला संस्कृत साहित्यात ‛भासनाटकचक्राणि’ असे म्हणतात. त्यातील ‛प्रतिज्ञायौगंधरायणम्’ आणि ‛स्वप्नवासवदत्तम्’ ही दोन नाटके राजा उदयन आणि अवंतीराजकुमारी वासवदत्ता यांच्या जीवनावर आधारित आहेत.

वासवदत्ता उज्जैनचा राजा प्रद्योत याची कन्या असते. उदयन एका छोट्या राज्याचा राजा असतो. त्याच्याकडे ‛घोषवती’ नावाची एक अद्भुत वीणा असते आणि तो उत्तम वीणावादन करत असतो. त्याची ती ख्याती ऐकून वासवदत्ताला त्याच्याकडून वीणा शिकण्याची इच्छा उत्पन्न होते. ती वडिलांजवळ तसा हट्ट करते. राजा उदयन हे सहज मान्य करणार नाही हे प्रद्योतला माहीत असल्याने तो कपटाने उदयनाला कैद करतो आणि आपल्या वाड्यात आणून ठेवतो आणि त्याला आपल्या कन्येला वीणा शिकवण्यास सांगतो.

उदयन आणि वासवदत्ता त्या निमित्ताने एकमेकांना भेटत राहतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे लग्न होते. त्याचवेळी उदयनाचा मंत्री यौगंधरायण आपल्या राजाला सोडवून आणण्यासाठी एक उपाययोजना करतो आणि उदयन- वासवदत्ताना सोडवून आणतो. पुन्हा आपल्या राज्यात परत आला तरी उदयन आपल्या पत्नीच्या प्रेमापुढे राज्याकडे दुर्लक्ष करू लागतो. त्यामुळे अरुणी नावाचा राजा त्याचे राज्य हस्तगत करतो. ते परत मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या राजाच्या मदतीची गरज असते. मगध राजाची बहीण पद्मावतीशी उदयनाने विवाह केला तर हे शक्य होणार असते. म्हणून यौगंधरायण वासवदत्ताशी सल्लामसलत करून एक योजना आखतो. त्यामध्ये उदयनाला वासवदत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मेली असे भासवण्यात येते व तिला पद्मावतीची दासी म्हणून ठेवण्यात येते. अशाप्रकारे अनेक नाट्यमय वळणे घेत या नाटकांचा सुखांत होतो.

ही एक दंतकथा असली तरी एक प्रकारे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब या नाटकांमधून निदर्शनास येते असे मला वाटते.

पहिल्या भागात वडिलांकडे वीणावादन शिकण्यासाठी हट्ट करणारी अल्लड वासवदत्ता चित्रित केली गेली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उदयन भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडलेली प्रेमिका दिसते. आपल्याला अशी तिची दोन्ही रूपे भावून जातात. याशिवाय संगीत- चित्रकला अशा कलांमध्ये स्त्रियांना प्राविण्य मिळवण्याची मुभा होती हेही लक्षात येते.

त्यानंतर पतीच्या घरी गेल्यावर जेव्हा उदयन पत्नीच्या प्रेमात रममाण होऊन राज्य गमावून बसतो आणि त्याचे मंत्री जेव्हा वासवदत्तेला याची जाणीव करून देतात तेव्हा तिच्यातील कर्तव्यदक्ष पत्नी जागी होते. तीसुद्धा एका राजाची मुलगी असते आणि राज्य टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागते याची तिला पूर्ण कल्पना असते. म्हणूनच आपल्या पतीच्या व प्रजेच्या हितासाठी ती यौगंधरायणाच्या योजनेला पूर्ण मान्यता देते आणि राजाचा विवाह पद्मावतीशी करून देण्यासाठी राजी होते. त्या काळी राजांनी अशा पद्धतीने विवाह करण्याची सर्रास प्रथा होती. शिवाजीमहाराजांनीही राज्यविस्ताराच्या दृष्टकोनातूनच आठ विवाह केले होते असे इतिहास सांगतो. म्हणूनच इथेही वासवदत्तामधील चाणाक्ष राजकारणी दिसून येते.

वासवदत्ता इतकेच करत नाही. तर राजाचे आपल्यावर किती प्रेम आहे हे माहीत असल्याने तिच्या मृत्यूची खोटी कहाणी रचल्याशिवाय राजा दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही हे लक्षात येते तेव्हा ती सहजपणे ही योजना स्वीकारते. वास्तविक आपल्याच मृत्यूची बतावणी करणे कितीही अवघड असले तरी ते स्वीकारणारी वासवदत्ता एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष स्त्रीच्या रुपात समोर येते.

जेव्हा ती पद्मावतीची दासी म्हणून राहू लागते त्यावेळी सर्व सुखासीन आयुष्य सोडून देते. वास्तविक असे जीवन जगणे एखाद्या राजघराण्यातील स्त्रीला किती अवघड जात असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे आपल्या ध्येयासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारी वासवदत्ता ही त्यागमूर्ती होती असे म्हणावे लागेल.

पद्मावतीशी उदयनाचा विवाह होतो आणि तिला वारंवार आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहावे लागत असले तरी आपल्या पतीच्या व राज्याच्या हितासाठी ते सर्व सहन करत असते. यातून तिच्यातील सहनशील नारी प्रत्ययास येते.

असे सर्व असले तरी शेवटी ती एक स्त्री असल्यामुळे साहजिकच कुठे तरी तिला आपल्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा असतेच. त्यामुळे एका प्रसंगात विदूषक राजाला विचारतो की त्याचे “सर्वात जास्त कोणावर प्रेम आहे?” तेव्हा तो वासवदत्तेचेच नाव घेतो. हा संवाद नकळत वासवदत्तेच्या कानावर पडतो आणि ती अतिशय आनंदित होते. कारण शेवटी तिचेसुद्धा आपल्या पतीवर तितकेच उत्कट प्रेम असते. शिवाय एकदा नकळत झोपेत राजाला स्वप्न पडते आणि तो वासवदत्तेलाच हाक मारत असतो. त्यावेळी पण वासवदत्ता तिथेच असते.

या दोन्ही प्रसंगातून वासवदत्तामधील पत्नी अतिशय सुखावते. कारण जरी आपल्या राज्यासाठी तिने एकप्रकारे हे व्रत स्वीकारलेले असले तरी तीसुद्धा एक माणूसच असते. 

अशाप्रकारे प्रेमिका, पत्नी, उत्तम कलाकार, कर्तव्यदक्ष राणी अशा वेगवेगळ्या रुपात भेटणारी ही वासवदत्ता काल्पनिक असली तरी त्या काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचे एक आगळेच रूप होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती साडी… – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ ती साडी… – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे

(रेणूने सासूने आणलेली साडी त्यांना अपमानास्पद वागणूक देत घरच्या कामवाल्या मावशीला देऊन टाकली.) आता पुढे….

आशा मावशींना काहीच सुचेना. त्या बुचकळ्यात पडल्या.

“घ्या मावशी, साडी छान खुलून दिसेल तुमच्या अंगावर!”… सासुबाई मनापासून म्हणाल्या. थोडा वेळ गप्पच होत्या. नंतरआपल्या मनातली खदखद व्यक्त करत पुढे म्हणाल्या,”हे जे काही आयुष्यात घडतंय ना त्यामुळे वाईट वाटतं.पण सरते शेवटी ते आपल्या भल्यासाठीच असतं असं म्हणून सोडून द्यायचं. राहणार होते एक,दोन दिवस…. पण आज संध्याकाळीच घरी मुंबईला जाईन.मलाही अमेरिकेला जायची तयारी करायचीय.” सासुबाईंनी आपला नव्याने बनवलेला प्लॅन सांगून टाकला. “एक सांगू का आई तुम्हाला, आता तिकडचा मुंबईतल्या पावसाचा जोर कमी झालाय. पण इकडे जोरात पडणार आहे असं वाटतंय. तुम्ही लवकर सुखरूपपणे घर गाठावं हेच बरं.”सांगितल्यावर, पुन्हा जरा विचार करून आशा मावशी म्हणाल्या,….” आणि हो, इथली.. आणि साहेबांची काळजी अजिबात करायची नाही.या येड्या- बागड्या ध्यानाचा विचित्र स्वभाव ,विचित्र वागणं.. बोलणं, याची आम्हाला सवय झालीय.  साहेब म्हणजे देव माणूस… पगार पण चांगला देतात… अडचणीत मदत करतात. त्यामुळंच मी,स्वयंपाकीण काकू, माळी दादा इथे टिकून राहिलोय .नाहीतर आम्हाला गुलाम समजणाऱ्या या बाईकडे आम्ही ढुंकूनही पाहिलं नसतं.” बोलताना आशा मावशीचा सात्विक संताप उसळून आला होता.

संध्याकाळी चहाची तल्लफ आली तशी रेणू खाली उतरली.आणि सासूबाईंची चाहूल लागली नाही त्यामुळे मनातून खुष झाली. आल्याचा वाफाळलेला चहा पिता पिता म्हणाली,”आशामावशी यार, आता हा आठवडा खूप काम आहे मला. मी खाली पण उतरणार नाही. त्यामुळे माझा ब्रेकफास्ट, लंच सगळं सगळंच वर आणून द्यायचं. ओके?”               

बाहेर पावसाला खळ नव्हती.नदीचं पाणी वेगानं वाढत होतं…’पूर येणार असं वाटतंय’…. गावभर बोललं जाऊ लागलं होतं.पण रेणूला त्याची खबरबात नव्हती. माळी दादा, स्वयंपाकीण काकू दोघांचे पाठोपाठ फोन आले.घरात पाणी घुसलंय ,त्यामुळे ते येऊ शकणार नव्हते. आशा मावशीनं सगळं रेणूच्या कानावर घातलं. पण तिला कशाचीच फिक्र नव्हती. ऐकल्यावर थोडावेळ ती विचारात पडली,’ ही गोरगरिबांची घरं म्हणजे अशीच असतात नदीकाठी, लोअर एरियात.. त्यामुळे दर पावसाळ्यात पूर ठरलेला.’पुन्हा भूतकाळात शिरून ती विचार करू लागली,”आपला हा अवाढव्यव बंगला, डॅडीने किती विचारपूर्वक अगदी योग्य जागी  बांधलाय. बांधकाम पण असं की ना भूकंपाचा डर ना पूराची भीती…. शेवटी सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्टची बुद्धी’!…. छोटे शहर असले तरी लहानपणापासून सुट्टीत डॅडी बरोबर ती इथे येऊन राहायची. तिचं मन रमायचं. 

आईचा स्वभाव वेगळा! मिडलक्लास मेंटॅलिटीतून ती कधी बाहेरच पडली नाही. डॅडीचं आणि तिचं भांडण चालायचं. शेवटी डायव्होर्स झाला ….आई बद्दल कधी तिला प्रेम वाटलंच नाही. आई निघून गेल्यावर तर स्वच्छंद वागणं, पैसा उडवणं ,समाजाचे निती नियम मुद्दामून ठोकरणं यातच तिला आनंद वाटू लागला. शाळा, कॉलेजात पण तिची कुणाशी फारशी मैत्री नव्हती. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे , उच्च आहोत. ही भावना तिच्या मनात रुजली होती. ती मान्य करत नसली तरी  चित्रकलेचा वारसा तिला आईकडून मिळाला होता… आणि स्वभावाचा वडिलांकडून!बेपरवाही, अहंकार, उर्मटपणा हे जणू तिचे दागिनेच होते.

दहा-बारा वर्षाची असताना टीव्हीवर वरचेवर येणारी एक जाहिरात रेणू पहायची. त्यातली मॉडेल स्टार म्हणायची,”समझौता मैं नही करती… चलता है मैं नही कहती… मुझे चाहिए सिर्फ सौंदर्य साबून लक्स…” बस्स, तेव्हापासून तिला जगण्याचा एक फंडाच मिळाला होता.

“व्वाव्,क्या बात है! असंच जगलं पाहिजे. तडजोड ,चालवून घेणं.. छीऽ! असल्या मान खाली घालून  जगण्याला काय अर्थ आहे?’ तिचं तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान सगळं या तत्त्वावर उभं राहिलं होतं. ‘मला लक्षात आहे तेव्हापासून तरी आयुष्यात मी कधीच रडले नाही.मी स्ट्रॉंगआहे….कॉन्फिडंट आहे… मला इतर कुणाचीही गरज नाही….मी स्वावलंबीआहे… कुठल्याही संकटाला पळवून लावण्यास मी समर्थ आहे…..’ तिचे विचार चक्र चालूच होते. जेव्हा चंदननं तिला प्रपोज केलं तेव्हा तिने हेच ठासून सांगितलं होतं.’शिवाय पहिला काही काळ आपण लिव्हिंग मध्ये राहू. पटलं तर लग्न…. नाही तर आपले मार्ग वेगळे !’चंदन संगीतकार होता .त्याचा आपला एक बँड- ग्रुप होता. देश विदेशात त्यांचे कार्यक्रम चालायचे. आपली पत्नी एक साधारण गृहिणी असावी अशी त्याची अपेक्षाही नव्हती.त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन छान चालले होते.

क्रमशः …

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाजाळूचे अलगद मिटणे! — श्री ए.के.मराठे ☆ संग्राहिका – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ लाजाळूचे अलगद मिटणे! — श्री ए.के.मराठे ☆ संग्राहिका – श्री अनंत केळकर ☆  

निसर्गात,आपल्या आजूबाजूला अनेक आश्चर्यकारक गोष्टी असतात. लाजाळू वनस्पतीही अशीच एक आश्चर्यचकित करणारी आहे. स्पर्श होताच / धक्का लागताच लाजळूची पाने पटकन मिटतात हे आपण सगळेच जाणतो.

धसमुसळेपणा या वनस्पतीला अजिबात आवडत नाही. इंग्रजीत Touch Me Not नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या वनस्पतीचे एक पान अलगद पकडले, तर मात्र एक नितांत सुंदर कलाविष्कार पहावयास मिळतो. आपल्या बोटांची स्पर्श-ऊर्जा जसजशी भिनत जाईल, तसतशी लाजाळूच्या पानांची एकेक जोडी अलगद मिटत जाते.

निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !!!

लेखक : ए.के. मराठे, कुर्धे

9405751698

संग्राहक : अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले:- 

“आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी–तुम्हाला काय वाटतं ?”

त्यावर पती म्हणाला:- ” जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला, पळायला पण जाईन, पोहायला शिकवीन– अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन “

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला:- “आणि मुलगी झाली तर?”

यावर पतीने खूप छान उत्तर दिले.! ” जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही “

पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले:-  “का असे का.?” 

पती म्हणाला, ” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी ” दुसरी आई ” होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल.”

पति पुढे म्हणाला.! ” तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे. माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले: ” म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल, आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:- “अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा  मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकावं लागेल. मुलींचं तसं नाही. मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल . “

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली, ” पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे.? “

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला:- ” हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्या सोबत नसेल. पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू, ” तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे !! अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण,  मुली ह्या परीसारख्या असतात. त्या जन्मभरासाठी आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !! !” 

खरोखर मुली ह्या परीसारख्याच असतात !

ज्यांना मुलगी आहे…  अशा माझ्या सर्व मित्रांना व मैत्रिणींना, बहिणींना व भावांना, समर्पित !!

लेखक : अज्ञात

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घर कसं असावं? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घर कसं असावं? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

केवळ अपुल्या स्वार्थासाठी

कलह नसावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——-

 

येणार्‍याला पाणी द्यावे

स्वागतातही गोडी हवी

जाणार्‍याच्या मनांत फिरुनी

येण्यासाठी ओढ हवी

ऐसा प्रेमळ माणुसकीचा

झरा वहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——–

 

भांड्याला लागतेच भांडे

विसरुन जावे क्षणामधे

परस्परांना समजुन घ्यावे

अढी नसावी मनांमधे

रुसवे फुगवे नको फुकाचे

मोद रहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——-

 

नित्य काळजी घरात घ्यावी

वय झालेल्या पानांची

ज्याची त्याला द्यावी जागा

वयाप्रमाणे मानाची

एकमताने निर्णय घ्यावे

नको दुरावा मनामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——–

 

कवी  : रमण रणदिवे

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एकटी – कवी – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ?  एकटी – कवी – अज्ञात  ? ☆ संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

येतोस इथे

होऊन पाहुणा आता

रामतोस जुन्या

मित्रांसह येता जाता

मी थकले तरीही

तुजसाठी वावरते

जे आवडते तुज

तेच रांधुनी देते

पण ध्यान तुझे

मजपाशी असते नसते

मी तरीही तुजला

मनात टीपुनी घेते

ती सुट्टीही का

लवकर सरूनी जाते

तू गेल्यावरती

पुनः एकटी होते

कवी – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#158 ☆ बाल मन की कविता – हो जाऊँ मैं शीघ्र बड़ा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का  चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है बाल मन की कविता “हो जाऊँ मैं शीघ्र बड़ा…”)

☆  तन्मय साहित्य # 158 ☆

☆ बाल मन की कविता – हो जाऊँ मैं शीघ्र बड़ा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

(बालदिवस की हार्दिक शुभकामनाओं के साथ प्रस्तुत एक बाल मन की कविता)

आता है मन में विचार

मैं भी हो जाऊँ शीघ्र बड़ा

नहीं किसी की ओर निहारूँ

अपने पैरों रहूँ खड़ा।

 

चॉकलेट टॉफी के लिए

कहाँ तक  हम तरसेंगे

होंगे बड़े  करेंगे मेहनत

फिर  पैसे  बरसेंगे,

थोड़ी कंजूसी करके

भर लूँगा पूरा एक घड़ा।

आता है मन में विचार

मैं भी हो जाऊँ शीघ्र बड़ा….

 

इक दिन मैं बाजार गया

अंगूर सेंवफल लेने

बच्चा, हमें जान कर

हेर-फेर की फल वाले ने,

घर आकर देखा तो

एक सेवफल, पूरा मिला सड़ा।

आता है मन में विचार

मैं भी हो जाऊँ शीघ्र बड़ा।।

 

टोका टाकी रोज-रोज मैं

कब तक और सहूँगा

मम्मी पापा के अधीन

मैं कब तक और रहूँगा,

यही बात पूछी पापा से

चाँटा प्यार से मुझे पड़ा।

आता है मन में विचार

मैं भी हो जाऊँ शीघ्र बड़ा।।

 

फिर मम्मी ने समझाया

यह बाल उम्र ही अच्छी है

होंगे जितने बड़े, बढ़ेगी

उतनी  माथापच्ची है,

बात समझ में आई सच में

बचपन हीरो हार जड़ा।

आता है मन में विचार

मैं भी हो जाऊं शीघ्र बड़ा।।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

अलीगढ़/भोपाल   

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares