मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #151 ☆ नरहरी दास…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 151 ☆ नरहरी दास…! ☆ श्री सुजित कदम

विश्व कर्मा ब्राह्मणात

जन्मा आले नरहरी

वंश परंपरा थोर

श्रद्धा भक्ती परोपरी..! १

 

कर्ते मुरारी अच्युत    

आणि कृष्णदास हरी

पणजोबा आजोबांची

कृपादृष्टी सर्वांवरी…..! २

 

सोनाराच्या व्ववसायी

पारंगत नरहरी

मुळ नाव महामुनी

शैव उपासना करी….! ३

 

संत नरहरी यांसी

जाहलासे साक्षात्कार

शिव विठ्ठल एकच

ईशकृपा चमत्कार….! ४

 

पांडुरंग परमात्मा

तोच शिव भगवान

नरहरी सोनारांस

प्राप्त झाले दिव्य ज्ञान. ५

 

शैव वैष्णवांचा  त्यांनी

दूर केला विसंवाद

अध्यात्मिक अभंगाने

नित्य साधला संवाद .. !  ६

 

शतकात  चौदाव्या त्या

शिवभक्ती आचरीली

संसारीक कार्य सिद्धी

सदाचारे स्विकारीली…! ७

 

उदावंत कुलातील 

शिवभक्त चराचरी

संकीर्तनी असे दंग

अहोरात्र नरहरी…! ८

 

असे कुशल सोनार        

 निर्मीतसे अलंकार

हरी आणि हर दोघे

परब्रम्ह अवतार….! ९

 

शिव पिंडीमध्ये पाही

विठ्ठलाचे निजरुप

वैष्णवांचा दास सांगे

हरीहर एकरुप…! १०

 

एका सोनसाखळीने

घडविला चमत्कार

पाही रूप नरहरी

शिव पांडुरंगा कार…! ११

 

समरसतेचा पंथ

नाही मनी कामक्रोध

केला प्रचार प्रसार

भक्ती मार्ग नितीबोध…! १२

 

केली प्रपंचात भक्ती

अक्षरांत विठू माया

अभंगात गुंफीयली

दैवी हरीहर छाया…! १३

 

ज्ञानयोगी कर्मयोगी

नऊ दशके प्रवास

सुवर्णाचे अलंकार

अनुभवी शब्द खास…! १४

 

माघ कृष्ण तृतीयेला

पुण्यतिथी महोत्सव

हरिऐक्य दिन जगी

सौख्य शांतीचा उत्सव…! १५

 

पंढरीत महाद्वारी

समाधिस्थ नरहरी

नोंद भक्ती भावनांची

अभंगात दिगंतरी…! १६

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

?  विविधा ?

☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

(आजची स्त्री कशी असावी ? याबद्दल सावरकरांच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थान पोस्टला लिहिलेला लेख !)

….विनायकाची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली, आईनंतर आईच्याच मायेने येसूवाहिनीने त्यांच्यावर प्रेम केलं, सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढलं, आणि देशासाठी लढलं सुद्धा ! विनायकराव परदेशात असतांना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन्ही स्त्रिया उघड्यावर पडल्या…अशा अवस्थेत आपल्या परमप्रिय वहिनीला लिहिलेल्या पत्रात विनायकराव म्हणतात,

तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती

रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच

“सांत्वन” नावाचं हे सावरकरी काव्य ! इतकी उलथापालथ घडूनही, आभालाहून मोठं संकट येऊनही आपली वहिनी, आपली बायको, खंबीरपणे सगळ्यावर मात करेल हा त्या स्त्रीवर दाखवलेला विश्वास, विनायकरावांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असला तर स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: जबाबदारीने संकटाशी सामना करावा असेच तात्या सुचवतात, होय ना !

विनायक जिथे वाढला तो भाग आणि तो काळ एका संकुचित, रूढीग्रस्त मानसिकतेत जगणारा. रांधण्यात आणि वाढण्यात जन्म घालवावा बायकांनी, बाकी रमूच नये कशात अशीच तेंव्हाची रीत. पण चूल आणि मुल वाट्याला येण्याआधीच ज्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण दुर्दैवाने ओढून नेले अशांचे अभाग्यांचे काय ? अशांच्या भाळी लिहिल्या होत्या अबोल यातना फक्त ! या निष्पाप स्त्रियांच्या वेदनांना शब्दरूप दिलय विनायकाने. बालविधवांचे दु;खस्थिती कथन हे विनयकाचे काव्य अशा अनेक मूक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. “ही विवाहव्यवस्था आहे ही वैधव्यव्यवस्था” असा करडा सवाल विनायकराव करतात तो उगाच नाही, स्त्रीने सती जाणे हे धर्माला मान्य नाहीच शिवाय ते माणुसकीलाही लाज आणणारे आहे असं विनायकराव सप्रमाण पटवून देतात हे विशेष !

गुलामगिरी मान्यच नव्हती तात्यांना ! माझी भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये, तिची गुलामगिरी संपावी तशीच आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी, मुक्तपणे तिने करावा संचार या मताचे होते तात्या ! “राज्याची सूत्र हातीघे तो तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जीच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे !’’ असं म्हणत सहजीवनाचा केवढा आदर्श सांगितलाय तात्यांनी !

“स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नितीमत्ता पक्षपाती नि टाकाऊ आहे” हे तात्यांचे वाक्य वाचले की वाटते हा माणूस वैचारिक दृष्ट्‍या सगळ्या समकालीन नेत्यांच्या किती पुढे गेला असेल, किती प्रगल्भ असेल.

हा माणूस सौंदर्याचा उपासक होता. जे जे उत्तम उदात्त उन्नत्त महन्मधुर त्याचा ध्यास घेतलेला होता. जीवनात कुठल्याही बाबतीत कुरूपता याला नकोच होती. आपल्या दूरस्थ वहिनी आणि पत्नीला “नवकुसुमयुता” असं लोभसपणाने म्हणणारे विनायकराव समस्त स्त्रीवर्गाला  सांगतात…“…लावण्यवती कुमारीनो, जननिंनो, तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीला, तुमच्या सौंदर्याला आपल्या पूर्वपुण्याईचं वरदान माना आणि ते सौंदर्य जपा ! हल्लीच्या आधुनिक काळात, सौंदर्य प्रसाधने वापरा, खुलून दिसा !” …विनायकराव हा विचार अशा काळात सांगत होते जिथे त्यांचे हे शब्द ऐकून बायका गालातल्या गालात, खुदकन् हसून लाजेने चूर होण्याचीच शक्यताच जास्त होती, पण आजच्या बायका तात्यांचा हा सल्ला खुबीने राखताहेत खऱ्या…!

एके ठिकाणी मॅझिनीच्या विचाराचा संदर्भ देतांना विनायकराव म्हणालेत, “पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाहीत.” हा विचार देऊन आताशा पन्नास वर्ष उलटूनही गेली असावीत. तात्यांच्या कल्पनेतली शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होतांना फार वर्ष लागलेले नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरलेत. आज घराघरात, आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई मोठ्या अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, वादळ पेलते आहे, आणि लढते आहे.

तिच्या प्रत्येक भरारीसोबत एक नवं आव्हान तिच्यासमोर उभ आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अश्या कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुधा नाहीत. या मुक्या वेदना समोर येतील तेंव्हा काय होईल ? कोणते नवे प्रश्न उभे रहातील ? यापैकी अगदी सगळ्याच नाही पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या “सावरकरी” विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे !

© श्री पार्थ बावसकर

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

एकदा घरात समजलं की माझे काही प्रेम बिम नाहीये.सो हिला मुलगा बघायला हरकत नाही.तेव्हा माझे नाव दोन तीन वधुवर सूचक मंडळात घातले.आईचे फोन चालू झाले तिथे ,पत्रिका शिक्षण घरची माहिती वगैरे वगैरे.त्यात एक स्थळ बरे वाटले म्हणून मग मुलाच्या घरी फोन लावला.मुलाचे वडील प्रसिद्ध नाट्य अभिनेता असल्याने त्यांचे  प्रयोग बाहेरगावी असत. सो ते असतील तेव्हा शक्यतो मुलीला बघणे कार्यक्रम करू असा तिकडून निरोप आला.

अत्यंत बोअर अशी सकाळी ८,३० ची आणि रविवारची वेळ घेतली.मी साडी नेसणार नाही या विषयावर वाद झाल्याने आई आधीच चिडली होती आणि बाबांना सांगितलं होतं की तुम्ही उगीच फार बडबड करू नका.ते खूप बोलतात कारण.आणि मुलगा आवडला तर मी रुमालाची घडी घालीन आणि नाही आवडला तर रुमाल चुर्गळून टाकीन मग तुम्ही समजाल की किती वेळ बसायचं तिथे ते.

हे सगळं ठरवून आम्ही तिघे मुलाच्या घरी पोचलो .मुलाला बघून माझी विकेट गेली होती.त्याची आई खूप प्रश्न विचारत होती आणि त्या गोंधळात माझा रुमाल कुठेतरी पडला.

आता बाबांची मात्र झाली पंचाईत त्यांना कळेना की मुलगा आवडला का नाही.मुलगा इतका शांत होता आणि मी पहिल्यांदा च भेटल्याने मी नेहमी सारखी बोलत नव्हते.मुलींनी फार बोलायचं नसतं  . शास्त्र अस्ताय ते ……  बऱ्याच साधेपणानं कार्यक्रम झाला.निघताना आम्ही काय ते कळवू असे कोणीच कोणाला म्हटले नाही.

तिथून येताना या मुलाच्या घराजवळ आमचे एक जोशी नावाचे काका ओळखीचे होते.एक म्हणजे चौकशी पण होईल आणि उद्या मुलीशी बोलून तुला सांगतो असे ठरवून त्यांच्याकडे निरोप देऊन आम्ही घरी आलो.

घरी आधी रुमालाने दगा दिला आणि म्हणून मला काहीच कळू शकले नाही म्हणून बाबा चिडले होते.आणि मुला ने काहीच प्रश्न विचारले नाहीत म्हणजे नकार असणार हे आईनी पक्कं केलं होतं. पण मला मुलगा मनापासून आवडला होता. बाबांनी त्या जोशी काका ना आमचा होकार सांगितला फोन करून.नेमके त्याच दिवशी त्यांचे वडील आजारी झाले आणि त्यामुळे जोशी त्या मुलाकडे आमचा होकार न कळवताच गावाला गेले.

मुलाकडे आम्ही काहीच निरोप न दिल्याने मुलीकडून नकार असेल असे ते समजून गेले.मध्ये ३ दिवस गेले . कोणाचा च कोणाला काही निरोप नसल्याने हा विषय थांबला.

माझा मात्र संयम सुटत चालला होता. मी ठरवले की किमान नकार तर येऊ देत म्हणून मी मुलाच्या घरी फोन केला.मुलाच्या आईने फोन घेतला.मी वेगळं नाव ,मुलीचे नाव शिक्षण सांगितले.कधी येऊ आम्ही मुलीला घेऊन असे विचारले.तर तुम्ही २ दिवसांनी या.असे त्या बोलल्या.म्हणजे आम्हाला नकार होता हे ओघाने आलेच पण प्रयत्न सोडला नाही दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी फोन केला .मुलीचे नाव मधुरा आहे. लेले आडनाव आहे. आम्हाला पत्रिका बघायची आहे.तर ऊद्या येऊ का.आणि आम्ही बाहेर गावचे आहोत.सो नकार असेल तरी लगेच सांगा.म्हणजे आम्ही इथली पुढची मुलं बघू.तरी मुलाची आई ही हो हो करत होती.आपण परवा भेटू असे सांगून मुलाच्या आईने फोन ठेवला.आता मात्र मला रडू यायला लागले.

शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून मी रात्री ८ ला फोन केला.अपेक्षा अशी होती की ,,तो,, फोन घेईल.तर पुन्हा आईसाहेब च फोन वर.मग मी उगीच तुमच्या इथले जोशी आहेत ना त्यांचे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. मुलगी पुण्यात असते आणि आम्ही दोघे नगरला असतो.आणि काहीतरी नाव ठोकून दिलं. पण परिणाम चांगला झाला ,लगेच त्याच दिवशी मुलाच्या आईसाहेब तिथल्या जोशी काकांच्याकडे गेल्या आणि ८ वाजता जो फोन केला त्यांची तुम्हाला काय माहिती आहे.आणि ते तुमच्या कशा ओळखीचे हे विचारू लागल्या तेव्हा ते म्हणाले, की मी नाही ओळखत कोण सांगताय त्यांना.त्या आधी जे अमुक तमुक होते, ते माझ्या परिचयाचे आहेत. मग माझ्या बाबांचे नाव सांगितले,तेव्हा ते म्हणाले की  दुसऱ्या  दिवशीच ते होकार सांगून गेले होते पण मी नेमका गावाला गेलो आणि निरोप देणे राहिले.

आता सगळी चक्र फिरली मग मुलाच्या वडलांचा आमच्या घरी फोन आला की जरा निरोपाचा गोंधळ झाल्याने आम्हाला काही समजले नाही. मुलाला पण  मुलगी आवडली आहे तर एकदा भेटू.

एकदा कशाला मी तर माळ घेऊनच तयार होते.तरी शक्य तितके नम्र भाव ठेवून मी ‘तुम्ही म्हणाल तसं …’ असलं काही तरी उत्तर दिलं.

दुसऱ्याच दिवशी मुलाकडे गेलो .मला तर आपण काय भारी काम केलं याचा फील होता.पण मुलाची आई मात्र ,माझ्या आईला ,,अहो याचा की नाही जबरदस्त योग होताच लग्न ठरायचा .कित्ती फोन आले तुम्ही येऊन गेलात तेव्हापासून आणि माझ्याकडे बघत मीच सांगितलेली नावं आणि माहिती  सांगू लागल्या. मला किती हसू आणि किती नको असं झालं. पण आमच्या स्मार्ट फादरांच्या लक्षात आले.त्यांनी घरी आल्यावर विचारलं की काय आहे भानगड? मग मी सगळं खरं काय घडलं ते बाबांना आणि आईला सांगून माफीसुद्धा मागितली.

याच मुलाशी पुढे लग्न झाल्यावर त्यालासुध्दा सगळं सांगून टाकलं. त्याची तर हसून हसून पुरती वाट लागली. त्यानंतर सुद्धा सासूबाई हा किस्सा पुन्हा पुन्हा सांगत असत आणि कित्ती हो डिमांड होता तुमच्या मुलाला म्हणून मी कौतुक करत असे .आणि नंतर जाम हसत असे.  

विशेष टिप्पणी –

सून झाल्यावर काही दिवसांनी सासूबाई आणि सासरे यांना माझा हा कारभार सांगितला. सासरे खूप हसले पण सासूबाई मात्र जरा चिडल्या.( पुढे  मात्र सगळे गोष्टीत सांगतात त्या प्रमाणे आम्ही सुखाने राहू लागलो.)

लेखिका –  सुश्री अनिता मेहेंदळे

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

‘रघुवंश’ काव्यात कालिदासानं शरद ऋतूच्या आगमनाची खूण सांगितली आहे. शरद ऋतू सुरू झाला. त्याने पुंडरीकरूपी छत्र आणि काशतृणरूपी चामरे धारण केली.. पुंडरीक हे कमळ पावसाळा संपला की फुलू लागते. काश नावाच्या तृणास फुले येतात.

कवी अनिलांच्या तोंडून ‘शरदागम’ ही कविता मी अनेकदा ऐकली आहे. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा, या शरदागमाच्या खुणा आहेत. साचून राहिलेल्या गढूळ पाण्याचे हळूहळू निर्मळ जळात रूपांतर होतंय आणि त्या आरशात डोकावून बाभळी आपलं सावळं रूप पाहतात. ज्वारी टवटवली आहे. काळी आता काळजी करते, की अजून कापूस का फुलत नाही? त्यासंबंधी अधिक चौकशी करायला निळे तास पक्षी खाली उतरतात. कुणीतरी शेवंतीच्या कानात सांगतं, अजून तुझी वेळ आलेली नाही. गवत अजून हिरवे आहे. त्याचे पिकून सोने होण्याआधी पिवळ्या फुलांची घाई करू नकोस. अनिलांच्या कवितेतली ही चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली की समजायचे, ऋतुराज शरदाचे आगमन झाले. 

मोगरा आणि कुंद यांनी बरोबर सहा-सहा महिने वाटून घेतले आहेत. जानेवारी ते जून हे मोगर्‍याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू आहे. काश या गवताची ओळख करून घ्यायला मी उत्सुक आहे. उसासारखे सुंदर तुरे येणारे ते गवत असले पाहिजे.                                                                              

शरद ऋतूचे वर्णन असलेल्या वसंत बापटांच्या ‘निचिंत’ या कवितेत काश फुलांचा उल्लेख आहे. बापट असतानाच त्यांना विचारायला हवे होते. बापटांची ‘सेतू’ ही प्रसिद्ध कविता शरद ऋतूची आहे. तिच्यातल्या प्रतिमा एकावेळी निसर्ग आणि प्रेयसी दोहोंनाही लागू पडणार्‍या आहेत. किंबहुना शरद ऋतूतील पहाटच सेतू होऊन कवीला ‘तिच्या’कडे घेऊन जात आहे. ….. 

‘ही शरदातील पहाट…. की….  तेव्हाची तू?

तुझीया माझीया मध्ये पहाटच झाली सेतू’ 

….‘सेतू’ ही माझ्या वाचनातील शरद ऋतूवरील सर्वांत सुंदर मराठी कविता आहे.                                                    

जिला मी दुसरा क्रमांक देईन ती इंदिरा संतांची कविता शरदातली दुपार चित्रांकित करते. ही निळी पांढरी शरदातली दुपार कशी आहे? तर तिचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळूवार आहे. सव्वीस ओळींच्या मोठय़ा कवितेत शरदातील निसर्गाचे सुंदर तपशील आहेत. आणि हा शेवट….. 

‘का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी?

का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी?

का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती?

रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती?

दिस भरलेली ही काय तरी गर्भार

टाकीत पावले चाले रम्य दुपार!’      

मराठी कवींप्रमाणे संस्कृत कवींनाही शरद ऋतू तितकाच प्रिय आहे. महाकवी कालिदासाला तो ‘रूपरम्या नववधु’सारखा सुंदर, टवटवीत वाटतो. ‘किरातार्जुनीय’ या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, ‘हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात. असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो !’

पूर्णता आणि परिपक्वता यांची प्रतिमा होऊन शरदातले मेघांनी धुतलेले आकाश रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांतून येते.  पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘मुक्काम शांतिनिकेतन’ मध्ये आश्रमातल्या शरद ऋतूचे वर्णन केले आहे, तेही रवींद्रनाथांच्या पत्राद्वारा. भानूसिंहेर पत्रावलीच्या अकरा क्रमांकाच्या पत्रात गुरुदेव लिहितात, ‘आज बागेत हिंडताना मालती फुलांचे हे ‘अनुप्रास’ पाहायला मिळाले.’ 

शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. आकाशातली निळाई हळूहळू स्पष्ट आणि गडद होते. तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. या रात्रीही मोठय़ा असतात. इतर कोणत्याही ऋतूंना रात्रीच्या सौंदर्याचं हे वरदान नाही, म्हणून तर कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ‘ज्योतिष्मती रात्र’ म्हटलं आहे. शरदात येणारे सणदेखील रात्रींशी निगडित आहेत. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी हे रात्रीचेच उत्सव आहेत.

चकोर पक्ष्याचं मला भारी आकर्षण वाटायचं; पण तो म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू किंवा परीस यांसारखी कवीकल्पनाच असावी, असा समज. शरद ऋतूच्या चंद्रकलेचे कोवळे अमृतकण चकोर खातो. याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायात येते.                                                                    

मारुती चितमपल्लींनी चकोर नाकारला तर नाहीच; पण त्याचे विज्ञान सांगून कवीकल्पनेला शास्त्रीय पुस्ती जोडली आहे. शरद ऋतूत चकोरीची पिल्ले तिच्याबरोबर जंगलात फिरत असतात. वाळवीच्या किड्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून वारुळातून वाळवी रात्री बाहेर पडते. आपल्या पिलांची जलद वाढ व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. शरद ऋतूतल्या चंद्राच्या प्रकाशात चकोराला वाळवी सहज दिसते. हे दृश्य पाहून कवींना वाटते, की चकोर चांदणेच टिपत आहेत ! मी ग्रंथप्रेमी असल्याने वाळवी खाणार्‍या चकोरांबद्दल आता कृतज्ञता वाटते.

शरदातल्या चंदेरी रात्री जेवढय़ा सुंदर, तेवढाच शारद रात्रींतला अंधारही प्रियतम आणि मोहमयी असतो. अंधार ही प्रेम करण्यासारखीच गोष्ट आहे हे शरदातल्या रात्रीच   पटते, हे अरुणा ढेरे यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी खरे आहे…. 

‘पर्वतों के पेडों पर शाम का बसेरा है. 

चंपई उजाला है, सुरमई अंधेरा है !’

 …. हे साहिरचं वर्णन एखाद्या शारद सुंदर रात्रीलाच उद्देशून असलं पाहिजे. सुरम्यासारखा अंधार ! व्वा ! कोजागिरीची रात्र म्हणजे चंपई उजाला आणि दिवाळीची रात्र म्हणजे सुरमई अंधेरा !

शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्‍याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हींव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत विश्‍वामित्राचा उन्हाळाही होऊन जातो, त्यालाच अलीकडे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू. 

लेखक :  -प्रा. विश्‍वास वसेकर 

लेखक साहित्यिक आहेत.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

हैदराबाद येथील  सालारजंग वस्तू संग्रहालयाचे पहिले  व्यवस्थापक, तसेच  निर्मितीस नबाबास सहकार्य करणारे मागील शतकातील जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा  जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी अहमदनगर येथे झाला. गोपाळराव हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. त्यांचा व त्यांची मोठी बहिण शांता यांचा नातेवाइकांनी सांभाळ केला. नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देऊसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. मूळचे देवास, मध्यप्रदेश येथील देऊसकर कुटुंब  अहमदनगर येथे आले. देऊसकर यांच्या  घरात तीन पिढ्यांपासून कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन देऊसकर आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते.

त्यांनी वर्ष १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. १९२७ साली मुंबईला आल्यावर खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटक मंडळीच्या बिऱ्हाडात ते राहिले. त्यांनी १९३१ मध्ये जे.जे.मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. जे.जे.स्कूलचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते. तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. त्यांची कला पाहून निजामाने पाच वर्षांकरिता खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले व लंडनमधील ‘रॉयल अकादमी’त त्यांनी शिक्षण घेतले. 

त्या संस्थेच्या लंडनमधील जागतिक कला प्रदर्शनांत त्यांनी सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळवला होता. वर्ष १९३६ व १९३८ च्या रॉयल ॲकडमीच्या प्रदर्शनात देऊसकरांची ‘शकुंतला’ व ‘अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे  लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही चित्रे बडोदा येथील संग्रहालयात आहेत. त्यांनी ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ या चित्रांमध्ये निसर्गघटकांच्या  पार्श्वभूमीचा उत्कृष्ट वापर केला आहे. बडोदा-नरेश प्रतापसिंह गायकवाड यांची ‘घोड्यावरून सलामी’  आणि ‘राजगृहात संस्थानिक’ या दोन्ही चित्रांमधून त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येतो. त्या वेळी ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली. 

हैदराबाद येथील सालारजंग  उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्याची खूपच प्रसिद्धी झाली. सालारजंग म्युझियमची मांडणी  ही मराठी माणसाच्या कल्पकतेचे द्योतक आहे. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. ‘व्यक्तिचित्रकार’ म्हणून देऊस्कर यांनी स्वतःची ‘व्यावसायिक कारकीर्द घडविली. त्यांच्या चित्रशैलीला बॉंबे आर्ट सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवले होते. आजही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, तसेच टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात. व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर ह्यांनी ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ या पुस्तकातून देऊसकरांमधला कलावंत आणि माणूस याची सुंदर ओळख दिली आहे. त्याच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार आणि सोबतची चित्रे, छायाचित्रे येथे पाहण्यास मिळतात. 

जे.जे.तून पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर देऊसकरांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पारितोषिके व पदके संपादन केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक ही त्यांपैकी काही महत्त्वाची पारितोषिके होत. भारतात पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांच्या परंपरेतील श्रेष्ठ कलाकार म्हणून  गोपाळराव देऊसकर यांचे स्थान अव्वल आहे. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. 

लेखक – अज्ञात

संग्राहक : विनय मोहन गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वा. वि. दा. सावरकरांचे निर्वाण झाले. लोककवी मनमोहन यांनी या दुःखद प्रसंगी आपल्या भावना पुढील काव्यातून व्यक्त केल्या… 

ते आता दिसणार नाहीत 

की जे निशाणातच नव्हे, प्राणातही भगवे होते !

 

ते आता स्पंदणार नाहीत 

की जे वेरुळचे शिल्प अंदमानात घडवीत होते !

 

ते आता बोलणार नाहीत 

की जे सत्तावन्न नंतरचे खरे ‘अठ्ठावन्न’ होते !

 

ते आता हसणार नाहीत 

की जे अमावस्येची प्रसन्न पुनव करीत होते !

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #172 – होली पर्व विशेष – कहाँ आज प्रह्लाद… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है होली पर्व पर आपकी एक भावप्रवण कविता  “कहाँ आज प्रह्लाद…”)

☆  तन्मय साहित्य  #172 ☆

☆ होली पर्व विशेष – कहाँ आज प्रह्लाद… 

रंगभरी इस दुनियाँ  में

अनगिन बदरंगी चेहरे भी हैं

नहीं सुहाता अच्छा उनको

कानों से वे बहरे भी हैं।

 

नीला, हरा, गुलाबी, पीला,

नहीं रंग केशरिया भाए

खूनी रंगों से रिश्ते,

कब धवल रंग में ठहरे भी हैं।

 

कहाँ आज प्रह्लाद,

चतुर्दिश हैं हिरण्यकश्यप ही सारे

नरसिंहों के शौर्य पराक्रम,

पर शैतानी पहरे भी हैं।

 

अमराई की मोहक गंध

न है फगुनाहट अब फागुन में

प्रतिबंधित हैं छंद ,

गीत पर वार हुए वे गहरे भी हैं।

 

प्रेम-प्यार, सद्भाव प्रीत की रीत,

अतीत की बात पुरानी

सूख रही सरिताएँ तो

स्वाभाविक विचलित लहरें भी हैं।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ होली एवं अंतरराष्ट्रीय महिला दिवस विशेष – लघुकथा – बहू उवाच ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों  से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 350 से अधिक लघुकथाएं रचित एवं ग्यारह  पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है,जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं।  आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं। आज प्रस्तुत है होली पर्व पर आपकी एक विचारणीय एवं हृदयस्पर्शी लघुकथा ‘‘बहू उवाच’’)

☆ होली एवं अंतरराष्ट्रीय महिला दिवस विशेष ? लघुकथा – बहू उवाच ☆ डॉ कुंवर प्रेमिल

मोहल्ले मोहल्ले होलिका दहन की तैयारियां जोर शोर से चल रही थी। स्पीकर पर होली के गीत प्रसारित हो रहे थे। चारों तरफ होलीमय वातावरण फैला पड़ा था।

एक घर की नववधू अपनी सास से बोली-आज इस मोहल्ले में एक साथ दो होली जलेंगी सासू मां, आप कौन सी होली पसंद करेंगी, घरवाली या बाहर वाली।

‘घरवाली होली भी होती है क्या? मैंने आज तक कहीं सुनी भी नहीं है बहू’। सास आश्चर्यचकित होकर गोली।

‘आज उसे भी देख लेना सासूजी, बड़ी लोमहर्षक होली होती है यह।’

‘इसी जलाता कौन है? और यह जलती कहां है बहू।’

‘ऐसी होली घर के किचन या बाथरूम के अंदर संपन्न होती है मां जी, इसे स्वयं बहू यह उसके सास ससुर, जेठ जेठानी, देवर देवरानी और नंनदें आदि जलाती है।’

‘तो क्या ऐसी होली हमारे घर में जलने वाली है’-सास ने बहू से पूछा।

‘हां माताजी यह होली हमारे घर में जलने वाली है इसके लिए मैंने सारा सामान जुटा लिया है। बस मैं थोड़ा सा श्रृंगार कर अभी हाजिर होती हूं, अपने हाथ से यह कार्यक्रम संपन्न कर लीजिए, मुझे बड़ी खुशी होगी।’

सास बुरी तरह चौकी फिर अपनी बहू के सिर पर हाथ फेर कर बोली – मुझे नहीं चाहिए तेरे पिता से ₹300000 तू मेरे घर की लक्ष्मी है, यह पाप मैं नहीं होने दूंगी, आज तूने मेरी आंखें खोल दी है। आज से तू मेरी बहू ही नहीं, मेरी बेटी भी है, ऐसी मनहूस बातें आज के बाद अपने मुंह से फिर कभी मत निकालना।

सास ने अपनी बहू को अपनी छाती से लगा लिया फिर सास बहू एक दूसरे से लिपट कर सिसक सिसक कर देर तक रोती रहीं।

🔥 🔥 🔥

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – शाश्वत ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि –  शाश्वत ??

…मृत्यु पर इतना अधिक क्यों लिखते हो?

…मैं मृत्यु पर नहीं लिखता।

…अपना लिखा पढ़कर देखो।

…अच्छा बताओ, जीवन में अटल क्या है?

…मृत्यु।

…जीवन में नित्य क्या है?

… मृत्यु।

…जीवन में शाश्वत क्या है?

…मृत्यु।

… मैं अटल, नित्य और शाश्वत पर लिखता हूँ।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित आपदां अपहर्तारं साधना गुरुवार दि. 9 मार्च से आरम्भ होगी। यह श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को विराम लेगी।

💥 इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना तो साथ चलेंगी ही।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 58 ☆ गीत – गीत तुम्हें याद आयेंगे… ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण गीत – “गीत तुम्हें याद आयेंगे ”।

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 58 ✒️

?  गीत – गीत तुम्हें याद आयेंगे … ✒️  डॉ. सलमा जमाल ?

तुम्हें याद आयेगी, होली पर हमारी

वो प्यार की पैगें, हमारी तुम्हारी।

 

बहेंगी फागुन की मुअत्तर  हवाएँ

आमों में बौर, महकती फिज़ायें 

तब आखों से बरसेंगी काई घटायें

न देगी चैन मन को अश्क बारी…

 

जंगल में टेसू के, दहकते अंगारे

सरसों के खेल, वो दिलकश नज़ारे

हँसेगी जब कोयल, खिलेंगी बहारें

निगाहों में हसरत, दमे बेकरारी…

 

तन्हाई में जब कसम खायेंगी बाहें

गुलाल से भरपूर होगी रंगीन राहें

होठों पे आयेगी, बेताब आहें

कभी मैं थी राधा तुम कृष्ण मुरारी…

 

© डा. सलमा जमाल

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares