(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा – गीत,कविता, लघु कथाएं, कहानी, संस्मरण, आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – नजर बदलिए।)
जीवन के कई अर्थ हमें पिछली सीट पर बैठ कर ही समझ में आते हैं। कभी-कभी अपनी गाड़ी की स्टेरिंग दूसरे के हवाले कर देनी चाहिए। कभी अपने रोजमर्रा के काम भी हमें छोड़कर कुछ अलग करने की सोचना चाहिए। इसी उधेड़बुन में शांति खोई हुई थी। तभी अचानक उसके पतिदेव ने कहा कि तुम बहुत ही अच्छा गाना गाती हो एक सुंदर सा मधुर गीत सुनाओ और आज खाना मैंने बाहर से ऑर्डर कर दिया है। आज हम दोनों मिलकर कैंडल लाइट डिनर करेंगे, कुछ ही देर बाद बच्चे भी आ जाएंगे।
बहुत ही अच्छा अभिनव पर इतने दिनों बाद आपके अंदर ऐसा बदलाव कैसे आया?
बस आज मन किया कि जीवन की सारी वस्तुओं को छोड़कर पुराने शौक ही को पूरा किया जाए और स्वयं को अपलोड किया जाए। जीवन की इस नवीनता के अपने को माधुर्य में डुबो देना चाहिए।
विश्वयोग दर्शन, केंद्र मिरज-सांगली या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या योग निबंध स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांना तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल ई अभिव्यक्ती समुहाकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
त्यांचा पुरस्कार प्राप्त लेख “प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास…” आजच्या अंकात प्रकाशित करीत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.
सौ राधिका भांडारकर
☆ योगी ☆
☆
मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो
मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा…
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ सरते
ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले
विलग पानांचा होतो पाचोळा
वार्यावर उडतो कचरा सोनसळा
वृक्ष होतो बोडका
तरी भासतो योग्यासारखा
गळणार्या पर्णांना निरोप देताना
उभा ताठ, ना खंत ना वेदना
कर्मयोगी निवृत्तनाथ
ऋतुचक्राशी असे बद्ध
एकाकी हा कातरवेळी
संवाद करी पानगळी
हा शिशिर सरेल
पुन्हा वसंत फुलेल
नव्या जन्मी नवी पालवी
हिरवाईने पुन्हा नटेल. .
~ राधिका भांडारकर
‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,
“मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो”
बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!
निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,
“मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा. . .
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ
सरते. “
या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.
मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.
कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.
वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!
रसग्रहण – सुहास रघुनाथ पंडित
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(पुरस्कार प्राप्त लेख)
नमस्ते प्राण प्राणते नमो अस्त्व
पानते/ पराची नाय ते नमः,
प्रतीचीनाय ते नमः, सर्वस्मैत इदं नमः//
” हे प्राणा, जीवनाच कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. अपानाचे कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. पुढे जाणाऱ्या आणि मागे सरणाऱ्या प्राणास नमस्कार असो. सर्व कार्य करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. “
रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला निघाले. जाता जाता दवाखाने पाहिले. जवळजवळ 30-35 दवाखाने बरीच गर्दी असलेले दिसले. मनात विचार आला, खरंच इतके आजार का बरं वाढले असतील? इतके भौतिक प्रगती होऊनही आरोग्य नीट राखता येत नाही असं दिसतं. त्यासाठी जीवन पद्धती बदलायला हवी ; ही गोष्ट पाश्चा त्यांनाही कळल्याने ते लोक आता भारतीय अध्यात्म, आणि योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत.
मानवाच्या कल्याणासाठी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल अनुभवातून, (इ. स. पूर्व 200 वर्षे) ऋषी पतंजलीनी शास्त्रीय दृष्ट्या अष्टांग योगाची रचना सांगितली आहे. उपनिषदे हे तत्त्वज्ञान (theory). आणि पतंजली योग ही साधना. (Practical) आहे. त्यांनी ‘योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध’ अशी व्याख्या केली आहे. “तस्मिन्सती श्वास प्रश्वासयो: गतिविच्छेदः” म्हणजे प्राणायामात श्वासाची गती तुटणे. “त्यांनी सांगितलेले ज्ञान हे एक आचरण शास्त्र आहे. त्यांनी सांगितलेली अष्टांगे यापैकी बाह्यंगे— यम (सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य अपरिग्रह) नियम— (शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान). आसन— –शरीराची सुख स्थिती. प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा दिशा देणे. अंतरंगे— प्रत्याहार –इंद्रियांची बाहेरची धाव बंद करणे. धारणा —- एखाद्या गोष्टींवर मन स्थिर करणे. ध्यान— धारणेशी एकता- नता. आणि शेवटी समाधी स्थिती. प्राणायाम हा प्रकार अंतरंग आणि बहिरंग यांना जोडणारा सेतू आहे असे म्हणायला हरकत नाही. सुदृढ शरीर, मन आणि आत्मा पवित्र करायचा असेल तर ते कार्य प्राणायामाद्वारे होऊ शकते. जवळ जवळ 80 टक्के व्याधी प्राणायामाच्या अर्ध्या तासाच्या नियमित सरावाने लवकर दूर होतात. तसेच ध्यान आणि समाधी ही ही सहज प्राप्त होते. ही एक पूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे.
संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माण ज्या पंचतत्वांच्या योगाने झाले, त्याच्या मुळात एक तत्व जे सर्वत्र आहे ते म्हणजे ‘प्राणतत्व’. पंचप्राणांपैकी प्राणायाम कोष, चेतन करून, विश्वव्यापी प्राणातून प्राणतत्व आकर्षित केले जाऊ शकते. त्यामुळे योगशास्त्रात प्राणायामाचे खूप महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम (प्राणाला दिशा देणं किंवा प्राणाचे नियंत्रण) म्हणजे केवळ श्वास घेणं आणि सोडणं इतकच नाही तर त्या प्राण किंवा परमशक्ती बरोबर (vital force) जोडून राहण याचा अभ्यास हाच प्राणायाम. स्थूलरुपाने
श्वासोश्वासाची एक पद्धत आहे. श्वास आत घेणं (अभ्यंतर )म्हणजे तो पूरक. आत मध्ये रोखून धरण म्हणजे कुंभक. आणि बाहेर सोडणे म्हणजे रेचक. शरीरातील सर्व हालचालींचा वायू हा कारक असल्याने, पेशींच्या केंद्रकातील हालचाल चालू असते. त्या वायुचे नियमन म्हणजे चौथा सूक्ष्मतर प्राणायाम. विज्ञानानुसार छातीतील दोन्ही फुफ्फुसे श्वासाला शरीरात भरण्याची यंत्रे आहेत. नेहमीच्या श्वासात फुफ्फुसाचा एक चतुर्थांश भाग कार्य करतो. त्यामध्ये सात कोटी 30 लाख स्पंजासारखी कोष्टक किंवा वायुकोष असतात. पैकी दोन कोटी छिद्रातूनच प्राणवायूचा संचार होतो. प्रत्येक पेशी प्राणवायू घेते आणि CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) बाहेर टाकते. यालाच आजच्या विज्ञानात (celular tissue respiration )म्हणतात. पेशींची ही देवाणघेवाण रक्तामार्फत होत असते. विज्ञानाने बाह्य (external) आणि आंतर ((internal) असे म्हटले आहे. पण पतंजलींनी ‘स्तंभ ‘ हा तिसरा प्रकार सांगितला आहे. हवा रक्तात पुढे पेशीपर्यंत जाऊन, देवाणघेवाण होऊन, रक्ताचा दुसरा स्तंभच त्याला विज्ञान (column of blood) म्हणते. शरीरातील उत्सर्जक पदार्थ, (toxins) ही कान, नाक, डोळे, त्वचा, मलमूत्राद्वारे बाहेर पडतात. पण श्वास हा निरंतर चालत असल्याने टॉकसिन्स बाहेर पडण्याचे काम हे सतत चालू असते. श्वास घेताना जर दीर्घ श्वास घेतला, आणि रोखून धरला तर फुफ्फुसाचे कार्य 90 ते 95 टक्के पर्यंत होऊ शकते. आपोआपच श्वसन पेशींच्या माध्यमातून रक्तात येणारा प्राणवायू जास्त प्रमाणावर येतो. पुढे तो इंद्रियांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बरेच आजार दूर होतात. आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, आजारांचे मूळ कारण, प्राणवायूची अल्प उपलब्धता हे आहे. प्राणाचा मनाशी संबंध असल्याने मनावर संयम ठेवल्याने मनही शक्तिमान होते. इतर इंद्रिये प्राणाच्या स्वाधीन होतात. योगासनांनी स्थूल शरीराच्या विकृती दूर होतात. तर प्राणायामाने सूक्ष्म शरीरावर (फुफ्फुसे, हृदय, मेंदू वगैरे) तसेच स्थूल शरीरावरही प्रभाव पडतो. त्यामुळे प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. षट्र् चक्रांचा अर्वाचीन उपचार विज्ञानाशी तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, लोहचुंबक व त्याचे कार्यक्षेत्र (magnet) आणि (magnetic field )यांचा जो अन्योन्य संबंध आहे, तसाच काहीसा प्रकार (nerve plexuses ) षट्चक्रांचा आहे. मानवी शरीरात ७२ हजार पेक्षाही जास्त नाड्या आहेत. पैकी इडा (डावी चंद्रनाडी), पिंगला (उजवी सूर्य नाडी) या सक्रिय राहतात. इडेचा उगम डाव्या नासिका छिद्रातून होऊन प्रवाहित होणारा प्राणवायू लहान मेंदू (cerebellum )व ( medulla oblongata) मध्ये प्रवेश करत सुषुम्नेच्या (तिसरी नाडी )डाव्या बाजूस थांबते. याच्याच उलट पिंगला नाडीचे कार्य होते. नासिकेच्या वरील भागात दोन्ही छिद्र एकत्र येतात. तिथेच दोन्ही नाड्यांचे उगमस्थान असल्याने तेथेच शरीराचा प्रमुख जीवनीय बिंदू (vital spot) तयार होतो. येथेच इडा (parasympathetic) आणि पिंगला (sympathetic) एकत्र येऊन एक चक्र (plexus) तयार होते. तेच आज्ञाचक्र. (तिसरा डोळा). याच प्रमाणे शरीरात आणखीही चक्रे आहेत. त्याच्या स्थानाप्रमाणे त्याच्या आजूबाजूच्या इंद्रियांवर प्राणायामाद्वारे ध्यान करून संतुलित ठेवता येते. १) मूलाधार चक्र (pelvic plexus) शिवणी स्थान व reproductory संस्थेवर कार्य करते. २) स्वाधिष्ठान चक्र (hypogastric plexus) लिंगस्थान व excretory वर कार्य करते. ३) मणिपूर चक्र (solar plexus) नाभी स्थान. digestive संस्थेवर कार्य करते. ४)अनाहत चक्र (cardiac plexus) हृदय स्थान, circulatory संस्थेवर कार्य करते. ५) विशुद्ध चक्र (carotid plexus) स्थान कंठ. respiratory संस्थेवर कार्य. ६) आज्ञा चक्र (medullary plexus) स्थान भ्रूमध्य, nervous संस्थेवर कार्य) याला गंगा, यमुना, सरस्वती असा त्रिवेणी संगम म्हणतात. सर्व चक्रे मेरुदंडाच्या मुळापासून वरच्या भागापर्यंत असतात. प्राणायाम आणि ध्यानाने ती विकसित करून त्या त्या ठिकाणच्या व्याधी कमी होऊ शकतात.
योगासन आणि प्राणायामाच्या द्वारा शरीरातून बाहेर पडणाऱ्या शक्तीला बांधून ठेवणे म्हणजे बंध होय. प्राणायामात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. १) श्वास भरून, हनुवटी कंठाला स्पर्श करून रोखून धरणे तो जालंधर बंध. २) पोट मोकळे सोडून छाती वरच्या बाजूला उपटली की तो उड्डियान बंध. ३) गुद आत ओढून घेतला की, तो मूलाधार बंध. तीनही बंध एकदाच केले (महाबंध) की, तिन्हीचेही फायदे एकत्र मिळतात.
देश, काल आणि संख्येचा परिणामही प्राणायामावर घडतो. थंड प्रदेशात हालचाली कमी होत असल्याने प्राणशक्ती जास्त लागत नाही. याउलट उष्णता असताना हालचाली जास्त, त्यामुळे प्राणशक्तीही जास्त लागते. त्याच प्रमाणे दिवस रात्रीचाही परिणाम होतो. प्रत्येक प्राण्याचे आयुष्य त्याच्या श्वासक्रीयेवर, संख्येवर अवलंबून असते. धावपळ करताना श्वास जास्त घ्यावे लागतात. उदाः- ससा मिनिटला 38 वेळा व आयुष्य आठ वर्षे साधारण, घोडा सोळा वेळा आणि आयुष्य 35 वर्षे, कासव, सर्प पाच आणि आठ वेळा त्यांचे आयुष्यही भरपूर असते. मनुष्य बारा ते तेरा वेळा आणि आयुष्य 90 ते 100 असे धरले आहे. असा श्वासाचा खजिना जितक्या काळजीपूर्वक आपण खर्च करू तितके दीर्घायुषी होऊ. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत
१) अनुलोम विलोम— मेंदू तंत्रातील द्रवामध्ये (cerebrospinal fluid)संदेश वहनाचे कार्य करणार्या अणूच्या तंत्रात (neuropeptide) शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित होत असतात इतकेच नाही तर मेंदूत होणाऱ्या भावनात्मक क्रियानाही नियंत्रित करते.
जेव्हा द्रवाचा संचार उच्च पातळी गाठतो तेव्हा मेंदूचा डावा व उजवा भाग समान क्रियाशील होतो. हे अनुलोम विलोम प्राणायामाने होते. आणखी एक गोष्ट, मेंदूच्या माध्यमातून होणाऱ्या श्वसनक्रियेत, सूर्यकिरणापासूनच्या ऊर्जा, आणि प्राणवायूचा संचार शरीरात होऊ शकतो. मेंदू सुद्धा श्वसन आणि स्पंदनाची क्रिया करतो, असा आयुर्वेदात आणि अनेक देशांच्या दर्शनात उल्लेख आहे.
२)कपालभाती—- अंतः श्वसन आणि प्रयत्नपूर्वक उश्वास यामुळे रक्तदाब वाढवून हृदयात रक्त बळपूर्वक परत आल्याने तेथील अवरोध दूर होतो. किंवा अवरोध कधीच होत नाही. आधुनिक शास्त्रात ई. ई. सी. पी द्वारे पायाच्या खालच्या भागात मिनिटाला 60 वेळा (extrnal stroke)देऊन एन्जिओ प्लास्टीच्या रुपाने त्याच्या गतीला हृदयाच्या गतीशी समान केल्याने अवरोध दूर होतो. तसेच एस. एल. ई. सारख्या असाध्य आजारावर व पोट व छातीतील सर्व अवयवांना या प्राणायामाने फायदा मिळतो.
भस्त्रिका—- साधारण श्वसनचक्रात 500 एम एल वायूचा उपयोग करतो. दीर्घ श्वास घेऊन बलपुर्वक बाहेर टाकला तर 46500 एम एल ही असू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
सूर्यभेदी, चंद्रभेदी प्राणायाम— हे प्राणायाम क्रमशः उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात कमी करावा. करताना जालंधर व मूलबंधाबरोबर करावेत. सित्कारी, शीतली, मूर्छा, प्रणव, उद्गिथ, उज्जयी, भ्रामरी असे अनेक प्राणायाम आहेत. सर्वांचेच पद्धत आणि फायदे येथे सांगणे अवघड आहे. पण एकूणच प्राणायामाने सर्वच अवयव ऊर्जावान व शरीर निरोगी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नाही तर प्राणायाम करणारी व्यक्ती प्रेम, करूणा, धैर्य, शक्ती, पवित्रता अशा गुणांनी युक्त होते. वाढत्या हिंसा, चोऱ्या, भ्रष्टाचार, अत्याचार या सर्व अवगुणांवर उपाय म्हणजे प्राणायाम. आजच्या युगात याची नितांत गरज आहे.
प्राणायामाचे जितके फायदे आहेत तितकेच ते नियमानुसार केले नाहीतर ते त्रासदायकही होते.
प्राणायामाचे नियम—- प्राणायाम करताना पद्मासन किंवा वज्रासनात बसावे. ज्यायोगे पाठीचा कणा ताठ राहतो. शक्य नसेल तर खुर्चीवर बसून करावा. आसन स्वच्छ असावे शक्य असेल तर पाणी व तुपाचा दिवा जवळ असावा. ज्यायोगे प्रदूषण होणार नाही. श्वास नाकानेच घ्यावा. पंचेंद्रियांवर तणाव न ठेवता मन प्रसन्न ठेवावे.
(हॅलो एन एम टी) आहार सात्विक व शाकाहारी असावा. प्राणायाम सावकाशपणे व सावधानतेने करावा. प्रथम तीन वेळा ओंकार म्हणावा. प्राणायाम तज्ञ व्यक्तीकडूनच शिकावा. वाचून करू नये. प्राणायामैन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत/ आयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः// ( हटयोग प्रदीपिका) प्राणायामाच्या बाबत वेद, उपनिषदे, पतंजली, मनू, दयानंद या सर्वांचेच एकमत आहे. खरंच प्राणायामाला एक किमयागार असं म्हणायला हरकत नाही.
मी स्वतः रोज दीड तास योग साधना करते. आज वयाच्या 77व्या वर्षीही शरीराने मन सुदृढ, निरोगी आणि आनंदी असल्याचा अनुभव मी घेत आहे. असाच सर्वांनी अनुभव घेऊन आपले आयुष्य निरामय व आनंदात घालवावे घालवावे.
“सर्वेपि सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः/ सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख माप्नुयात// अशी सर्व जीवांसाठी प्रार्थना करुया. नमस्कार.
सकाळी अकराच्या सुमारास भाऊ आणि मालतीबाई घराबाहेर पडले. कुठं चाललोय हे भाऊंनी सांगितलं नाही अन मालतीबाईंनी सुद्धा विचारलं नाही. नवऱ्याच्या पाठोपाठ रिक्षात बसल्या. एका बिल्डिंगजवळ दोघं उतरले. मालतीबाईंचा हात धरून भाऊ चालायला लागले. लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर पोचले. एका फ्लॅटजवळ थांबून भाऊ म्हणाले “मालती, ही किल्ली घे”
“कसली”
“तुझ्या घराची”
“म्हणजे”
“हे तुझ्या हक्काचं, मालकीचं घर!!”
“कशाला म्हातारीची चेष्टा करताय”
“खरंच !!समोरची पाटी वाच ”पिशवीतून चष्मा काढून मालतीबाईंनी पाटी वाचली. स्वतःचे नाव पाहून प्रचंड खुष झाल्या.
“कसं वाटलं सरप्राइज ?”भाऊंनी विचारल्यावर खूप भरून आल्यानं मालतीबाईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते मात्र डोळे वहात होते. एकाचवेळी त्या हसतही होत्या अन रडतही होत्या. इतका मोठा आनंद नेमका कसा व्यक्त करावा हे न समजल्यानं बाईंनी भाऊंचा हात घट्ट पकडला. भाऊंकडे पाहताना नजरेत अपार कौतुक, अफाट प्रेम आणि कृतज्ञता होती. बाईंच्या मनातल्या भावना शब्दविना भाऊंपर्यंत पोचल्या. आनंद, समाधान, कौतुक अशा मिश्र भावनांच्या कल्लोळात बाईंनी थरथरत्या हातानं दरवाजा उघडला. घरात उजवं पाऊल ठेवताना खूप भावुक झाल्या. छोटसं दोन रूमचं घर सोफा, खुर्च्या, भांडी, गॅस अशा जीवनावश्यक गोष्टींनी सजलेलं होतं.
“अहो, आता आपण इथंच राहू ” मालतीबाई.
“हो, या क्षणाची पस्तीस वर्षे वाट पाहिलीस ना. माझ्याकडूनच उशीर झाला त्याबद्दल माफ कर”
“अहो, काहीही बोलू नका. माझ्यासाठी खूप काही केलंत. तृप्त, समाधानी आहे आणि आज दिलेली ही भेट. काय बोलू सुचत नाही. तुम्ही खूप चांगले आहात उलट मीच खूप त्रास दिला. त्यात ही आजाराची कटकट, ”
“ए गप. आजच्या आनंदाच्या दिवशी नको ते विषय काढू. आता इस बात पे चाय तो बनता है. मी बनवतो. ”
“तुम्ही बसा. खबरदार, माझ्या किचनमध्ये परवानगी शिवाय जायचं नाही. आधी चहा मग छान जेवण करते. ” नव्या नवरीच्या उत्साहानं मालतीबाई घरात वावरत होत्या. त्यांचा उत्साह पाहून भाऊंचे डोळे पाणावले.
दोन्ही मुलं, सुनांच्या विरोधाला न जुमानता वन रूम किचन विकत घेतल्यावर भाऊ थोरल्याच्या घरी आले. तेव्हा धाकटा तिथेच होता. सगळे हॉलमध्ये बसले पण कोणीच बोलत नव्हतं. सगळेच अवघडलेले.
“तुम्हांला माझ्याविषयी प्रचंड राग आहे. ”अखेर भाऊंनी सुरवात केली.
“आता बोलून उपयोग नाही. तुमचा पैसा तुम्ही उडवला. ” धाकटा
“वर्षा-दोन वर्षासाठी उगीच एवढा खर्च केलात ” थोरल्या सून.
“पोरी, तोंड सांभाळून बोल ” भाऊ.
“जे खरं आहे तेच ती म्हणाली ” थोरल्यानं बायकोची बाजू घेतली.
“भाऊ, तुम्ही स्वीकार करा. आता आईचं आयुष्य तेवढंचय. ” धाकटा
“त्यासाठीच हे सगळं केलंयं ना. ” भाऊंनी कसाबसा हुंदका आवरला.
“भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतलात. ” थोरला
“तुमच्याकडून पैसे घेतले नाही ना. मग कशाला उगीच !!”
“अगदीच वेगळं घर घ्यायचं तर भाड्यानं घ्यायचं ना. विकत कशाला?” धाकटा.
“तुला कळणार नाही”
“मला समजून सुद्धा घ्यायचं नाही. गरज नसताना पैसे अडकवलेत ” थोरला.
“पुन्हा पुन्हा तेच का सांगताय. माझे पैसे मनासारखे खर्च करायचा मला अधिकार आहे. ”
“भाऊ, एक गोष्ट क्लिअर करतो, आम्हांला तुमच्या पैशात काडी इतकाही इंटरेस्ट नाही. ” थोरला
“नाहीतर काय, हे पैसे तुम्हालाच उपयोगी पडले असते. ” धाकटा.
“पोरांकडे मोठाली घरं असतानासुद्धा आईबाप वेगळे राहतायेत. लोकं तर आम्हांलाच शिव्या घालणार. ”.. सून.
“मालतीच्या आनंदासाठी घर घेतलंय. मला लोकांशी देणंघेणं नाही. आयुष्यात काहीप्रसंगी व्यवहारापेक्षा आपल्या माणसाचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तेच मी केलं. ”
“तुम्हांला नक्की काय म्हणायचयं. ” थोरला.
“आमच्या लग्नाला छत्तीस वर्ष झाली. लग्न झाल्यापासून तुझ्या आईनं फक्त आणि फक्त तडजोड केली. माझी आई दीर्घायुषी !! नातसून पाहूनच तिनं जगाचा निरोप घेतला. आधी सासू अन नंतर सून सोबतीला त्यामुळे मालतीला कायम मन मारावं लागलं. ”
“या सगळ्याचा इथे काय संबंध?”
“आम्ही कधीच तुमच्याशी वाईट वागलो नाही. आता सासू-सुनेचे वाद तर कोणत्याच घराला चुकलेले नाहीत. ” थोरला.
“मला वेगळं सांगायचं आहे”
“म्हणजे”
“आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने फार काही हौस-मौज करता आली नाही आणि जेव्हा पैसा आला तेव्हा वेळ राहिला नाही. मालतीच्या दुखण्यानं भयानक वास्तवाची वस्तुस्थिती समोर आल्यावर मी पुरता खचलो. जोडीदाराची अंताकडे चाललेली वाटचाल पाहणं हे नशिबी आलं. म्हणून तिच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतोय. ”
“आईला घर हवं होतं?”
“ती माऊली एका शब्दानंही बोलली नाही आणि कधीच बोलणारही नाही. ”
“मग हे कशासाठी? का?”
“छोटसं का होईना पण स्वतःचं घर असावं. एकटीचा संसार असावा. अशी इच्छा तिनं लग्न ठरल्यावर एकदा बोलून दाखवली होती परंतु आमचा संसार सुरू झालाच नाही. हे घर घेऊन आत्ता तिची इच्छा पूर्ण करतोय. ” दोन्ही मुलं भाऊंजवळ येऊन बसले.
“हक्काचं घर असावं, मनाप्रमानं ते सजवावं. एवढी माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच घर घेतलं. उशिराने का होईना पण मालतीला तिचं घर, एकटीचा संसार देऊ शकलो. स्वतःच्या घरात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जन्माचं सार्थक झालं. या समाधानाचं मोल होऊच शकत नाही. म्हातारपणात नवीन घर घेणं. वेगळं रहाणं हे सगळं फक्त मालतीच्या आनंदासाठी करतोय. लोकं हसतील, नावं ठेवतील पण फिकीर नाही. आम्हांला सोबत भरभरून जगायचंय. “
“झालं ते झालं. आज इथं यायचं कारण म्हणजे येत्या रविवारी जेवणाचं आमंत्रण द्यायला आलोय. नाही म्हणू नका. प्रचंड आनंदी असलेली मालती अन तिचं घर, तिचा संसार बघायला नक्की या. ” भाऊंनी हात जोडले तेव्हा ‘नक्की येणार’ बाकीचे एकासुरात म्हणाले.
शरीराच्या ‘पाठी’चा कणा ताठ असतो जेव्हा, मनाचा व्यवहार सुरळीत चालतो तेव्हा. खरे तर आपण म्हणजे ‘पाठ’च असतो. ‘पाठी’च्या कण्यावरच तर आपली शारीरिक, नैतिक आणि मानसिक भिस्त असते. त्या कण्याच्या जोरावरच आपले शरीर उभे रहाते. आणि त्याच्या ताठपणावरच आपले भावविश्व कधी झुकते, कधी खचते तर कधी उंच उभारी घेते.
शाबासकीची थाप ‘पाठी’वरच पडते. धपाटा वा रट्टाही ‘पाठी’वरच मिळतो. तसंच सहानुभूतीचा हात ‘पाठी’वरूनच फिरतो. आपल्याला उभारी देणारा अश्वासक हातही ‘पाठी’वरच ठेवला जातो. कघी संधीकडे, कधी आयुष्याकडे, तर कधी मोहाकडे माणसे ‘पाठ’ फिरवतात. कधीकधी वाऱ्याला ‘पाठ’ देत देत संकटाना तोंड देतात. ‘पाठी’ला ‘पाठ’ लावून आलेली भावंडे एकमेकांच्या ‘पाठी’त खंजीर खुपसतात. तर कधी मित्र म्हणवणारी माणसे ‘पाठी’शी खंबीरपणे उभी रहातात.
एखाद्या ध्येयाचा, प्रश्नाचा जन्मभर ‘पाठ’पुरावा करत माणसे चळवळी उभारतात आणि पोटात माया असलेली माणसे आसऱ्याला आलेल्यांची ‘पाठ’राखण करताना मिळणारी दूषणे ‘पाठी’वरच झेलतात. राजकारणी माणसे कधी एखाद्याला शिताफीने ‘पाठी’शी घालतात, तर कधी एखाद्याच्या ‘पाठी’मागे लपतात.
घोड्याच्या ‘पाठी’वर स्वार होतात तर गाढवाच्या ‘पाठी’वर ओझे लादले जाते. परिस्थितीवशात सुसरीबाईच्या खरखरीत ‘पाठी’लाही मऊ म्हटले जाते. आणि खारीच्या ‘पाठी’वर रामाची बोटेही दिसतात.
‘पाठी’चा कणा हा सर्वार्थाने आपल्या जगण्याचा आधार असतो. म्हणूनच शरीराचा अन मनाचा व्यवहार सुरळीत चालू रहातो. कसे?
अनादी अनंत तुझे ते अव्याहत वाहत जाणे ! तुझे कार्यच तसे, वाहणे ! काळाच्या कसोटीवर तुला, अनेकदा पाहिलं.. तुझं काम चोखच ! किती जणांची पापे तू धुतलीस ते तुलाच माहीत ! तुझ्या किनारी कितीतरी पिढ्यानपिढ्या गाणी गायली ! त्यांची सर्व दुःख वेदना पोटात घेऊन, तू परत स्वच्छच राहिलीस !
तुझ्या पोटातील घाण वेळोवेळी कचऱ्यासारखी बाहेर पण टाकलीस ! तो कचरा पण प्रवाहापासून अलग होऊन, दोन्ही किनार्ऱ्यांना बाजूला झाला !
तोच कचरा परत काही कालानी परत वेदना घेऊन तुझ्याच जवळ आला ! पापक्षालनासाठी ! असं अव्याहत वर्तुळ तू पूर्ण करण्यासाठीच तुझा जन्म झाला का ?
नियतीने तुला त्यासाठीच जन्माला घातले का ? तुझ्याजवळ आला तरी तो पापी पुण्यच पदरी घेऊन गेला ! तू मात्र आहे तशीच राहिलीस ! तुझ्यात यत्किंचितही बदल झाला नाही ! हेच तुझे वैशिष्ट्य जगाला दिलेस ! तुझ्याशिवाय जन्मच हा अपुरा वाटतो, व ते तेवढंच सत्य आहे ! काळाच्या पडद्याआड कितीतरी गोष्टी लपल्या ! पण ते उघड गुपित … ते गुपितच ठेवून तुझा हा अखंड प्रवास चालूच आहे !
आजन्म तृषार्ताला तू नाही म्हटलं नाहीस ! प्रत्येकाची तृष्णा तू भागवून दमली नाहीस ! तुझे हे रूप चिरतरुणच राहिले ते तुझ्या स्वभावामुळे !