सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर

गौरी, महालक्ष्मी तीन दिवस येतात आणि चैतन्य निर्माण करून जातात. 

गणपती बाप्पा त्यांना माहेरी घेऊन येतात. माहेर हे तीन दिवसाचं असतं हेच सुचवलं आहे गौराईने त्यांची आरास पूजा नैवेद्य रमुन जातो चार पाच दिवस तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत असतो सुवासिनी येतात हळदीकुंकू समारंभ होतो भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते नवीन कल्पना सुचतात आणि दरवर्षी नवीन करण्याची प्रेरणा मिळते.

गावं बदलले कि प्रथा बदलतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात कुलाचार वेगळे असतात. स्वयंपाक, नैवेद्य वेगळे असतात गौराई सगळीकडे जाऊन तृप्त होते आणि आशीर्वाद देऊन जाते.

एकदा सुरु केलेला उत्सव बंद करता येत नाही. काही अडचण आली तर दुसऱ्याकडून करून घेता येत. वृद्धी असेलतरीही दुसऱ्याकडून करून घेता येत वृद्धी म्हणजे गोड विटाळ मानला जातो. सुतक असेलतर मात्र काहीच करता येत नाही. मग काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात आत्ता नाही तर नवरात्रात गौरी बसवता येतात हे कुठल्या आधारावर सांगितलं जातं काही कळत नाही.

पंचांग मध्ये ही अफवा आहे असं सांगितलं आहे मग कोण जोतिषकार आहे जे वेदांच्या पलीकडे सांगतात.

गौरी अहवान वर्षातून एकदाचं होते त्याच वेळी पूजा होते. तशी लक्ष्मी रोजच घरात असते ना ती आहे म्हणून आपण आहोत पण तिला मान तीन दिवसाचा आहे. रोज ती आई म्हणून पाठीशी असते.

नवरात्री हा सोहळा त्या तिघींचा आहे ” महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ” महिषसुराचा वध करण्यासाठी देव देवीला शक्ती प्रदान करण्यासाठी घटी बसतात सात दिवस युद्ध सुरु असतं आठव्या दिवशी देवी होमातून निघून नव्यादिवशी वध करते. नवरात्रीत नऊ दिवसाचा उपवास असतो मग गौरीची पूजा नवरात्रात केल्यावर तिला नैवेद्य कशाचा दाखवणार ती युद्ध सोडून एक दिवस तुमच्याकडे कशी येणार महत्वाचं म्हणजे देव घटी बसले असताना देवी जेवण तरी कसं करणार एकादशी असली तरी अन्नदान किंवा गाईला घास देता येत नाही तिथे नवरात्रीत महालक्ष्मी कशी उभी करणार हा एक प्रश्नच आहे आणि याचे उत्तर ही अफ़वा पसरणाऱ्याकडेच असेल असं वाटतं.

देव म्हणजे श्रद्धा, भक्त, उपासना, देव म्हणजे प्रेम दया होय.

जे काही आहे ते त्याचाच आहे आपण त्याला देणारे कोण, तो करून घेत असतो त्याला हवं त्याच्याकडूनच दोन हात जोडतो ते सुद्धा त्यानेच दिलेले आहेत फुल, उदाबत्ती, नारळ जे काय आहे ते त्याचाच त्याला अर्पण करतो देवाला पोहचतो तो फक्त भक्ती भाव म्हणून परंपरा, कुळधर्म, कुलाचार हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवेत, , , , ,

पाडव्याची गुढी दीपावली ला उभारली आणि लक्ष्मी पूजन पाडव्याला केलं तर चालेल का तसंच गौरी अहवान एकदाचं होत हेच खरं आहे.

श्री स्वामी समर्थ 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments