हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 127 – देश-परदेश – पुरानी यादें: हमारा बजाज ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 127 ☆ देश-परदेश – पुरानी यादें: हमारा बजाज ☆ श्री राकेश कुमार ☆

साठ के दशक में इटली का लैंब्रेटा, देश की सड़कों का बेताज बादशाह हुआ करता था। देश के औद्योगिक घराने “बजाज ग्रुप” ने लैंब्रेटा को ऐसी टक्कर दी, वो देश से नौ दो ग्यारह हो गया।

बजाज स्कूटर एक समय में मिनी कार का काम किया करता था। सत्तर के दशक में जब परिवार नियोजन का नारा “हम दो हमारे दो” का प्रचार आरंभ हुआ, तो बजाज ने नए परिवार की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए, “हमारा बजाज” स्कूटर लंबे समय तक देश की सड़कों का सरताज बना रहा। कई खिलाड़ी उसके मुकाबले में आए जैसे कि विजय सुपर, फाल्कन आदि, लेकिन बजाज का सामना करने में असफल रहे। वो तो बाद में मोटर साइकिल ने स्कूटर को तो प्राय-प्राय सड़कों से शून्य तक पहुंचा दिया।

हमने भी बजाज के “चेतक” नामक ब्रांड को सिल्वर जुबली मना कर विदा किया था। उसके साथ के कुछ स्कूटर आज भी जुगाड के रूप में “मालवाहक” के रूप में सेवाएं प्रदान कर रहे हैं।

हमारे एक मित्र तो बजाज का “प्रिया” ब्रांड का स्कूटर चार दशक से अधिक पुराने मॉडल को प्रतिदिन घर से बाहर निकाल कर इसलिए रख देते हैं, ताकि उनके घर के बाहर कोई दूसरा अपनी कार पार्क ना कर सके। वैसे उनका स्कूटर स्टार्ट हुए भी दो दशक हो चुके हैं। हद तो तब हो गई, जब उन्होंने अपने बच्चों के वैवाहिक बायो डाटा में एसेट्स के नाम पर अपने स्कूटर तक का जिक्र भी कर दिया था।

उपरोक्त फोटो एक कॉलेज के पुराने मित्र ने मियामी (अमेरिका) से प्रेषित की है, जो वहां के एक स्थानीय अमरीकी भोजनालय की है। वहां पर बजाज स्कूटर एक शो पीस का काम कर रहा है। उसने तो मज़ाक मज़ाक में ये भी कह दिया कि यदि हमारा चार दशक पुराना चेतक स्कूटर उपलब्ध हो तो उसे भी अमेरिका के किसी भोजनालय में उचित सम्मान और दाम मिल जायेगा।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – आलेख ☆ श्रापित गर्भ… ☆ श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव ☆

श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव जी

अल्प परिचय 

गोरखपुर, उत्तरप्रदेश से श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव जी एक प्रेरणादायक महिला हैं, जिन्होंने अपनी लेखनी से समाज में महत्वपूर्ण योगदान दिया है। उन्हें 2024 में अंतरराष्ट्रीय महिला सम्मान से नवाजा गया। उनके द्वारा संवाद टीवी पर फाग प्रसारण प्रस्तुत किया गया और विभिन्न राज्यों के प्रमुख अखबारों व पत्रिकाओं में उनकी कविता, कहानी और आलेख प्रकाशित हो चुके हैं। उनकी लेखनी में समाज के प्रति संवेदनशीलता और सृजनात्मकता का सुंदर संगम देखने को मिलता है।

☆ आलेख ☆ श्रापित गर्भ… ☆ श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव ☆

अक्सर घरों में किसी के निधन के बाद उसकीं पुण्यतिथि मनाई जाती हैं और सार्मथ्य अनुसार दान-पुण्य किया जाता हैं ताकि आत्मा को शांति मिले।

मगर हर तबके में एक मृत्यु के बाद ना तो पुण्यतिथि मनाई जाती हैं न ही आँसू बहाये जाते हैं और ना ही दान पुण्य होता है क्योंकि मृतका माँ के कोख में ही दम तोड़ देती है।

बात कड़वी हैं लेकिन 100% सही है।

जी हाँ मैं बात कर रहीं हूँ माँ के उस गर्भ की जो पुत्र मोह के लिए पुत्री के हत्या से रंग जाते हैं।

कहते है कंस अपनी बहन के बच्चों की हत्या जन्म के बाद कारागार में करता रहा क्योंकि उसे डर था अपने प्राणों का।

मगर माँ के गर्भ गृह में मारने वाला कंस कौन है?

वह भी अपने अबोध अंश का, उसे किसी का डर नहीं।

बस पुत्र रत्न प्राप्ति की अभिलाषा और यही से शुरू होने लगता है, पाप-पुण्य का वह खेल जो मानव रुपी पिता से वह अपराध करवाने लगता है जो ना चाह कर भी माता पिता कर बैठते हैं।  

खैर मेरा काम था लिखना।

क्योंकि गीता -कुरान बाकी धार्मिक किताबों में केवल लिखा गया है बाकी तो सभी समझदार हैं ही।

 

अपने आंगन के नन्ही दूब को फैलने दें।

कोई फर्क नहीं पड़ता समाज को कि आपके घर बेटा है या बेटी!

उन्हें अपने हाथों से कुचलने की चेष्टा ना करें🙏

सृष्टि हैं तभी शिव हैं वरना पत्थरों पे फूल खिलते नहीं।

 

अजन्मा- भ्रूण हत्या

व्यक्तिगत सोच है, मजबूरी नहीं

फिर खुद के हाथों

अपनी उस कली को कैसे कुचल सकते हैं?

जिसके अंदर हमारा रक्त यहाँ तक कि धडकन भी साथ-साथ धड़क रही हो और वह नन्ही सी जान हाथों में आने के लिए पल- पल प्रतीक्षा कर रही हो।

माँ तो मिट्टी से बनी हुई दुर्गा की वह प्रतिमा होती है जिसका स्वभाव ही मातृत्व फिर अपने कोख की रक्षा करने में असर्मथ कैसे हो सकती है? क्योंकि पुरुष के साथ साथ वंश की चाहत प्रंचड हावी स्त्री मन में भी होती है।

और अंधकार में छोटी सी पवित्र लौ अपनी अस्तित्व खो देती है।

अगर स्त्री स्वयं के भ्रूण हत्या को होने से नहीं बचा सकती तो उसे फिर माँ कहलाने का हक कैसा?

माँ तो जननी होती है। उसके लिए पुत्र और पुत्री का क्या भेद?

© श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव

गोरखपुर, उत्तरप्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #280 ☆ साठलीत जळमटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 280 ?

☆ साठलीत जळमटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

लपून चार बाजुला थांबलीत जळमटे

घराघरात जाउनी शोधलीत जळमटे

*

करून रामबाण हा पाहिला इलाज मी

इलाज पाहुनीच हा फाटलीत जळमटे

*

सुरुंग आज लावला ठोकशाहिला जुन्या

नवीन कल्पने पुढे वाकलीत जळमटे

*

भयाण वाटली तरी जाळु सर्व संकटे

मनात आग पाहुनी पेटलीत जळमटे

*

हळूहळूच हे किटक आत पोचले पहा

चिवट बरीच जात ही थाटलीत जळमटे

*

कुणी न काल रोखले हे कुणा न वाटले

दिसेल घाण त्या तिथे लटकलीत जळमटे

*

लगेच साफ व्हायची आस ही नका धरू

प्रमाणबद्धतेमुळे साठलीत जळमटे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काय सांगू गझलहीतर राम आहे

ईश्वराच्या साधनेचे प्रेम आहे

*

ध्यास आहे जो जयाच्या अंतरीचा

तोच येथे गझल होतो नेम आहे

*

मानता नाजूक नाते कृष्ण राधा

कोण सांगा राधिकेचा शाम आहे

*

लावली ज्याने समाधी साधनेची

गझल त्याला लाभलेले दाम आहे

*

शब्द असतो बांधलेला भावनेशी

त्यात अवघा साठलेला जोम आहे

*

माणसाला माणसांची जाण नाही

कोण येथे जाणणारा व्योम आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्रमास आला बाई…… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ चैत्रमास आला बाई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

चैत्र मास आला बाई आला मोहोर घेऊन

आधी गेली पाने आता आला अंकूर लेवून..

*

सजलाय पर्णभार कोवळी ती पाने किती

सुंदर ती दिसतात हात, झाडावर हलवती…

*

लाल तांबूस पिवळी गर्द हिरवी ती छटा

मोहोराच्या हलवी हो चैत्र झाडावर बटा…

*

कैऱ्या डोलती डौलात गुलमोहोर फुलारला

छत्र लालीचे घेऊन पळस पांगाराही आला..

*

सणासुदीचा आनंद गुढी सुख पावित्र्याची

नांदी नवीन वर्षाची गोड प्रेम नि सौख्याची..

*

माणूस तो एक आहे हाच संदेश देऊ या

गुढी चैतन्याची हाती सण साजरा करू या….

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्थलांतर… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्थलांतर… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्‍या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.

स्थलांतर कशा प्रकारचं?

काही प्राणी एकाच मार्गाने, एकरेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्य, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.

 कोणत्या प्रकारे प्राणी स्थलांतर करतात?

प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत नदीच्या गोड्या पण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.

 प्राणी स्थलांतर का करतात?

एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर करतात. का? प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.

१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी

२. काही प्राणी दुसर्‍या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी

३. काही जण आपल्या अन्नाच्या शोधात

 ४. काहीजण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.

 स्थलांतर कसं करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?

आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो, पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे. शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ, हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं, ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरकही खूण असावी.

स्थलांतर कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?

स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात. पण इतर प्राण्यांचं काय? ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.

मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर

काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२००कि. मी. चा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते. वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई-वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावरती ही बसतात.

काही विशिष्ट जातीच्या भुंग्यांचं स्थलांतर

ज्या प्रदेशात अत्यंत थंडी असते, हिमवर्षाव होतो, आणि थंडीत गवताचं पातंसुद्धा कुठे दिसत नाही, अशा युरोपमधील देशात लेडी बग नावाचे भुंगे बागेतून कंपाऊंडवॉलच्या ऊबदार फटीत जातात. ते त्यांचे स्थलांतर असते. काही जण आणखी पुढचा प्रवास करतात. एखाद्या टेकाडाकडे तेउडत जातात. तिथे अनेक लेडी बग एकत्र गोळा होतात. अगदी जवळ जवळचिकटून मोठा गट करून, एकमेकांना ऊब देत ते थंडीचे दिवस घालवतात. वसंत ऋतू आला, की ते पुन्हा आपल्या मुळच्या घरी परत येतात.

या प्रकारच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या स्थलांतरामुळे शास्त्रज्ञ गोंधळात पडतात. प्राण्यांना, पक्षांना, कीटकांना कसं कळतं, की त्यांना कुठं जायचं आहे? आता हे ठिकाण सोडायची वेळ झाली आहे, याची उत्तरे अद्याप कुणालाच कळलेली नाहीत.

 मुंग्यांची फौज

दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात. जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं, तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात. ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते, तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात् त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या इतक्या मुंग्या असतात. की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते. जर नदी रुंद असेल, तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मधे राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्‍या तिरालापोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते. त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात. पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल, तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते. त्या सतत कूच का करतात? त्या कुठे जातात? आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.

– क्रमश: भाग १ 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “का??…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “का??…” ☆ श्री मंगेश मधुकर

“ का? ”

रात्रीचे साडे अकरा वाजले तरी श्रीकांत लॅपटॉपवर काम करत होता. रूमचा लाइट पाहून आईनं दार वाजवलं.

“आई, काय काम आहे. झोप ना”नेहमीप्रमाणे श्रीकांत खेकसला.

“ए, विनाकारण ओरडू नकोस”

“सॉरी!! मातोश्री. प्रोजेक्टचं काम चालूयं. ते झालं की झोपतो”

“आधी दार उघड”

“काय कटकट ये”चडफडत श्रीकांतनं दार उघडलं.

“प्रोजेक्ट किती अर्जंट आहे”

“विशेष नाही”

“मग लवकर झोप”

“का?”

“सकाळी लवकर उठायचं आहे”

“सुट्टी आहे. मी निवांत उठणार”

“उद्या गुढीपाडवा पण आहे”

“सो व्हॉट…”

“सकाळी तुला गुढी उभारून पूजा करायचीय.”

“हे कधी ठरलं”श्रीकांत वैतागला.

“आत्ताच”

“गप ना. उगीच छळू नकोस.”

“आठ वाजेपर्यंत गुढी उभारु.”

“इतक्या सकाळी? ”जांभई देत श्रीकांत म्हणाला.

“खरंतर सात वाजताच उभारली पाहिजे पण उशीर झालाय म्हणून तुला सवलत. ओके!!”

“नॉट ओके, मला एक कळत नाही जर संध्याकाळी काढूनच टाकायची तर गुढी उभारायची कशाला?”

“शास्त्र असते ते! ! ”आई हसत हसत म्हणाली.

“बघ. तुझ्याकडे उत्तर नाहीये आणि हसलीस म्हणजे माझं म्हणणं तुला पटलं.”

“अजिबात नाही. आपला सण परांपरेनुसारच साजरा करायचा.”

“गुढी उभरण्या मागंच लॉजिक काय?”

“तू नवीन पिढीतला आजच्या भाषेत बोलायचं तर झेड जनरेशन मधला ना..”

“त्याचं इथं काय संबंध?”

“तुम्ही लोक खूप हुशाssssssर. मग गुढीचं उभरण्यामागचं लॉजिक गुगल कर. चॅट जीपीटी ला विचार.”

“ते तर करणारच आहे. सकाळी तुला सांगतो!!” श्रीकांत.

“चला त्यानिमित्तान तुला सणांची माहिती होईल.”

“येस. माहिती असणं केव्हाही चांगलं ना. नवीन पद्धतींचा स्वीकार करावा. स्वतःला अपडेट करावं”

“शंभर टक्के मान्य पण हा सिलेटीव्ह अप्रोच नको.”

“म्हणजे”

“सोकोल्ड मॉडर्न आणि झेड जनरेशनमध्ये भारतीय सणांना नावं ठेवण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येक सणाविषयी काही ना काही तक्रारी असतातच. हे कशाला? असंच कशाला? हेच का करायचं? वगैरे वगैरे…” 

“अच्छा म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. ”श्रीकांत.

“जरूर विचारा परंतु १४ फेब्रुवारी, ३१ डिसेंबर, वर्षभर साजरे केले जाणारे ‘डे’, त्याच त्या पार्ट्या आणि अजून काही.. साजरे करताना चकारही शब्द तोंडातून निघत नाही मात्र भारतीय सणांमध्येच लॉजिक शोधता. माझा आक्षेप त्यावर आहे.”

“कुठचा विषय कुठं नेतेयेस”

“बरोबर बोलतेय. सणवार आले की हे कशासाठी? का? असं तुझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलयं.”

“परत तेच. यात काहीच चुकीचं नाही. तुझ्याकडे उत्तर असेल तर कनव्हीन्स मी.”

“मला एवढचं सांगायचं की सरसकट नावं ठेवणं सोप्पंयं त्याऐवजी आपले सण, ते साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी नीट माहिती घे. मग बोल. खात्रीने सांगते की प्रत्येक ठिकाणी लॉजिक सापडेल. ” श्रीकांत विचारात पडला.

“आई, यावर नंतर बोलू. आता रात्र खूप झालीय. तू म्हणशील तसं करतो. सकाळी सातला गुढी उभारू हॅपी!! ”

“ठीकयं पण आधी माहिती घे आणि मनापासून वाटलं तर कर उगीचच जुलमाचा रामराम नको.” आई 

“दोन्ही बाजूनं कसं काय बोलतेस”

“बोलाव लागतं. विनाकारण सणांना टार्गेट केल्यावर राग येणारच.”

“आय एम सॉरी! ! तुला दुखवायचं नव्हतं”

“प्रश्न माझ्या दुखवण्याचा नाहीये. झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सगळंच तात्पुरतं झालेलं असताना वर्षानुवर्षे हे सण, परंपरा आजही उत्साहात, जल्लोषात, आनंदात साजरे केले जातात. ही बाब खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे झोप आता, बाकी उद्या बोलू. गुड नाइट”.

बरोब्बर सात वाजता अत्यंत उत्साहात श्रीकांतनं गुढी उभारली तेव्हा आईच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होतं. श्रीकांतनं कडुलिंबाचं एक कोवळ पान खाल्लं अन एकेक आई-बाबांना दिलं.

“अरे वा, गुढीपाडव्याचा अभ्यास केलेला दिसतोय.” आई 

“हो, थॅंकयू आई”

“तुलासुद्धा थॅंकयू”

“का?”

“माझं ऐकलं म्हणून”आई.

“तुझं ऐकल्यानं माझाच फायदा झाला. पाडवा म्हणजे गुढी अन गोड पदार्थाचं जेवण आणि सुट्टी एवढचं माहिती होतं. आपलं बोलणं झाल्यावर इंटरनेटवर गुढीपाडव्याविषयी चांगली, नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती मिळाली आणि आपल्या प्रत्येक सण का? आणि विशिष्ट पद्धतीनेच साजरा करण्यामागचं लॉजिक समजलं.”

“म्हणूनच तर पिढ्या बदलल्या तरी सण दिमाखात साजरे होतायेत. ”आई.

“मी ठरवलयं की माहिती नसताना किवा अर्धवट माहितीच्या आधारे व्यक्त होणाऱ्या जमान्यात यापुढे प्रत्येक सण का? साजरा करायचा याविषयी सोशल मिडियावर लिहिणार. याची सुरुवात आजपासून…”

“चांगल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!! आता नवीन परंपरेचे पालन करू” आई.

“म्हणजे”

“गुढीसोबत सेल्फी तर पाहिजेच ना” लगेचच आई, बाबा, श्रीकांत तिघांनीही गुढीसोबत फोटो काढले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/१  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/१  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वासंती – भाग -१  

गुलाब मावशीचा ज्येष्ठ सुपुत्र, पप्पांचा मावसभाऊ आणि माझा काका ज्याला आम्ही “भाऊ” अशी हाक मारत असू. आमचा आणि गुलाबमावशीचा परिवार हा संयुक्त परिवारासारखाच होता. एकमेकांच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या सर्वच चांगल्या- वाईट, सुख- दुःखांच्या घटनांमध्ये आमची खोलवर गुंतवणूक असायची. “भाऊचं लग्न” ही एक अशीच घटना होती की ज्यामुळे औत्स्युक्य आणि चिंता आमच्या घरात पसरली होती. औत्स्युक्य अशासाठी की आता भाऊचे लग्न होणार घरात सून येणार, काकी मामी येणार, काहीतरी कौटुंबिक बदल घडणार म्हणून आणि चिंता अशासाठी की भाऊ कोणतीच मुलगी पसंत करत नव्हता. त्याला सुंदरच मुलगी हवी होती बायको म्हणून. तसा भाऊसुद्धा गोरा, देखणा होताच. हसरा, मिस्कील होता. त्याचे शिक्षण मात्र तुलनेने कमी होते. खरं म्हणजे तो हुशारही होता, त्याचं गणित फार चांगलं होतं शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांचे त्याला ज्ञान होते. त्यावर तो सफाईदारपणे बोलू शकायचा. आपली मते मांडू शकायचा पण तो शिकू शकला नाही कारण त्याच्यावर अचानक कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यावर पाठच्या दोन भावांचे शिक्षण आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी होती. भाऊ तसा कर्तव्यदक्ष होताच आणि त्याचे त्याच्या भावांवर अपार प्रेम होते. , ज्या संधी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या भावांना मिळाव्यात ही त्याची मनापासून इच्छा होती आणि तशी त्याची धडपड होती आणि खरोखरच त्याने त्यासाठी त्याची स्वतःची घडण बाजूला ठेवून आई-वडिलांच्या संसाराची जबाबदारी कर्तव्यपरायणतेने खांद्यावर पेलली.. त्यात तो यशस्वी झाला. सत्यरंजन ज्याला आम्ही “पपी” म्हणत असू आणि सुभाष ज्याला आम्ही “बाळू” म्हणत असू, त्या दोघांची शिक्षणं विनाअडथळा पार पडली. दोघांनाही उत्तम पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या. “पपी” तर शिक्षण आणि नोकरीत अधिक सरस ठरला. भविष्यात त्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या. हे फक्त “भाऊ” मुळे शक्य झाले याची जाणीव मात्र दोघांनाही होती. भाऊ जरी जिथे होता तिथेच राहिला पण त्याची कारणे या दोघांनी कधीही स्मृतीआड केली नाहीत. त्यांनी भाऊविषयी सदैव आदरच बाळगला.

मग लग्न ठरवताना आज पर्यंत स्वतःसाठी कुठलंही स्वप्न न पाहणाऱ्या भाऊने सुंदर मुलीशी विवाह करायचा निर्धार केला तर गैर काय होते? म्हणूनच सारे जण याबाबतीत.. जरी ही बाब फारशी कुणाला रुचत नसली तरी भाऊसोबत राहिले.

भाऊने अक्षरश: नव्व्याणव मुलींना नकार दिले. कोण सावळी, कोण बुटकी, कुणी अधिक उंच, कुणाचे दात किंचित पुढे, कोणाचे केस पातळ, कुणी जाडी कुणी लुकडी अशा विविध कारणांनी भाऊने धडाधड विवाहयोग्य वधूंवर फुल्या मारल्या. माझे पप्पा आणि आप्पा (भाऊ चे वडील) कधी कधी त्याला समजावण्याचा प्रयत्नही करायचे.

“अरे या मुलीला नाकारतोस? काय खोड दिसते तिच्यात तुला? शरीरयष्टी थोडी किरकोळ आहे पण लग्नानंतर होईल की ती भरदार आणि शिवाय तिचे वडील सचिवालयात मोठ्या पदावर आहेत. नाही म्हटलं तरी तुझ्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. तुलाही ते पुढे आणतील.”

 पण या कशाचाही होकारार्थी परिणाम भाऊवर व्हायचा नाही. झालाही नाही.

भाऊची स्त्रीसौंदर्यविषयीची नक्की काय कल्पना होती तेच कुणाला कळत नव्हते. सारेच हैराण होते. जिजी मात्र म्हणायची, ” योग यावा लागतो. वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. आता भाऊ साठी मुली बघूच नका, ”

कधी कधी ती असेही म्हणायची, ” बघ हं भाऊ! “चापू चापू दगड लापू” असं व्हायचं तुझ्या बाबतीत,”

पण जिजीचे पहिले म्हणणे खरे ठरले. अखेर भाऊचे लग्न जुळण्याचा योग आला. वासंतीला भाऊने बिनतक्रार, कसलीही खोड न काढता क्षणात पसंत केले. वासंती ही शंभरावी मुलगी होती आणि भाऊच्या स्त्रीसौंदर्य कल्पनेत ती १००% उतरली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि भाऊचे लग्न जमले. गंगेत घोडं नहालं!

मोरेश्वर ढगे (मला नक्की नाव नीट आठवत नाही) यांची वासंती ही ज्येष्ठ कन्या. तिला अनिल नावाचा एकच भाऊ होता. वासंतीची आई जाडजूड, लठ्ठ, चष्मेवाली, थोडं अंगाशी सैल झोळ असलेलं नऊवारी लुगडं नेसणारी पण बोलण्यात स्पष्ट, ठणठणीत आणि काहीशी चतुर, चौकस होती. त्या मनाने वासंतीचे वडील मात्र शांत, गरीब, सरळ स्वभावाचे वाटले. अनिल उंच, मिस्कील आकर्षक असला तरी थोडासा कलंदर, बढायाखोर, उनाड असावा असा आपला एक अंदाज. अर्थात पहिल्याच भेटीत जजमेंटल कशाला व्हावे?

पण वासंती मात्र खरोखरच सुंदर होती. नाकी डोळी नीटस, रंग जरी सावळा असला तरी कांती सतेज होती. तिचे डोळे तर फारच सुंदर होते. मोठे पिंगट रंगाचे आणि पाणीदार, बोलके. केसही सरळ आणि लांब सडक. बांधा थोडा बसका आणि स्थूल असला तरी तिच्या एकूण व्यक्तीमत्वाला तो शोभून दिसत होता आणि बोलताना तिच्या पातळ ओठांची सुरेख हालचाल व्हायची. थोडक्यात काय वासंती सगळ्यांनाच आवडली. भाऊला हवी तशी मनासारखी जोडीदार मिळाली म्हणून सारेच खुश झाले. थोडं दडपण होतं ते म्हणजे गुलाबमावशीच्या स्टेशन रोडवरच्या राहत्या घराचं. घराला काहीच रेखीवपणा, सुविधाबद्ध आराखडा नव्हता. मुळात शयनगृह हा प्रकारच तिथे नव्हता. कशाही एकमेकांना जोडलेल्या, अर्थहीन, हेतूशून्य खोल्या. पाठीमागच्या बाजूने जिना उतरून खाली गेल्यावर कॉमन पद्धतीचे संडास तेही त्यावेळच्या टोपली पद्धतीचे. कॉमन अशासाठी की खालच्या मजल्यावर एक दोन भाडोत्री राहत होते आणि त्यांच्यासाठी वेगळी सोय नव्हती.

वासंती ही मुंबईत ग्रँटरोड सारख्या भागात राहणारी. त्यांचंही घर मोठं नसलं तरी मुंबईच्या वेगळ्याच शहरी वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत फरक नक्कीच होता पण लग्न जमण्याच्या आनंदात काही बाबी किरकोळ ठरतात किंवा “पुढचं पुढे बघू” अशा सदरात जाऊन बसतात हेही तितकंच खरं.

वासंती आणि भाऊचे लग्न झाले. “लक्ष्मी नारायणाचा जोडा जणूं” म्हणून सारे नावाजले. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. गृहप्रवेशाच्या वेळी वासंतीने लाजत मुरकत सुरेख शब्दांची गुंफण करून नावही घेतले. भाऊ तर काय हवेतच होता.

जिना चढून वर आल्यानंतर झोपाळा असलेल्या बाहेरच्या जागेच्या उजव्या बाजूच्या काहीशा काळोख्या खोलीचे रूपांतर भाऊ आणि वासंतीच्या शयनगृहात झाले. पूर्वी त्या खोलीतून पापड लोणच्याचे वास यायचे पण आता पावडर, परफ्युमचे सुगंध यायला लागले. काही आधुनिक, छान छान वस्तू तिथे दिसू लागल्या, सुंदर चादरी, पडदे झळकले. एक वेगळाच साज त्या खोलीला चढला आणि हे सारं केवळ वासंतीमुळे.

शक्यतो तिच्या आवडीनिवडी जपण्याचा भाऊ बऱ्याच वेळा रिकाम्या खिशाचा विचार न करता प्रयत्न करायचा. घरात वापरायची एक खोली नकळतपणे कमी झाली तरी बाकीच्या सर्व सदस्यांनी सांभाळून घेतले. याच घराच्या माळ्यावरच्या दोन खोल्यात कुमुदआत्या आणि तिचे कुटुंब राहत होते. गुण्यागोविंदाने सारे नांदत होते. सारी प्रेमाची, अत्यंत घट्ट जुळलेली नाती. याच नात्यात वासंती नावाचा एक नवा धागा सुंदर रित्या विणला जावा हीच साऱ्यांची अपेक्षा असणार ना? पण तसे झाले नाही. का? कुठे बिनसले? नक्की काय चुकले? कलहाची सुरुवात कशी कधी झाली हे कळलंच नाही. भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.

 क्रमशः भाग ३७ / १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

फार पूर्वी महिन्याची एक तारीख म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा, कारण त्या दिवशी पगार मिळायचा आणि तो पण चक्क कॅश.

१ तारीख आणि पगार हा विचार मनात आला, आणि मी चक्क १९७१ सालामध्ये नाशिकला पोहोचलो.

उत्तम मार्काने इंजिनिअरिंग पास केले होते, पण कुठेही नोकरी लागत नव्हती. जवळजवळ पन्नास एक ठिकाणी तरी अर्ज केले असतील, कुठूनही उत्तर नाही. अचानकपणे नशिबाने साथ दिली आणि चक्क नाशिकला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, मिग विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी लागली. पगार होता २२५ प्लस महागाई भत्ता ४०.

दर एक तारखेला दुपारी पगाराचे पैसे २६५ रुपये हातामध्ये मिळायचे. पैसे नंतर बँकेत भरायचे. आणि लागतील तसे २० रुपये, कधी ४० रुपये बँकेतून काढायचे. मजा असायची.

कंपनी मधला मित्र सिद्धांति याच्याबरोबर एका खोलीत भाड्याने राहत होतो.

खोलीचे भाडे होते प्रत्येकी १५ रुपये, बाहेर चहा प्यायला गेलो तर भोसले टी हाऊस चा चहा होता १२ पैसे, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचो, तिथे साधे जेवण १ रुपया आणि स्वीट डिश आणि दह्याची वाटी घेतली तर जेवण दीड रुपया. सकाळचे जेवण कंपनीमध्येच व्हायचं, आणि चार्जेस अगदीच किरकोळ असायचे.

रात्रीचे जेवण झाल्यावर मित्राबरोबर फिरायला जायचो. एका छोट्या हॉटेलच्या समोर मोठी शेगडी ठेवलेली असायची आणि त्यावर कढईमध्ये दूध उकळत असायचे. आणि एकीकडे गरम गरम जिलब्या तळणे चालू असायचे. जिलबी मिळायची ३ रुपये किलो. गरम दुधाचा ग्लास वरती साय टाकून किंमत ३० पैसे (या किमतींवर आता विश्वास बसणार नाही). तिथे मस्त बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचं, इकडे तिकडे बघत बघत गप्पा मारायच्या, ५० ग्रॅम जिलबी आणि मस्त ग्लासभर दूध प्यायचो. नंतर फिरत फिरत खोलीवर परतून मस्त झोपायचो.

अशा रीतीने पगाराचे पैसे कॅश मिळणे, आणि कॅश खर्च करणे यात एक वेगळीच मजा असायची.

साधारण ११ महिन्यानंतर नाशिकची नोकरी सोडून पुण्याला टाटा इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आलो, आणि एक तारखेला पगाराचे पैसे हातात मिळणे हा प्रकार संपला.

पण अजूनही महिना संपल्यानंतर कॅलेंडरचं पान उलटलं आणि एक तारीख बघितली की नाशिकची आठवण हमखास येतेच येते. आणि एक छान गाणं पण आठवतं किशोर कुमारचं – खुश है जमाना आज पहिली तारीख है…

तुमच्या पण अशाच आठवणी कळवा, मजा येईल.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्राक्तन… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

? इंद्रधनुष्य ?

☆ प्राक्तन… ☆ श्री हेमंत तांबे 

(तेलंगणात IT park साठी 400 एकर जंगल जाळलं आणि तिथल्या प्राण्यांचा आक्रोश ऐकवणारा व्हिडिओ कुणीतरी पाठवला. तो तुम्ही शोधा. पण त्यामुळं झालेल्या दुःखातून जे स्फुरले ते पाठवतो आहे. वाचा!) 

निश्चिंत उभ्या जंगलाला…

अरण्य जाळायचा विचार समजला तेव्हा…

त्यानं संदेश पाठवले अश्राप पक्षांना आणि श्वापदांना…

थांबू नका नका इथं, कारण तो चिता रचणार आहे त्याचीच…!

निश्चिंत प्राण्यांनी चेष्टा केली जंगलाची…

उपदेश सुद्धा केला जंगलाला, म्हणाली आठव त्याचा वानप्रस्थाश्रम…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशी नातीगोती सांगणाऱ्या तुक्याचे दाखले सुद्धा दिले…

खो खो हसत गिरक्या घेतल्या माकडांनी झांडां भोवती…

सर्व म्हणाले, He is a jolly good fellow, he is a jolly good fellow…!

जंगलाला नव्हती काळजी, आपण बेचिराख होण्याची…

दिसत होती त्याला राख रांगोळी, पंख न फुटलेल्या पिल्लांची…

आणि ढुशी मारून दूध पिणाऱ्या पाडसांची…

जंगलाला आधीच ऐकू येऊ लागल्या, किंकाळ्या त्या अश्राप जीवांच्या…

माजला होता कोलाहल त्याच्या अंतरंगात…

आणि इच्छा झाली त्याला, सर्व अश्रापांना घेऊन पळून जाण्याची…

पण पाय नसल्यानं पळूनही जाता येत नव्हतं…

म्हणून त्यानं फांद्या मारल्या आपल्याच कपाळावर…!

आज मात्र दुःख झालं त्याला…

साधं दुःखही साजरं करता येऊ नये, आपल्याला उन्मळून पडण्याचं…?

का आणि कुणी दिला मला असला वर…?

आदिम संस्कृती जपण्यासाठी तुझी पाळं मुळं जातील खोलवर…!

जंगलाच्या त्या असहाय उद्विग्न अवस्थेत, जेव्हा सर्व संज्ञा लुप्त झाल्या होत्या…

तेव्हा कानांवर आले सूर अश्वत्थाम्याच्या करुणघन विराणीचे…

कर्णानं अबोध गहन शापानं भोगलेल्या निःश्वासाचे…

हायसं वाटलं त्याला, कोणीतरी सोबत आहे म्हणून…

धुरामुळं नाही, पण डोळे घट्ट मिटून सामोरं गेलं ते आगीला…

तरीही प्राक्तन कुणाला चुकलं नाही म्हणून, किंकाळ्या मात्र ऐकाव्याच लागल्या…!

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares