निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला कि अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो.
तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते. पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात. बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गून दुपारी असते.
फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील रंगपंचमी अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरी च्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासातअसतो. वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो.
उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथेतिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणावू लागतात. वनराणी जणु आपल्या जवळील हिरव्या रंगाच्या हिरवट, पोपटी गर्द शेवाळी, पिवळसर सोनेरी राजवर्खी रंगाची मुक्तहस्ते उधळण करू लागते. मग तरु-लतांवर ही रंगल्याली नाजूक पालवी वाऱ्यावर लवलव करु लागते. शिरीष, पिंपळ आदि वृक्ष ही नाजूक पालवीचे सजतात.
फाल्गुन महिन्यात खऱ्या अर्थाने चैत्रही धरेवर अवतरतो. यावेळी फाल्गुन आणि चैत्र अगदी हातात हात घालून सज्ज असतात कारण ऋतूराजाच्या आगमनाची जय्यत तयारी त्यांना करायची असते. कळ्याफुलांना, तरुवेलींना, नभातील चंद्र तारकांना,अगदी वातलहरींना ही हा सांगावा द्यायचा असतो. आंब्याच्या मोहोराचा, कडुलिंबाच्या फुलोऱ्याचा मस्त गंध वातावरणात दरवळत असतो. पक्षीही पंख फडफडत आनंदाने गगनात उंच भऱ्याऱ्या घेतात आणि त्याबरोबरच नरपक्षी माद्यांना आमंत्रित करण्यात मशगुल असतात. फाल्गुनाचा चैत्रविलास असा रंगलेला असतो.
हळूहळू फाल्गुनाची निरोपाची घडी जवळ आलेली असते. पण आपला उत्साह, आपले चिरतारुण्य तो हसतमुखाने आपल्या चैत्रसख्याकडे सुपूर्द करतो. ह्या निरोपावेळी करुण वातावरणात सुध्दा फाल्गुनाचे निर्मळ हास्य मिसळते आणि चैत्रही आनंदी बनतो. दोघांच्या गळामिठीची साक्षीदार ही सारी सृष्टी असते. आता फाल्गुन तर निरोप घेतो पण चैत्र मास मन घट्ट करून निसर्गाशी एकरूप होऊन जातो. या मधुमासाचा गोडवा किती वर्णावा! चैत्रमास हा ‘वसंताचा आत्मा’च. त्यामुळे या महिन्यात कोकिळ मदमस्त ताना घेतो. आम्रतरुवर आता मोहोरातून बाळकैऱ्या डोकावू लागतात. सोनचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा फुलतात. त्यांच्या सुगंधात जाई, जुई, मोगरा, मदनबाण यांचे गंध मिसळून साऱ्या परिसरात गंधमळे फुलल्याची जाणीव वातलहरी करून देतात. कमलिनीच्या मिठीत भ्रमर मत्त होतात. पळसाबरोबर पांगारा, सावरी, फुलतात. वनराई पुष्पवैभव दिमाखात मिरवत असते. चैत्रपालवी नी फुले यांची रानभूल पडते. पक्षी मीलनोत्सुक असतात. कुठे घरटीही दिसू लागतात व लांबट, वाटोळी, चपटी … साऱ्या निसर्गात वासंतिक सोहळा रंगलला पाहून चैत्र खुलतो, गाली हसतो…
☆ लाइटर – कथा – भाग 2 – लेखक – श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆
( मागील भागात आपण बघितले – लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला ” हे काय केले तुम्ही , हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दुष्ट आत्मा कैद होता . आता आपले काही खरे नाही . चला पळा इथून ” आता इथून पुढे )
भीमराव आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला . त्या रात्री भीमराव आपल्या भावाच्या भीतीने घरी गेलाच नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी भीमराव घरी गेला घराचा दरवाजा उघडाच होता . तो आत गेला तर त्याचा भाऊ जमिनीवर मृत पडलेला होता . तो मोठ्याने रडू लागला पण आता रडून काय फायदा त्याच्या चुकीमुळे त्याने आपल्या भावाला गमावला होता . भावाच्या मृत्यूने त्याच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला . त्याने ठरवले या पुढे दारू आणि सिगरेटला हात सुद्धा लावायचा नाही .
त्याने आपले सगळे लक्ष तांत्रिक विद्येकडे केंद्रीत केले . खूप दिवस कठोर परिश्रम केल्यावर आता तो सुद्धा आत्म्यांना कैद करण्याच्या विद्येत निपूण झाला . पण त्याच्या समोर आता खूप मोठे संकट उभे होते . गावातील लोकांना शामरावाचा आत्मा दिसत होता . लोकांकडे त्याचा आत्मा सिगरेट आणि लाइटर मागत होता .
भीमरावाने खूप प्रयत्नाने शामरावाच्या आत्म्याला एका लाइटर मधे कैद केले . दुसऱ्या दिवशी तो शामरावाच्या आत्म्याला मुक्त करणार होता . पण तो लाइटर कुठे तरी हरवला . कदाचीत तो लाइटर कोणीतरी तुमच्या गावात आणला आहे आणि त्या लाइटर मधे असलेल्या शामरावाच्या आत्म्याला नकळत बाहेर काढले आहे . जोपर्यंत त्याचा आत्मा त्या लाइटर मधे कैद होत नाही तो पर्यंत तो या गावात भटकत राहणार .शामरावाला फक्त त्याचा भाऊच कैद करू शकतो पण त्यासाठी अगोदर तो लाइटर शोधावा लागणार . “
“लाइटर तर आम्ही शोधू शकतो पण भीमराव कुठे मिळणार आम्हाला ? ” लोकांनी त्या तांत्रिकाला प्रश्न केला .
” तुम्ही फक्त लाइटर शोधा भीमराव इथेच आहे ” .
तांत्रीकचे बोलणे ऐकून लोक सर्वत्र बघत म्हणाले ” इथे ? पण इथे तर कोणीच दिसत नाही . कुठे आहे भीमराव ? “
” तुमच्या समोर . होय मीच आहे भीमराव . त्या दिवशी मी त्या लाइटरच्या शोधात सरपंचाच्या घरात गेलो होतो . त्या दिवशी जर तुम्ही माझे ऐकले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती . त्याच दिवशी मी त्याला कैद केला असता . अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर तो लाइटर शोधा नाहीतर अनर्थ होईल.”
लाइटर शोधण्यासाठी लोकांना जास्त त्रास झाला नाही ,लाइटर सरपंचाच्या घरीच सापडला . लाइटर हातात घेऊन तांत्रीक मंत्र म्हणत गावभर फिरत होता . त्याच्या पाठोपाठ गावातील लोक चालत होते . तांत्रीक पिंपळाच्या झाडाखाली थांबला . त्याला तिथे शामरावाची आत्मा असल्याचा आभास झाला असावा . तो झाडाकडे बघत जोर जोरात मंत्र म्हणू लागला . जसा जसा मंत्राचा वेग वाढत होता तसतसा लाइटर पकडलेला तांत्रिकाचा हात थरथर कापत होता . ५ – १० मिनीटे न थांबता तो जोरात मंत्र म्हणत होता . मंत्र म्हणता म्हणता अचानक तो शांत झाला आणि लाइटर आपल्या पिशवीत ठेवतं म्हणला ” आता घाबरण्याची गरज नाही शामरावाचा आत्मा लाइटरमधे बंद झालेला आहे . ” इतका वेळ शांत असलेला सरपंच त्याला म्हणाला ” नीट ठेवा तो लाइटर परत बाहेर नाही आला पाहिजे तो आत्मा “
तांत्रीक म्हणाला ” तुम्ही काहीच काळजी करू नका सरपंच साहेब तो आत्मा आता कधीच बाहेर नाही येणार ” .
” मग तो कोण आहे ? ” सरपंचाने समोर बोटाने इशारा केला .
समोर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . लोक त्याला बघून घाबरले . यावेळी तांत्रीकाला सुद्धा घाम फुटला होता .
” किती भयानक आणि मायावी आहे शामरावाचा आत्मा. तो बघा आपल्या मागे पण आहे त्याचा आत्मा ” सरपंच मागे बघत म्हणाला .
लोकांनी मागे वळून पाहिले तर तिथे पण शामराव होता . आता तर लोक खूपच घाबरले होते त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता . लोकांपेक्षा जास्त तांत्रिक घाबरला होता .
लोकांना घाबरलेले पाहुन सरपंच म्हणाला ” घाबरण्याची गरज नाही . इथे आत्मा वगैरे काही नाही . हे दोघे जुळे भाऊ आहे शामराव आणि भीमराव . “
” मग हा कोण आहे ? ” लोकांनी तांत्रीकाकडे बोट करत विचारले .
सरपंच म्हणाले, ” हा एक हिर्यांचा स्मग्लर आहे . परदेशातून ह्याचे साथीदार लाइटर मध्ये हिरे लपवून इथे पाठवतात . एका रात्री पोलिस याच्या मागे लागले होते म्हणून याने लाइटर खिडकीतून माझ्या घरात फेकून दिला होता . तोच लाइटर घेण्यासाठी हा दुसऱ्या दिवशी तांत्रीकाचा वेष घेऊन माझ्या घरात घुसला होता . पण त्यावेळी तुम्ही याला ढोंगी म्हणून गावातून हाकलून लावला . त्याच दिवशी मला तो लाइटर खिडकी जवळ सापडला . तो इतर लाइटर पेक्षा वेगळा होता आणि पेटत पण नव्हता म्हणून मी तो उघडला त्यात मला हिरे सापडले . मी लगेच पोलिसांना फोन केला . पोलिसांनी मला रात्री घडलेल्या घटने बद्यल सांगितले . आणि विचारले “त्या दिवशी कोणी अनोळखी माणूस गावात आला होता का ? ” मी त्यांना सांगितले ” एक तांत्रीक माझ्या घरात आला होता पण लोकांनी त्याला ढोंगी समजून हाकलून लावला . ” पोलिसांना माझे बोलणे ऐकून खात्री पटली की तो स्मग्लरच तांत्रीक बनून माझ्या घरी आला होता . पोलिसांना माहित होते तो लाइटरमधे असलेले हिरे घेण्यासाठी परत नक्की येणार या गावात . मग पोलिसांनी आपले काही गुप्तचर या गावात पाठवले . त्यांनीच या जुळ्या भावांचा पडदा उघड केला . मग काय पोलिसांच्या भितीने या दोघांनी तांत्रिकाची सगळी हकीकत सांगितली. तांत्रीकाने खुप चांगला प्लान केला होता ते हिरे परत मिळवण्यासाठी पण त्याला त्याच्या नशीबाने साथ दिली नाही आणि शेवटी तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला .. ‘’ सरपंच बोलायचे थांबले. एव्हाना पोलिसांनी त्या तिघांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या.
– समाप्त –
लेखक – श्री देवा गावकर
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
मो. ९३७१८९८७५९
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मी तिला सांगितलं,तुझ्याबद्दल लिहायचं आहे. तर अंगभूत स्थितप्रज्ञतेने म्हणाली ……
“ इतकं कौतुक आवश्यक आहे का? आणि जर करायचंच असेल तर माझ्या कामात मी एकटी नाही. माझ्यासोबत माझा नवरा,शेखर आहे आणि या कामात आम्हा उभयतांचे विचार आणि कृती आहेत.”
तर….तिची आणि त्याची गोष्ट ऐका………
ती किलबिलीने उठते… तिनेच जपून वाढवलेला, मोठ्या केलेल्या झाडांवरचे पक्षी तिला उठवतात
कमीतकमी पाणी वापरून ती आन्हिक उरकते .. संततधारी नळ चालू न ठेवता. ती नेमक्या वेळी नेमकेच पाणी वापरते.
आंघोळीच्या वेळी ती साबण लावत नाही. वर्षानुवर्ष ती पाण्याचे रासायनिक प्रदूषण टाळून फक्त हळद-चणापीठ-तांदूळपीठ-मीठ वापरते आहे.
भांडी घासायचे,कपडे धुवायचे साबणही ती रसायनविरहित वापरते.
ती तशीच आहे…. अस्सल आणि निर्विष. तिच्या घरातून बाहेर जाणारे सांडपाणीसुद्धा तसेच आहे ….
अस्सल आणि निर्विष. तिचे सांडपाणी मुठेला अशुद्ध करत नाही.
ती प्लास्टिक वापरत नाही आणि जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर आवर्जून करते.
तिच्या घरच्या ओल्या कचऱ्याचं काळ सोनं होतं…. काही काळाने त्या काळ्याचं-हिरवं होतं.
म्हणून तर तिच्या गच्चीत आणि परसात जादुई-हिरवी उधळण आहे, आणि हिरव्याने परिधान केलेली लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, केशरी रंगबरसात आहे.
तिथेच फुलपाखरांच्या जन्मकहाण्या लिहिल्या जातात. मधमाश्या,भुंगे,चतुर आणि असंख्य पक्षी प्रणयाराधन करतात .. आणि तिच्या ऋणमुक्तीसाठी सकाळी गीत गातात. तिच्या गच्चीत मधमाश्यांच्या पेट्या तर असतातच, पण क्वचित बागेत सापही सापडतात. आलाच एखादा आगंतुक साप घरात, तर ती अविचल राहून situation handle करते …. झुरळ पाहून किंचाळणाऱ्या मला ती क्षणोक्षणी प्रभावित करते.
कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तिच्या घरात उन्हाळ्यातही पंखा लागत नाही. प्रशस्त खिडक्या आणि भोवतालची झाडं हीच तिची वातानुकूलित यंत्रणा असते.
स्त्री-मुक्तीच्या दांभिक कल्पनांना, ही मुक्ताई फाटा देते. उन्हाळ्यात ती पारंपारिक वाळवणं घालते
आणि घरच्या गच्चीतून मिळालेल्या हळदीचं लोणचंही घालते. लोणच्यापासून ते थेट जिलबीपर्यंत सगळं घरी करते. जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवते….. बागेतल्या वाळलेल्या फूलपाकळ्यांनी रांगोळीचे रंग बनवते.
गणपती उत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळासुद्धा घेते…..
… आणि हे सारे काही करताना ती स्थितप्रज्ञ असते. आपण काही विशेष करतोय असा तिचा अभिनिवेश नसतो. तिचे श्वास, तिचे उच्छ्वास, तिचे शब्द, तिचं वावरणं… हे सगळं एखाद्या सुखदुःखापल्याड पोचलेल्या अभोगी योगिनीसारखे असते. ज्या निसर्गाच्या घरी आपण साठ-सत्तर वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलोय त्याला आपण माघारी जाताना काय काय देऊन जायचे ह्याचा तिचा सशक्त-विचार तयार आहे.
… म्हणून तर निवृत्तीपूर्वीच निवृत्त होऊन तिने च..क्क….चाळीस एकरांचं एक जंगल विकत घेतलं आहे..
जं..ग..ल….
त्या जंगलाला तिने प्राणपणाने जपलंय, वाढवलंय. तिथे आंबा-काजू अशी कोकण-स्पेशल लागवड नाही.
तिथे तिने निसर्गाला हवं-तसं,हवं-तेवढं वाढू दिलंय. छोट्या-मध्यम-महाकाय वेली, छोटी-मोठी झुडुपे,
छोटे-मध्यम-महाकाय वृक्ष ……
सूक्ष्मकिड्यापासून ते फुलपाखरापर्यंत आणि साळिंदरापासून ते गव्यापर्यंतचे सगळे प्राणी त्या जंगलाला आपलं-घर मानतात….. तो हिरवा-जंगल-सुगंध मी घेतलाय. तिथली ती शाश्वत शांतता.. तिथे साधलेला स्व-संवाद.. सृष्टीची खोल गाभ्यापर्यंत पोचलेली हाक मी ऐकली आहे.
तिने निसर्गाला घातलेल्या सादेला त्याने भरभरून दिलेलं हिरवगच्च प्रतीउत्तर मी त्या जंगलात पाहिलं आहे.
हे सगळं कल्पनेपलीकडचं आहे असं म्हणत आपण आपलंच खुजेपण कुरवाळत राहायचं का? ह्यातलं थोडतरी आपण करू शकतो का???
… शहरात राहणारी, उच्चविद्याविभूषित असलेली, कॉर्पोरेट महिला, एका जीवावर बेतलेल्या अपघातानंतर पुन्हा उभी राहून हे सगळ करत असेल तर आपण ‘आम्हाला नाही बुवा असलं काही जमणार’ हा मंत्र जपणार का? …. आपण तिच्यासारखा शाश्वत-वसा घेऊ शकतो का?? …. घ्यायची इच्छा तरी आहे का?? …. एखादी तरी कृती त्यादिशेने होईल का?….
… तिने चाळीस एकर जंगल जपलंय !!! मी दहा स्क्वेअरफुटात काही हिरवं लावेन का??
… मी प्लास्टिक वापरण सोडीन का??
… जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर करीन का??
…. पाणी कमीत कमी वापरून बघेन का???
… आठवड्यात दोन दिवस बिनासाबणाची आंघोळ नाक न मुरडता करेन का???
… मी निसर्गाचे देणे मानेन का???
… त्याची ऋणजाण पावलोपावली ठेवेन का???
… प्रश्नांची घुसळण मनात येते आणि… ते प्रश्न-काहूर माझ्या मनात आठ मार्च जवळ आला की जास्तच उधळतं. कारण तेव्हा मी शोधत असते…. ऑफिसच्या महिला-दिनाची पाहुणी. पण ते कुठेही शोधायची गरज नसतेच.
… कारण…ती जी कुणी आहे ना…. ती कायमच असते…….. माझ्या मनातल्या महिला-दिनाची पाहुणी..
जिचं नाव असतं …….. शिवांगी चंद्रशेखर दातार!!!!!!
लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे
प्रस्तुती : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ५ ते ८ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ५ – ८
ऋषी – मेधातिथि कण्व : देवता सवितृ
आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी सवितृ देवतेला उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील बाविसाव्या सूक्तातील पाच ते आठ या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
परदेशी नोकरी करणाऱ्या माझ्या मुलाचा व्हॅाट्सॲप मेसेज :
‘प्रिय बाबा,
आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी ह्या हॅाटेलात मी आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे, तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला ॲाफिसमध्ये अचानक काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…
बाबा, दरवर्षी आम्हाला ह्या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?
तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सूचित करीत होती, जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते?
तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक की आईवरील तुमचं ‘प्रेम’, हे मला कधीच कळलं नाही…
बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेला तृप्तीचा ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?
काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?
बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. ॲाफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.
आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे, मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होता… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…
बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?
तुमचाच,
अजय
मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या हिची वाट पाहत बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही ‘डे’ साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही…
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… साठच्या दशकातील मुंबईचा हा ट्राम चा फोटो मला फेसबुकवर दिसला… मन भुतकाळात गेले… कितीतरी बालपणीच्या आठवणी त्या ट्रामशी निगडीत होत्या त्या एकेक मनचक्षूसमोर उभ्या राहत गेल्या…. मला आठवतंय ते किंग्ज सर्कल, आताचा माहेश्वरी उद्यान,ते काळा घोडा, आताचं जहांगीर आर्ट गॅलरीचा परिसर इतका तिचा प्रवासाचा पल्ला असे… हमरस्ताच्या मधोमध लोखंडी पट्ट्याच्या , रेल्वे लाईन सारख्या खाचा पडलेल्या मार्गिका होती. त्यात आठ चाकांची ट्राम खडखड करत येजा करत असे… ट्राम टर्मिनस (T.T.) म्हणून परेल टी. टी., दादर टी. टी. राणीबाग. टी. टी. सायन टी. टी. आणी फ्लोरा फाउंटन टी. टी. अशी मुख्य ठिकाणी ट्रामचा मोठा पसारा असे…ट्राम स्टेशनस होते… अधे मधे प्रत्येक नाका, चौकात, थिएटर जवळ, मार्केट जवळ स्टेशन असत…माळा असलेली, आणि नसलेली स्वरुपात ह्या ट्राम फिरत असत… दोन्ही टोकाकडे उतर दक्षिण चालक उभ्यानेच दोन्ही हातांने हॅंडल फिरवित असे.. बहुधा एक लिवरचा आणि दुसरा ब्रेकचा अशी ती हॅंडलची रचना असावी… शिवाय पायात एक नाॅब असे.. हॅन्ड गियर काम करत असे… चालक एकच आणि वाहक दोन असत… आताची लोकल आणि ट्राम जवळपास सारखी फक्त ट्राम ला डबे नव्हते… अगदी संथगतीने ट्राम धावत असे… चालत्या ट्राम मधून बऱ्याच वेळेला हवे तिथे धीराचे लोक चढ उतरतं करत असतं…मोठमोठाल्या खिडक्या, दारं, संपूर्ण लाकडाच्या बनावटीची अशी हि ट्राम एका लय पकडून धावत असे.. पाच पैसे तिकीट असताना मी प्रवास त्यातून केलेला मला चांगलाच आठवतो…रविवार सुट्टीच्या दिवशी तर दोन तास फेरफटका त्यातून केल्या शिवाय दिवस मावळत नसे.. खूप गंमतीशीर अनुभव येत असे.. हळूहळू मुंबईची वस्ती वाढू लागली आणि वाहतूकही वाढली.. रस्तावर गर्दी वाढत गेली.. रस्ते दुतर्फा वाढविण्यासाठी ट्रामची जागा बळकावली गेली आणि आणि सन 1966/67च्या आसपास ट्रामची घरघर बंद झाली…
आजही जुन्या हिंदी सिनेमात मुंबई दर्शन दिसताना ती धावणारी ट्रामची छबी पाहिली कि आठवणींची जिंगल बेल मनात कुठेतरी वाजत असते…
जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता
(15 मार्च – स्व रमेश बतरा जी की पुण्यतिथि पर विशेष)
☆ संस्मरण ☆ रमेश बतरा : तुम्हारा एक पुराना खत मिला है… ☆ श्री कमलेश भारतीय ☆
बीते बरस पर बरस पर याद और साथ बरकरार है । तुम्हारा एक पुराना खत मिला है संडे मेल के दिनों का लो पढ़ लो, तुम भी । जहां भी हो… -कमलेश भारतीय)
@दिलशाद गार्डन से
@प्रिय कमलेश !
-तुम्हारा संग्रह ‘इस बार’ यथा समय प्राप्त हो गया था , लेकिन इधर लगातार अस्वस्थ रहने के कारण तुरंत पावती नहीं दे पाया । वैसे अभी भी छुट्टी पर हूं और डाॅक्टर की इजाजत मिली तो अगले सप्ताह से दफ्तर जाऊंगा ।
पता चला इस बीच तुम दिल्ली आये और मिले नहीं । इसकी शिकायत रहेगी ।
खैर ! ‘इस बार’ के लिये हार्दिक बधाई । इसे तुमने मेरे ही नाम करके एक तरह से मेरा मुंह ही बंद कर दिया है , वहीं यह तुम्हारा अपनापन है , अन्यथा मैंने तुम्हारे लिये ऐसा कुछ नहीं किया ! मुझे जो फर्ज लगा वही किया । यह वस्तुत: तुम्हारा अपना श्रम है और लगन जो ‘प्रयास’ से शुरू हुई , वही रंग ले रही है !
डाॅ महाराज कृष्ण जैन ने पुस्तक के बारे में बड़ी सूक्ष्मता और विद्वतापूर्ण तरीके से लिखा है । यह अच्छी तकनीक है(इस संदर्भ में ) का उदाहरण भी है । मैं यही कहूंगा कि अभी तुम्हें विकास करना है और ऐसा संग्रह देना है जो लघुकथा के आदर्श के रूप में देखा जा सके , क्योंकि इस संग्रह में भी ऐसी कथाएं हैं जो गैरजरूरी हैं -जरूरत के हिसाब से भी और प्रस्तुति के हिसाब से भी और प्रस्तुति तथा घटना की घटनात्मकता और तथ्य के यथार्थ की गहराई का कई बार यह गहराई या तो जलदबाज अंत के कारण उथला जाती है और कभी सटीक शब्दों के अभाव में तो कभी प्रतिक्रिया पाकर ! मुझे खुशी यह है कि ऐसा बहुत कम और पिछली बार से तो बहुत ही कम हुआ है !
मेरी तरफ से पुनः बधाई और शुभकामनाएं ! अवस्थी (जीतेंद्र अवस्थी ) और विजय ( संपादक विजय सहगल) को मेरा अभिवादन दें । सपरिवार स्वस्थ व आनंद होंगे । चंडीगढ़ में रम रहे होंगे तुम !
खुश ने घर बदल लिया है-1427/ 34 सी ,,,कभी कभी उसके पास चक्कर लगा लिया करो ! प्रचंड का पता मालूम हुआ ? उसके बारे में सूचना दो । सेक्टर सत्रह वाले पते से तो कोई जवाब नहीं आया ।
-तुम्हारा
रमेश बतरा ।
#रमेश बतरा अब कौन ऐसे बेबाक मेरी रचनाओं पर बात करेगा ? कितने मित्रों को याद कर लिया करते थे एकसाथ । इस पर कोई तारीख तो नहीं लेकिन यह सन् 1992 का है । ‘इस बार’ लघुकथा संग्रह इसी वर्ष आया था शुभतारिका प्रकाशन, अम्बाला छावनी से । डाॅ महाराज कृष्ण जैन से पहली बार रमेश बतरा ही मुझे मिलवाने ले गये थे । मैं भी उन दिनों दैनिक ट्रिब्यून में उपसंपादक होकर चंडीगढ़ आ चुका था । कथा कहानी साप्ताहिक पृष्ठ का संपादन मिला था मुझे जो सात वर्ष किया ।
#रमेश ! मैं आज भी खुश के घर चक्कर लगाने जाता हूं तुम कब आओगे ?
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “सवाल पर बवाल…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 140 ☆
☆ सवाल पर बवाल… ☆
डूबती नैया पर सवारी करने का फल यही होता है कि आपको अपने विचारों को अभिव्यक्त करने के लिए कोई सही तर्क ही नहीं मिलता और आप कुतर्कों के सहारे जुबानी जंग जीतने की कोशिश करने लग जाते हैं। किंतु आजकल तो हर बात रिकॉर्डेड होती जा रही, जरा सी चूक होने पर आपका अगला- पिछला सब कारनामा सामने हाजिर हो जाता है। अब तो अपनी बात पर अड़िग रहें या शब्दों की वापसी की घोषणा करते हुए कह दें कि मेरा ये मतलब नहीं था, मीडिया ने तोड़-मरोड़ कर मेरी बात को प्रस्तुत किया है।
इन्हीं चर्चाओं के बीच बहुत से प्रश्न और खड़े हो जाते हैं जिनका स्पष्टीकरण किसी के पास नहीं होता क्योंकि यहाँ भी अक्ष पर घूमने का सिद्धांत कार्य कर रहा होता है जो आज यहाँ है वो कल कहाँ होगा ये वो भी नहीं जानता है बस चलते रहो का अनुसरण करते हुए स्वयं को लाभान्वित करना मुख्य लक्ष्य होता है।
कहते हैं जो कार्य करेगा उस पर सवाल होगा, सो सवालों से न बचते हुए उसे हल करने की ओर चलें। वैसे भी आप किसी भी विचारधारा के हों आपको अनुयायी मिल ही जाते हैं। किसी भी मुद्दे को पकड़ कर उस पर पाँच साल तो क्या पूरा जीवन गुजारा जा सकता है, बस उसके इर्द- गिर्द मायाजाल रचते रहिए, समस्याओं को हल करने की ओर यदि आप लगे तो निश्चित है कि कुचक्र का शिकार होंगे अतः ऐसा कार्य करें जो आपको व्यस्त तो रखे साथ ही रोज नए सवालों को भी पैदा करता रहे, जब सवाल होंगे तो वबाल होगा और दिन – रात की तरह आजीवन मनुष्य गतिशील रहकर विचारों का मंथन करते हुए अपने को उपयोगी बनाए रखेगा।