(आजची कथा ‘धाग्या’वीण‘ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी’ यांची आहे. त्या लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. खालील चित्र हे प्राप्त चित्रावरून प्रेरित होऊन आकाश पोतदार यांनी काढलेले आहे.)
तुझी पोर्टरेट मला का आवडतात माहित्येय?
उत्तर जर कलात्मक नसेल,प्रॅक्टिकल असेल तर नको सांगूस.
ए काय रे कुचकटासारखं बोलतोयस ! मी सांगणार…मला तुझे डोळे आवडतात आणि तुझ्या प्रत्येक पोर्टरेटमधे मला तेच,तसेच दिसतात.
छान ! अहो सायन्स स्टुडंट,डोळे बायोलॅजिकली सारखेच असतात,फक्त त्याच्या आत आणि भोवती काय घडलय यावर त्याचं वेगळेपण असतं.हं! आता तू म्हणतेस तर कदाचित मी माझेच डोळे शोधत असतो बहुधा त्या कॅरेक्टर मधे किंवा मी अशीच कॅरेक्टर शोधतो.हम् म् म्…म्हणजे ‘कला’ नाहीच म्हणा आवडत आमची.
ए ! ही थट्टा असेल तर बास कर हं,तुला माहितेय ना? तू कलाकार आहेस आणि मी न’कलाकार.
हं..विज्ञानाच्या चष्म्यातून सतत फॅक्ट शोधणे…….
आज १० वर्षानंतर आयुष्याचं ‘फॅक्टच’ माझ्या कागदपत्राच्या रूपानं माझ्या हातात होतं. आधी डोळे, मग दोन्ही किडण्या आणि आता… हृदय आणि मग माझ्या रवीचं संपूर्ण शरीर मेडीकलच्या स्टुडंट्सच्या अभ्यासासाठी मी दान करणार. पेंटीग करताकरताच सांडलेल्या रंगाच्या दाट पाण्यावरून पाय घसरण्याचं निमित्त, थेट डोक्याच्या पार्श्वभागावरच दाणकन आपटला. किती काळ गेला होता मधे, किमान चार तास. तळपायाला विविध रंगांचा लेप होता तर डोक्याखाली मात्र लाल रंगाचा पाट वाहिला होता.मधल्या तासांमुळे बहुधा लालसर चॉकलेटी…डोंट नो….रंगांच्या बाबतीत सतत मला करेक्ट करणारा रवी आत्ता शुद्धीत होता कुठे ….नंतर तर तो शुद्धितच नाही आला. आता जो रवी ’कोमा’त आहे त्याला, त्याएका चित्रकाराला किती वर्ष अंधाराच्या काळ्या गर्द रंगात जगवत ठेवायचं? असा विचार केला, डॉक्टरांचे सल्ले घेतले.
वेगवेगळ्या ठिकाणची गरज ओळखून त्याला वेगळ्याजिवांशी धागे जुळवून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
माझा रवी कित्येकांच्या आयुष्यात आता उगवलाय.दिवसाच्या सगळ्या प्रहरांचे रंग तो रंगवत असेलच की.
क्लिनीकमधे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे मी निरखून बघत असते, बहुधा फॅक्टच शोधत असते, शोधत असते की या डोळ्यांचा आणि माझा काही बंध असेल का ? असाच “धाग्याविण”!
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.
☆ || थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||… लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन् गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे सोळावं वर्ष होतं.. गेली पंधरा वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काहीजण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात.
कोण आहेत ही मुलं मुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. “हे असलं काम मी का करु?” आणि “बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?” असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिका’ला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं..! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्रधर्माचं दर्शन घडतं..!
रात्री पावणे दोन वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि महादरवाजा ओलांडून पहिली प्लॅस्टिकची बाटली उचलली ती पहाटे चार वाजता.. तिथून आमचे हात कचरा उचलण्यात जे गुंतून गेले ते शेवटची बॅग दुपारी बारा वाजता भरेपर्यंत अखंड काम करत होते..! आम्ही नेलेल्या बॅग्ज आणि पुन्हा वरती घेतलेल्या काही जम्बो बॅग्ज असा मिळून जवळपास तीन ट्रक खचाखच भरतील इतका कचरा गोळा करण्याचं काम आम्ही केलं..!
आपल्याकडं हे एक भारी असतं बघा. कचरा करणाऱ्यांनाही कुणी विचारत नाही अन् कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्यांचीही दखल कुणी घेत नाही. हजारो लोक गडावर होते, कुणी हुल्लडबाजी करत होते, कुणी तलवारी घेऊन नाचत होते, कुणी पारंपरिक पद्धतीच्या पोशाखात सजूनधजून आले होते. हौशे नवशे गवशे सगळे होते. पण, “चला, मीही तुमच्यासोबत काम करतो” असं एकही जण म्हणाला नाही. उलट, अनेकांना खरोखरच आम्ही सफाई कामगार वाटलो. त्यांनी शिट्टी वाजवून आम्हाला बोलावलं अन् त्यांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळी उचलायला लावल्या..! आदल्या दिवशी गडावर कुणीतरी पॅक फूड वाटलं होतं. ते उष्टं, सडलेलं, माशा घोंगावणारं जेवण जागोजागी तसंच पडलेलं होतं. कुणीतरी एक गृहस्थ आम्हाला “अरे मुलांनो, ते खरकटं अन्न सुध्दा उचला रे” असं सांगत होते. त्यांच्या हातात बिस्किटांचा पुडा होता. आम्हाला सांगताना त्यांनी बिस्किटे खाल्ली अन् रिकामा प्लॅस्टिकचा कागद तिथंच टाकून निघून गेले…!
दोन जण तटावर बसून दाढी करत होते. इतक्या उंचावर येऊन थंडगार हवेचा आनंद घेत घेत दाढी करणं म्हणजे सुख असणार.. दाढ्या आटोपल्यावर उभयतांनी आपापली रेझर्स तटावरून खालच्या दरीत फेकून दिली..!
आर ओ’चा प्लांट होळीच्या माळावर बसवण्यात आला होता. काही महाभाग ते पाणी घेऊन आडोशाला जाऊन पोट रिकामं करण्यासाठी वापरत होते. चार-पाच जणांनी आर ओ’चं पाणी बादल्यांमध्ये भरुन घेतलं आणि हत्ती तलावापाशी जाऊन चक्क आंघोळी केल्या..!
आपल्या समाजातल्या लोकांच्या बुद्धीची आभाळं अशी फाटलेली आहेत. कुठं कुठं आणि किती ठिगळं लावायची?
“एक जमाना असा होता की, आम्हाला हीच कामं हे लोकं करायला लावत होते, आता यांच्यावर ही वेळ आली” असं म्हणून एकमेकांच्या हातांवर टाळ्या देऊन छद्मीपणानं हसणारं सुध्दा एक टोळकं आमच्या मागं होतं. मी फक्त ऐकत होतो. पण मागं वळून पाहत नव्हतो. सावरकर, टिळक, पेशवे अशा अनेक विशिष्ट लोकांविषयी येथेच्छ टिंगलटवाळी चालली होती. माझे डोळे लाल झाले होते, पाण्यानं भरले होते. “आज कचरा उचलायला लावलाय, उद्या नासवलं पाहिजे”, हे शब्द कानांवर पडले, मग मात्र मी मागं वळून त्यांच्याकडं बघितलं. डोळ्यांत डोळे घालून बघितलं. अठरा वीस वर्षं वयाची पोरं होती ती. माझा चेहरा बघूनच त्यांच्या पोटात कळ आली असावी. पुढच्या क्षणाला तिथून सगळे पळून गेले..! असो.
यावेळी आमच्या गटानं केवळ गडाची स्वच्छताच केली असं नाही. गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या दहा कातकरी कुटुंबांसाठी आम्ही भरपूर साहित्य गोळा करुन आणलं होतं. कपडे, भांडी, खेळणी, धान्य, तेल, चहा- साखर, धान्य साठवण्यासाठी डबे, पाणी साठवण्यासाठीचे बॅरल असं पुष्कळ साहित्य तिथल्या परिवारांना दिलं. जवळपास दोनशे किलोहून अधिक धान्य दिलं. त्यात गहू, ज्वारी, तांदळाची पोती, तूर आणि मुगाची डाळ, तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी असं सगळं सामान होतं. जवळपास पन्नास कुटुंबाकडून मुलांनी हे सगळं गोळा केलं होतं. कपड्यांमध्ये साड्या होत्या, पुरुषांसाठी शर्ट्स, पँट, जीन्स, टी शर्ट, रेनकोट, मोठ्यांसाठी स्वेटर्स, लहान मुलांसाठी कपडे आणि स्वेटर्स, बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट्स, सतरंज्या असं सामान दिलं. हे गोळा करण्यासाठी मुलं घरोघरी फिरली. लोकांनीही मुलांना चांगला प्रतिसाद दिला. या सगळ्या मुलांच्या पालकांनी यात आर्थिक बाबतीत सक्रियता दाखवली.
चाळीस-चाळीस वर्षं वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही अशा दुर्गम भागात ही कुटुंबं राहत आहेत. कुणाही राजकीय नेत्याला त्यांच्याकडं बघायला सवड नाही. आता ऑगस्ट महिन्यात या दहा कुटुंबांसाठी आम्ही सोलार दिवे घेऊन जाणार आहोत, असा संकल्प केला आहे. इच्छा तेथे मार्ग…! आमच्या या संकल्पाला नक्की यश येईल.
आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही. (रायगडावर सावली देणाऱ्या झाडांची नितांत गरज आहे. पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार कदाचित जमिनीत झाडं लावता येणार नाहीत. पण मोठमोठ्या आकाराच्या आकर्षक कुंड्यांमध्ये निश्चित लावता येतील. महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन हा विषय उत्तम करता येईल. पण इच्छाशक्ती नाही.) ‘भ’ आणि ‘मा’ च्या भाषेत बोलणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी नाही. माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी यातला फरक आजही लोकांना कळत नसेल तर,आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे,असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे.
शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे.
लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे.
“आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजीमहाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे.
☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
अखेर तो धावपळीचा, उत्साहाचा दिवस उजाडतो. हातात असलेल्या कॅमेराची बॅग सांभाळत मी त्या स्टुडिओवजा रूममध्ये जाते. तिथे जणू सिनची तयारी सुरू असते. दिग्दर्शक आणि कथा लेखक त्या सीन लावणाऱ्यांना भरपूर सूचना करत असतात. त्यात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ठाकठूकचा आवाज, मध्येच कुठे पडदा जोराने झटकल्याचा, जोरात टेबल सरकवल्याचा आवाज हे वातावरण निर्मितीत मोलाची भर घालत असतात. या सगळ्या तालामध्ये मीही अगदी एकतानतेनं कॅमेराची बॅग उघडून तो सेट करायला लागते.
वर्षातून किमान तीन-चारदा तरी हे काम करावे लागत असल्याने सगळ्यांचे हात सरावलेले असतात. नजरसुद्धा हळूहळू सरावायला लागलेली असते. तर कॅमेराचा स्टॅन्ड, त्याची योग्य पोझिशन, त्याची निरनिराळी सेटिंग्ज इकडे माझं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि मग एकदा मनासारखं सेटिंग झाल्यावर हळुवार हाताने त्या कुशनमधून अलगद कॅमेरा बाहेर काढला जातो. आणि मग स्टॅन्डवर त्याला स्थानापन्न करण्याचा सोहळा सुरू होतो. कॅमेरा जणू त्या दिवशी राजाच्या थाटात असतो. त्याचा रुबाब काय वर्णावा… खरंतर तो ही एक अप्रत्यक्ष दिग्दर्शकच आहे की आजचा. म्हणून त्याचाही मूड सांभाळावा लागतो. जरासा सुद्धा सेटिंग्ज मधला ढिलेपणा त्याला चालत नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष एकदा माझ्याकडे आणि एकदा कॅमेराकडे लागलेलं असतं. कारण सीन मधला कॅमेरा सेट करणं हा आमच्यासाठी शेवटचा पण महत्त्वाचा भाग असतो.
सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आम्हा दोघांच्या म्हणजे मी आणि कॅमेराच्या दृष्टिकोनातून ‘परफेक्ट व्ह्यू’ सेट झाला की मी जरा रिलॅक्स होते. आणि मग आपोआपच माझी नजर विंगेतून जणू लपूनछपून पाहणाऱ्या आजच्या विशेष कलाकारांकडे म्हणजेच पॅकिंगमधून हळूच वर डोकावणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे जाते. दृष्ट लागण्यासारखं रुपडं असतं त्यांचं आज ! तुकतुकीत अंगकांती असलेल्या आणि आपल्या काळ्याकरड्या पोशाखात उठून दिसणाऱ्या या प्रॉंडक्टसवर आज विशेष पॉलिश्ड झळाळी असते. त्यांचा नवथरपणा जाणवत असतो.
आता प्रमुख दिग्दर्शक सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. त्यातल्या एकेका प्रॉंडक्टला हळूहळू त्याच्या त्याच्या नियोजित जागेवर सेट केलं जातं. ते करताना प्रत्येकाची एनर्जी लेवल चेक केली जाते. सगळी फंक्शन्स व्यवस्थित होतायत ना, जर त्या प्रॉंडक्टला अटॅचमेंट असतील तर त्यांचा शार्पनेस व्यवस्थित आहे ना. वगैरे वगैरे……
….. आणि मग ऑल ओके आहे हे सगळ्यांच्याच नजरेतून चेक केलं जातं. मग लाईटचा फोकस्ड अभिनय सुरू होतो. कधी मंद, कधी तीव्र, कधी वरून, कधी खालून आणि मग प्रत्येक सीननुसार योग्य असणारं त्याचं सेटिंग ठरवलं जातं. ते करताना रिफ्लेक्शन तर पडत नाहीये ना, शॅडो ओव्हरलॅप होतं नाहीयेना हे कळीचे मुद्दे विचारात घेतले जातात. आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अॅक्शन असं म्हणून फायनल कामाला म्हणजेच फोटोग्राफीला सुरुवात होते. जिच्यासाठी हा सगळा जामानिमा झालेला असतो आणि जी सलग काही तास चालते.
तर मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काही सिनेमा-नाटक इ.बाबतच वर्णन नाहीये… पण दिग्दर्शक, सिन, कथानक, कॅमेरा, स्टुडिओ हे शब्द तर आलेत. मग नक्की आहे तरी काय हे…..
… तर मंडळी, ही आहे एका प्रोडक्टच्या यूझर मॅन्युअलच्या, म्हणजेच इन्स्ट्रक्शन मॅन्युअलच्या निर्मितीची तयारी… आपण एखादी छोटीशी वस्तू किंवा मशीन विकत घेतलं की त्याच्यासोबतच एक छोटीशी पुस्तिका आपल्याला मोफत मिळते. जर ती वस्तू महागाची असेल आणि वापरण्यासाठी आपल्याला सवयीची नसेल तर आपण ती उघडून बघतो. त्यात काही चित्रं दिलेली असतात. काही सूचना दिलेल्या असतात, त्या वाचतो आणि त्याप्रमाणे आपण ती वस्तू वापरायला सुरुवात करतो. त्यात काही बिघाड झाले असतील तर काय करायचं, वस्तू वापरून झाल्यावर कशी ठेवायची, कुठे ठेवायची, वापरण्यासाठीसुद्धा ती कशा ठिकाणी ठेवली गेली पाहिजे, काय क्रमाने ती इन्स्टॉल (रचली) केली गेली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यात सांगितलेल्या असतात. आपल्यासाठी तर या गोष्टी खिजगणतीतही नसतात.
पण हीच प्रॉडक्ट्स जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाणार असतात, उदाहरणार्थ मेडिकल सर्जरी… तेव्हा त्यांच्या निर्मितीनंतर त्यांच्या वापरण्याबाबत काटेकोरपणे सूचना द्याव्या लागतात. आणि वापरणारे त्या पाळतातही. म्हणूनच गरज असते निर्दोष आणि अचूक अशा युझर मॅन्युअलची. ही युझर मॅन्युअल्स उत्कृष्ट असणं हे देखील त्या प्रॉडक्ट्सचं एक वैशिष्ट्य असतं जे त्याला उत्कृष्ट निर्मितीचा दर्जा देण्यामध्ये सहाय्यभूत ठरतं. अशी ही यूझर मॅन्युअल्स तयार करण्याचं काम ग्राफिक डिझायनर म्हणून काही वर्षांपूर्वी मी अनेकदा केलं आहे. पण हे सगळं आज सांगण्याचं प्रयोजन काय… तर २७ एप्रिल हा आहे ‘वर्ल्ड ग्राफिक्स डे’!
आणि वर वर्णिलेल्या फोटोग्राफीपासून पुढे त्याचं युझर मॅन्युअलमध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरणारं काम म्हणजे ग्राफिक्स डिझाईन. याच्यासाठी ग्राफिक्स डिझायनर आपलं कौशल्य पणाला लावतो. तो या सगळ्या फोटोंवरून काही ठराविक फोटो निवडून क्रमवार पद्धतीने एक कथा तयार करतो जी दिग्दर्शकांच्या कथेशी मिळतीजुळती असते. त्यावरून वेगवेगळ्या ग्राफिक डिझाईनच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने या सगळ्या फोटोंचं ग्राफिक्समध्ये रूपांतर करतो. आणि मग त्यात तज्ज्ञ व्यक्तींच्या योग्य सूचना, तसंच ते बनवणारे कुशल इंजिनियर्स यांच्याकडील माहिती एकत्रित करून पुढे एडिटिंग, प्रूफ रीडिंग इ. आणखीन बऱ्याच प्रक्रिया होऊन हे युझर मॅन्युअल / इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तयार होतं. ज्याच्याकडे काही अपवाद वगळता जास्त गांभीर्याने पाहिलं जात नाही.
प्रत्येक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असंच केलं जातं का… माहित नाही. ते प्रॉडक्ट्सनुसार नक्कीच बदलतं. आता तर आणखीन सॉफ्टवेअर्सही अपडेट झाल्यामुळे याचीही पद्धत बदललेली असू शकते. पण ग्राफिक्स, त्याचे डिझाईनिंग, त्यासाठी लागणारे विचार आणि इमॅजिनेशन या गोष्टी मात्र तशाच असतील. सुंदरता, उपयुक्तता, सुलभता आणि नाविन्यता या चार गोष्टी आज आपल्या जगण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आणि हे सगळं सहज साध्य होत आहे त्यात एक वाटा ग्राफिक्स डिझाईनचाही आहे, हे महत्त्वाचं !
☆ शेवटी अंतर तेवढंच राहिलं… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…
— शेवटी अंतर तेवढंच राहिलं .
लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.
— शेवटी अंतर तेवढच राह्यलं.
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…
— शेवटी अंतर तेवढच राह्यलं.
लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
— शेवटी अंतर तेवढंच राह्यलं.
लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकीमधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं,
आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…
— शेवटी अंतर तेवढंच राहीलं.
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावतांना दिसतात.
— शेवटी अंतर सारखंच राहतं…
लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच माणसं मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा कळतं …
— शेवटी अंतर सारखंच राहतं…
आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार. मग मनाशी पक्क केलं– जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…
म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले होते ,
ठेविले अनंते तैसेचि राहावे,
चित्ती असू द्यावे समाधान ...
….. मित्रांनो खूश रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जीवन खूप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा…… आणि अर्थातच … कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.
संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले
मो 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “ग़ाफ़िल हुआ सैर करना…”।)
ग़ज़ल # 82 – “ग़ाफ़िल हुआ सैर करना…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी विचारणीय लघुकथा – बोझ-।)
☆ लघुकथा ☆ बोझ ☆ श्री हरभगवान चावला ☆
चेरी ब्लॉसम स्कूल में कार्यरत हरदीप और उसकी पत्नी नवदीप अपनी सहकर्मी शिक्षक अनामिका की छः साल की बेटी को आज अपने साथ अपने खेत में लेकर आए थे। अनामिका दो साल से इस स्कूल में काम कर रही थी। उसकी बच्ची भी उसके साथ ही स्कूल में आती थी। अनामिका के पति चार साल से ऑस्ट्रेलिया में थे। बहुत ख़ूबसूरत और प्यारी सी वह बच्ची खूब मस्ती में ट्यूबवेल की धार के नीचे नहाते हुए उनके बच्चों के साथ अठखेलियाँ कर रही थी। वह कभी खेत की ओर दौड़ जाती, कभी नाचने लगती। नवदीप ने पति से कहा, “देख रहे हो, यह वही बच्ची है जो स्कूल में किसी से नहीं बोलती। कितनी मस्ती कर रही है।”
“पता नहीं आज ये हमारे साथ आने के लिए तैयार कैसे हो गई? ये तो आधी छुट्टी में भी बच्चों के साथ खेलने की बजाय या तो अपनी माँ के पास चली जाती है या किसी कोने में बैठ कर पेंटिंग करने लगती है।”
“अनामिका बता रही थी कि सोती भी उससे चिपक कर है। इसका हाथ सोते हुए भी उसकी देह के किसी हिस्से पर रहता है।”
“इस उम्र में इतनी संजीदगी अच्छी नहीं।” हरजीत ने एक लम्बी साँस ली।
बच्चे जी भर कर नहा चुके थे और अब आम खा रहे थे। नवदीप ने पूछा, “सौम्या तुम स्कूल में किसी से बोलती क्यों नहीं?” सौम्या गंभीर हो गई, बिलकुल वैसे ही जैसे स्कूल में होती थी।
“बताओ न बेटा।” नवदीप ने प्यार से उसकी गाल थपथपा दी।
“मम्मा पास जाना है।”
“हाँ बस अभी चल रहे हैं मम्मा पास, बता दो प्लीज़, तुम स्कूल में किसी से बोलती क्यों नहीं?”
“मुझे मम्मा के पास ही रहना है आंटी।”
“मम्मा के पास ही तो रह रही हो बेटा।”
“मम्मा जब गु़स्सा करती है तो कहती है तुझे ऑस्ट्रेलिया भेज दूँगी।” सौम्या जैसे दहशत से पीली पड़ गई थी।
“ओ माई गॉड! तो यह है कारण। नन्हीं सी जान और इतना बड़ा बोझ…” बरबस नवदीप की सिसकी निकल गई। उसने सौम्या को कसकर सीने से चिपका लिया। सौम्या की देह काँप रही थी और नवदीप की आवाज़। सिसकती नवदीप सौम्या की पीठ पर हाथ फेरते हुए लगातार कहे जा रही थी, “तू हमेशा मम्मा के पास रहेगी… तुझे कोई ऑस्ट्रेलिया नहीं भेजेगा… कभी नहीं…”
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – फिल्मी गीतों में अभिव्यक्त उदात्त प्रेम
(कुछ पूर्व लिखा लघु आलेख)
प्रेम केवल मनुष्य नहीं अपितु सजीव सृष्टि का शाश्वत और उदात्त मूल्य है। इस उदात्तता के दर्शन यत्र-तत्र-सर्वत्र होते हैं। उदात्त प्रेम के इस रूप को प्राचीन भारत में मान्यता थी। विवाह के आठ प्रकारों की स्वीकार्यता इस मान्यता की एक कड़ी रही।
कालांतर में अन्यान्य कारणों से सामाजिक और सांस्कृतिक मूल्यों में भारी उलटफेर हुआ। इस उलटफेर ने वर्ग और वर्ण के बीच संघर्ष उत्पन्न किया। इसके चलते प्रेम की अनुभूति तो शाश्वत रही पर सामाजिक चौखट के चलते अभिव्यक्ति दबी- छिपी और मूक होने लगी।
1931 में आया पहला बोलता सिनेमा ‘आलमआरा’ और मानो इस मूक अभिव्यक्ति को स्वर मिल गया। यह स्वर था गीतों का।
अधिकांश फिल्मों की कहानी का केंद्र नायक, नायिका और उनका प्रेम बना। यह प्रेम फिल्मी गीतों के बोलों में बहने लगा। ख़ासतौर पर 50 से 70 के दशक के गीतों की समष्टि में व्यक्ति को अपनी भावना की अभिव्यक्ति मिलने लगी। समष्टि के लिए रचे गीत वह गा सकता था, गुनगुना सकता था/ थी, जिनमें निगाहें कहीं थीं और निशाना कहीं था। इन प्रेमगीतों ने भारतीय समाज को मन के विरेचन के लिए बड़ा प्लेटफॉर्म दिया।
गीतकारों ने गीत भी ऐसे रचे जिसमें प्रेम अपने मौलिक रूप में याने उदात्त भाव में विराजमान था। प्रेम को विदेह करती यह बानगी देखिए, ‘दर्पण जब तुम्हें डराने लगे, जवानी भी तुमसे दामन छुड़ाने लगे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा सर झुका है, झुका ही रहेगा तुम्हारे लिए..।’
स्थूल को सूक्ष्म का प्रतीक मानने की यह अनन्य दृष्टि देखिए, ‘तुझे देखकर जग वाले पर यकीन क्योंकर नहीं होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा…/ अंग-अंग तेरा रस की गंगा, रूप का वो सागर होगा..।’
प्रेम के मखमली भावों की शालीन प्रतीकात्मक अभिव्यक्ति का यह ग़जब देखिए, ‘मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद यह गहरा, बात ज़रा सी।’ श्रृंगार भी शालीनता से ही अलंकृत रहा,’ मन की प्यास मेरे मन से न निकली, ऐसे तड़पूँ हूँ जैसे जल बिन मछली।’
प्रीत की उलट रीत कुछ यों अभिव्यक्त हुई है, ‘दिल अपना और प्रीत पराई, किसने है यह रीत बनाई..।’ इस रीत के रहस्य को छिपाये रखने का भी अपना अलग ही अंदाज़ है, ‘होठों पे ऐसी बात मैं दबाके चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई..।’ प्रेयसी के अधरों तक पहुँचे शब्दों में ‘अ-क्षरा’ भाव तो सुनते ही बनता है, ‘होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो..।’ होठों की बात कहने के लिए मीत को बुलाना और मीत को सामने पाकर आँख चुराना दिलकश है, साथ ही अपनी बीमारी के प्रति अनजान बनना तो क़ातिल ही है, ‘मिलो न तुम तो हम घबराएँ, मिलो तो आँख चुराएँ../ तुम्हीं को दिल का राज़ बताएँ, तुम्हीं से राज़ छुपाएँ,…हमें क्या हो गया है..!’
चाहत अबाध है, ‘चाहूँगा तुझे सांझ सवेरे’.., चाहत में साथ की साध है, ‘तेरा मेरा साथ रहे..’ चाहत में होने से नहीं, मानने से जुदाई है,’जुदा तो वो हैं खोट जिनकी चाह में है..।’ अपने साथी में अपनी दुनिया निहारता है आदमी, ‘तुम्हीं तो मेरी दुनिया हो’ पर गीत दुनियावी आदमी को दुनिया की हकीकत से भी रू-ब-रू कराता है, ‘छोड़ दे सारी दुनिया किसीके लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए।’
उदात्त प्रेम केवल प्रेमी-प्रेमिका तक सीमित नहीं रहता। इसके घेरे में सारे रिश्ते और सारी संवेदनाएँ आती हैं। देश के प्रति निष्ठा हो, भाई- बहन का सहोदर भाव हो या पिता से परोक्ष बंधी पुत्री की गर्भनाल हो.., गीतों में सब अभिव्यक्त होता है। कलेजे के टुकड़े को विदा करती पिता की यह पीर साहिर लुधियानवी की कलम से निकल कर रफी साहब के कंठ में उतरती है और सार्वभौमिक तथा सार्वकालिक होकर अमर हो जाती है, ‘बाबुल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले/ मैके की ना कभी याद आए, ससुराल में इतना प्यार मिले..।’ उदात्त में पराकाष्ठा समाहित है तब भी इसी गीत में उदात्त की पराकाष्ठा भी हो सकती है, इसका प्रमाण छलकता है, ‘..उस द्वार से भी दुख दूर रहे, जिस द्वार से तेरा द्वार मिले..।’
गीत बहते हैं। गीतों में प्यार की लय होती है। प्यार भी बहता है। प्यार में नूर की बूँद होती है,..‘ ना ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं/ नूर की बूँद है, सदियों से बहा करती है।’
उदात्त प्रेम ऐसा ही होता है, फिर वह चाहे फिल्मी गीतों के माध्यम से मुखर होकर गाए या भीतर ही भीतर अपना मौन गुनगुनाए।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
आषाढ़ मास साधना- यह साधना आषाढ़ प्रतिपदा तदनुसार सोमवार 5 जून से आरम्भ होकर देवशयनी एकादशी गुरुवार 29 जून तक चलेगी।
इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “हाइपर बोल“।)
अभी अभी # 87 ⇒ हाइपर बोल… श्री प्रदीप शर्मा
हिंदी व्याकरण में एक अलंकार है, अतिशयोक्ति अलंकार, जिसे अंग्रेजी में hyperbole (हाइपरबोल) कहते हैं। हमने अंग्रेजी सहित कई भाषाओं को आत्मसात किया है, और उन्हें हमारी बोलचाल की भाषा में ढाल लिया है। अधिक बोलने वाली महिलाओं को अक्सर सर में हेडएक (headache) और अपच के कारण कई पुरुषों को पेट में भी हेडएक होने लगता है।
Ten thousand saw I at a glance. यह मैं नहीं कह रहा, अंग्रेजी कवि विलियम वर्डस्वर्थ कह रहे हैं। जिसे हम अतिशयोक्ति अलंकार कहते हैं, वह अंग्रेजी का figure of speech, hyperbole ही है। ।
मान लिया आप कवि हो, पर दस हज़ार डफोडिल्स एक झलक में, भाई साहब आप भले ही इसे अपनी भाषा में हाइपरबोल कह लें, लेकिन ये बोल ज़रा, जरूरत से ज्यादा ही हाइपर हो गए हैं। जिस तरह आपकी भाषा है, हमारी भी एक भाषा है, संस्कृति है, विचार है।
जब कोई ज्यादा फेंकता है, तो हम भी हाइपर हो जाते हैं।
ऐसे बोल जिससे हमारे सर में हेडएक हो, हमारा टेंपर हाइपर हो, उसे हम हाइपरबोल ही कहते हैं। हमारे हिंदी कवियों ने भी अतिशयोक्ति अलंकार का भरपूर प्रयोग किया और आजकल हमारे राजनेता भी इन्हीं अलंकारों से लदे हुए हैं। अतिशयोक्ति की भी हद होती है। पहले जहां तौलकर बोला जाता था, वहीं आजकल, बिना तराजू से तौले, क्विंटल में फेंका जा रहा है। ।
कितना बढ़िया शब्द चुना है आप लोगों ने अतिशयोक्ति अलंकार के लिए, हाइपरबोल ! हम गांव के सीधे सादे आपस में राम राम से अभिवादन करने वाले, आज कहां से कहां पहुंच गए। इस्स, लाज आती है बताते हुए। किसी ने कहा हरि बोल, तो हमने भी हरि बोल कहा। हनुमान जी के भक्त ने जय बजरंग बली कहा, तो हमने हनुमान जी की भी जय जयकार करी।
हमारे लिए सब भगवान एक हैं, आप चाहे जय श्री कृष्ण कहें अथवा जय श्री राम, हमें तो बस भगवान का नाम लेने से काम।
लेकिन हमारे राजनेता बड़े चतुर निकले। उन्हें जब अपनी भी जय जयकार करवानी हो, रैलियां निकालनी हों, तो वे अपने नाम के साथ भगवान के नाम की भी जय जयकार करवाने लगे। क्या यह अतिशयोक्ति नहीं हुई, इसमें कोई आभूषण नहीं, कोई अलंकार नहीं, हमारे लिए यह बकवास बोल है, जिसके लिए हमने आपका अलंकार hyperbole हाइपर बोल
हाइपरबोल में आज हम thousand से मिलियन और बिलियन तक पहुंच गए हैं। हमारा राजनेताओं का आंकड़ों का गणित आज जहां तक पहुंचा हुआ है, वहां तक कभी आपका कोई पहुंचा हुआ कवि, नहीं पहुंच पाया होगा। हमारी नज़र हजारों से हटकर करोड़ों तक पहुंच गई है।
आपका तो नाम ही कविवर wordsworth था, जिसका हर शब्द कीमती था, words worth, अतः आपसे क्षमा मांगते हुए हमने आपके अलंकार हाइपरबोल पर अपना कॉपीराइट स्थापित कर लिया है। अतिशयोक्तिपूर्ण कथन में कोई हमसे बाजी नहीं मार सकता। बोल बोल, जब भी बोल हाइपरबोल। ।