श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १९ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष.

म.वि.राजाध्यक्ष हे मराठीतील नामवंत समीक्षक व ललित लेखक होते.त्यांनी आपले शिक्षण मुंबई येथे पू  केले.शिक्षण काळात त्यांनी इंग्रजी साहित्यातिल वर्डस्वर्थ पारितोषिक प्राप्त केले.त्यांनी पुढील काळात अहमदाबाद,मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी इंग्रजीचे अध्यापन केले.

‘अभिरुची’ या मासिकातून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली.या मासिकात निषाद या टोपणनावाने लिहिलेले वाद संवाद हे सदर लोकप्रिय झाले. रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा,ज्योत्स्ना या मासिकातूनही त्यांनी लेखन केले आहे.

पाच कवी हे त्यांचे पहिले पुस्तक. यात त्यांनी पाच आधुनिक कवींच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यांचे अन्य साहित्य असे:

समीक्षा: भाषाविवेक, शब्दयात्रा

लघुनिबंध: अमलान, पंचम, आकाशभाषिके, खर्डेघाशी, पाक्षिकी, मनमोकळे, शालजोडी.

इतर : कुसुमावती देशपांडे यांच्यासह लिहीलेले ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’

श्री.राजाध्यक्ष हे पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळाचे काही वर्षे मुख्य संपादक होते. तसेच नॅशनल बुक ट्रस्ट चे विश्वस्तही होते. ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे सदस्य व साहित्य अकादमीच्या मराठी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.

दि.19/04/2010 ला म.वि.राजाध्यक्ष यांचे निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस   विनम्र अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted