भारतीय संस्कृतीत सौरमास आणि चांद्रमास असे दोन प्रकार आहेत.चांद्रमासात ३६० दिवस येतात आणि सौरमासात ३७१ दिवस येतात.दोन्हीमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो.हा भरून निघण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो.याला धोंडामहिना असेही म्हणतात.
याला पुरूषोत्तम मास का म्हणतात?
प्रत्येक महिन्याचा एक स्वामी ठरलेला आहे.अधिक महिन्याचे स्वामी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला.त्यावेळी श्रीविष्णु यांनी यांचे दायित्व घेतले.म्हणून याला पुरूषोत्तम मास असे म्हणतात.
३३ चे महत्व काय?
आपण एकूण ३३ कोटी देव मानतो पण ते कोटी नसून कोट आहे.कोट म्हणजे प्रकार.ही गणितातील कोटी संख्या नाही.
१२ आदित्य,११रुद्र, ८ दिक्पाल /वसु,१ प्रजापती,१वषट्कार असे हे देवतांचे प्रकार आहेत.
याप्रमाणे ३३ प्रकारचे देव आहेत.
आपला गैरसमज आहे की ३३ करोड देव आहेत,पण कोट म्हणजे प्रकार.
अधिकस्य अधिकम् फलम्
या सूत्राप्रमाणे या महिन्यात केलेले जप,तप,दान, पुराण श्रवण इ. गोष्टी अधिक फल देतात.सत्पात्री दान हे Double benefit scheme सारखे असते.दान घेणारा हा विष्णूचे स्वरूप आहे असे मानले जाते अधिक महिन्यात कोणती व्रते करावीत?
आपली परिस्थिती, शारीरिक क्षमता, मदतनीस इ.गोष्टींचा विचार करून व्रतवैकल्ये, उपवास इ गोष्टी कराव्यात.
१) ३३ दम्पतीना भोजन, दक्षिणा,वस्त्र इ.देणे
२) ३३सुवासिनीना ओटी भरणे
३) ३३ गरजू अशा विद्यार्थ्यांना गणवेष,शालोपयोगी वस्तू, रेनकोट इ.देणे.
४) गरीब बाळंतिणीला ३३ डिंकाचे लाडू देणे.
५) श्री सत्यनारायण पूजा.
६) दररोज गाईला गोग्रास देणे.
७) रोज ३३ फुलवाती लावणे.
८) वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ३३ पुस्तके वाचनालय अथवा शाळेत देणे.
☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
एवढ्या मोठया बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राजा आपला संसार थाटून रहात होता. बायको रंजू आणि मुलगा रोहन असे छोटेसे कुटुंब राजाचे ! राजाला आठवतं त्या दिवसापासून राजाची आई याच आऊट हाऊसमध्ये रहात होती आणि कायम बंगल्यातच राबण्यात जन्म गेला तिचा ! राजा चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले आणि आई आणि राजा याच आऊट हाउस मध्ये राहू लागले. आईने जिवापाड कष्ट केले आणि राजाला शाळेत घातले, शिकवणीही लावली. राजाचे वडील बंगल्यात वॉचमनचं काम करत असत, आणि गोगटे साहेबांचे अगदी विश्वासू उजवा हात होते ते. गोगटे साहेबांची दोन्ही मुलंही गुणी आणि हुशार होती. राजालाही ती दोघे शाळेत मदत करत आणि राजाला चांगले मार्क्स मिळत.
राजा बीकॉम झाला आणि गोगटे साहेबांनी त्याला एका कारखान्यात नोकरी लावून दिली. मग तर राजाची आई कृतज्ञतेने भारावूनच गेली. दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. गोगटे साहेबांच्या पत्नी माई अचानकच निधन पावल्या. दरम्यान दोन्हीही मुलं परदेशी निघून गेली होती आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात गोगटेसाहेब अगदी एकाकी एकटे पडले. त्यांनी राजाला अगदी कळवळून विनंती केली, “ राजा,आता तू तरी नको जाऊ घर सोडून. मला एकटे अगदी रहावत नाही रे. तू आपल्या आऊट हाऊसच्या मागच्याही दोन खोल्या नीट करून घे आणि इथेच रहा मला सोबत म्हणून !” राजाला वाईट वाटले आणि त्याने गोगटे साहेबांची विनंती मान्य केली. मुलगे जरी परदेशी असले तरी साहेबांची मुलगी नीता भारतातच होती. तिच्या नवऱ्याच्या आर्मीतल्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. जमेल तशी तीही आपल्या वडिलांकडे येत असे. पण वारंवार येणे तिलाही जमत नसे.
गोगटे साहेबांचे मुलगे वर्षा दोन वर्षांनी भारतात येत, महिनाभर रहात आणि निघूनजात. गोगटेसाहेबही बऱ्याचवेळा मुलांकडे परदेशात जाऊन आले होते. पण आता त्यांना ते झेपेनासे झाले. साहेबांची तब्बेत अजूनही छान होती. रोज सकाळी वॉक ,मग आले की बाई छानसा ब्रेकफास्ट करून ठेवत. त्या मग स्वयंपाक करून ठेवूनच निघून जात. सुट्टीच्या दिवशी ते राजाच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या हॉटेलात जात आणि आनंदाने वेळ घालवत. राजाला त्यांनी कधीही नोकरासारखे वागवले नाही आणि आता तर तो स्वतःही बऱ्यापैकी नोकरीत होताच. गोगटे साहेब कितीवेळा म्हणायचे,” राजा,काय माझे ऋणानुबंध आहेत रे तुझ्याशी,सख्खी मुलं राहिली बाजूला आणि तूच किती प्रेम करतोस रे माझ्यावर.” अनेकवेळा रंजू साहेबांना जेवायला बोलवायची, सणासुदीला गोडधोड बंगल्यावर पोचवायची. नीता अधूनमधून यायची वडिलांकडे. तिला हे सगळं दिसायचं. रंजू राजा अतिशय मनापासून करतात आपल्या वडिलांचं, आणि त्यांना आपण भारतात असूनही आपली फारशी गरजही लागत नाही, याचा राग येई तिला. गोगटे साहेब हळूहळू थकत चालले. त्यांनाही आपली तिन्ही मुलं कशी आहेत ते नीट माहीत होतंच. त्यातल्या त्यात नीताचा स्वभाव फार स्वार्थी, मतलबी आणि धूर्त होता. खरं तर तिला काय कमीहोतं ? नवऱ्याला आर्मीत चांगला पगार होता, सासरचंही चांगलं होतं सगळं. पण इथे आली की दरवेळी आईचं कपाट उघडून फक्त सांगायची – “ बाबा, मी यावेळी हे चांदीचं तांब्याभांडं नेतेय बरं का. कधी ,मी आईची ही चेन नेतेय हं ! तिकडचे भाऊ आणि त्यांच्या बायकांना काय उपयोग या सोन्याचा?”
बाबा बिचारे गप्प बसत. आपलीच मुलगी ! काय बोलणार तिला? आणि तिच्या आक्रस्ताळ्या स्वभावाला घाबरून ते ती नेईल ते नेऊ देत तिला. गोगटे साहेबांचे तिकडे असलेले अजय आणि अमोल हे मुलगे जरा तरी रिझनेबल होते. राजा सतत आपल्या वडिलांजवळ असल्याने त्यांना खूप हायसे वाटे. मध्यंतरी बाबांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन झाले तेव्हाही, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते रात्री झोपायला जाण्यापर्यंत सगळे राजा आणि रंजूने तर निभावले, आणि म्हणून नीता किंवा त्यांना कोणालाच यावे लागले नाही. अजय अमोलला याची पूर्ण जाणीव होती. ही कृतज्ञता ते राजाला वेळोवेळी बोलूनही दाखवत. राजा म्हणायचा, “अरे काय बिघडतं मी केलं तर… माझे वडील दुर्दैवाने लवकर गेले पण मला तुमच्या बाबांनी कधी काही कमी नाही पडू दिलं. मी आज त्यांच्यामुळेच उभा आहे.”
बाबासाहेब दिवसेंदिवस थकत चालले. त्या दिवशी त्यांचे वकील मित्र दाते काका आलेले दिसले आणि दुसऱ्या दिवशी गोगटेसाहेबांना गाडीतून नेलेलेही बघितले रंजूने. असेल काहीतरी काम म्हणून ती आपल्या कामाला लागली. रंजनाचा मुलगा आता मोठा झाला होता. कॉलेजला जायला लागला होता. चांगलाच हुशार होता तो अभ्यासात ! त्याची स्वप्न ध्येयं वेगळी होती. “ आई, आपण या आऊट हाऊसमध्ये आणखी किती वर्षे रहायचं ग? मोठं आहे हे मान्य आहे.. पण किती त्रास होतो बाबांना. सतत हाका मारत असतात गोगटे काका आणि किती राबवतात आपल्या बाबांना. यांची मुलगी आहे ना इथे? मग कधी कशी ग त्यांच्यासाठी येत नाही? आपले बाबा आणि तूसुध्दा किती वर्षे करणार? इथंच रहायचं का आपण कायम?” रोहन चिडून विचारत होता… “ पटतंय बाबा तुझं सगळं मला, पण बाबांना कुठं पटतंय? आंधळी माया आहे त्यांची गोगटे साहेबांवर. मी काही बोलायला लागले की गप्प करतात मला. अरे माई होत्या तेव्हा तर विचारू नको. हे घरगडी आणि मला स्वयंपाकीण करून टाकली होती अगदी ! “ रंजना उद्वेगाने म्हणाली.
राजा बाहेरुन हे ऐकत होता. “ हे बघा, तुम्हाला इथं रहायचं नसेल तर तुम्ही मोकळे आहात कुठेही जायला. मी बाबांना सोडून कुठेही येणार नाही, त्यांच्या अशा उतारवयात तर नाहीच.”
“अहो पण बाबा, त्यांना आहेत की तीनतीन मुलं. हा कसला त्याग बाबा? आम्हाला तुमची काळजी वाटते बाबा. आपल्या भविष्याचा विचार कधी करणार तुम्ही? जन्मभर इथेच रहायचं का आपण ?” रोहनने विचारलं.
“ हो. निदान बाबा असेपर्यंत तरी ! मग बघू पुढचं पुढं ! “ रंजना हताश होऊन आत निघून गेली.
गोगटे आता वरचेवर आजारी पडू लागले. राजाने त्यांच्यासाठी रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी नोकर नेमले. त्याचे पैसे मात्र गोगटे काकांच्या अकाउंट मधून जात. राजाने मुलांना कळवले, “ तुम्ही येऊन जा,बाबांचं काही खरं नाही.” दोन्हींही मुलांचे फोन आले, “आम्हाला येता येत नाही. तूच बघ बाबा काय ते.”
नीताला कळवले तर तीही येऊ शकली नाही. गोगटे काका पुढच्याच आठवड्यात झोपेतच कालवश झाले. काकांचे अंत्यसंस्कारही राजानेच केले. मग मात्र तीनही मुलं आली. त्यांची बायका मुलं आली नाहीतच. राजाला अतिशय वाईट वाटले. सख्खी तीन मुलं असूनही आपल्यासारख्या परक्या मुलाकडून काकांचे अंत्यसंस्कार व्हावे, याचे फार वाईट वाटले त्याला. पण मुलं शांत होती.पंधरा दिवसांनी त्यांनी राजाला बोलावलं आणि विचारलं, “ राजा, खूप केलंस तू आमच्या बाबांचं. पण आता आम्ही कोणी इथे रहाणार नाही तर हा बंगला आम्ही विकायचं ठरवतोय….तू आमचं आउट हाऊस कधी रिकामं करून देतो आहेस ? एक महिन्यात सोडलंस तर बरं होईल. म्हणजे हा व्यवहार करूनच आम्ही तिकडे निघून जाऊ.”
राजा हे ऐकून थक्क झाला.त्याने स्वतःच्या खिशातून काकांसाठी केलेल्या खर्चाची विचारपूस तर जाऊच दे, पण एका क्षणात हे लोक आपल्याला जा म्हणून सांगतात, याचा त्याला अत्यंत संताप आला.’ विचार करून दोन दिवसात सांगतो,’ असं म्हणून राजा घरी आला.
त्याला एकदम आठवलं, काकांचे दाते वकील काही महिन्यापूर्वी काकांकडे आले होते आणि त्यांना घेऊन बाहेर गेले होते. राजा ताडकन उठला आणि दाते वकिलांकडे गेला .. “ ये रे राजा, झालं ना गोगटेचं सगळं नीट? तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं? तेही,एका पैची अपेक्षा न ठेवता? शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले. राजाच्या डोळ्यात अश्रू आले…
सन १९८९. ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने, पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या.
चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.
१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.
राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.
देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.
त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने मावशी मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.
या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.
मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले. त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले. त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.
१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.
देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला आर्थिक मदत केली आहे.
समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना सहस्र प्रणाम 👏
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
भारत – अध्यात्माची मायभूमी – जिथे सजीव आणि निर्जीव दोन्हींमधे देव बघितला जातो। श्रध्दा हा जीवनाचा आधार – त्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थानं आणि त्यांच्या विविध परंपरा। अशीच एक सुमारे ७०० वर्षांपासून चालत आलेली उच्चस्तरीय परंपरा आहे —’आषाढ आणि कार्तिक महिन्यात होणारी पंढरीची वारी।’
विठ्ठल-रखुमाईचा जागृत वास असलेली पुण्यनगरी पंढरपूर… येथे फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर प्रांतातून आणि परदेशातूनसुध्दा भाविकगण वारी करायला मुख्यतः आषाढ महिन्यात येतात। ईश्वर कृपेने ही पायी वारी करण्याची संधी यंदा मला मिळाली।
सुरुवातीला या यात्रेबद्दल काहीच माहित नसल्यामुळे मनात अनेक प्रश्न काहूर माजले होते। बरेच प्रश्न – कुठं जाऊ, किती अंतर असणार, रस्ता कसा असेल, लोकं कोण नि कसे असतील, जेवणाचं, थांबायचं कसं नि कुठे, इत्यादि होते. पण यांची माहिती मिळवली नि माझ्या गृहनगर भोपाळ येथून देवाचं नाव घेऊन घराबाहेर पाऊल टाकलं।
पुण्यात माझी आतेबहिण नि भाची यांची भेट आमच्या दिंडीने ठरविलेल्या ठिकाणी – ‘गुप्ते मंगल कार्यालय, शनिवार पेठ पुणे‘ येथे झाली। खरं तर माझी यात्रा ताईंच्यामुळे शक्य झाली कारण त्यांनी कार्यक्रमाची महिती मला दिली नि मी त्यांच्यासोबत यात्रेची तयारी केली।
आमची यात्रा ‘संत विचार प्रबोधिनी’ या दिंडीसोबत होणार होती। त्याच्या संचालिका हभप सौ माईसाहेब गटणे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आधीच सर्वांना व्हाटस्एपच्या माध्यमातून दिली होती। त्या सूचनापत्रकाप्रमाणे पायी वारीसोहळा हा ११ जून ते ३० जून २०२३ पर्यंत चालणार होता।
११ जून :: पहिले पाऊल
गुप्ते मंगल कार्यालयात आमचे आवश्यक सामान, जे पुढे यात्रेत लागणार होते ते ठेवून, एका लहान बॅगमधे रस्त्यात लागणारे लहान-सहान सामान घेऊन आम्ही श्रीक्षेत्र आळंदीला निघालो। अद्याप आपल्या सह-वारकरी मंडळीशी आपसांत ओळखी झाल्या नव्हत्या।
माझी आळंदीला ही दुसरी यात्रा होती, पण या वेळेस उद्देश् वेगळा होता, त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती। पुणे नगरात चहूकडे वारकरी दिसत होते. त्यात शहरापेक्षा गावची मंडळी जास्त आहेत असे वाटले, पण नंतर हे दृश्य बदललं। पायी चालत तिथे ठरलेल्या ठिकाणी- विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात आम्ही सुमारे चार वाजता पोहोचलो। त्याच वास्तूत अजून एक दिंडी आली असल्यामुळे थोडा गोंधळ झाला, पण लगेच आपले ठिकाण पहिल्या माळयावर आहे हे कळले।
त्या रात्री तिथेच मुक्काम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली जागा ठरवून सामान लावून घेतले होते। येथे जुने वारकरी पूर्वओळख असल्याने एकत्र आले नि नवे पण हळूहळू त्यांच्यात मिसळू लागले। आमची एकूण संख्या १५० आहे हे कळविण्यात आले।
उन्हाळा खूप असल्याने पाण्याची गरज खूप जास्त भासत होती. तेव्हा वारंवार बाहेर जाऊन पाणी आणावे लागत होते। थोडयाच वेळात दिंडीच्या संचालिका सौ माईसाहेब आल्या नि मंचावर त्यांनी स्थान ग्रहण केले। सुरुवातीला वारीच्या फीचा हिशेब, पावती देणे ही किरकोळ कामं आटोपून नंतर संपूर्ण यात्रेची माहिती आणि वारीचे अनुशासन सांगितले। या मधेच सर्वांना या दिंडीचा १९८६ पासूनचा पूर्व इतिहास नि पूर्व वारीप्रमुख वै.ह.भ.प.डॉ रामचंद्र देखणे यांचा जीवन परिचय देण्यात आला। हे पूर्ण झाल्यावर त्यांची प्रवचन सेवा झाली जी सर्वांनी मनापासून ऐकली।
आजच्या दिवशी म्हणजे ११ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून संध्याकाळी निघणार होती अन् त्या दिवशी परंपरेप्रमाणे तिचा मुकाम तिथेच असल्यामुळे दिंडीच्या व्यवस्थे- -प्रमाणे पुण्यात स्वतःची सोय असणारे वारकरी पुण्याला परत जाऊ शकत होते। रात्री सुमारे आठ वाजता वाजत-गाजत भक्तजनांच्या गजरासोबत पालखीची यात्रा सुरू झाली। गर्दी खूप जास्त असल्याने मला दर्शन काही होऊ शकले नाही। पोलिसांना गर्दी सांभाळायला खूप मेहनत करावी लागत होती। नंतर रात्री नगर बस सेवेत बसून पुण्याला परत आलो।
१२ जून :: माऊली आलेत पुण्याला ..
दुसरे दिवशी १२ जूनला पालखीचे पुण्यात आगमन झाले अन् तिथे पालखीचा एक दिवस मुक्काम होता. त्यामुळे दिंडी पण १३ जूनला पुण्याला गुप्ते मंगल कार्यालयात थांबली। पुण्यातील स्थानीय वारकरी यांना आज इथे हजर होण्याबद्दल सूचना होती।
१४ जून :: वारी निघाली पंढरपुराला : पुणे – सासवड अंतर ३८.३४ कि.मी.
शेवटी १४ जूनला तो सूर्यादय झाला ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती। सकाळी पाच वाजल्या- -पासून सर्व वारकरी पूर्ण उत्साहात तयार झाले। तेव्हाच सूचना झाली की सर्वांनी आपले सामान लगेजच्या ट्रकवर ठेवावे। पहिला दिवस असल्यामुळे थोडी घाई गर्दी होत होती पण अखेरीस सर्वांचे सामान चढले। इथे सांगण्यात आले की जवळच एका ठिकाणी सर्वांचा चहा इत्यादि होईल नि मग पुढे वाटचाल होईल। त्या प्रमाण तिथे चहा-नाश्ता नि दिवसाकरिता खाण्याचे पैकेट वाटप सुरू झाले। चहा-कॉफी, नाश्ता घेऊन आता पाठीवर आवश्यक तेवढे सामान, मनांत प्रचंड उत्साह, उत्सुकता घेऊन आणि मुखाने जय हरि विठ्ठल घोष करीत सर्व ओळीत लागले नि ‘ ज्ञानोबा-तुकाराम माउली ‘ असा नाद करीत आमची ‘ संत विचार प्रबोधिनी ‘ची दिंडी वारीच्या मार्गाला निघाली। येथेच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजाच्या पालख्या एकत्र येतात नि नंतर वेगळया मार्गावर चालू लागतात।
एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, की आता मी मंदिरात येणार नाही.
यावर पुजाऱ्याने विचारले – का?
मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिक पणे कमी करतात, आणि देखावा अधिक!
यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला – ते बरोबर आहे! पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का!
बाई म्हणाल्या – तुम्ही मला सांगा. काय करावे?
पुजारी म्हणाले – एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकपण थेंब खाली पडता कामा नये.
बाई म्हणाल्या – मी हे करू शकते.
मग थोड्याच वेळात त्या बाईने तेच केले. त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला 3 प्रश्न विचारले –
तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?
2. तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?
तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?
बाई म्हणाली – नाही मी काही पाहिले नाही!
मग पुजारी म्हणाले – जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये.म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.
आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल, तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.
आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे ? की तुम्ही स्वतः आहात ?
अरे! देव नाही ,
गृहनक्षत्र किंवा कुंडली नाही,
नशीब नाही,
नातेवाईक नाहीत,
शेजारी नाहीत,
सरकार नाही,
तुम्ही स्वतः जबाबदार आहात.
1) तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे.
2) तुमची पोटदुखी , तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.
3) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.
4) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली चरबी / आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.
5) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.
6) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.
वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत , ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता.
यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही.
जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्याला आढळेल की कुठेतरी आपला मूर्खपणा त्यांच्यामागे आहे.
म्हणून योग्य निर्णय घ्या आणि त्यानुसार तुमचे आयुष्य निरोगी आणि सुखी समृद्धी होवो!
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो में लेक्चरार के पद पर कार्यरत। पूर्व में यॉर्क यूनिवर्सिटी, टोरंटो में हिन्दी कोर्स डायरेक्टर एवं भारतीय विश्वविद्यालयों में सहायक प्राध्यापक। तीन उपन्यास व चार कहानी संग्रह प्रकाशित। गुजराती, मराठी व पंजाबी में पुस्तकों का अनुवाद। प्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ निरंतर प्रकाशित। कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार 2020।
☆ कथा कहानी ☆ दोरंगी लेन☆ डॉ. हंसा दीप ☆
फोन पर उसकी आवाज से लगा था कि वह एक उम्रदराज महिला होगी। अपना सामान लेकर कार से जब मैं वहाँ पहुँची तो मेरा अनुमान सही निकला। मुझे देखते ही बोली– ओरा?
मैंने “हाँ” कहते हुए सिर झुकाया। मेरा प्रतिप्रश्न था- एंजिला?
उसने हामी भरी। ध्यान से देखने पर लगा कि उसकी उम्र साठ से पैंसठ के बीच होगी। वह एक श्वेत महिला थी। बाल करीने से सेट किए हुए थे। सारे बाल सफेद होते हुए भी मुँह पर तेज था। कपड़े महंगे व अच्छे थे। चेहरा तटस्थ था। न जाने क्यों उसकी मुस्कान मुझे सहज नहीं लगी। एक थोपी हुई मुस्कान से स्वागत किया उसने। ऐसे, जैसे कि उसे आते-जाते किराएदारों से बात करने की आदत हो। पहले भी कई छात्र यहाँ रह कर गए होंगे। वेस्टर्न यूनिवर्सिटी पास होने से इस छोटे-से कस्बे ‘फरगस’ में मेडिसिन के छात्रों का आना-जाना लगा रहता होगा।
अंदर आकर एक नजर डाली। घर पुराना था। फर्नीचर, तस्वीरें, सजावट के तौर-तरीके, हर एक चीज से, उनके आकार-प्रकार से एंटिक सामान की अनुभूति हो रही थी। सुसज्जित कमरे ऐसे थे मानो किसी भी एक चीज को हटा दें तो खालीपन उभर कर सामने आ जाएगा। शायद एंजिला के तटस्थ चेहरे की तरह इनका भी अपना एक अतीत होगा, जो गाहे-बगाहे अपनी आपबीती सुनाकर एक दूसरे का मन बहला देता होगा। वह मुझे अपना कमरा दिखाने नीचे ले गयी।
हाथ में चाबी पकड़ाते बोली- “कुछ भी चाहिए तो मुझसे कहना।”
वह चली गयी। चाबी लेते हुए मैंने करीब से देखा उसे। गिनी-चुनी झुर्रियों को छोड़ दें तो चेहरा सौम्य लेकिन भाव रहित था। मैंने अपने कमरे में नज़र दौड़ायी। वहाँ एक साफ चादर-तकिए के साथ पलंग था, टेबल थी, छोटा-सा फ्रिज़, स्टोव व किचन काउंटर था। साथ ही लगा हुआ स्नानघर और शौचालय भी था। यानी एक छात्र के रहने लायक समुचित सुविधाएँ थीं। मैं अपने आप में सहमी हुई थी। घर की हर चीज मानों मुझे मेरे रंग का अहसास करा रही थी। फिर चाहे वे पलंग पर बिछे सफेद चादर-तकिए हों या फिर बाथरूम में टंगे सफेद टॉवेल हों। किचन के सफेद केबिनेट हों या सफेद छत हो। अश्वेत को घर में जगह देना श्वेत लोगों के लिए आसान नहीं होता होगा।
खैर, पहला दिन था। एंजिला से पहली मुलाकात थी। जगह अच्छी लग रही थी। अपनी इंटर्नशिप के लिए मुझे कुछ महीने इस गाँव में रुकना था। मेरा अपने काम पर आना-जाना शुरू हुआ तो उससे आमना-सामना होने लगा। गुड मॉर्निंग, गुड नाइट के अलावा पिछले तीन दिनों में कोई बात नहीं हुई, न ही उसके चेहरे में कोई अंतर नजर आया। एक खामोशी ओढ़े आवाज निकलती और हवा में खो जाती। चाहे शुभप्रभात का ताजा अभिवादन हो या शुभरात्रि का अलसाया हुआ, एंजिला के चेहरे को पढ़ना बहुत मुश्किल था। धीरे-धीरे यह भी मेरे व्यस्त समय का एक हिस्सा बन गया। यंत्रवत लौटकर कमरे में चली जाती और अगले दिन सुबह तैयार होकर अपने काम पर।
एक महीना हो चला था। अब कुछ मित्र थे जिनके साथ समय कटता। एक दिन काम के बाद हमने फिल्म देखने जाने की योजना बना ली। स्वाभाविक ही एंजिला को सूचित करने की कोई जरूरत नहीं समझी। रोज के नियमित समय से तकरीबन ढाई घंटे लेट घर पहुँची तो अंधेरा गहरा गया था। उसे बाहर बेचैनी से घूमते पाया। मुखमुद्रा बदली हुई थी। चिंता की रेखाएँ कुछ झुर्रियों को पारदर्शी कर रही थीं।
मैंने पूछा- “कहीं आप मेरा इंतजार तो नहीं कर रही थीं?”
“नहीं।” कहकर वह तेज कदमों से भीतर चली गयी।
मुझे अच्छा नहीं लगा। शायद वह मेरे आने का इंतजार ही कर रही थी। यूँ बगैर कुछ कहे उसका जाना चुभ गया। उसकी चुप्पी मुझे खलने लगी थी। यह मौन टकराहट कचोटती थी। अपने अंदर छुपी वह धारणा दिन-ब-दिन बलवती हो रही थी कि मेरा अश्वेत होना उसे अच्छा नहीं लग रहा था। उसके न बोलने की यही वजह है। न बोले, लेकिन एक मुस्कान तो दे ही सकती है। गुड मॉर्निंग बोलती भी है, तो चेहरा ऐसा सपाट रहता है मानो कोई रिकॉर्डिंग बजा दी हो। मैं कुछ भी बोलूँ, चाहे कोई सवाल हो या जवाब। मेरे चेहरे का भाव और हाथ पैर, सब मेरे साथ बोलने लगते हैं, पल दर पल बदलते हैं। उसके मुँह से आवाज भर निकलती, शेष अंग उस आवाज का साथ नहीं देते। ऐसा लगता मानों सारे अंगों का एक दूसरे से संपर्क टूट गया हो। एक बार में एक अंग ही काम करता हो। अतीत जब पीछा नहीं छोड़ता तो अंतर्मन के भावों पर ताले लग जाते होंगे; ऐसा ही कुछ एंजिला की खामोशी के पीछे होगा।
खैर, उसका अतीत जो भी हो। मुझे अपने काम से काम रखना है। वैसे भी हम दोनों के बीच के अंतर को कभी पाटा नहीं जा सकता। बहुत होशियार छात्र होने के बावजूद एक बात मुझे हमेशा सालती रही है। अपने व्यक्तित्व को लेकर तमाम ऐसी हीन भावनाएँ थीं जो कभी-कभी मेरी प्रतिभा को भी दबाने का प्रयास करतीं। तब मैं इस माहौल में खुद को मिस-फिट समझती। हालाँकि किताबें मेरे दिमाग में फिट होती रहतीं। मेडिसिन की पढ़ाई करके मैं बहुत आगे जाना चाहती थी ताकि ज्यादा से ज्यादा लोगों की मदद कर सकूँ। मेरे ममा-पापा ने भी अपने जीवन भर यही किया था। मेरे लिए सपने भी देखे मगर बाहर भेजने से डरते थे। मेरी स्कालरशिप और अदम्य इच्छा ने उन्हें बाध्य कर दिया था कि मुझे न रोकें, जाने दें, अपने रास्ते खुद बनाने दें। मैं भी एक नयी दुनिया देखना चाहती थी। बहुत सोच-समझकर यही तय हुआ था कि मैं टोरंटो जाने का सुनहरा अवसर न खोऊँ।
टोरंटो आने के बाद किसी से भी मिलते हुए इस बात पर ध्यान जाता कि सामने वाला कौन है- श्वेत, अश्वेत, या फिर एशियन। मैं युगांडा से आयी थी, एक अश्वेत। वहाँ कभी ऐसा कुछ महसूस नहीं हुआ क्योंकि वहाँ हम सब एक जैसे थे। बाहरी काले रंग से भीतर की रंग-बिरंगी दुनिया का कोई वास्ता नहीं होता। बेखबर होकर सपनों की दौड़ लगाते। मैंने दाखिला तो बी.एससी. में लिया मगर बहुत तेजी से अपने कदम बढ़ाते हुए तीसरे वर्ष के अंत में ही वेस्टर्न यूनिवर्सिटी में मेडिसिन में चयन हो गया। कैनेडा में आने के तीन सालों के अंदर ही मैंने ऐसी छलांग लगायी कि अपने इलाके के लोगों में मेरा नाम हो गया। अत्याधुनिक व्यवस्था में, विकसित देश में पढ़ाई करके डॉक्टर बनने का हौसला अंदर ही अंदर कुलाँचे मारता रहा।
आ तो गयी थी इस दुनिया में, लेकिन कई श्वेत छात्रों के बीच रहते हीनता से ग्रस्त होना स्वाभाविक था। न जाने भगवान ने हम अश्वेत लोगों को इतना काला क्यों बनाया। हमें गढ़ते हुए रंगों की इतनी कमी हो गयी कि काले रंग के अलावा कोई रंग बचा ही नहीं। जन्म के साथ ही अन्याय शुरू हो गया। और यह बात माँ ने मुझे बहुत अच्छी तरह समझायी थी- “तुम्हारे साथ कदम-कदम पर पक्षपात होगा। अपने लोगों के साथ उठना-बैठना। तुम कभी अकेले महसूस मत करना। अपना एक ग्रुप बनाना।” ऐसी कई चेतावनियाँ दी थीं। माँ का कहा एक वाक्य मुझे बिल्कुल अच्छा नहीं लगा था- “हमारा रंग हमें अपंग बना देता है। यह जन्मजात अभिशाप है।” बहस करना चाहती, पर न कर पाती। ये माँ के अपने अनुभव थे। वे यूरोप गयी थीं पढ़ने के लिए लेकिन छह महीने में लौट आयी थीं। अपना तिरस्कार सह नहीं पायी थीं। यहाँ आकर मैं स्वयं उन लोगों से दूर रहती जो मुझे अपने रंग के दिखाई न देते। शायद यही वजह थी कि अभी तक ऐसा कोई कड़वा अनुभव नहीं हुआ था। मेरी कक्षाओं के कई साथी मेरे करीब आने का, दोस्ती करने का प्रयास करते लेकिन उनके एकतरफा प्रयास कारगर न होते। मैं अपनी पढ़ाई पर ध्यान देना चाहती थी। किसी पक्षपात का शिकार होकर वापस लौटना बिल्कुल स्वीकार्य नहीं था। हालाँकि, इस बात से भी इनकार नहीं करती कि आज तक किसी ने भी टोरंटो में रंग को लेकर मुझ पर कोई फिकरा कसा हो, या फिर मुझे परेशान किया हो।
एंजिला को देखते ही स्वत: दूरियाँ बन गयी थीं। पैसे देकर सिर्फ एक किराएदार का संबंध रखना चाहती थी मैं। मेरा आत्मविश्वास मेरी पढ़ाई थी, न कि मेरे आसपास के लोग। वैसे भी मैं बेहद सफाई पसंद लड़की हूँ, मुझसे किसी को कोई तकलीफ हो ही नहीं सकती। उसकी बेरूखी को मैं तवज्जो नहीं देती।
एक दिन बहुत बर्फ गिर रही थी। पूरा लॉन बर्फ की सफेदी से घिरा था। एंजिला ने ड्राइव-वे साफ करवाने के लिए लोगों को रखा हुआ था। लेकिन बर्फ इतनी गिर रही थी कि अच्छा-खासा पहाड़ खड़ा हो गया था। मुझे बाहर जाना था। मैं चाबी लेकर अपनी कार की ओर बढ़ने लगी तो उसने मुझे कार चलाने से रोका। चेतावनी भी दी कि यहाँ की बर्फबारी टोरंटो से अधिक खतरनाक होती है। बर्फ जम कर आइस बन जाती है और गाड़ी के टायर स्लिप होने के कारण कोई भी दुर्घटना हो सकती है।
मैंने कहा- “मेरा जाना बहुत जरूरी है। मैं जल्दी ही लौट आऊँगी।” वह आश्वस्त नहीं थी। आज उसके चेहरे पर मैं गुस्सा देख रही थी जो उसकी आँखों में उतर आया था। उसके गुस्से में मेरी चिंता की झलक नहीं थी बल्कि उसकी बात मनवाने का रौब था। ये भी एक वजह थी कि मैं उसके खिलाफ जाना चाहती थी। इतने दिनों में एक बार भी सीधे मुँह बात तक नहीं की थी उसने मुझसे। आज चाहती है कि मैं उसकी बात मानूँ। मैं जहाँ जाना चाहूँ, जाऊँ, उसे रोकने का कोई हक नहीं। उसका निराकार चेहरा अब आकार ले रहा था, क्रोध से घिरा। उस भाव को वहाँ गहराते देख मेरा जाने का मन और अधिक प्रबल हो रहा था।
बगैर उसकी इच्छा की परवाह किए मैं तेजी से बाहर निकल गयी। गाड़ी स्टार्ट करके चल दी। उस समय मेरे शरीर का हर अंग ताकत से भरपूर था। न जाने बगावत की बू थी, या सफेदी को हराने की साजिश। एंजिला को, या फिर बर्फ को, क्योंकि दोनों ही सफेदी से भरपूर थे। जाने कैसा तैश था जो अंदर से मुझे शीतल कर रहा था।
यह शीतलता बहुत महंगी पड़ी मुझे। अंतत: मेरे साथ वही हुआ जिसकी आशंका एंजिला को थी। मेरी गाड़ी फिसल गयी। मैं बाल-बाल बची लेकिन गाड़ी को बहुत नुकसान हुआ। मैं जैसे-तैसे गाड़ी को टो-ट्रक के हवाले करके घर लौटी। थकान के मारे, ठंड के मारे मेरा बुरा हाल था। बहुत देर तक बाहर खड़ा रहना पड़ा था। घर लौटी तो देखा वह और ज्यादा गुस्से में है। जितना शांत चेहरा हुआ करता था उससे कई गुना ज्यादा त्योरियाँ चढ़ी हुई थीं। आँखें आग उगल रही थीं। कई दिनों से दबी चिंगारी को जैसे किसी ने फूँक मार-मारकर आग में तबदील कर दिया था, अंदर के भावों को झिंझोड़ कर बाहर निकाल दिया था!
उसने मुझसे बात नहीं की। लेकिन उसके अनकहे शब्द बहुत कुछ कह रहे थे। शायद यही– “तुम लोग सुनते नहीं हो।”
चेहरे पर जमा क्रोध की परतें मैं महसूस कर रही थी। मुझे उसके गुस्से पर गुस्सा आ रहा था। गाड़ी के लिए इंश्योरेंस कंपनी को रिपोर्ट करनी थी। ममा-पापा को नहीं बताया वरना उन्हें भी जवाब देना मुश्किल हो जाता। मैं न तो कुछ खा पायी, न उससे बात ही कर पायी। मुझे इस समय सहानुभूति की जरूरत थी, किसी के गुस्से की नहीं। आज मैं बहुत कठिन परिस्थितियों में बाल-बाल बची थी। वह कँपकँपी थी, खौफ था। मौत का सामना करते वे क्षण थे, जो लौट-लौटकर डरा रहे थे। गाड़ी का फिसलना, भड़ाम की आवाज के साथ पलट जाना और मेरा किसी तरह दरवाजा खोलना और बाहर निकलकर इमरजेंसी नंबर पर कॉल करना। पूरी फिल्म स्लो मोशन में कई बार चलती रही। हर दृश्य के साथ शरीर में झुरझुरी अभी भी थी। बहुत हिम्मत दिखाकर गाड़ी को टो-ट्रक के हवाले करके आयी थी। ऐसे में एंजिला के इस बर्ताव में मुझे नफरत की आग धधकती नजर आयी। अब मैंने भी ठान लिया कि मुझे उससे बात करने का कोई शौक नहीं। किराएदार और मकान मालिक का संबंध पैसों तक ही रहे। मुझ पर हुक्म चलाने का उसे कोई हक नहीं।
अब माहौल बदल चुका था। ममा-पापा की आशंकाएँ सच हो चली थीं। मेरे और उसके बीच की खाई और गहरी होती जा रही थी। आपसी पूर्वाग्रहों के बीच एक घर में रहते दो इंसान झुलस रहे थे। मैं पढ़ाई में सब कुछ भूल जाती थी लेकिन उसके पास तो समय ही समय था। वह शायद एक ही बात में उलझी रहती थी इसीलिए कई दिनों तक उसका चेहरा वैसा ही बना रहा। मुझे लगा कि वह अपने आप में इतनी खोयी रहती है कि एक बार किसी बात पर अड़ जाती है तो शायद महीनों तक उसके शरीर के हर हाव-भाव में वही बात रहती है। फिर चाहे उदासी हो, चुप्पी हो या फिर गुस्सा हो।
मैं गुस्से में थी, एंजिला भी। अब तो हमारे बीच गुड मॉर्निंग, गुड नाइट की औपचारिकता भी शेष नहीं रही थी। एक बार फिर से मेरे भीतर बँधी गाँठ में कसाव आया। मेरा आईना मुझे विद्रोही बनाता। भले ही मैं एक बड़ी डॉक्टर क्यों न बन जाऊँ मगर मेरा रंग मुझे सालता रहेगा। मैं और एंजिला, हम दोनों एक दूसरे से बेहद नाराज थे। उसकी नाराजगी का लेवल मुझसे कहीं अधिक था। आशंकाओं के चलते शीत युद्ध बढ़ता चला जा रहा था। बीतते दिनों के साथ मैं सहज होने लगी थी लेकिन वह नहीं। कई दिनों से उससे बात नहीं हुई थी। मैं कभी अपने प्रेजेंटेशन में, तो कभी अपने केस की स्टडी में व्यस्त रहती।
एक दिन रात में मैं गहरी नींद में थी कि एंबुलेंस के कानफोड़ू हार्न से मेरी नींद खुल गयी। धड़-धड़ करते बूटों की आवाज आयी और दरवाजा भी खुला। मैं तुरंत उठ कर ऊपर गयी। एंजिला को अस्पताल ले जाया जा रहा था। उसे सीने में दर्द हो रहा था। मैंने उसके साथ जाना उचित समझा। उसे अस्पताल में भर्ती कर लिया गया। शायद बायपास सर्जरी करनी पड़े। मैं रोज उसे देखने जाती पर कभी बात नहीं होती। या तो वह सो रही होती या फिर नर्स होती उसके आसपास।
कुछ समय बाद उसकी सर्जरी हुई और रिकवरी के बाद घर भेज दिया गया। उसकी मदद के लिए अस्पताल से एक नर्स लगा दी गयी थी जो उसकी सारी जरूरतों का ध्यान रखती। शनिवार की एक दोपहर मैं उसे रोज की तरह सोया हुआ देखकर अपने कमरे में लौट रही थी कि उसने मेरा हाथ पकड़ कर अपने पास बैठने को कहा। मैं उसके सामने बैठ गयी। हम दोनों के चेहरे सपाट थे, निर्विकार।
कुछ क्षणों के बाद उसने तकिए के नीचे से एक फोटो निकालकर मुझे बताया। उसमें मेरी उम्र की दो अश्वेत लड़कियाँ और अधेड़ उम्र का एक अश्वेत व्यक्ति एंजिला का हाथ थामे हुए था। फोटो देखने के बाद उसके चेहरे पर मेरी प्रश्नवाचक निगाहें टिक गयीं।
“ये मेरी बेटियाँ हैं।”
मैं अवाक उसका मुँह देख रही थी। वह शांत भाव से कहने लगी– “मैं अपने इस परिवार को खो चुकी हूँ।”
मैंने कहा- “ये?” जैसे एक बच्चा उलझी पहेली को सुलझाने की कोशिश करता है कुछ वैसी ही उलझन मेरे हर अंग से टपकते हुए उसके चेहरे पर जाकर टिक गयी थी।
“ये हैं मेरे पति, बच्चियों के पापा।”
“क्या?”
“ऐसे ही बर्फबारी में तीनों गए थे, वापस नहीं लौटे। उस दिन उन्होंने मेरी बात नहीं मानी थी, सालों बाद फिर से तुमने भी मेरी बात नहीं मानी।”
मैं जड़वत थी।
“तुम्हें कुछ हो जाता तो मैं अपने आप को कभी माफ नहीं कर पाती। तुम्हारे यहाँ रहते मुझे घर में जैसे अपनी बेटियाँ दिखती रहीं। इसलिए अधिकार से तुम्हें बर्फ में जाने से मना करती रही।”
मैं अब उसके चेहरे पर आते-जाते भावों को पढ़ रही थी। मेरे लिए संदेश भी था कि मुझे कुछ हो जाता तो वह किस भयानक सदमे से गुजरती। मैं क्या कहती! नि:शब्द थी। आज मेरा चेहरा उसके चेहरे की तरह भाव विहीन था। चार लोगों के उसके परिवार में अब वह अकेली है, वे तीनों नहीं हैं। जाने-अनजाने मैंने उसका दर्द भरा इतिहास दोहरा दिया था। वह दृश्य मेरे सामने था- किस तरह घर के तीन सदस्य बर्फबारी में निकल गए होंगे। वह चिंता कर रही होगी, और जब उसे खबर मिली होगी कि उनका एक्सीडेंट हो गया तो भरे-पूरे परिवार को खोकर उस पर क्या गुजरी होगी!
मैं कल्पना में बहुत दूर तक गयी और उन दृश्यों को जाकर वर्तमान में लौट आयी। यह सोचकर ही काँपती रही कि एंजिला ने स्वयं को कैसे संभाला होगा। मैं उसके प्रति सहानुभूति जताने लायक भी नहीं रही थी। किस मुँह से कुछ कहती! उस अतीत को जिसे वह भूलना चाहती है, मैं फिर एक बार उसके सामने लेकर आयी। उसके घायल मन को मैंने फिर लहूलुहान किया था। मेरा मन पश्चाताप में झुलस उठा।
मेरे रंग-रूप में उसे अपनी बेटियों का अक्स नजर आता होगा। उसने मुझे लेकर कई कल्पनाएँ बुन ली होंगी और मैं रंगों के चक्कर में अपने मन को बेरंग करती रही। पता नहीं उसका हाथ मेरे हाथ में था, या मेरा उसके हाथ में। अपनी आँखों की गीली पोरों में अब मैं सिर्फ स्पर्श को महसूस कर रही थी। भीतर बँधी कई गाँठें चटक-चटक कर टूट रही थीं। एक डॉक्टर बनना था मुझे जो लोगों की ग्रंथियाँ खोलता है, बाँधता नहीं।
मेरे सामीप्य से उसके चेहरे पर जो मुस्कान थी, वह बरसों तक बनी रहे, यह जिम्मेदारी मुझ पर थी। मेरे कंधों ने खुशी-खुशी यह जिम्मेदारी ओढ़ ली। हिमपात कहर ढा कर गुजर गया था, घर के बाहर भी और भीतर भी। घर की आबोहवा में ताजी धूप ने दस्तक दे दी थी। हर तरफ़ फैले दूधिया बर्फ के कण और एंजिला का चेहरा दोनों ही मुझे मुझसे मिला रहे थे।
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “हम पर गुज़री वो फुरक़त न हो कभी…”।)
ग़ज़ल # 86 – “हम पर गुज़री वो फुरक़त न हो कभी…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’