सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “मोल क्षणाच्” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
जगण्याची धडपड
कधीच नाही संपत
वेळ काढल्याशिवाय
वेळ कधीच नाही भेटत….
हरवलेल्या क्षणांचे
दुःख असते मोठे
रोज धावता धावता
जगायचे मात्र राहते…
वेळ नाही म्हणून
किती काळ ढकलणार
अर्ध आयुष्य संपल्यावर
मागे वळून मग पाहणार…
आजचा सुंदर दिवस
जगायचा राहून जातो
भूत भविष्यात
आपण हरवून बसतो….
काल गेलाय निघून
परतून न येण्यासाठी
उद्याची कोण देते हमी
सांगा या जीवनी….
आज आणि आता
यावर आपली सत्ता
नको विचारांचा गुंता
ओळखा आपली क्षमता..
झालं गेलं सोडून द्यावं
जगायचे ते जगून घ्यावं
उद्यासाठी का बरं थांबावं
आजच्या क्षणाचं मोल जाणून घ्यावं …
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈