☆ मातृदिनानिमित्त – लेकीस पत्र सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)☆
प्रिय सौ.अंजूस..
शुभ आशिर्वाद.
आज जागतिक मातृदिन…
तूं आई झालीस तो क्षणं आमच्या आयुष्यातील खूप सुंदर क्षणं होता.
आनंदाची फुलं ओंजळीत घ्यावा असाच.आतां तूं दोन मुलांची-सुप्रिया, निरंतरची आई आहेस. अन् सूनेचीही म्हणजे सौ.गायत्रीची.. तुझं आईपण तूं छान अनुभवतेस अन् निभावतेसही…! ते पाहून माझी ओटी भरुन गेलीय. यापेक्षा आतां मला काय हवं..
तुझ्या आईपणाचा अभिमान वाटतो.
खरंतर आतां आपलं नात॔ नकळत बदलत चाललय– आयुष्याच्या यावळणावर..! माय-लेकी तर आहोतच आपण. तुझ्या उमलत्या वयात छान मैत्रीणी झालो होतो. आतां या नात्यात भूमिकांची अदलाबदल होत असते कधी-कधी…! तूं माझी आई अन् मी तुझी लेक…
ही भूमिकाही तूं छानच पेलतेस 😢
मायेइतकचं दटावतेसही.
आवडते ही तुझी-माझी बदलती भूमिका मला..!👍
या तुझ्यातील आईला-आईपणाला मनापासून खूप सुंदर शुभेच्छा.🌹
“गप्प बैस गं, काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का..? तुला जी भाजी वाटते ती कर, मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर.
तशी आवंढा गिळून बळचं हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली. “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी,” असं कापऱ्या आवाजात म्हणाली…
सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता, त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्याजवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला, आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झालीय आपली.. हा, सगळे शानशोक बंद झाले, पण ते तसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते, मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे?’ म्हणत आई जरा रागावली त्याला…
तितक्यात त्याचा फोन वाजला, कामावरच्या राजूचा होता. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो, आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं. कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणूस होता, पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं, रक्ताची कारंजी उडाली होती आणि राजू त्या दिवसापासून कामावर नव्हता.….
राजूच्या बायकोने फतवाच काढला होता, लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती त्याची. खरंतर फार गरज होती त्याची कामावर. खूप विश्वासू होता तो.
‘बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल…’ असा विचार करत त्याला कॉलबॅक केला,.. “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”
तिकडून आवाज आला.. “सर, कामावर दोन दिवसात येईन पण आज मला थोडे पैसे पाहिजे होते, उद्या मदर्स डे आहे. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?
त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला.. “अरे राजा, तूझं डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट देतोस तू,..?”
राजू तिकडून म्हणाला, “हसू नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं. अगदी खाऊ सुद्धा घातलं, तिनं पाच पाच घरं जास्त भांडी घासायची कामं घेतली. माझ्या कमाईची तिनं भरपाई केली, मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही.
आता मी पूर्ण बरा झालोय सर.. आपल्या त्या साईटच काम मीच पूर्ण करीन. पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खूप फोटो काढायचं स्वप्न आहे तिचं….
माझ्या मित्राचं साड्यांचं घरगुती दुकान आहे, तो म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या,.. आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या.. साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”
गडबडत हा म्हणाला, “हो, तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली.. छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती.. कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एक दिवस ओरडलो होतो.. ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं, त्याकडे आपलं लक्ष पण नाही.
राजूसारखा माणुस त्याच्या बायकोची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो.. आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे.. आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय..
तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली, “डबा तयार आहे रे….”
निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं, आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी.”
आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही… म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी. आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे. आता कधी योग येतो की बिचारीला,….?”
साईटवर राजू वाटच बघत होता.. ह्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात.. मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो.”
सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला व आईला कॉटनची साडी घेतली.. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले.. “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”
दुसऱ्या दिवशी दोघींना सोफ्यावर बसवल्ं, औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला.. “हॅप्पी मदर्स डे, मला माहित आहे आई तुला ही पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही. मनात प्रेम तर असतंच, पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवला एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो ही आईसाठी आहे.. सेलिब्रेशन घरात तर करतोय..” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… तिला खूपच आवडला तो हिरवागार रंग.. आईचे तर डोळेच पाणावले, “अरे मला कशाला आणत बसलास ॰..?”
त्याने आईला जवळ घेतलं, “आई सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीय तर त्यासमोर ही तर छोटीशी भेट आहे.. पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईन मी तिला.. आणि तेही मदर्स डे ला.. कारण बघ ना, ती बायको असली तरी.. मला मुलासारखं समजून तर पटकन सावरून धरलंय तिने. आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई, ती त्याच्या बायकोतली आई असते…”
आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला…. “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे….”
तितक्यात राजूने व्हिडीओ कॉल केला “साहेब तुमचे आभार, आमची आई एकदम खूश आहे बघा..” ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती, आईने तिचं फोनवर कौतुक केलं.. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघून ती आणखीनच खुलली.
फोन ठेवला तर समोर.. ही पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी.. गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी..!
कुठलीही संवेदनशील व्यक्ती एखाद्या अनोळख्या व्यक्तीचं दुःख बघून हळहळते, मनातून खूप दुःखी होते, बराच वेळ त्याचाच विचार करत राहते, कधीकधी थोडीफार आर्थिक मदत करते आणि शेवटी यापलीकडे आपण काय करू शकतो? असा विचार करून दिनक्रमाला लागते… पण काही लोक जात्याच वेगळे असतात….out of the way जाऊन ते पीडीतांसाठी काम करतात… अशा अनेक गोष्टी आपण वाचतो, अचंबित होतो… पण आता मी सांगणार आहे ती घटना आम्ही अगदी जवळून बघितलेली…. तुम्हा सगळ्यांना share करावीशी वाटली…!!
माझा नवरा आणि त्याच्या तीन मित्रांनी नुकतंच भारताच्या पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत ( जवळ जवळ ४००० km) cycling च Expedition पूर्ण केलं त्यात घडलेली ही घटना..!! त्या चौघांना, Young Seniors चे काही सहकारी, गुहाटी ला join झालेत.. त्यात पुण्याचे प्रथितयश Maxillofacial and oral surgeon डॉ. दीपक कुलकर्णी हे सुद्धा होते.. एक दिवस (१३ डिसेंबर २०२२) रोजी ह्या सगळ्यांनी लोहित जिल्ह्यातील सनापुरा येथील विवेकानंद mission च्या शाळेला भेट दिली.. तिथे डॉ. कुलकर्णींना सर्व मुलींमध्ये एक ९-१० वर्षांची मुलगी (तिचं नाव मुस्कान) जरा वेगळी आणि एकटीच बसलेली आढळली… नीट निरखून बघितले तर त्या मुलीची मान पूर्ण वाकडी असलेली आढळली, आणि मानेची नीट हालचाल पण होत नव्हती, त्यामुळे complex येऊन ती मुलगी कुणात मिसळत नसल्याचं कळलं… डॉ. नी अशा केसेस दुरूस्त झालेल्या बघितल्याने, ते प्रिन्सिपॉलना भेटून म्हणाले, ” यावर शस्त्रक्रिया हा उपाय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही तिला गुहाटी किंवा अरुणाचल प्रदेशात चांगल्या डॉ ना दाखवा..” त्यावर प्रिन्सिपॉल म्हणाल्या ,”आम्ही भरपूर ठिकाणीं दाखवलं पण काही उपयोग झाला नाही..” यावर डॉ. नी ताबडतोब उत्तर दिलं की ,”तुम्ही हिला पुण्याला घेऊन आलात तर मी तिथल्या चांगल्या डॉ. कडून हिच्यावर उपचार करवून घेईन , शिवाय तिच्या जाण्यायेण्याच्या, औषध पाण्याच्या खर्चाची तरतूदही करेन.. तुम्ही हिच्या पालकांशी बोलून घ्या “..!! आणि आपला फोन number देऊन डॉ. पुढे मार्गस्थ झाले..!!
त्यानंतर जानेवारी १० पर्यंत प्रिन्सिपॉल मॅडम डॉक्टरांशी w app वर संपर्कात होत्या… त्यानंतर ४-५ दिवसात डॉ.ना मुस्कानच्या काकांचा फोन आला.. त्यात ऑपरेशनच्या यशापयशाबद्दल विचारलं ( हे साहजिकच होतं कारण ते इतका खर्च करून येणार होते) डॉ. नी त्यांना आश्वस्त केलं…!! त्यानंतर पुढील एक महिना काहीच घडले नाही… डॉ. ना वाटले त्या लोकांना खात्री वाटली नसेल म्हणून येणार नाहीत …
पण २२ फेब्रुवारीला प्रिन्सिपॉल मॅडमचा फोन आला की मुस्कान आणि तिचे नातेवाईक लवकरच पुण्याला येत आहेत.. त्याप्रमाणे ७ एप्रिलला फक्त एकटे काका आणि ८ एप्रिलला इतर सगळे (मुस्कान आणि तिचे जवळचे नातेवाईक) पुण्यात येऊन धडकले.. डॉ. ना भेटले… डॉ. नी त्यांना ससूनमधील सगळी procedure समजावून सांगून admit करून घेतले… दरम्यान मुस्कानची, प्रसिद्ध शल्यचिकित्सक,डॉ. पराग सहस्रबुद्धे ( prof and head, plastic surgery department) यांचेकडून तपासणी करून, १२ एप्रिल ही तारीख operation साठी ठरवली… ठरल्याप्रमाणे, कुठलेही complication न येता , op व्यवस्थित पार पडले…!!
मुस्कान चे काका एक दिवस आधी फक्त डॉ. ना जोखायला आले होते.. एका अनोळखी मुलीला out of the way जाऊन हे इतकी मदत का करत आहेत हे त्यांच्या आकलनापलीकडचं होतं… त्यांनी नंतर डॉ.कडे कबूल केलं की, “ आम्ही जरा साशंक होतो , पण मग आम्ही विचार केला की, ” जे लोक इतक्या दूर सायकलवर येतात ते नक्कीच चांगल्या मनाचे असायला हवेत, म्हणून आम्ही केवळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, फक्त आवश्यक तपासण्या करायला म्हणून इतक्या लांब आलो आणि तुम्ही आम्हाला चक्क ऑपरेशन करूनच परत पाठवत आहात…!! “
ऑपरेशन नंतर जाग येताच मुस्कानचा पहिला प्रश्न होता,” माझी मान सरळ झाली का? “…. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळलं…” इतका लहानसा जीव, जन्मापासून हे वेगळेपण आणि समाजाच्या विचित्र नजरा झेलतच मोठा झालेला… हा सुखद धक्का तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे, याची तिला जाणीव तरी असेल का..??
मुस्कान ला discharge मिळाल्यावर डॉ. नी Young Senior grp शी तिची भेट घडवून आणली… शेवटी या सगळ्या घटनांना जबाबदार YS grp च होता ना..?? (YS grp मधील cyclists नी सुद्धा contribution करून, खारीचा वाटा म्हणून मुस्कानला काही मदत केली )
अगदी वेळेवर ठरून, डॉक्टर दीपक कुलकर्णी, गुहाटीला या चौघांना join होतात काय, मुस्कानला बघून त्यांचं मन द्रवतं काय, ३००० km चा प्रवास करून एक गरीब कुटुंब केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे येतं काय आणि वेगाने सगळया घटना घडून मुस्कान ठीक होते काय…. सगळं स्वप्नवत भासत होतं…!!
मुस्कान लवकरच आपल्या घरी परत जाईल… op successful झाले असले तरी जादूची कांडी फिरवल्या सारखी मान एका मिनिटात सरळ होणार नाही… तिला काही महिने पट्टा आणि physiotherapy करावी लागेल… मात्र हळुहळू मान नॉर्मल position ला येणार हे नक्की !!
एका सहृदय माणसाने, आपल्या संवेदनशील मनाची हाक ऐकून ही जी कृती केली, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा हा प्रयास…!!
डॉक्टर दीपक कुलकर्णी तुम्हाला सलाम. — संत तुकाराम महाराज यांच्या ,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातील “साधू ” किंवा “देव” अजून वेगळा काय असू शकतो.??
लेखिका : साधना राजहंस टेंभेकर, कोथरूड, पुणे
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक साधक व नर्मदा भक्त – १ एप्रिल २०१७ ते २० एप्रिल २०१८….
भगवंत व सद्गुरुंनी १७० दिवसात पायी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. संत साहित्याचा अभ्यास यथाशक्ती चालू आहे.
इंद्रधनुष्य
☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – १… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆
अखंड मंडलाकारम्
व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरुवे नमः।।
जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म, वैशाख शुद्ध पंचमी, नंदन नाम संवत्सर, युधिष्ठिर-शक 2631, वसंत ऋतू, रविवारी, इसवी सन पूर्व 509 ला…. केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी, कालडी नावाच्या, गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शिवगुरू व आईचे नाव आर्यांबा. कुशाग्र बुद्धी, तल्लख स्मरणशक्ती, अत्यंत देखणी व बळकट शरीरयष्टी, आजानुबाहू, असे त्यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व होते.
शब्दोच्चार व लिपी यांचे ज्ञान पाचव्या वर्षीच झाल्याने त्यांच्या पिताजींनी पाचव्या वर्षीच, त्यांचा व्रतबंध केला. आठव्या वर्षी ते चतुर्वेदी झाले. बाराव्या वर्षी सर्व शास्त्र संपन्न होते.
१६ व्या वर्षी प्रस्थान-त्रयी…. म्हणजे उपनिषदे, ब्रह्म -सूत्र व श्रीमद् भगवद्गीता यावर जगप्रसिद्ध असे भाष्य केले.
३२ व्या वर्षी ते दिव्यलोकी परतले.
चार वर्षांचे असताना “देवी भुजंग स्तव” हे २८ श्लोकांचे स्तोत्र त्यांच्याकडून रचले गेले.
बालशंकरांचे उपनयन झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांचे पितृछत्र हरपले. म्हणून त्यांच्या मातोश्रींनी, त्यांना गुरुकुलात दाखल केले. गुरुकुलात असताना एक दिवस ते भिक्षा मागायला गेले असता, त्या घरातील ब्राह्मणाची पत्नी, त्यांना देण्यासाठी, घरामध्ये भिक्षा शोधू लागली. घरात काहीच नव्हते. तिला एक वाळलेला आवळा दिसला. तोच तिने त्यांना दिला. त्यावरून , त्यांना त्या घरातील दारिद्र्याची कल्पना आली. तेव्हा त्यांना स्फुरलेल्या कनकधारा स्तोत्राने, त्यांनी श्री लक्ष्मी देवींची स्तुती केली. तत्काळ लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, देवींनी, सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला व त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे दूर झाले. त्यामुळे त्या गावचे नाव कनकांबा असे पडले.
तीन वर्षांच्या कालावधीतच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेची ख्याती राजदरबारात पोहोचली. राजाने त्यांना बरीच संपत्ती देऊन, राजदरबारात आणण्यासाठी, पालखी पाठवली. ती संपत्ती नम्रतापूर्वक परत करून, ती प्रजेसाठी वापरावी. मला याचा काय उपयोग? असा निरोप राजाला दिला. आपण विद्वानांविषयी आदर बाळगता, त्यामुळे आपले भलेच होईल असा राजाला आशीर्वाद दिला. त्यांची विद्वत्ता पाहून गावातले प्रतिष्ठित त्यांना खूपच मान देत असत. शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता. पण आईला कोण सांभाळणार? त्यांनी विचार केला. त्यांनी त्यांच्या अनेक शिष्यांपैकी अग्नि शर्मा या आवडत्या असलेल्या शिष्याच्या नावावर सर्व संपत्ती करून आईची जबाबदारी सोपवली. अग्निशर्मांनी पण आचार्यांना त्यांच्या आईची काळजी घेण्याचे वचन दिले.
आईला स्नानासाठी गंगेवर लांब जायला नको म्हणून आचार्यांनी गंगेचा प्रवाह आपल्या घराजवळ आणला. एक दिवस आचार्य स्नानाला गंगेत उतरले असता मगरीने त्यांचा पाय पकडला. तेव्हा आचार्यांनी आईला सांगितले, आता मगर मला खाऊन टाकणार. तर तू मगरीच्या तावडीतून सोडवायला प्रार्थना कर. आईच्या प्रार्थनेवरून ते मगरीच्या तावडीतून सुटले. तेव्हा ते आईला म्हणाले, आता तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दे. तू माझी आठवण काढलीस की मी नक्की परत येईन व तुला भेटेन. असे म्हणून ते कालडी सोडून निघून गेले. त्या दिवशी कालडी गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नाही.
गुरूंच्या शोधात प्रथम ते गोकर्ण महाबळेश्वरला आले. तिथे त्यांना विष्णू शर्मा नावाचा त्यांच्याबरोबर गुरुकुलात शिकत असलेला मित्र भेटला. एके दिवशी एका संन्याशाने त्यांना सांगितले, की ते ज्यांच्या शोधात आहेत ते “गुरुगोविंदयती” नर्मदा नदीच्या तीरावर, ओंकार मांधाता येथे, आश्रम स्थापून राहात आहेत. गुरुगोविंदयती हे गौडपदाचार्यांचे शिष्य. गौडपदाचार्य पतंजलीचे शिष्य.
आचार्य ओंकारेश्वरला गुरूंच्या गुहेत आले. गुरूंनी विचारले “ बाळा तू कोण?” आणि आचार्य उत्स्फूर्त उद्गारले ……
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम्।
नचश्रोत्र जिव्हे, नच घ्राण नेत्रे।
नचव्योम भूमिर्नतेजो न वायुः।
चिदानंद रूप शिवोsहम् शिवोsहम्।।
गुरु गोविंदयतींना, बद्रिकाश्रमात, व्यासमुनींनी, या शिष्याची कल्पना आधीच दिली होती… की पृथ्वीवरील शिवाचा अवतार तुझ्याकडे शिष्य म्हणून येईल. ते त्यांची वाटच बघत होते. तीनच महिन्यात आचार्यांचा अभ्यास पाहून गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली, व या बाल बृहस्पति शिष्याला, ‘ शंकराचार्य ‘ म्हणून उद्घोषित केले. तिथे शंकराचार्यांनी अत्यंत अवघड अशा ‘ विवेक चूडामणी ‘ नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. नर्मदामाई वाट पाहत होती की, या शंकराचार्यांचे लक्ष आपल्याकडे कधी जाईल?
एकदा खूप पाऊस आला. मोठाच पूरही आला. ही संधी साधून शंकराचार्य व त्यांचे गुरु ज्या गुफेत होते, त्या गुफेत वरपर्यंत मैय्या प्रवेश करू लागली. तेव्हा श्री शंकराचार्यांनी नर्मदा मैय्याची स्तुती करून, नर्मदाष्टक रचले व कमांडलूमध्ये मैय्याला बंदिस्त करून, गुरूंच्या गुफेत येण्यापासून रोखले.
नंतर बद्रिकाश्रमात गुरूंचे गुरु गौडपादाचार्य यांचे दर्शनास ते गुरुगोविंदयतींबरोबर गेले.
त्यानंतर गुरूंनी त्यांना वाराणसी म्हणजेच, वारणा + असी या दोन नद्यांचा संगम, त्यावर वसलेले वाराणसी येथे पाठवले. तेथे प्रस्थान त्रयीवर भाष्य करण्यास सांगितले.
गणेश पंचरत्न स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, कालभैरवाष्टक इत्यादी अनेक स्तोत्रे, त्यांनी रचली.
वाराणसीत आचार्यांची प्रवचने होऊ लागली. प्रवचनाला भरपूर गर्दी होत असे. आचार्यांचे शिष्यवैभव अपूर्व होते. एकदा एक वृद्ध भेटले. खूप प्रश्नोत्तरे झाली. जेव्हा ते साक्षात विष्णू आहेत हे समजले, तेव्हा आचार्य त्यांच्या पाया पडले. तेव्हा श्रीविष्णूंनी आपले खरे रूप प्रकट केले.
आचार्यांचे प्रस्थान- त्रयीवरचे भाष्य-लेखन पूर्ण झाल्यावर ते आपल्या शिष्यांसह गुरूंना भेटायला बद्रिकाश्रमात आले. त्यांच्या या कर्तृत्वावर खूष होऊन, आपल्या गुरूंच्या संमतीने, गुरू गोविंदयतींनी आचार्यांना अद्वैत-वादाचा प्रसार करण्याचा आदेश दिला.
तिथून पुढे जात असता आचार्यांना साक्षात भगवान शिवांचे दर्शन झाले. आचार्यांच्या प्रार्थनेवरून शिवांनी त्यांना अध्यात्म-संन्यास दिला. त्याच क्षणी आचार्यांनी भगवान शिवांची मानसपूजा केली व रचली.
एके दिवशी आचार्यांना समजले, की आपल्या मातेचा अंत जवळ आला आहे. ती आपली आठवण काढत आहे. ते कालडीला आले. आईच्या इच्छेनुसार आचार्यांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडवले. “विजयी भव” असा आशीर्वाद देत, तृप्त नजरेने पुत्राकडे पहात असतानाच आर्यांबा अनंताकडे झेपावल्या व चैतन्य, चैतन्यात विलीन झाले.
आचार्य संन्यासी असल्याने गावातील वैदिक ब्राह्मणांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना विरोध केला. पण आचार्यांनी आईला तसे वचन दिले होते. त्यामुळे आईचे अंत्यसंस्कार करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. सर्व मंडळी निघून गेली. आचार्यांचा शिष्य सुखाचार्य व आचार्य दोघेच राहिले. मध्ये काही वेळ गेल्यामुळे आईचा देह जड झाला होता. तो एकट्यांना उचलणे शक्य नव्हते. त्यांनी त्या देहाचे तीन तुकडे केले. मृत्युंजयाचे स्मरण केले. आणि स्वतःच्या योगसामर्थ्याने त्या चितेला अग्नी दिला. आपल्याच हाताने मातेचे दहन केले.
आईचे दिवस करण्यासाठी गावातील कोणी ब्राह्मण येईनात. त्याच वेळी तीन ब्राह्मण अतिथी म्हणून आले. आचार्यांचा वाडा रोज वेदघोषाने दणाणू लागला. गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले, की ते तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – आकर ऐसे चले गये…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 139 – आकर ऐसे चले गये…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “नियत तिथी की तैयारी में…”)