मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं?तेही, एका पैची अपेक्षा न ठेवता?शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले… राजाच्या डोळ्यात अश्रू आले.) इथून पुढे —- 

“ काका,तुम्ही बघत होतात..  मी कोणतीही अपेक्षा न ठेवता माझे वडील मानून गोगटेबाबांचं सगळं केलं. पण आता मीच बेघर व्हायची वेळ आली हो. मला एक महिन्यात जागा खाली करायला सांगत आहेत हे लोक. आता मी कुठं जाणार आणि एवढे पैसे घालून घर तरी कुठे घेणार? अहो कानी कपाळी ओरडत होती माझी बायकामुलं. पण मी त्यांचं कधीही ऐकलं नाही. माझ्या खाजगी नोकरीत  मला काही खूप पगार नाही आणि नव्हताही. कसे फेडणार होतो मी घर घेऊन हप्ते? या आउट हाऊसच्या तीन खोल्या पुरेशा होत्या आम्हाला काका.” राजाला अश्रू अनावर झाले.

दाते काका त्याच्या जवळ बसले आणि म्हणाले, “ राजा,देव असतो पाठीशी !माझा मित्र शहाणा होता. त्याला तुझ्या आपुलकीची, निरपेक्ष कष्टाची जाणीव होती बाबा ! जा घरी तू. उद्या मी बंगल्यावर येतोय. बारावे होईपर्यंत थांबलो होतो. जा तू. होईल सगळं ठीक बाळा !” 

राजा घरी आला. झोप उडाली होती त्याची. उद्या काय होणार आणि दातेकाका तरी काय चमत्कार करणार हे त्याला समजेना.  दुसरा दिवस उजाडला. सकाळी दाते काकानी सगळ्याना फोन करून घरी थांबायला सांगितले होतेच. दाते वकील घरात आले. म्हणाले, “आता तुमचे बाबा गेले !आता तुमचा विचार काय आहे?” तिघेही म्हणाले, “आम्ही हा बंगला विकणार काका. आम्ही तर परदेशात असतो. आता इथे कधीही येणार नाही आम्ही. “ 

“ बरं बरं ! मग या राजाचं काय? त्याने इतकी वर्षे इथे काढली. तुमच्या वडिलांच्या एकाही दुखण्याखुपण्यापासून ते अगदी अंत्यसंस्कारापर्यंत तुम्ही कुणी आलासुद्धा नाहीत. सगळं राजाने निभावलं. त्याची सोय काय? “ दात्यांनी विचारलं.

“ त्याची कसली आलीय सोय काका?  त्याने बघावं घर आता आपलं.” 

काका शांतपणे उठले. ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढले. हे माझ्या मित्राने केलेले कायदेशीर रजिस्टर्ड मृत्यपत्र. यात स्पष्ट  लिहिलंय ….  या बंगल्यातल्या सम्पूर्ण खालच्या मजल्यावर राजा गेले अनेक वर्षे भाडेकरू म्हणून रहातो. या बघा गेल्या वीस वर्षाच्या भाडेपावत्या ! तर आता तुम्ही हा बंगला भाडेकरू सकट विकत असाल तर उत्तम ! राजा खालचा मजला सोडणार नाही. तो कायदेशीर भाडेकरूआहे ! “ 

राजा आणि सगळी मंडळी थक्क झाली. राजाने मनोमन गोगटे बाबांना हातच जोडले. दाते मिस्कीलपणे हसत होते. आता लवकर बोला. मला वेळ नाही. राजा उद्या तू या खालच्या मजल्यावर शिफ्ट हो. केवळ बाबा होते म्हणूनच ना तू इथे रहात नव्हतास ?” दाते डोळा बारीक करून म्हणाले. “ होय हो काका,असंच झालंय.” राजा खूण समजून म्हणाला… “ मग आता तू ते आऊट हाऊस सोडून दे आणि इथे रहायला लाग. तू कायदेशीर भाडेकरू आहेस गेली वीस वर्षे. या बघा भाडे पावत्या. गोगटे काकांची सही असलेल्या सर्व पावत्या फाईलला व्यवस्थित लावलेल्या होत्या. तिन्ही भावंडांची बोलती बंद झाली. आता कसला बंगला विकला जाणार? कोण घेईल असा पूर्ण मजला भाडेकरूकडे असलेला बंगला?..   

दाते वकील निघून गेले.संध्याकाळी राजा त्यांना भेटायला गेला. त्याने दात्यांचे पायच धरले. “ काका,ही सगळी काय भानगड आहे ? माझी मती गुंग झालीय खरंच ! “ 

“ सगळं सांगतो. बस इथं ! हे बघ.माझा मित्र गोगटे काही मूर्ख नव्हता. तिन्ही आपमतलबी मुलं त्याला काय माहित नव्हती का?  मला सगळं सांगायचा बरं गोगटे ! प्रसंगी माझा सल्लाही विचारायचा तो. ती नीता एक नंबरची स्वार्थी आणि हावरट ! जवळजवळ सगळं  दागिन्यांचं कपाट साफ केलंय तिनं. तू किती आपुलकीने प्रत्येकवेळी गोगटेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंस, त्याच्या सर्व ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळ कायम होतास, हे तो कसा विसरेल? त्यानेही तुझ्यावर मुलापेक्षा जास्त माया केली आणि तुझी त्याच्यापश्चात सोयही करून ठेवली. ही मुलं तुझा उपयोग करून घेणार,आणि तुला बाहेर काढणार याची खात्रीच होती त्याला. म्हणून माझ्याच सल्ल्याने या भाडेपावत्या करून ठेवल्या आम्ही.आता तू कायदेशीर भाडेकरू ठरतोस.” 

 “ काका,मला खूप अवघड वाटेल हो असं तिथे रहायला ! नको नको,मी नाही जाणार असा तिथे ! “

“ अरे वेड्या, पुढची गम्मत काय होते ते बघत रहा. माझ्या अंदाजाने हे धूर्त लोक आता माझ्याकडे येतील. माझा सल्ला विचारतील. तुला कसे काढायचे हे विचारतील. तेव्हा मी सांगणार, ‘ तुम्हाला बंगल्याची चांगली किंमत यायला हवी असेल तर राजाला दुसरीकडे फ्लॅट घेऊन द्या. तरच तो खालचा मजला सोडेल. त्याने का म्हणून जावे दुसरीकडे?’.. अरे राजा, तुला आपोआप चांगला फ्लॅट विनासायास मिळेल बघ .ते झक्कत देणार तुला फ्लॅट ! तेव्हा मात्र उगीच दोन खोल्यांचा घेऊ नकोस. तू सगळं सगळं केलं आहेस ना  बाबांचं? मग या चोरांना सोडू नकोस. मी बघून देईन तुला चार रूम्सचा फ्लॅट ! आपण काही ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खात नाही आहोत. हे झाले की मग मीही  मित्रकर्तव्यातून मोकळा होईन. माझी भरपूर फी गोगटेने आधीच दिलीय बरं ! भला माणूस माझा मित्र.” दाते आणि राजा दोघांचेही डोळे भरून आले. 

अपेक्षेप्रमाणे तिन्ही भावंडे आलीच दाते वकिलांकडे.. ‘  निर्वेध बंगला असेल तर फार उत्तम. किंमत लगेचच येत होती. आता आम्ही काय करू आणि राजाला कसे बाहेर काढू?’ हा सल्ला विचारत होते तिघेही. दाते म्हणाले, “ तो असा कसा जाईल? आता तुम्ही जर त्याला बाहेर फ्लॅट घेऊन दिलात तर मग बघता येईल.” 

“ काका, तीस पस्तीस लाखाचा फ्लॅट द्यायचा का  या चोरालाआम्ही ?” .. तणतणत तिघेही म्हणाले.

“ नका देऊ मग. तो राहील की तिथेच. मला मूर्ख समजू नका. गोगटेच्या बंगल्याची किंमत आज चार कोटी तर आहेच. कमी येत नाहीयेत तुम्हाला बंगला विकून पैसे ! ही गोगटेची इच्छा होती, राजा बंगल्यातच रहावा. तो कुठे म्हणतोय मला फ्लॅट द्या? बघा बुवा! “ 

आठच दिवसात राजाच्या पसंतीचा फ्लॅट  तिघा भावंडांनी त्याला दाखवला. दाते वकिलांनी कायदेशीर  कागदपत्रे तयार करून फ्लॅट राजाच्या नावावर केला. राजाने आऊट हाऊस लगेचच सोडले आणि पुढच्याच महिन्यात भरपूर किमतीला बंगला विकला गेला. पैशाची वाटणी करून दोघे भाऊ अमेरिकेला निघून गेले. राजाला फार सुरेख फ्लॅट मिळाला.

राजाने  दाते  काकांना घरी जेवायला बोलावले आणि मोठी रक्कम त्यांच्या हातात ठेवली. “ काका,तुम्ही नसतात तर आज मी कुठे गेलो असतो हो ? गोगटे बाबा आणि तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर “  राजाला रडू आवरले नाही. रोहन आणि रंजना त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले, “ आम्ही चुकलो. तुमच्या निरपेक्ष सेवेचं भरघोस फळ तुम्हाला मिळालं. आम्हाला  तुम्ही माफ करा बाबा. दाते आजोबा,  किती आभार मानावे तुमचे ते कमीच आहेत खरं तर ” रोहन म्हणाला.

“ बघा ना, गोगटेआजोबा गेल्याक्षणीच त्यांची मुलं बाबांना घर सोडायला सांगत होती. आज हे मृत्युपत्र नसते आणि तुम्ही ते गोगटे काकांकडून हुशारीने करून घेतले नसते, तर मात्र आम्ही रस्त्यावर आलोच असतो “. रोहनच्याही डोळ्यात पाणी आलं. “ अरे हो बाळा, हे असंच घडलं असतं, पण सत्याचा वाली देव असतो बाबा. तुझ्या बाबांना न्याय मिळाला बस. मी मित्रकर्तव्यातून मुक्त झालो. रोहन,तू सुद्धा तुझ्या बाबांसारखाच सरळ सज्जनपणे वाग. देव आपल्याला काही कमी  पडू देत नाही.” 

…. दाते काकांचेही डोळे मित्राच्या आठवणीने भरून आले होते .

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर

वारीचा पहिला दिवस – पहिला अनुभव – पहिली परीक्षा

एका ओळीत चालत मुखाने हरिनाम स्मरण करीत हळू-हळू शहरातील रस्त्यांवरून वारी चालली। पुढे जाता जाता अजूनही काही दिंड्या येऊन सहभागी होऊ लागल्या …. जसे गावागावातून वहात येणाऱ्या लहान नद्या पुढे एका नदीत येऊन मिसळतात नि एक मोठी नदी निर्माण होते … तसेच काहीसे वाटून गेले. वारीचा खरा उत्साह आता दिसू लागला होता। चहुकडे नुसता नामाचा गजर, भारी गर्दी, त्यांत आता आमच्या दिंडीचे वारकरी वेगळे होऊन गेले। रांग वगैरे सगळी संपली। आता आपण फक्त एका गावचे नाही …  आता संपूर्ण विश्व आपला परिवार आहे असा भाव निर्माण झाला। वारकरी आपसांत एकमेकांना माऊली हे असे संबोधतात । भक्तीची ही असाधारण भावना बघून माझे मन भारावून गेले, आणि त्याच क्षणी मी निर्णय केला की  घरी गेल्यावर हे सर्व विस्ताराने लिहायचे,  ज्याने श्रध्देचा हा अनुभव इतरांना घेता येईल। 

आता थोडे त्यांचे वर्णन, जे स्वतः प्रत्यक्ष वारीत नव्हते पण ज्यांची भावना वारकऱ्यांपेक्षा कुठेही कमी नव्हती। शहरांत चालत असतांना पदोपदी पाण्याची बॉटल, त्या दिवशी एकादशी असल्यामुळे, राजगिरा पापडी, लाडू, केळी, चहा, शेंगदाण्याचे लाडू, साबूदाणा, असे बरेच काही घेऊन अनेक श्रध्दाळू रस्त्याच्या कडेला उभे राहून विनवणी करून वारकऱ्यांना देत होते। काही काही ठिकाणी तर एक दोन वर्षाच्या पोरांना छान धोतर किंवा छोटंस नउवारी घालून सजवून कडेवर घेऊन त्यांच्या हातून वस्तू देत होते- काका याच्याहातून एक तरी घ्या। असा प्रेमळ आग्रह करत होते. एके ठिकाणी तर एक मध्यम वयाचे गृहस्थ हातात एक दोन रुपयांची नाणी घेऊन वारकऱ्यांना एक एक देत होते, त्यामागे भावना ही असावी की वस्तु नाही तरी अशी काही सेवा आपल्या हातून व्हावी। धन्य तेची जन, जयांचे संत चरणी मन !! पुढे मिलिट्री, डॉक्टर हे सर्वपण सेवेत हजर होते। याच ठिकाणी माऊलींच्या रथाचे पहिले दर्शन मला झाले। खूप जवळून पाहता आले।

पुणे सोडल्यावर माझी पहिली परीक्षा सुरू झाली, जेव्हा समोर दिवेघाट दिसायला लागला। याक्षणी यात्रेवर निघायच्या आधीचे सर्वांचे बोलणे मला आठवू लागले। सात महिन्यापूर्वी हृदयाघात कारणाने दोन स्टेंट घालावे लागले असल्यामुळे सगळयांनी खूप शंका व्यक्त केल्या होत्या की आता काय ही परीक्षा पास होणार का? देवाचे नाव घेतले नि सर्वांच्यासोबत घाटाच्या रस्त्यावर पहिले पाऊल ठेवले। वर सूर्यनारायण पूर्ण तेज घेऊन हजर होते। आता या मार्गी खाण्या-पिण्याची सोय जवळपास संपली होती.  वर तळतळतं ऊन नि खाली ज्ञानबा-तुकाराम-एकनाथ-मुक्ताबाई चा सतत गजर। येथे मी विशेष उल्लेख करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे भरपूर टैंकर सोबत होते. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होत होती। घाटात एकीकडून पायी चालणारे नि अर्ध्या भागात दिंडीची वाहनं, रुग्ण्वाहिका चालत होत्या। दर एक दीड तासांनी रस्त्याच्या काठावर थांबायचे, दोन घोट पाणी घेऊन पुढे चालायचे। एका उत्साहात बिना काही त्रासाचा आठ कि.मी. चा हा घाट अखेरी संपला आणि पुढे समतल मैदानांत डाव्या बाजूला  ठेवूनिया कर कटेवरी उभा तो विठोबा–  अशी भली मोठी मूर्ति दिसली. एकदा वाटले – आलो का काय पंढरपुराला !!! पुढे पुष्कळ चालून सायंकाळी सुमारे पाच वाजता सासवडला आमच्या ठरलेल्या ठिकाणी- दादा जाधवराव मंगल कार्यालय येथे आलो।

तिथे अजून ही दिंड्या थांबल्या असल्याचे दिसून आले। संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि प्रवचनाचा पहिला कार्यक्रम झाला। त्या वेळी दिंडी प्रमुख डॉ भावार्थ देखणे आणि त्यांच्या भार्या सौ पूजा देखणे यांस व्यासपीठावर ऐकायची संधी मिळाली। वारकरी संप्रदायाशी पूर्वीचा काही परिचय नसल्यामुळे माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता। या अगोदर कधीच मी हरिपाठ ऐकला नव्हता। आतापर्यत काही बंधु भगिनींशी प्राथमिक ओळख झाली होती। वारीबद्दल माहिती साठी इंटरनेटवर बरंच काही वाचलं होतं.  पण माझा अनुभव त्यापेक्षा बराच वेगळा होता। प्रवचन आणि हरिपाठ अत्यंत सुरेख झाला, इथे मी देखणे दंपतिचे अभिनंदन करू इच्छितो की या तरुण वयात आणि स्वतः उच्चशिक्षित नि कॉर्पारेट क्षेत्रात उच्च पदी असूनही देवाच्या कामात येवढे कौशल्य !! मला स्तुत्य वाटले। त्यांच्या संगतीला टाळवादकांची ती एकसम पदचालना-पावली, जसे काही नृत्यच आणि पखावजाची ती उत्तम साथ, सर्व तरुण वयाचे, आनंद वाटला। आजचा दिवस सर्वात जास्त चालणे झाल्यामुळे पुढे १५ जूनला सासवडला विश्राम होता। इथे माझ्या पायाला झालेल्या छाल्यांकरिता मी औषध घेतले।

१६ जून :: येळकोट येळकोट जय मल्हार : जेजुरी तीर्थक्षेत्र अंतर २०.९४ कि.मी. 

सासवडच्या विश्रांतीनंतर नवीन उत्साह घेऊन आम्ही निघालो जेजूरीला। हे मल्हारी मार्तण्ड किंवा खंडोबाचे जागृत तीर्थस्थान आहे। एका उंच गडावर पायऱ्या चढून दर्शनाला जावे लागते। अतिशय गर्दी आणि थकवा असल्यामुळे मी दर्शनाला जाऊ शकलो नाही, किंवा खण्डोबाची मला आज्ञा नसावी असेही म्हणता येईल। येथे गावाच्या सुरुवातीला उजव्या हाताला एक प्राचीन देऊळ पाहिले, ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी ‘लवथवती विक्राळा‘— ही शंकराची आरती लिहिली असा तिथे उल्लेख केला होता। देवळाला लागून एक तलाव दिसला जो अत्यंत घाण होता। आजच्या रस्त्यात पुन्हा चहा-कॉफी, वडापाव, उसाचा रस, सोडा आणि खूप काही खाय-प्यायची दुकानं होतीच. त्याशिवाय अनेक संस्थांतर्फे अन्न, पाणी, चहा याची मोफत वाटप केले जात होते। उसाच्या रसाच्या सगळया स्टॉलवर आधीच रेकॉर्ड केलेली कमेंटरी फार मजेदार होती। चंद्रभागेच्या पाण्याने जोपासलेल्या उसाचा अमृतासारखा गोड रस ‘ विठाई रसवंती ‘च्या नावाने फक्त पाच रुपयांत एक ग्लास मिळत होता, तो यात्रेत मी एक दोनदा घेतला सुध्दा। वारीला जातांना रस्ता कसा असेल याची शंका आता मिटली होती, कारण पूर्ण रस्ता रुंद हायवे होता, कुठेच उतार चढाव आणि वळण नव्हते। येथे आमचे मुक्कामाचे ठिकाण शोधायला खूप विचारावे लागले। आजचा मुक्काम श्री.आगलावे यांच्या धर्मशाळेत होता। रात्री दररोजप्रमाणे हरिपाठ ज्या ठिकाणी झाला ते एक अतिशय सुंदर राम मंदिराचे आंगण। छान गार वारा होता आणि सोबत सरस हरिपाठ। याच सत्संगात सौ.  माईंची अभंग प्रस्तुति – ‘ खंडेराया तुज करिते नवसू-मरू दे रे सासू- खंडेराया ‘, आणि सोबत डॉ. भावार्थचे संबळ वादन हे मी पहिल्यांदा ऐकले। खरं तर हे वाद्य पण पहिल्यांदाच पाहिले। त्या वास्तुचे मालक पण तिथे उपस्थित होते। रात्री नऊ वाजता जेवण नि नंतर विश्रांति।

– क्रमशः भाग दुसरा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे

(एका इंग्लिश पोस्टवर आधारित)

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  

एका मूर्खाने काहीही विचार न करता  ते सोडवले.  

गाढव शेतात घुसले आणि जोरजोरात ओरडू लागले.

हे पाहून शेतकऱ्याच्या पत्नीने चिडून गाढवाला गोळ्या घालून ठार केले.

गाढवाचा मालक चिडला.  त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला गोळ्या घातल्या.

बायको मेलेली पाहून शेतकरी परत आला, त्याने जाऊन गाढवाच्या मालकाला गोळ्या घातल्या.  

गाढवाच्या मालकाच्या पत्नीने आपल्या मुलांना जाऊन शेतकऱ्याचे घर जाळण्यास सांगितले.

पोरांनी संध्याकाळी उशिरा जाऊन आईची आज्ञा आनंदाने पार पाडली, त्यांना वाटले शेतकरीही घरासह जळाला असेल.  

खेदाची गोष्ट म्हणजे तसे झाले नव्हते…..  शेतकरी परत आला.  तो एकटाच असल्याने त्याला असहाय्य वाटू लागले. त्याने आपले जाती बांधव एकत्र केले आणि त्यांना गाढवाच्या मालकाच्या जातीवरून आरोप करून चिथवले आणि त्यांनी गाढवाच्या मालकाच्या पत्नी आणि दोन मुलांना घरासह आग लावून जाळले.

मग गाढवाच्या मालकाचे जाती बांधव एकत्र झाले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जाति बांधवांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर  दोन्ही जातींमध्ये प्रचंड धुमश्चक्री आणि राडा झाला.

त्यानंतर ठिकठिकाणी जाती-जातींमध्ये व धर्माधर्मांमध्ये उद्रेक सुरू झाले. 

खूपच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दंगे सुरू झाल्याने ते शमविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले.

सैन्यबळ देशांतर्गत यादवीमध्ये गुंतलेले पाहून शत्रूने देशावर चाल केली….. 

हे सर्व पाहून व्यथित झालेल्या एका साधूने त्या मूर्ख व्यक्तीला म्हटले,  ” बघ तुझ्यामुळे देशावर किती मोठे संकट ओढवले !”

तो म्हणाला, ” मी काय केले ? मी फक्त गाढवाला सोडले.”

तो साधू म्हणाला,  ” हो, पण, त्यावर सर्वांनी अविचाराने चुकीची प्रतिक्रिया दिली, कुणाचे तरी ऐकून कुणाला तरी दोषी ठरवले,  आणि आपल्या मनातल्या भुताला सोडले.”

आता तरी तुम्हाला कळलं का?—- कुणीही काहीही करत नाही. कुणीतरी मूर्ख  तुमच्यातील अहंकाराला चालना देऊन दुष्प्रवृत्तींना जागृत करतो…..

……  त्यामुळे पुढच्या वेळी प्रत्युत्तर देण्यापूर्वी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी, तक्रार करण्यापूर्वी, दटावण्यापूर्वी किंवा सूड उगवण्यापूर्वी ……  थांबा आणि विचार करा.  काळजी घ्या……  कारण ….  

…… अनेक वेळा कुणीतरी मूर्ख फक्त गाढवाला सोडतो.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते.घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत.शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या,फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची.रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे.पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !आस-पास,शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची.पण शास्त्रीबुवांची बायको-मुलं मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत.पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून,भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे.पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेनं पहात असे.त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई.

आजचा दिवसही सणाचा,दिवाळीचा होता !

घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला.तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते .मुलं सकाळपासून उपाशी होती.आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते.

शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला,’इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला,ना कधीही आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण आज अस्वस्थ का वाटतंय ? परमेश्वर दयाळू असतो,असं म्हणतात.मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये ?आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे ?होय.तसंच असलं पाहिजे.तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस पहावे लागले नसते.’

विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.

पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते.त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं.तो शब्द होता ”दयाघन” !

त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.

जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता.तो त्यांनी उचलला आणि त्या ”दयाघन” शब्दावर फुली मारली !

त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती.

त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला,सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली.त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या.निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.

श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती.

इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली.शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवेकोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत,

मुलांच्या अंगावर ओरडले,

” काय रे ! कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?”

दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही,असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत,असं क्षणभर का होईना,पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,

” बाबा,इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !

आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीय !”

श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.

घरी येऊन पहातात तर काय? घरभर दिवे तेजाळत होते.सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता.एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकारांनी ती सजली होती.शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं,”एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?”

” काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला.आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला.जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय.”

शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.

” काय निरोप दिलाय ?”

श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.

” त्यानं निरोप दिलाय की..

‘शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !’…

कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?”

पत्नीनं गोंधळून विचारलं.

क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.

पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता,कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली.हळूवार उघडली.आणि पानावरच्या ”दयाघन” या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली.

पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली.

श्रद्धा !

श्रद्धा असली म्हणजे  जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते..

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #203 ☆ व्यंग्य – एक इज़्ज़तदार आदमी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक सार्थक व्यंग्य ‘एक इज़्ज़तदार आदमी’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 203 ☆
☆ व्यंग्य ☆ एक इज़्ज़तदार आदमी
अंग्रेजी भाषा कई लोगों का कल्याण करती है। अंग्रेजी भाषा की बदौलत ही धनीराम वर्मा मिस्टर डी.आर. वर्मा बन जाते हैं। डी.आर. धनीराम, देशराज, डल्लाराम, धृतराष्ट्र सबको बराबर कर देता है। हिन्दी ज़्यादा से ज़्यादा धनीराम वर्मा को ध.रा. वर्मा बना सकती है, लेकिन डी.आर. में जो रोब है वह भला ध.रा. में कहाँ?

धनीराम वर्मा मेरे ऑफिस में छोटा अधिकारी है। अपनी पोज़ीशन और पहनावे के बारे में वह बेहद सजग है। बिना टाई लगाये वह दफ्तर में पाँव नहीं रखता। गर्मी के दिनों में टाई उसके गले की फाँस बन जाती है, लेकिन वह टाई ज़रूर बाँधता है।

टाइयों के मामले में उसकी रुचि घटिया है। उसकी सारी टाइयाँ भद्दे आकार और रंग वाली, मामूली कपड़ों के टुकड़ों जैसी हैं, लेकिन वह मरी छिपकली की तरह उन्हें छाती पर बैठाये रहता है।

बात होने पर वह अपनी स्थिति समझाता है। कहता है, ‘भई, बात यह है कि मैं तो मामूली खानदान का हूँ, लेकिन मेरी वाइफ ऊँचे खानदान की है। चार साले हैं। तीन क्लास वन पोस्ट पर हैं, चौथा बड़ा बिज़नेसमैन है। मेरे फादर- इन-लॉ भी सिंडिकेट बैंक के मैनेजर से रिटायर हुए। आइ मीन हाई कनेक्शंस। इसीलिए मेरी वाइफ मेरे कपड़े-लत्तों के मामले में कांशस है।’

उसे अपने फादर-इन लॉ और ब्रदर्स-इन-लॉ के बारे में बताने में बहुत गर्व होता है। चेहरा गर्व से फूल जाता है। किसी से परिचय होने पर वह अपने फादर-इन-लॉ और ब्रदर्स-इन-लॉ का हवाला ज़रूर देता है। दफ्तर के लोग उसकी इस आदत से परिचित हैं, इसलिए जैसे ही वह अपनी ससुराल का पंचांग खोलता है, लोग दाहिने बायें छिटक जाते हैं।

लेकिन इस रुख का कोई असर वर्मा पर नहीं होता। कोई मकान देखने पर वह टिप्पणी करता है— ‘मेरे फादर-इन-लॉ के मकान का दरवाजा भी इसी डिज़ाइन का है।’ कोई कार देखकर कहता है— ‘मेरे बड़े ब्रदर-इन-लॉ ने भी अभी अभी नई इन्नोवा खरीदी है।’ बेचारा ससुराल के ‘परावर्तित गौरव’ में नहाता-धोता रहता है।

बेहतर खानदान वाली बीवी का शिकंजा उस पर ज़बरदस्त है। जब हम लोग आपस में बैठकर भद्र-अभद्र मज़ाक से जी हल्का करते हैं तब वह मुँह बनाये, फाइलों में नज़र गड़ाये रहता है। बाद में कहता है, ‘भई, बात यह है कि माइ वाइफ डज़ंट लाइक चीप जोक्स। वह बहुत कल्चर्ड खानदान की है। यू सी, शी इज़ वेल कनेक्टेड। उसके घर में कोई हल्के मज़ाक नहीं करता।’

दफ्तर में वह आन्दोलन, विरोध वगैरह में हिस्सा नहीं लेता। कहता है, ‘यह सब कल्चर्ड आदमी के लिए ठीक नहीं है।वी शुड बिहेव लाइक कल्चर्ड पीपुल। हम बात करें, लिख कर दें, लेकिन यह शोर मचाना, नारेबाज़ी करना मुझे पसन्द नहीं है। मेरी वाइफ भी इसको पसन्द नहीं करती। यू सी, शी बिलांग्स टु अ वेरी कल्चर्ड फेमिली।’
दफ्तर में लोग इस नक्कूपन पर उससे बहुत उलझते हैं, उससे बहस करते हैं, लेकिन उस पर कोई असर नहीं होता। वह अपनी टाई सँभालते हुए कहता है, ‘भई देखिए, दिस इज़ अ मैटर आफ प्रिंसिपिल्स। मैं अपने प्रिंसिपिल्स से हटकर कोई काम नहीं कर सकता।’

एक बार उसने हम तीन चार लोगों को अपने घर खाने पर बुलाया था। उसकी बीवी से साक्षात्कार हुआ। ऐसी ठंडी शालीनता और ऐसा रोबदार व्यवहार कि हम बगलें झाँकने लगे। लगा जैसे हम महारानी एलिज़ाबेथ की उपस्थिति में हों। उसके मुँह से एक एक शब्द ऐसे निकलता था जैसे हम पर कृपा-बिन्दु टपका रही हो।

वर्मा का ड्राइंग रूम अंग्रेजी फैशन से सजा था। नीचे गलीचा था। बीवी के साथ उसके दो फोटो थे। बाकी फादर-इन-लॉ और ब्रदर्स-इन-लॉ के थे। उसके खुद के बाप का कोई फोटो वहाँ नहीं था।

खाने का इन्तज़ाम भी बिलकुल अंग्रेजी नमूने का था। काँटा, छुरी,नेपकिन सब हाज़िर। हमसे ज्यादा आतंकित वर्मा था। हमारे हाथ से काँटा छूट कर प्लेट से टकराता तो वह आतंकित होकर बीवी की तरफ देखने लगता। हम ज़ोर से बोलते तो वह कान खड़े कर के भीतर की टोह लेने लगता। उस पर उसकी बीवी का भयंकर खौफ था। हम भी ऐसे सहमे थे कि खाना चबाते वक्त मुँह से आवाज़ निकल जाती तो हमारे मुँह की हरकत रुक जाती और हम वर्मा का मुँह देखने लगते। हमने ऐसे भोजन किया जैसे किसी की मौत की दावत खा रहे हों।

वर्मा का घर उसके लिए काफी था, लेकिन वह उसके ‘इन लॉज़’ के हिसाब से स्टैंडर्ड का नहीं था। इसलिए उसने पिछले साल मकान बनाने का निश्चय किया। दफ्तर से उसने ऋण लिया और मकान बनना शुरू हो गया।

हमने वर्मा को सलाह दी कि वह अपनी हैसियत के हिसाब से छोटा मकान बनाये, लेकिन उसे अपने ‘इन लॉज़’ की चिन्ता ज़्यादा थी। इसलिए वह बंगला बनाने की जुगत में लग गया। जल्दी ही नतीजा सामने आया। पैसे सब खत्म हो गये और मकान आधा भी न बना।

वर्मा की हालत खराब हो गयी। अब वह दफ्तर में सारा समय कागज़ पर कुछ गुणा-भाग लगाता रहता। बीच बीच में माथा, आँखें, नाक और गर्दन पोंछता रहता। मकान उसकी गर्दन पर सवार हो गया था। उसे दीन- दुनिया की कुछ खबर नहीं थी।

कई बार उसने मुझसे कहा, ‘यार, मकान में बहुत पैसा लग गया। वाइफ के सारे जे़वर गिरवी रखने पड़े। बाज़ार का भी काफी कर्ज़ चढ़ गया। क्या करें? मकान तो ज़िन्दगी में एक बार ही बनता है। नाते-रिश्तेदार महसूस तो करें कि मकान बनाया है।

अंत़तः मकान बन गया। एकदम शानदार। सिर्फ चारदीवारी और गेट नहीं बन पाया क्योंकि पैसे खत्म हो गये और अब कर्ज़ देने वाला कोई नहीं बचा। लेकिन फिर भी वर्मा खुश था क्योंकि अब वह अपने ‘इन लॉज़’ को बिना शर्मिंदा हुए बुला सकता था।

मकान पूरा होने के बाद उसके ‘इन लॉज़’ का आना शुरू हो गया। एक के बाद एक उसके तीन साले पधारे। जब भी आते, वर्मा किराये की एक कार का इन्तज़ाम करता, उन्हें संगमरमर की चट्टानें दिखाता, सिनेमा दिखाता। गाड़ी चौबीस घंटे सेवा में खड़ी रहती। खाने पीने की ढेर सारी चीजें आतीं। उस वक्त वर्मा दफ्तर से छुट्टी लेकर पूरा शाहंशाह बन जाता। बाद में मुझे बताता— ‘तीसरे ब्रदर-इन-लॉ आये थे। मकान देखकर हैरत में आ गये। मान गये कि हम भी कोई चीज़ हैं।’

लेकिन अब कुछ और भी बातें होने लगीं। अब दफ्तर में कुछ लोग उसे ढूंढते आने लगे। उन्हें देखकर उसका मुँह उतर जाता। वह जल्दी से उठ कर उन्हें कहीं अलग ले जाता। उनकी बातें तो सुनायी नहीं देती थीं, लेकिन उनके हाव-भाव देख कर पता चल जाता था कि क्या बातें हो रही हैं। उन आदमियों के चले जाने पर वर्मा देर तक बैठा पसीना पोंछता रहता।

ऐसे लोगों की संख्या बढ़ती गयी। अंत में ऐसे लोग बड़े साहब के पास अपने ऋण का तकाज़ा लेकर पहुँचने लगे। बड़े साहब ने वर्मा को बुलाकर हिदायत दी कि अगर भविष्य में उसका कोई ऋणदाता दफ्तर में आया तो वर्मा के खिलाफ कार्रवाई होगी। वर्मा दो पाटों के बीच में फँस गया। सुना कि बहुत से लोग उसके नवनिर्मित महल के चक्कर लगाते थे और वह उनसे भागा फिरता था। उसकी अनुपस्थिति में ऋणदाताओं के सारे श्रद्धा-सुमन उसकी बीवी के हिस्से में आते थे। सुना कि अब उसका आभिजात्य कई डिग्री कम हो गया था।

एक रात वर्मा हड़बड़ाया हुआ मेरे घर में घुस आया। घुसते ही उसने पानी माँगा। बैठकर उसने पसीना पोंछा, बोला, ‘यह चौधरी भी एकदम गुंडा है। बाजार में तीन चार आदमियों के साथ मुझे घेर लिया। कहता था बीच बाजार में मेरे कपड़े उतारेगा। जस्ट सी हाउ अनकल्चर्ड। सिर्फ बीस हज़ार रुपयों के लिए मेरी बेइज्ज़ती करेगा। दिस मैन हैज़ नो मैनर्स। मैं किसी तरह स्कूटर स्टार्ट करके यहाँ भाग आया। घर नहीं गया। सोचा वे पीछा करते शायद घर पहुँच जाएँ।’

वह घंटे भर तक मेरे यहाँ बैठा रहा। उसके बाद उसने विदा ली। चलते वक्त बोला— ‘यार शर्मा, इन पैसे वालों ने तो ज़िन्दगी हैल बना दी। एकदम नरक। ज़िन्दगी का सारा मज़ा खत्म हो गया। साले एकदम खून चूसने वाले हैं।’

फिर कुछ याद करके बोला, ‘हाँ याद आया। इस संडे को मेरे चौथे ब्रदर-इन-लॉ आ रहे हैं। मेरे खयाल से वे भी मेरे ठाठ देख कर इंप्रेस्ड होंगे। व्हाट डू यू थिंक?’
फिर मेरी सहमति पाकर वह स्कूटर स्टार्ट करके कोई गीत गुनगुनाता हुआ चला गया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 148 ☆ नवगीत – शब्दों की भी मर्यादा है  ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक नवगीत “सॉनेट – महर्षि महेश योगी)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 148 ☆

☆ नवगीत – शब्दों की भी मर्यादा है ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

हल्ला-गुल्ला, शोर-शराबा

क्यों उल्लास-ख़ुशी हुडदंगा?

शब्दों का मत दुरूपयोग कर.

शब्द चाहता यह वादा है

शब्दों की भी मर्यादा है

*

शब्द नाद है, शब्द ताल है.

गत-अब-आगत, यही काल है

पल-पल का हँस सदुपयोग कर  

उत्तम वह है जो सादा है

शब्दों की भी मर्यादा है

*

सुर, सरगम, धुन, लय, गति-यति है

समझ-साध सदबुद्धि-सुमति है

कर उपयोग न किन्तु भोग कर

बोझ अहं का नयों लादा है?

शब्दों की भी मर्यादा है

*

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१४-१२-२०१६, जबलपुर

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 202 ☆ देह से हूँ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 202 देह से हूँ ?

समय के प्रवाह के साथ एक प्रश्न मनुष्य के लिए यक्षप्रश्न बन चुका है। यह प्रश्न पूछता है कि जीवन कैसे जिएँ?

इस प्रश्न का अपना-अपना उत्तर पाने का प्रयास हरेक ने किया। जीवन सापेक्ष है, अत: किसी भी उत्तर को पूरी तरह खारिज़ नहीं किया जा सकता। तथापि एक सत्य यह भी है कि अधिकांश उत्तर भौतिकता तजने या उससे बचने का आह्वान करते दीख पड़ते हैं।

मंथन और विवेचन यहीं से आरम्भ होता है। स्मार्टफोन या कम्प्युटर के प्रोसेसर में बहुत सारे इनबिल्ट प्रोग्राम्स होते हैं। यह इनबिल्ट उस सिस्टम का प्राण है। विकृति, प्रकृति और संस्कृति मनुष्य में इसी तरह इनबिल्ट होती हैं। जीवन इनबिल्ट से दूर भागने के लिए नहीं, इनबिल्ट का उपयोग कर सार्थक जीने के लिए है।

मनुष्य पंचेंद्रियों का दास है। इस कथन का दूसरा आयाम है कि मनुष्य पंचेंद्रियों का स्वामी है। मनुष्य पंचतत्व से उपजा है, मनुष्य पंचेंद्रियों के माध्यम से जीवनरस ग्रहण करता है। भ्रमर और रसपान की शृंखला टूटेगी तो जगत का चक्र परिवर्तित हो जाएगा, संभव है कि खंडित हो जाए। कर्म से, श्रम से पलायन किसी प्रश्न का उत्तर नहीं होता। गृहस्थ आश्रम भी उत्तर पाने का एक तपोपथ है। साधु होना अपवाद है, असाधु रहना परम्परा। सब साधु होने लगे तो असाधु होना अपवाद हो जाएगा। तब अपवाद पूजा जाने लगेगा, जीवन उसके इर्द-गिर्द अपना स्थान बनाने लगेगा।

एक कथा सुनाता हूँ। नगरवासियों ने तय किया कि सभी वेश्याओं को नगर से निकाल बाहर किया जाए। निर्णय पर अमल हुआ। वरांगनाओं को जंगल में स्थित एक खंडहर में छोड़ दिया गया। कुछ वर्ष बाद नगर खंडहर हो गया जबकि खंडहर के इर्द-गिर्द नया नगर बस गया।

समाज किसी वर्गविशेष से नहीं बनता। हर वर्ग घटक है समाज का। हर वर्ग अनिवार्य है समाज के लिए। हर वर्ग के बीच संतुलन भी अनिवार्य है समाज के विकास के लिए। इसी भाँति संसार में देह धारण की है तो हर तरह की भौतिकता, काम, क्रोध, लोभ, मोह, सब अंतर्भूत हैं। परिवार और अपने भविष्य के लिए भौतिक साधन जुटाना कर्म है और अनिवार्य कर्तव्य भी।

जुटाने के साथ देने की वृत्ति भी विकसित हो जाए तो भौतिकता भी परमार्थ का कारण और कारक बन सकती है। मनुष्य अपने ‘स्व’ के दायरे में मनुष्यता को ले आए तो स्वार्थ विस्तार पाकर परमार्थ हो जाता है।

इस तरह का कर्मनिष्ठ परमार्थ, जीवनरस को ग्रहण करता है। जगत के चक्र को हृष्ट-पुष्ट करता है। सृष्टि से सृष्टि को ग्रहण करता है, सृष्टि को सृष्टि ही लौटाता है। सांसारिक प्रपंचों का पारमार्थिक कर्तव्यनिर्वहन उसे प्रश्न के सबसे सटीक उत्तर के निकट ले आता है।

प्रपंच में परमार्थ, असार में सार, संसार में भवसार देख पाना उत्कर्ष है। देह इसका साधन है किंतु देह साध्य नहीं है। गर्भवती के लिए कहा जाता है कि वह उम्मीद से है। मनुष्य को अपने आप से निरंतर कहना चाहिए, ‘देह से हूँ पर देह मात्र नहीं हूँ। ‘ विदेह तो कोई बिरला ही हो सकेगा पर स्वयं को देह मात्र मानने को नकार देना, अस्तित्व के बोध का शंखनाद है। इस शंखनाद के कर्ता, कर्म और क्रिया तुम स्वयं हो।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 150 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 150 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 150) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 150 ?

☆☆☆☆☆

दर्द का आलम

कुछ ऐसा है कि

दर्द अब अपना सा

लगने लगा है..!

☆☆

Condition of the pain is

somewhat such that

The pain has started to

feel like very own..!

☆☆☆☆☆

सियासत में तो कभी अपनी परछाई

तक भी ऐतबार नहीं करना चाहिए

दिन में तो एक बार हमारी परछाई तक

साथ छोड़ दिया करती है..!

☆☆

In politics, one should never

trust even own shadow…

Once a day even our own

shadow also leaves us..!

☆☆☆☆☆

तकलीफें बाजार में नहीं

बिका करतीं यारों, अक्सर

बांटने वाला भी कोई अपना

बहुत नजदीकी ही होता है…

☆☆

Dear friends, problems are

not sold in the market,

Often the person giving them

happens to be someone close

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ The Grey Lights# 09 – “So called…” ☆ Shri Ashish Mulay ☆

Shri Ashish Mulay

? The Grey Lights# 09 ?

☆ – “So called…” – ☆ Shri Ashish Mulay 

Life is so short

so short

but in dreaming it goes long..

 

Life is so restricted

so strict

where it fears other life..

 

Life is so framed

so tightly

where scene is always cropped..

 

Life is so contained in words

so densely

where meaning is ever evolving..

 

Life is defined

so vaguely

where Love is a sin..

 

Life is jailed

forever

in the hope of judgement..

 

Life is so good

damn good

for those who bring it to others…

© Shri Ashish Mulay

Sangli 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “सलाम–डॉ. ए. पी. जे. कलाम…” ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता खंडकर

 ☆ कविता  – “सलाम–डॉ. ए. पी. जे. कलाम…☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(१५/१०/१९३१ – २७/०७/२०२३)

बच्चे जिनके दिल की धडकन,

                विज्ञान थी साँस,

देश-हित ही धर्म था जिनका,

               अध्यापन की आस!

 

ब्राम्होस जैसे अस्त्र का,

               सफल किया निर्माण,

भारत की ताकत का दिया,

              दुनिया को एहसास !

 

अणु-शक्ति से देश-विकास का,

               सपना देखा महान,

नदियों को जोडने का,

               कितना अनोखा प्रयास!

 

प्रण लेना हर भारतवासी,

               करेंगे, ये सपना साकार,

भारत के ‘ मिसाईल मॅन ‘ को,

                वही होगा, सच्चा प्रणाम!

© सुश्री प्रणिता खंडकर

ईमेल – [email protected] वाॅटसप संपर्क – 98334 79845.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares