सुश्री अपर्णा परांजपे
☆ ✍️ स्वान्तसुखाय निर्णय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
१: निर्णय घ्यायचा असेल तर…
आपण एखाद्या निर्णय घेतो तेव्हा एकदा दुसऱ्या बाजूचा ही विचार व्हावा. जरी पटत नसली तरी दुसरी बाजू तरीही शांतपणे एकदा पुन्हा विवेकाने निःपक्षपातीपणे विचार करावा व मगच ठोस निर्णय घ्यावा. कारण आपण स्वतः घेतलेला एक निर्णय आपलेच जीवन बदलवत असतो.
बुध्दी व हृदय दोन्ही एकत्र करून विवेकाने, जागृतपणे, सावधानतेने सारासार विचार करूनच पक्का निश्चय करावा.
२: निर्णय आपल्या हातातच नसेल तर
प्रामाणिकपणाने, आत्मविश्वासाने परिणामांना शांतपणे सामोरे जावे.
आत्मिक समाधान यावरच अवलंबून असते.
*
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈