? इंद्रधनुष्य ?

आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गावे… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

आपल्या भारतातील विक्षण, अद्वितीय गावे

१ ) आळंदी गाव (महाराष्ट्र) – आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास – मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.

२ ) शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) – संपूर्ण गावात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

३ ) शेटफळ (महाराष्ट्र) – प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

४ )- हिवरे बाजार (महाराष्ट्र) – भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे.  ६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.

५ )– पनसरी (गुजरात) – भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गावातील सर्व ‘पथदीप’ सौर उर्जेवर चालतात.

६ )- जांबुर (गुजरात) – भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

७ ) कुलधारा (राजस्थान) – “अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.

८ )- कोडिन्ही (केरळ) – जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

९ )– मत्तूर (कर्नाटक) -दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारे गाव.

१० )- बरवानकाला (बिहार) – ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गावात लग्न-सोहळाच नाही.

११ )– मॉवलिनॉन्ग (मेघालया) – ‘आशिया’ खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव. पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

१२ )– रोंगडोई (आसाम) – बेडकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा ‘ग्रामसण’ च असतो.

१३ )- कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र) – Korlai  विलेज स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही ” पोर्तुगीज “ भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारे गाव.

१४ )-मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश) – एका गावातून ४६ पेक्षा जास्त माणसे  IAS झालेले हे गाव, ९० टक्केपेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…

१५ )– झुंझुनू (राजस्थान) – फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पाच पाच पिढ्यांपासून  प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती… ६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजारहून  जास्त फौजी देशाच्या विविध भागात नोकरीवर रुजू…

— असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गावे असतील. माहिती मिळवा, आणि इतरानांही माहित करून द्या.

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments