श्री मोहन निमोणकर 

??

☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका पालकांनी विचारले “काय सर आज तुम्ही सावरकरांचा पुतळा आणून शाळेत कार्यक्रम केला” मी म्हणालो होय 26 फेब्रुवारी म्हणजे सावरकरांची पुण्यतिथी, आणि मराठी राजभाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला, आणि 28 फेब्रुवारीला असतो विज्ञान दिन, यावर दुसरे पालक म्हणाले “सावरकरांसारखे क्रांतिकारक तयार करायचा विचार दिसतोय तुमचा” का हिंदुत्ववादी विचार मुलांच्या माथी मारणार आहात??? “

त्यांना काय म्हणायचंय, हे मला नेमकं कळलं होतं मी म्हणालो, स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय आपण बाजूला ठेवूया एक समाजसेवक सावरकर आणि मराठी भाषेसाठी आपले योगदान देणारा मराठी प्रेमी हा विचार आपण लक्षात घेऊया 

अहो, पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे यांनी सावरकर या विषयांमध्ये पीएचडी केली आणि त्यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सावरकरांच्या प्रतिभेची ओळख करून दिली. जयस्तुते आणि ने मजसी ने याच्याही पलीकडे अनेक गीत रचना करणार हा महाकवी यांनी छत्रपती शिवाजी आणि बाजीप्रभू यांच्यावर पोवाडे लिहिले आहेत शिवरायांची आरती’ ही लिहिली आहे संन्यस्त खडग मध्ये नाट्यगीते लिहिली आहेत. हिंदू एकता गीत लिहिले आहे प्रबोधन पर लावण्याही लिहिले आहेत आणि रत्नागिरीला तर पतित पावन मंदिर स्थापन करून त्यांनी सामाजिक एकतेसाठी केलेले कार्य हे सारं पुढच्या पिढीला कळायला हवं ना!! जे आमच्यापाशी आहे ते आम्हाला माहित आहे ते सर्व विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे ना!! एक साहित्यिक सावरकर त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा शक्ती आणि मायबोलीवर असलेलं त्यांचं प्रेम मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना सावरकरांनी मराठी मध्ये प्रतिशब्द दिले आहेत याची माहिती घ्या असेही मी मुलांना सांगितले. एखादा देशभक्त देशसेवा करीत असतानाच समाजसेवा, स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म, इत्यादींचा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि नुसता विचार नाही तर त्याप्रमाणे आचार आणि कृतीही करतो जसे लोकमान्य टिळकांनी मंडा लेच्या तुरुंगात गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा फुले, सर्वच समाजसेवकांनी लेखन साहित्य केलेले आहे, ते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांपर्यंत पोहोचवणं. हे आमचं काम आहे, आता ही नववी दहावीतली मुलं थोडी मोठी झाली आहेत. त्यांच्यामध्ये थोडी वैचारिक प्रगल्भता आली आहे, म्हणून त्यांच्यासाठी सावरकर हा विषय आहे. पाचवी सहावी मध्ये साने गुरुजी, आठवीमध्ये लोकमान्य टिळक, याप्रमाणे जशी इयत्ता वाढत जाते त्याप्रमाणे महापुरुषांचे विचार मुलांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांवर देश प्रेमाचे संस्कार करायचे असतील आणि मायबोलीची गोडी लावायची असेल मातृभाषेसाठी आपल्याला काही करायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच थोर कर्तृत्ववान माणसांचा इतिहास त्यांचा चरित्र सांगणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी सर्व पालकांना सांगितलं आता सारे पालक शांत झाले एक जण हळूच मला म्हणाला “माफ करा सर जरा आमचा गैरसमज झाला” लगेच दुसरे पालक म्हणाले हो “जरा गैरसमज झाला” दुसरे म्हणाले “होय, जरा आधी माहीत करून घ्यायला हवी होती” मी म्हणालो घरी आल्यावर आपल्या मुलांची संवाद साधा, त्यांना विचारा आज काय काय झालं? ? शाळेत कोणता कार्यक्रम होता? ? आणि आता एक काम करा सावरकरांचे विज्ञान विषयक विचार त्यांचीही पुस्तक आहेत ही तुम्ही स्वतः वाचा आणि मग मुलांना वाचायला द्या घरामध्ये जसं कपड्यांचा कपाट आहे ना तसे एक पुस्तकांचेही कपाट तयार करा पुस्तकांची खरेदी करा आणि त्यामध्ये सावरकरांची ही पुस्तकं ठेवा लोकमान्य टिळकांचे पुस्तक ठेवा महात्मा फुलेंची पुस्तके ठेवा सुंदर सुंदर चरित्र जेव्हा मुलं वाचतील तेव्हाच त्यांना प्रेरणा मिळेल असे म्हणून मी माझे मनोगत संपवले. पालकांना माझे विचार पटले होते. एक चांगलं सत्कार्य केल्याचे समाधान मला मिळाले होते.

मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!!

लेखक : श्री दयानंद घोटकर, पुणे

 (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)

मो.  ९८२२२०७०६८

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments