सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सुख…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

मुक्त विहरती कशी पाखरे.. किलबिल किलबिल आकाश भरे

ऐकला परी कुणी कधी का, कलरव त्यांचा उसासे भरे

*

खळखळ झरझर पाणी वाहे, स्वतःच शोधे वाट नि वाहे

दिसले का परि कधी कुणाला. वैतागून ते थांबून राहे

*

वृक्षवेली अन बागा फुलत्या, वाऱ्यासंगे नितचीडोलत्या

दिसल्या का पण कुणा तरी हो, कंटाळून कधी चिडलेल्या त्या

*

राग लोभ अन मोह नि मत्सर, त्यांच्या वाटे कधी न जाती

विश्वच त्यांचे किती वेगळे.. सुख-दु:खाची मुळी न गणती

*

वाटे मजला रोजच त्यांना पहाटेच तो देव भेटतो

षड्रिपू त्यांचे बांधून ठेवून मुक्त तयांना करून जातो

*

आम्ही माणसे पाखंडी किती.. सुखनिधान ते उरी गाडतो

षड्रिपू सारे मुक्त सोडूनी.. सुख शोधत अन वणवण फिरतो

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Hemant Tarey

खूप छान