सौ. वृंदा गंभीर
जीवनरंग
☆ फक्त अंतर एका हाताचं… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
आई वडील मुलांना जन्म घालतात, त्यांना परिस्थिती नुसार अति कष्टाने वाढवतात पायावर उभं करतात. फक्त एकचं स्वप्न असतं जे “आम्ही भोगलं ते मुलांना नको. ”
“असचं गावात एक कुटुंब होतं. खूप गरीब कष्टाळू पदरी चार मुलं, स्वप्न मोठं बघितलं आणि कामाला लागले. जे काम मिळालं ते करत गेले. कशाची लाज धरली नाही. मुलांना शाळेत घातलं, “गावात दहावी पर्यंत शाळा होती. नंतर बाहेर टाकायचं ठरलं, ” मुलं हुशार होती दोन दोन वर्षाचं अंतर होतं. मोठ्या मुलाला ठेवलं बाहेर शिकायला, खूप काटकसर करावी लागत होती. तो बारावी झाला दुसरा दहावी झाला. आता खर्च वाढला होता, पाऊस कमी जास्त झाल्यामुळे गावात कामं मिळत नव्हती. मग त्यांनी गावं सोडायचं ठरवलं राधा ताईंच्या, हाताला चव होती. मुलांच्या मदतीने ओळखीने डबे मिळवले. बघता बघता खूप डबे वाढले. परिस्थिती सुधारली, आता मुलं सगळेच कॉलेज ला जात होते. मोठ्या मुलाने “हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स” केला, त्याला छान नोकरी मिळाली. दुसरा M. B. A झाला, तिसरा “सॉफ्टवेअर इंजिनियर झाला “व चौथा “वकील झाला” दिवस सरले होते. आनंदाचे वारे वाहू लागले होते. मुलांना आई वडिलांचा अभिमान होता. खूप सुख द्यायचं असं म्हणायचे मुलं पण पुढचं कुणी बघितलं होतं.
“मोठ्या मुलाचं लग्न झालं, सुरवातीचे दिवस छान गेले, नंतर मुलात बदल जाणवायला लागला. त्याचं बोलणं कमी झालं दुसरे मुलं म्हणायचे दादा असं का वागतो, तो पहिल्यासारखा बोलत का नाही. खूप प्रश्न पडायचे मुलांना पण, आई वडील कळून न कळल्यासारखं त्यांना समजून सांगायचे. अरे त्याला कामं वाढली असतील लग्न झालं, जबाबदारी वाढली म्हणून, कदाचित नसेल बोलत. होईल पुन्हा पाहिल्यासारखं, मुलं शांत बसायची.
“दुसऱ्या मुलाचं लग्न त्याच्या ऑफिस मधल्या मुलीशी झालं. तिने पण M. B. A. केलं होतं. दोघांना पगार छान होता. आता गाडी बंगला सर्व काही झालं होतं. त्यांचा संसार सुरळीत सुरु होता. बरोबर जाणं येणं छान चालू होतं. पण मोठ्याचं बघून यांचं वागणं बदलायला वेळ लागला नाही. “आई वडिलांना वाईट वाटतं होतं. पण अजून दोन मुलांची लग्न बाकी होती. म्हणून सगळं सहन करत होते.
“तिसऱ्या व चौथ्या मुलाचं एकत्र लग्न झालं. दोघी बहिणी होत्या, एक इंजिनियर तर दुसरी डॉक्टर होती. जोड्या सुंदर होत्या, घर गोकुळा, सारखं भरलं होतं. आई वडील समाधानी होते.
या दोघी अपवाद होत्या, त्यांना कुटुंब आवडत होतं. म्हणून त्या प्रेमाने वागत होत्या. असेच दिवस जात होते. सगळ्यांना मुलं झाली कुटुंब वाढलं होतं. हळू हळू मुलं बाहेर पडली. स्वतःचा संसार सुरु केला, छोटा वकील आणि त्याची बायको डॉक्टर असलेली घरीच राहिले. वकिलाने परीक्षा दिली तो आता जज झाला होता.
“रोज नवनवीन केस समोर येत होत्या, तो योग्य न्याय देऊन केस सोडवत होता. एक दिवस त्याच्या समोर अशी केस आली की तो इतका गुंतून गेला, की न्याय कसा आणि काय द्यायचा आपण चं आईवडिलांवर अन्याय केला आहे. आपण दुसऱ्या आई वडिलांना काय न्याय देणारं आहोत.
“तर ती केस अशी होती, एका म्हाताऱ्या आईवडिलांनी हक्कासाठी मुलांवर केस केली होती. ते आजोबा आम्ही कुठल्या परिस्थितीत मुलांना शिकवलं वाढवलं, आमच्या जवळच सगळं देऊन, आम्ही विश्वासाने सगळं दिलं आता हे मुलं बाहेर पडली आम्ही काय करायच कोण सांभाळेल. आम्हाला आमच्य्याकडे कोण लक्ष देईल काय असेल आमचं उर्वरित आयुष्य, ते पोट तिडकीने बोलतं होते. कोर्टात शांतता पसरली होती. जज ही शांत होते. त्यांनी पुढची तारीख देऊन टाकली घरी आले मन उदास होतं.
“काय न्याय द्यायचा माझ्या भावांनी पण अन्याय केला. तेही बाहेर पडले. आज डोकं सुन्न झालं माझं, तत्याला कळत नव्हतं, तेवढ्यात तिथे आई आली चेहरा बघून म्हणाली काय झालं बाळा, आज उदास दिसत. आहे तेंव्हा तो आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला. म्हणाला, “आई आजची केस बघून मी हैराण झालो. वाईट वाटतं ग, आई तुम्हीही किती कष्टातून शिकवलं मोठं केलं आज तुम्हाला सुख देण्याऐवजी, आम्ही दुःख चं देत आहोत. “आम्ही आहे तुमच्या जवळ राहतो. आपण आनंदात पण तुमचं मन त्या तिघांसाठी व्याकुळ होतं. ते येत ग लक्षात पण काय करणार, , , समाजाने अजब परंपरा निर्माण केली. असं वाटतं, नसतं तुम्ही शिकवलं गावातच राहिलो असतो…… तिथेच कामधंदा केला असतातर, आज एकत्र असतो. का आपण मी काय करू काय न्याय देऊ आई सांग ना.
“आई म्हणाली ” बाळा फक्त एक हाताचं अंतर असतं रे “
मी म्हणालो मला समजले नाही, तेंव्हा आई बोलायला लागली, अरे तुम्ही पण आई वडील झाले. आता मुलांना वाढवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात. तुम्हाला आम्ही हातभार लावला. आम्हाला कुणाचाच हातभार नव्हता. लोकांच्या शेतात मिळेल ते काम केलं. तुम्हाला शिकवलं आता, फक्त तुम्हाला आरामात वाढवायचंय आम्ही कसं केलं असेल याचा विचार केला. की जाणीव होईल तुम्हाला, मी म्हणालो, “आई मला आहे, जाणीव प्रीतीला पण आहे. म्हणू, न मी तुमच्या जवळ आहे ग, आई म्हणाली होय आहे. “मला मान्य आहे, पण सगळेच सगळ्यांचे मुलं असे जाणीव ठेवतात, असं नाही ना. मी आहे नशीबवान तसें अनेक असतील, असं नाही. ना उद्या तुम्हीही असेच एकटे पडले तर, , , , , , ,
म्हणून म्हणते “फक्त एका हाताचं अंतर असतं. “
“अरे ज्या पलंगावर तुमचा, जन्म झाला, , जिथे तुम्ही लहानचे मोठे झाले. आईच्या कुशीत मायेने झोपले. आईच्या उबीत वाढले. तिचं आई नकोशी होते. कधी तर त्या पलंगावर बायको येते. त्या वेळी आई खाली असते. पलंगाची उंची असते फक्त एका हाताची, मग आई का नकोशी होते. ज्या आईने त्याच पलंगावर वाढवलं असतं, निजवलेलं असतं, किती प्रेम माया लावलेली असते. ती पण एक स्त्रीच असते, मग एवढा बदल का होतो. एकीने घडवलेलं असतं, एक साथ देणारं असते, ती पण आयत्या पिठावर रेघोट्या मरणार असते. आईचं मन कधीच विचलित होत नाही. मुलगा आला नाही तर, काळजी जेवण केलं नाही. काळजी ती स्वतःला उठून जेवायला वाढायला तयार असते. पण बायको मनासारखं झालं नाही, तर तण तण करते. रुसून बसते, भांडणं होतात, माहेरी निघून जाते. शेवटी आई सांगते, “बाबा रे तुझं सुख तू बघ नसेल तिला आवडत आमच्या बरोबर… रहायला तर बाहेर पड. आनंदात संसार करा. मग मुलगा तिचे ऐकून बाहेर पडतो. आई वडील विसरतो, नाती महत्वाची नसतात का?
आईच्या जागी आई असते. बायकोच्या जागी बायको असते. मग तिचं ऐकून आई वडिलांना त्रास देणं, किंवा घरा बाहेर काढणं, चांगलं आहे का? का मुलगा म्हणून आई वडिलांना समजून घेत नाही. तुम्हीही पळता ना मुलांसाठी, तेंव्हा माझे आई वडील असच माझ्यासाठी पाळले, मला मोठं केलं, हे का नाही मनात येत? का नाही बायकोला सांगू शकत, माझ्या “आई वडिलांनी खूप कष्ट केले. त्यांना आता सुखी ठेचायचे आहे. त्यांना फिरायला पाठवायचेआहे, चारिधाम यात्रेला पाठवायचे आहे, आता हे सगळं तुला सांभाळावं लागेल… पण नाही. हल्लीची मुलं बदलतात. “आज तुम्ही बदलले उद्या तुमची मुलं बदलतील. म्हणून बाळा “हाताचं काय वितेच सुद्धा अंतर पडू देऊ नका माया, ममता प्रेम फक्त आई कडे, मिळतं बाजारात सगळं मिळेल आई वडील नाही मिळणार…
“मुलींच्या आई वडिलांनी पण कष्ट घेऊन मुली शिकविलेल्याअसतात. त्यांनाही त्रास झालेला असतो. पण आता त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. आम्हाला जे संस्कार करून शिकवून सासरी पाठवलं होतं, ते मुलीला शिकवलं जात नाही. रोज फोन करून घरातलं विचारायचं, मग तिला “शिकवायचं संसारात आईची लुडबुड चांगली नाही. उद्या तिलापण वाहिनी येणार असते. त्या जे वागणार तसेच फळ मिळणार असतं, पण कोण शिकवणार त्यांना… म्हणून मुलांनी जाणीव ठेवावी. ” आई वडिलांचा आधार असतो, मुलगा मुलं जर कडक राहिली, तर वृद्धाश्रमात आई वडील जाणार नाहीत.
“मुलाने फार विचार केला व बायकोला घेऊन भावांकडे गेला. तिथे सर्व समजून सांगितलं. भावांना एकत्र राहण्यासाठी तयार केलं. त्यांनाही पटलं होतं, दुनियेचा त्रास बघितला होता, खस्ता खाल्ल्या होत्या, तेही घरी आले.
मग जज ने निकाल दिला, मुलांनी आई वडिलांना आदराने वागवायचं. नाही, तर वारस हक्क रद्द होऊन, नुकसान भरपाई व मुलांना वाढवतांना, झालेला आजतागायत खर्च, व्याजासहित परत करायचा. निर्णय ऐकून सगळे चकित झाले. मुलांनी आजोबा आज्जीची माफी मागून घरी नेलं, व आनंदात राहू लागले.
“तात्पर्य काय तर प्रश्न मुलानेच सोडवला मग असा प्रश्न आधीच का निर्माण करायचा म्हणून अंतर नको प्रेम हवं…”
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈