मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हसण्याचे वरदान…… – भाग ३ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ हसण्याचे वरदान…… – भाग ३ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(“का?” मिसेस बार्टननी तिचं बोलणं तोडत मधेच विचारलं, “सगळे दिवस सोडून ख्रिसमसच्या दिवशीच का?” त्या थांबल्या आणि त्यांच्या मनातलं बोलून गेल्या, “तसाही ख्रिसमसचा दिवस माझ्यासाठी अवघडच असतो.”) — इथून पुढे —

ती मुलगी पुढे झुकली आणि तिने तिचे लहान मुलीसारखे हात एकमेकात अडकवले. तिचे मोठे तपकिरी डोळे अश्रुंनी भरून आले, एखाद्या लहान बाळासारखे स्वच्छ अश्रू!

“खरंच भयंकर असतो ना?” ती कुजबुजली.

मिसेस बार्टननी त्यावर काही उत्तर दिलं नाही. त्यांच्यासाठी हा दिवस जितका भयंकर होता, तेवढं काहीच या मुलीसाठी भयंकर असणं शक्य नाही. त्या दोघींच्यात समान असं काहीच नव्हतं. ती मुलगी पटकन उठली आणि मिसेस बार्टनच्या खुर्चीजवळ येऊन गुडघ्यांवर बसली.

मिसेस बार्टन एकदम मागे सरकल्या. “नाही, ” त्या म्हणाल्या, “नाही —- मला तुझ्याबद्दल काहीही जाणून घ्यायचं नाही. ”

ती मुलगी सावकाशपणे तिथून उठली. “म्हणजे — तुम्हाला खरंच असं म्हणायचं का — की मी इथून निघून जावं?”

“प्लीज, ” मिसेस बार्टन विनवणीच्या स्वरात म्हणाल्या, “प्लीज — निघून जा इथून. ”

“पण टिगर तर म्हणाला होता—“

“प्लीज, ” मिसेस बार्टन ओरडल्या, “प्लीज, प्लीज!” त्यांनी आपला चेहरा दोन्ही हातांमधे लपवून जोरजोरात रडायला सुरुवात केली, त्यांचं सगळं अंग थरथरत होतं.

ती मुलगी त्यांच्या बाजुला अगदी शांतपणे उभी होती. आणि मग मिसेस बार्टनना त्यांच्या खांद्यावर कसलासा स्पर्श जाणवला.

“रडू नका, ” ती मुलगी म्हणाली. “तुम्ही रडू नका, मी जाते आहे. जर मला त्यानं मी आज इथे यायलाच हवं, असं सांगितलं नसतं, तर मी आलेच नसते. ‘साधारण बारा वाजता तू तिथे जा, ’ त्यानं मला सांगितलं होतं, ‘त्या वेळी मॉम चर्चला जाऊन परत आली असेल, ’ ‘ते मला घरात घेणार नाहीत, ’ मी त्याला सांगितलं होतं. तेंव्हा त्यानं त्याच्या छोट्याशा वहीतलं एक पान फाडलं आणि त्याच्यावर काहीतरी लिहून मला दिलं, आणि म्हणाला, की हे दार उघडणाऱ्या म्हातारबाबांना दे. आणि मग तुमची भेट झाल्यावर, त्यानं तुमच्यासाठी दिलेलं ख्रिसमस प्रेझेंट तुम्हाला दे, असं सांगितलं होतं त्यानं मला. ”

मिसेस बार्टननी आपल्या तोंडावरचे हात बाजुला केले. “माझ्यासाठी ख्रिसमस प्रेझेंट घेतलंय त्यानं?” त्यांनी आश्चर्यानं विचारलं.

“तो इथून गेल्यापासून ते माझ्याजवळच आहे, ” ती मुलगी सांगू लागली. “युद्धावर जाण्याआधीच्या शनिवारी दुपारी त्यानं ते खरेदी केलं होतं. मी त्याच्याबरोबर गेले होते. खूप वेळ लावला त्यानं खरेदी करताना — तुम्हाला देण्यासाठी कुठलीच गोष्ट त्याला चांगली वाटत नव्हती. ‘ती गोष्ट परफेक्ट असायला हवी, टिग्रेस!’ तो म्हणाला होता. हे नाव त्यानं दिलंय मला!”

“तुझं लग्न नाही ना झालेलं त्याच्याशी?” आश्चर्यानं त्यांनी विचारलं.

“नाही, नाही. ” ती मुलगी पटकन म्हणाली.

‘मग, ” मिसेस बार्टन आपला आवाज शांत, समजुतदार येईल, अशी काळजी घेत म्हणाल्या, “तू इथे का बरं आली आहेस, हे सांगशील मला?”

“मी सांगितलं की आधीच. टिगरने मला आज इथे येऊन हे प्रेझेंट तुम्हाला द्यायला सांगितलं होतं, ” ती शांतपणे म्हणाली. तिने तिची छोटी बॅग उघडली आणि त्यातून एक छोटंसं पुडकं बाहेर काढून त्यांना देत म्हणाली, “हे घ्या, आता मी हे तुम्हाला दिलंय, आता मी जाते. ”

“ते उघडताय का? म्हणजे मी त्याला सांगू शकेन, तुम्हाला ते किती आवडलंय ते. ”

मिसेस बार्टन जराशा घुटमळल्या, पण मग ते पुडकं उघडलं त्यांनी. त्याच्या आत एका सॅटीनच्या खोक्यात एक नक्षीदार सोन्याचं लॉकेट होतं, त्याच्यावर मोती जडवले होते आणि त्या लॉकेटच्या आत हस्तीदन्तावर, रॅनीचा, तो अगदी एक वर्षाचा असतानाचा चेहरा रंगवलेला होता.

“तरीच मला त्याचा तो लहानपणीचा फोटो सापडत नव्हता!” मिसेस बार्टन उद्गारल्या. “त्याच्या लहानपणीचा अल्बम बघताना माझ्या लक्षात आलं होतं. ”

त्या मुलीनं तिच्या बॅगमधून एक पाकीट काढलं, आणि त्यांना देत म्हणाली, “हे तुम्हाला नक्की परत दे असं सांगितलंय त्यानं मला. ”

मिसेस बार्टननी न बघतच ते पाकीट घेतलं. त्या लॉकेटमधल्या त्या चेहऱ्याकडेच टक लाऊन बघत होत्या. “किती गोड दिसतोय ना?” त्या कुजबुजल्या. “तो त्याच्या डोक्यावरचा सोनेरी केसांचा मुकुट! या प्रेझेंटनी मला किती आनंदी केलंय, काय सांगू? माझा छोटासा रॅनी परत माझ्याकडे आलाय असं वाटतंय मला!”

“अगदी हेच तो म्हणाला होता, ” ती थंडपणे म्हणाली. त्यांच्याकडे पहाणारे तिचे डोळे खरोखरच एवढे मोठे आणि शांत दिसत होते, की मिसेस बार्टन ना काहीसा रागच आला.

तिच्यासमोर ते चित्र धरत त्या म्हणाल्या, ” किती गोड दिसतोय ना?”

“होय, खरंच गोड दिसतोय, ’” ती मुलगी निर्विकारपणे बोलली.

“कदाचित तुला लहान मुलं आवडत नसावीत, ” मिसेस बार्टन म्हणाल्या.

“मला?” ती स्पष्टपणे म्हणाली, “मी नेहमीच म्हणते, मला दहा मुलं व्हायला हवीत!”

“मला एकच झालं. ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “रॅनीचे वडील पहिल्या जागतिक महायुद्धात मारले गेले. ”

“टिगरने मला ते सगळं सांगितलंय, ” ती मुलगी म्हणाली. “खरं तर तुम्ही परत लग्न करून रॅनीला आणखी बहीण-भाऊ द्यायला हवे होते. ”

“मी कधीच असा विचार करू शकले नसते, ” मिसेस बार्टन चिडून म्हणाल्या.

“टिगरने त्याबद्दलही सगळं सांगितलंय मला, ” ती मुलगी म्हणाली. “पण तरीही ते त्याच्यासाठी अधिक चांगलं झालं असतं. ” तिच्या सावळ्या गालांवरच्या खळ्या सरळ झाल्या. “खरं तर तेंव्हाच मी त्याच्याशी लग्न करायला हवं होतं, पण तो कुठे मोकळा होता तेंव्हा!”

मिसेस बार्टननी खटकन ते लॉकेट बंद केलं.

“काय म्हणायचंय तुला?” त्यांनी रागाने तिला प्रश्न केला. “रॅनी कायमच मोकळा होता. ”

त्या मुलीने नकारार्थी मान हलवल्यावर तिचे काळेभोर कुरळे केसही हलले. “नाही! तो मोकळा नाहिये, ” ती म्हणाली, दुःखाने नाही, पण काहीशा बालिश सुजाणपणे. “तो तुम्हाला बांधिल आहे, मिसेस बार्टन. कोणतीही गोष्ट करण्याआधी, ती तुम्हाला आवडेल की नाही, हा विचार येतो त्याच्या मनात. आणि मग बहुतेक वेळा तो ती करत नाही. ”

“ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ” मिसेस बार्टन धारदार आवाजात बोलल्या. “का बरं, आत्ताच तर तू म्हणालीस, की त्याने— त्याने तुला लग्नाची मागणी घातली. ”

“ होय, पण—मला हे दिसत होतं, की—–हे त्यानं तुम्हाला न विचारता केलंय— आणि जर तुम्हाला मी आवडले नाही तर—तो दुःखी होईल. ”

“तू त्याच्याशी लग्न न करण्याचं हे कारण आहे?” मिसेस बार्टननी विचारलं.

“जो माणूस दुसऱ्या कोणाचा तरी आहे, अशा माणसाशी मी नाही लग्न करू शकत, ” ती शांतपणे म्हणाली. आत्ताही तिच्या आवाजात दुःख किंवा विनाकारण दोष देणं, हे काहीही नव्हतं.

मिसेस बार्टन खुर्चीत बसल्या जागी ताठ झाल्या. “जर माझ्या मुलावर माझा एवढा प्रभाव असता—“ त्या बोलू लागल्या.

“ओह! प्रभाव असायला माझी काहीच हरकत नसती, ” ती उत्साहाने म्हणाली, “पण तुम्ही—म्हणजे – तुम्ही स्वार्थी आहात. तुम्हाला एकटं वाटू नये, आणखी काही-बाही, या सर्व गोष्टींसाठी तो स्वतःला जबाबदार समजतो. ”

मिसेस बार्टनना आपल्या मानेपासून वर, गालांपर्यंत रक्त चढतंय असं जाणवत होतं. “तो असं बोलला माझ्याबद्दल तुझ्याशी?” त्यांनी रागाने विचारलं.

“नाही, नाही, ” ती म्हणाली, “म्हणजे, फक्त मला सगळं समजून सांगण्याइतपतच. आज इथे येण्यासाठी मी तयार नव्हते, तेंव्हा –तो म्हणाला, तुम्ही — तुम्ही एखादेवेळी आत्महत्या सुद्धा कराल—तुम्ही विचार करत होतात, की तो परत येणार नाही. तुम्ही त्याला सांगितलं होतं, की त्याचे वडील युद्धावरून परत आले नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्याची खूप काळजी वाटते— याची त्याला काळजी वाटते. ”

“माझ्या मुलाने माझ्या सगळ्या खाजगी गोष्टी तुला सांगून टाकलेल्या दिसतायत. ” मिसेस बार्टन म्हणाल्या.

“नाही, त्याचं कारण म्हणजे, तुम्ही त्या गोष्टी त्याच्याच करून टाकलेल्या आहेत!” ती मुलगी म्हणाली. तिने परत तिची बॅग खुर्चीवर ठेवली, ती बसलेली ती खुर्ची निम्मी सुद्धा व्यापलेली नव्हती तिने! आणि परत तिने तिचे छोटेसे दोन्ही हात एकमेकात अडकवले. “अर्थातच, मी त्याला खरं काय ते सांगितलं, ” ती पुढे म्हणाली.

“खरं?” मिसेस बार्टननी प्रश्न केला.

“मी त्याला सांगितलं, की तुझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे, म्हणून त्या अशा आहेत, असं नाही, तर तुमच्या मनात त्याच्या शिवाय एकटं रहाण्याची जी भीति आहे, त्यामुळे तुम्ही अशा वागता. ”

मिसेस बार्टन उभ्या राहिल्या. अचानकपणे त्यांचे गुडघे थरथरू लागले. “मला वाटतं, तू इथून निघून जावंस, ” त्या म्हणाल्या. “अखेर, तू कोण लागून गेलीस एवढी? एक सामान्य मुलगी जिला माझ्या मुलाने पसंत केली. तुझ्यासारख्या मुली—“

पण ती मुलगी गंभीरपणे पुढे म्हणाली, “तुम्हाला वाटतं तसा काही प्रकार नाहिये. मला एका खुनाच्या केसमधे त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी पाठवलेलं होतं. मी एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करते. पण त्याने मला काहीही सांगण्यास नकार दिला, मला ते वागणं आवडलं. तेंव्हा त्याने मला जेवणाचं आमंत्रण दिलं. तिथेही मी त्याला त्याबद्दल प्रश्न विचारले, पण तरीही त्याने मला काहीही सांगितलं नाही. त्यामुळे मला तो अधिकच आवडला. ”

“कुठली केस होती ती?” मिसेस बार्टननी विचारलं.

“ती प्रॅट मर्डर केस!” ती मुलगी म्हणाली.

“पण ही गोष्ट तर तीन वर्षांपूर्वीची आहे, ” मिसेस बार्टन ओरडल्याच! म्हणजे, रॅनीची आणि हिची ओळख तीन वर्षांपासून आहे! आणि तीही माझ्या नकळत! म्हणजे, या मुलीसाठी तो कोणाशी लग्न करायला तयार नव्हता तर —माझ्यासाठी नव्हे!

ती मुलगी पटकन उठली आणि आपले छोटेसे पण स्थिर हात मिसेस बार्टनच्या खांद्यांवर ठेऊन तिने त्यांना परत खुर्चीवर बसवले. “खाली बसा, ” ती म्हणाली, “आणि काहीतरी बोलू नका. ”

मिसेस बार्टननी तिच्याकडे एक जहाल कटाक्ष टाकला. “म्हणजे, बऱ्याच पूर्वीपासून त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं का?”

“तो सांगतो, जेंव्हा त्यानं मला पहिल्यांदा पाहिलं, तेंव्हापासून—–म्हणजे, तीन वर्षांपासून. ” 

“तीन वर्षांपासून?” मिसेस बार्टन म्हणाल्या, “पण हा शुद्ध मूर्खपणा आहे —-तू किती लहान मुलगी आहेस!”

“बावीस वर्षांची आहे मी. ”

“पहिल्यांदा खरोखर कधी मागणी घातली त्यानं तुला?” मिसेस बार्टननी विचारलं. याच कारणामुळे त्याला ॲलिशिया आवडत नव्हती तर!

त्या मुलीने मान खाली घातली. “ते सांगितलंच पाहिजे का मी तुम्हाला?”

“तुला सांगायचंच नसेल तर नको सांगू, ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “तरीही मला एवढं सगळं सांगितल्यावर—“

“ती मुलगी हसली आणि अचानक उठून मिसेस बार्टनच्या खुर्चीच्या हातावर जाऊन बसली.

“तुम्हाला काही वाटत नाही का हो? तुम्हीच म्हणाला होतात ना, की मला काहीही ऐकायचं नाहिये म्हणून?”

मिसेस बार्टन जराशा घुटमळल्या. आणि मग अचानक त्याही हसत सुटल्या. हे खरोखरच खुळचटपणाचंच होतं की ! ही तरुण मुलगी त्यांच्याशी बोलत होती हेच ! “मी तसं म्हंटलं तरीही तू मला बरंच काही सांगितलं आहेस, ” त्या म्हणाल्या.

– क्रमशः भाग तिसरा 

मूळ कथा: पर्ल बक

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 ताई आणि संध्या

ताई आणि संध्याचं लहानपणापासूनच अगदी मेतकूट होतं. त्या समान वयाच्या म्हणूनही असेल कदाचित. बहिणी पण आणि जिवाभावाच्या मैत्रिणी पण असं संमिश्र नातं होतं त्यांचं. म्हणजे ते तसंच अजूनही आहे वयाची ऐंशी उलटून गेली तरीही.

ताई म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण आणि संध्या आमची मावस बहीण पण ती जणू काही आमची सहावी बहीणच आहे इतकी आमची नाती प्रेमाची आहेत.

अकरावी झाल्यानंतर ताई भाईंकडे म्हणजे आजोबांकडे (आईचे वडील) राहायला गेली. संध्या तर जन्मापासूनच भाईंकडे राहत होती. तेव्हा मम्मी (आजी) होती आणि भाईंची बहीण जिला आम्ही आत्या म्हणत असू तीही त्यांच्या समवेत राहायची. आत्या हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं जिच्या विषयी मी नंतर लिहिणार आहेच.

संध्या या तिघांसमवेत अत्यंत लाडाकोडात वाढत होती यात शंकाच नाही पण माझ्या मनात मात्र आजही तो प्रश्न आहेच की मावशी बंधूंचं (म्हणजेच संध्याचे आई-वडील..) संध्या हे पहिलं कन्यारत्न. पहिलं मूल म्हणजे आयुष्यात किती महत्त्वाचं असतं! याचा अर्थ नंतरची मुलं नसतात असं नव्हे पण कुठेही कधीही पहिल्याचं महत्व वेगळंच असतं की नाही? मग संध्याला आजी आजोबांकडे जन्मापासून ठेवण्यामागचं नक्की कारण काय असेल? कदाचित आजीचाच आग्रह असेल का? आजी ही आजोबांची तिसरी पत्नी होती. अतिशय प्रेमळ आणि नात्यांत गुंतणारी होती. तिने आई -मावशींना कधीही सापत्न भाव दाखवलाच नाही पण तरीही तिला स्वत:चं मातृत्व म्हणजे काय हे अनुभवता आलं नाही आणि लहान मुलांची तिला अतिशय आवड होती म्हणून असेल कदाचित.. तिने जन्मापासूनच संध्याला आजी या नात्याने मांडीवर घेतले आणि तिच्यावर आजी आणि आई बनून मायेचा वर्षाव केला. अर्थात हा माझा तर्क आहे प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन मला आजपर्यंत झालेलं नाही आणि या घटनेमागची मावशीची भूमिका ही मला कळलेली नाही.

हे लिहीत असताना मला एक सहज आठवलं तेही सांगते. आम्हा तीन बहिणींच्या नंतर जेव्हा उषा निशा या जुळ्या बहिणींचा जन्म झाला तेव्हा दोन पैकी एकीला आजोबांकडे काही वर्षं ठेवावं असा एक विचार प्रवाह चालू होता. त्याला दोन कारणे होती. एकाच वेळी दोन बाळं कशी वाढवणार आणि दुसरं म्हणजे आमचं घर लहान होतं, फारसं सोयीचं नव्हतं, आठ माणसांना सामावून घेण्याची एक कसरतच होती पण त्याचवेळी हाही एक अनुभव आला की रक्ताची नाती ही एक शक्ती असते. अरुंद भिंतींनाही रुंद करून त्यात सामावून घेण्याचं एक दिव्य मानसिक बळ त्यात असतं. काही काळ आमचं कुटुंब काहीसं हादरलं असेलही पण आम्हाला बांधून ठेवणारा एक पक्का, चिवट धागा होता. जीजीने विरोध दर्शविला म्हणण्यापेक्षा जबाबदारीच्या जाणिवेनं डळमळणाऱ्या मानसिक प्रवाहाला धीर देत सांगितलं, ” कशासाठी? माझ्या नाती याच घरात मोठ्या होतील. छान वाढतील. ”

आणि त्याच आभाळमायेच्या छताखाली आम्ही साऱ्या आनंदाने वाढत होतो.

मात्र मॅट्रिक झाल्यानंतर ताई भाईंकडे कायमची राहायला गेली. त्यावेळी भाईंच्या घरात आजी नव्हती. ती देवाघरी निघून गेली होती.

संध्या आणि ताई दोघीही उच्च गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. आमच्या घरात या दोघींच्या मॅट्रिकच्या यशाचा एक सोहळा साजरा झाला. आजोबांनी टोपल्या भरून पेढे गणगोतात वाटले होते.

ताईने आणि संध्याने एकत्र मुंबईच्या त्या वेळच्या नामांकित म्हणून गाजलेल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला होता आणि ठाण्याहून ताई इतक्या लांब फोर्टस्थित कॉलेजात कशी जाणार म्हणून तिने भाईंकडेच राहावे हा प्रस्ताव बिनविरोधात मंजूर झाला होता.

ताई आणि संध्याच्या जोडगोळीत तेव्हापासून वेगळेच रंग भरले गेले. आजोबांच्या शिस्तप्रिय, पाश्चात्य जीवन पद्धतीचा संध्याला अनुभव होताच किंबहुना ती त्याच संस्कृतीत वाढली होती. आम्ही आई बरोबर भाईंकडे फक्त शाळांना सुट्टी लागली की जायचो. दिवाळीत, नवरात्रीत जायचो. पण आम्ही मुळचे धोबीगल्लीवासीयच. ईश्वरदास मॅन्शन, नाना चौक ग्रँड रोड मुंबई. इथे आम्ही तसे उपरेच होतो. सुट्टी पुरतं सर्व काही छान वाटायचं पण ताई मात्र कायमस्वरूपी या वातावरणात रुळली आणि रुजली.

आता ती ठाण्याच्या आमच्या बाळबोध घरातली पाहुणी झाली होती जणू! 

एकूण नऊ नातवंडांमध्ये संध्या आणि अरुणा म्हणजे आजोबांसाठी दोन मौल्यवान रत्नं होती. त्या तिघांचं एक निराळंच विश्व होतं. आजोबांच्या रोव्हर गाडीतून आजोबा ऑफिसात जाता जाता त्यांना कॉलेजमध्ये सोडत. अगदी रुबाबात दोघी काॅलेजात जायच्या. त्या दोघींच्या साड्या, केशरचना, केसात माळलेली फुले रोजच एकसारखी असत. एलफिन्स्टन कॉलेजच्या प्रांगणात संध्या- अरुणाची ही जोडी या एका कारणामुळे अतिशय प्रसिद्ध झाली होती. शिवाय दोघीही सुंदर, आकर्षक आणि हुशार.

दोघींच्या स्वभावात मात्र तसा खूप फरक होता. पायाभूत पहिला अधोरेखित फरक हा होता की ताई मराठी मीडीअममधली आणि संध्या सेंट कोलंबस या कान्व्हेंट स्कूल मधली. सरळ केसांची संध्या तशी शांत, मितभाषी, फारशी कोणात चटकन् मिसळणारी नव्हती. तिचं सगळंच वागणं बोलणं एका ठराविक मीटर मध्ये असायचं आणि या विरुद्ध कुरळ्या केसांची ताई! ताई म्हणजे एक तुफान, गडगडाट. कुणाशीही तिची पटकन मैत्री व्हायची. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा तिला प्रचंड उत्साह असायचा. मला आजही आश्चर्य वाटतं की संध्याच्या पचनी ताई कशी काय पडायची? त्या दोघींची आपसातल्या या विरोधाभासातही इतकी मैत्री कशी? इतकं प्रेम कसं? 

एखाद्या बस स्टॉप वर दोघी उभ्या असल्या आणि बसला येण्यास वेळ झाला की ताईची अस्वस्थतेत अखंड बडबड चालायची. त्याचवेळी संध्या मात्र शांतपणे बसच्या लाईनीत उभी असायची. बसची प्रतीक्षा करत. कधीतरी ताईला ती म्हणायची!” थांब ना अरू! येईल नं बस. ”

पण ताईचं तरी म्हणणं असायचं, ” “आपण चालत गेलो असतो तर आतापर्यंत पोहोचलोही असतो. ”“ जा मग चालत. ” कधीतरी संध्याही बोलायची.

पण त्या दोघींचं खरोखरच एक जग होतं. आणि भाईंच्या सधन सहवासात अनेक बाजूने ते बहरत होतं हे नक्कीच. शिस्त होती, धाक होता पण वाढलेल्या गवताला मॅनिक्युरिंग केल्यानंतर जे वेगळंच सौंदर्य लाभतं तशा पद्धतीने या दोघींची जीवनं फुलत होती.

कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सवात त्या दोघी भाग घेत. संध्याची एकच प्याला मधील सिंधूची भूमिका खूप गाजली. ताईने ही प्रेमा तुझा रंग कसा मध्ये बल्लाळच्या पत्नीची भूमिका फार सुंदर वठवली होती. दोघींनाही पुरस्कार मिळाले होते. दोघींमध्ये अप्रतिम नाट्यगुण होते आणि त्यांना चांगला भावही या माध्यमातून मिळत होता.

आमच्या ज्ञातीच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्याच्या निमित्ताने एक व्यावसायिक पद्धतीने नाटक बसवण्यात आलं होतं. मला नाटकाचे नाव आता आठवत नाही पण या नाटकातही ताई आणि संध्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या आणि या नाटकाच्या तालमी भाईंच्याच घरी होत. सुप्रसिद्ध अभिनेते रामचंद्र वर्दे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक बसवले जात होते. भारतीय विद्या भवनात या नाटकाचा प्रयोग झाला. शंभर टक्के तिकीट विक्री झाली होती आणि प्रयोग अतिशय सुंदर झाला होता. इतका की भविष्यात ताई आणि संध्या मराठी रंगभूमी गाजवणार असेच सर्वांना वाटले. मात्र या नाटकाच्या निमित्ताने “विलास गुर्जर” नावाचा एक उत्तम अभिनेता मात्र रंगभूमीला मिळाला होता.

ताई आणि संध्या यांचं बहरणं असं वलयांकित होतं. आमच्या परिवारात या दोघी म्हणजे नक्कीच आकर्षक केंद्रं होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांचं हे असं मैत्रीपूर्ण बहिणीचं नातं सुंदरच होतं. एकमेकींची गुपितं एकमेकीत सांगणं, आवडीनिवडी जपणं, कधी स्वभाव दोषांवर बोलणं, थोडंसं रुसणं, रागावणं पण तरी एकमेकींना सतत सांभाळून घेणं समजावणं, एकत्र अभ्यास करणं मैत्रिणींच्या घोळक्यात असणं वगैरे वगैरे अशा अनेक आघाड्यांवर या दोघींचं हे नातं खरोखरच आदर्शवत आणि सुंदर होतं.

आम्ही जेव्हा सुट्टीत भाईंकडे जायचो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायचं ते म्हणजे संध्या, ताई, आजोबा आणि आत्या यांचा एक वेगळा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही नव्हतो. कारण बऱ्याच वेळा संध्या, ताई आणि आजोबा हे तिघंच खरेदीला जात, नाटकांना जात, आजोबांच्या ऑफिसमधल्या पार्ट्यांनाही जात. व्ही शांताराम च्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे भाईंना पास मिळत. बहुतेक हे चित्रपट ऑपेरा हाऊसला लागत आणि या प्रीमियर शोजनाही भाई फक्त ताई आणि संध्यालाच बरोबर नेत. म्हणजे तसे भाई आम्हालाही कुठे कुठे न्यायचे पण त्या नेण्यात ही “स्पेशॅलिटी” नव्हती. खास शिक्का नसायचा. ते सारं सामुदायिक असायचं, सर्वांसाठी असायचं. ”सगळीकडे सगळे” हा साम्यवाद भाईंच्या शिस्तीत नव्हता.

एकदा भाईंनी घरातच, वामन हरी पेठे यांच्या एका कुशल जवाहिर्‍याला बसवून ताई आणि संध्यासाठी अस्सल हिरे आणि माणकांची कर्णफुले विशिष्ट घडणावळीत करवून घेतली होती. कर्णभूषणाचा तो एक अलौकिक सौंदर्याचा नमुना होता. आणि एक मोठा इव्हेंटच होता आमच्या अनुभवातला. नातेवाईकांच्या लग्नसमारंभात त्या दोघी ही सुंदर कर्णफुले घालून मानाने मिरवायच्या फार सुरेख दिसायच्या दोघीही!

माझ्या मनात कुठलीच आणि कोणाशीही स्पर्धा नव्हती. जितकं प्रेम ताई वर होतं तितकंच संध्यावरही होतं. संध्या आजही आवडते आणि तेव्हाही आवडायची. कुणाही बद्दल द्वेष, मत्सर, आकस काही नव्हतं पण त्या त्या वेळी आजोबांच्या सहवासात हटकून एक उपरेपणा मात्र कुठेतरी जाणवायचा आणि तो माझा बाल अभिमान कुरतडायचा. डावललं गेल्याची भावना जाणवायची. अशावेळी मला माझी आई, आजी, पप्पा आणि धाकट्या बहिणी रहात असलेलं धोबी गल्लीतलं ते लहानसं, मायेची ऊब असलेलं, समान हक्क असलेलं घरच हवं असायचं. माझ्यासाठी ते आनंदघर होतं.

खरं म्हणजे “भाई” आजोबा म्हणूनही आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही त्यांचा प्रचंड प्रभाव माझ्या जडणघडणीवर आहेच. त्यांनी दिलेल्या आयुष्याच्या अनेक व्यावहारिक टिप्स मला जगताना कायम उपयोगी पडल्यात. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करूच शकत नाही पण त्या बालवयात मी प्रचंड मानसिक गोंधळ त्यांच्या पक्षपाती वागण्यामुळे अनुभवलेला आहे हे खरं.

आजोबांकडच्या वास्तव्यात मला आणखी एक जाणवायचं की आत्याचा संध्याकडे जास्त ओढा आहे. ते स्वाभाविकही होतं. ताई ही कितीतरी नंतर त्यांच्यात आली होती. आत्याला ताई पेक्षा संध्याचं अधिक कौतुक होतं आणि कित्येकवेळा ती ते चारचौघात उघडपणे दाखवत असे. “असले उपद्व्याप अरुच करू शकते.. संध्या नाही करणार. ” यात एकप्रकारचा उपहास असायचा. पण तो फक्त मलाच जाणवत होता का? ताईच्या मनात असे विचार येतच नव्हते का? एक मात्र होतं यामुळे ताईच्या आणि संध्याच्या नात्यात कधीच दरी पडली नाही हेही विशेष. त्यावेळी मला मात्र वाटायचं.. “का आली ताई इथे? का राहते इथे? कशाचं नक्की आकर्षण तिला इथे वाटतं. ? आपल्या घरातल्या सुखाची चव हिला कळत नाही का?

 मी माझ्या मनातले प्रश्न ताईला कधीही विचारले नाहीत. मी तेव्हढी मोठी नव्हते ना! आणि हे प्रश्न कदाचित गैरसमज निर्माण करू शकले असते. त्यातील अर्थांची, भावनांची चुकीच्या पद्धतीने उकल झाली असती. पण आज जेव्हा मागे वळून मी त्या वेळच्या माझ्या मनातल्या गोंधळांना तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा एकच जाणवते.. मला माझी स्वतंत्र विचारशक्ती होती. मी कधीही कुणालाही “का?” ” कशाला?” विचारू शकत होते जर कोणी माझ्या वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ केली तर. मला माझ्यातला एक गुण म्हणा किंवा अवगुणही असू शकेल पण मी कधीही कुणाची संपूर्णपणे फॉलोअर किंवा अनुयायी नाही होऊ शकणार.. माझ्यातल्या विरोधी तत्त्वाची मला तेव्हा जाणीव होत होती आणि त्याला कदाचित माझ्या आयुष्यातल्या या दोन सुंदर व्यक्तीच कारणीभूत असतील. केवळ संदर्भ म्हणून.. ताई आणि संध्या..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

हे आपल्याला माहीत आहे का ?

डेक्कन क्विन express कल्याणला का थांबत नाहीं?

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक ! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते ! पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे ‘ दक्षिणेची राणी ‘ ‘ डेक्कन क्वीन ‘ ! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही ह्याचे नवल वाटतेय ना ! बरोबर !!

त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले. रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला ! 

ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माहेर नसलेल्या मुली

कुठं जात असतील सणावाराला?

सासरी थकून गेल्यावर

चार दिवसांच्या माहेरपणाला?

 

कुणाला सांगत असतील

नवऱ्यानं झोडपल्यावर

भरलेल्या घरात

पोरकं पोरकं वाटल्यावर?

माहेर नसलेल्या मुलींचं

गाव कोणतं असेल?

 

कुठून घेत असतील त्या साडी चोळी

कुणाला बांधत असतील राखी

वडील भावाची ढाल नाही म्हणून

त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला?

दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात

नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून

काळीज जळत असेल का त्यांचं?

 

माहेर नसलेली मुलगी

आपल्या लेकरांना कसं सांगत असेल

मामा- मामी आजी- आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल?

मामाच्या गावाला जायचं

गात असतील का तिचीपण मुलं?

 

आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना?

बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू

कधी मिळत असेल का त्यांना खायला?

 

माहेर नसलेल्या मुली

निवांत झोपू शकत असतील का कुठं

जिथून त्यांना कुणीही लवकर उठवणार नाही?

कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास

फक्त त्यांचाच अधिकार असलेला?

 

माहेर नसलेल्या मुलींना

येत असतील का रोज आईचे फोन

तू बरी हाईस का विचारणारे?

कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का

की ती उपाशी निजली

तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल?

 

माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके

विरत असतील का हवेत

कुणीही तिला उराशी न कवटाळता?

किंकाळी फोडून रडावं

अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं?

 

माहेरचा आधार नाही म्हणून

माहेर नसलेल्या मुलींना

जास्तच छळत नसेल ना नवरा?

त्रास असह्य झाल्यावर

माहेरला निघून जाईन

अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला?

घर सोडून कुठंतरी जावं या भावनेनं

हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फडताळात ठेवताना

 चिंध्या होत असतील का त्यांच्या काळजाच्या?

 

माहेरची माणसं असूनही

माहेर नसलेल्या मुलींची वेदना खोल

की माहेरच्या माणसाचा मागमूसही न राहिलेल्या मुलीची जखम ओली

हे ठरवता येत नाही

 

माहेर नसलेल्या मुली

त्यांच्या लेकी-सुनांचं माहेर बनून

भरून काढत असतील का

स्वत:ला माहेर नसण्याची उणीव?

 

माहेर नसलेल्या मुलींना

आयुष्याच्या शेवटाला

कोण नेसवत असेल माहेरची साडी

की निघून जात असतील त्या

या जगातून

‘माहेर नसलेली मुलगी’

हेच नाव धारण करून?

कवयित्री : सौ. लक्ष्मी यादव  

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – शेवटी हात रिकामेच… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शेवटी हात रिकामेच? श्री आशिष  बिवलकर ☆

जोडून कवडी कवडी,

व्यवसाय धंदा वाढवत नेला।

सारं काही सोडून येथे,

रिकाम्या हाती एकटाच तो गेला।

*

दिलखुलास स्वभाव त्याचा,

एक एक माणूस जोडत गेला।

साध्या मराठी माणसाचा,

दिलदार शेट नकळतच झाला।

*

अपार कष्ट उपसले त्याने,

नशीब देत गेलं त्याला साथ।

धावपळीत विसरला मात्र,

उत्तम आरोग्याची मुख्य बात।

*

अक्षम्य दुर्लक्ष केलं स्वतःकडे,

हात पाय पसरण्याचा लागला ध्यास।

काय लागत जगायला जगी,

सुखाची निद्रा आणि खळगीत घास।

*

उत्तम आरोग्य -कौटुंबिक स्वास्थ्य,

यावर असते जीवनाची खरी भिस्त।

बाकी कमावणं -गमावणं गौण सारं,

मोह टाळायाची असायला हवी शिस्त।

*

प्रत्येकाने काही क्षण थांबून जरा,

स्वतः आत्मचिंतन नक्कीच करावं।

कुठे होतो-कुठे आहे-कुठे जायचं,

आध्यात्मिक विचार करुन ठरवावं।

*

प्रत्येक जन्माला येणारा,

कधी ना कधी जाणारच असतो।

मृत्यू सर्वांग सोहळा,

काळ जगाला दाखवतच राहतो।

वास्तवरंग

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 225 – कथा क्रम (स्वगत)… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 225 – कथा क्रम (स्वगत)… ✍

(नारी, नदी या पाषाणी हो माधवी (कथा काव्य) से )

क्रमशः आगे…

माधवी ।

तुम

देवी नहीं,

पाषाणी नहीं

मानुषी हो,

क्या

तुम्हारे मन में

कभी नहीं आया

कि कोई एक तुम्हारा हो

अपना हो

ऐसा अपना

जिसके वक्ष पर

विश्राम कर सको,

जिसके

बाहुओं में बँधकर

सुख का अनुभव करो

और जिसके कंधों पर

सिर रखकर

रो सको ।

अनुभव नहीं किया

तुमने

स्तनपान कराने

दुलारने

और

लोरी गाने का आनंद ।

माधवी,

तुम्हारे बारे में

सोचते सोचते

मैं

तुम्हारे काल से

आ जाता हूँ

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 225 – “झोंके छतनार सभी…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत झोंके छतनार सभी...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 225 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “झोंके छतनार सभी...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

ये पत्ते नीम के

कडवे लगते जैसे

नुस्खे हकीम के

 

दुबले पतले हिलते

लगे, हाथ हों मलते

भूखे प्यासे जैसे

बेटे यतीम के

 

डालडाल लहराते

टहनियों में फहराते

झूमते मचलते ज्यों

नशे में अफीम के

 

झोंके छतनार सभी

झुकते साभार , अभी

शाख पर लिखे जैसे

दोहे रहीम के

 

हरे भरे रहते हैं

खरी खरी कहते हैं

जैसे हों तकाजे

हवा के मुनीम के

©  श्री राघवेन्द्र तिवारी

08-02-2025

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – उलटबाँसी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – उलटबाँसी ? ?

लिखने की प्रक्रिया में

वांछनीय था

पैदा होते लेखन के

आलोचक और प्रशंसक,

उलटबाँसी तो देखिए,

लिखने की प्रक्रिया में

पैदा होते गए लेखक के

आलोचक और प्रशंसक!

?

© संजय भारद्वाज  

10.33. 13.11.18

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # 48 ☆ व्यंग्य – “पूंजी, सत्ता, और बाज़ार का प्रॉडक्ट है लिट्फेस्ट…” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी  के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अप्रतिम और विचारणीय व्यंग्य  “पूंजी, सत्ता, और बाज़ार का प्रॉडक्ट है लिट्फेस्ट…” ।)

☆ शेष कुशल # 47 ☆

☆ व्यंग्य – “पूंजी, सत्ता, और बाज़ार का प्रॉडक्ट है लिट्फेस्ट…” – शांतिलाल जैन 

‘मैं लिट्फेस्ट में गया था, वहाँ…..’  पिछले दस दिनों में दादू कम से कम दो सौ बार बता चुका है. सौ पचास बार तो मेरे सामने ही बता चुका है. साथ में तो मैं भी गया था. हर बार बताते समय उसका सीना छप्पन इंच से कुछ ही सेंटीमीटर कम फूला हुआ होता है. आमंत्रित रचनाकारों में दादू की वाईफ़ के मौसाजी के कज़िन भी थे जो सुदूर लखनऊ से आए थे. उत्सव की साईडलाईंस में हम उनसे मिलने और मौसी के लिए लौंग की सेव, घर की बनी मठरी, ठण्ड के करंट लड्डू और नींबू के आचार की बरनी देने गए थे. दादू को सपत्नीक जाना था मगर एनवक्त पर भाभीजी को माईग्रेन हो गया. वह मुझे साथ ले गया. वह राजनीति का मंजा हुआ ख़िलाड़ी है, मजबूरी में किए गए काम का भी क्रेडिट लेने और गर्व अभिव्यक्त करने के अवसर में बदल सकता है. ‘स्तरीय अभिरुचि’ और ‘साहित्य की श्रीवृद्धि में अकिंचन योगदान’ जैसे भावों से भरा दादू घूम घूम कर सबको बता रहा है ‘मैं लिट्फेस्ट में गया था, वहाँ…..’.

लिट्फेस्ट में कुछ लोग इंट्री फीस के साथ आए थे कुछ डोनेशन से मिलनेवाले वीआईपी ‘पास’ से. दादू ने इंट्री के लिए जुगाड़ से वीआईपी ‘पास’ का इंतज़ाम किया हुआ था. इंट्री सशुल्क रही हो या निःशुल्क, कुछ लोग अपने पसंदीदा लेखकों को सुनने, पुस्तकों पर हस्ताक्षर करवाने आए थे, शेष तो बस तफ़रीह को. रचनाकारों के हाथों में लगभग बिना ढक्कन का पेन होता था  जो लिखने के काम आता तो नहीं दिखा, किताब पर हस्ताक्षर करने के काम अवश्य आ रहा था, उसी से उन्होंने रसीदी-टिकट पर दस्तख़त करने जैसा महत्पूर्ण कार्य संपन्न किया. आईएफएससी कोड, अकाउंट नंबर, बैंक डिटेल्स वे घर से लिखकर लाए थे. पेन उपकरण तो सरस्वतीजी का था मगर अपने स्वामी लेखक को लक्ष्मीजी तक पहुँचाने में उसकी महती भूमिका थी. 

बहरहाल, वहाँ चार से छह सत्र एक साथ चल रहे थे. मेरी-गो राऊंड. इधर से घुसकर उधर निकल जाईए, उधर से घुसकर और उधर, उधर से और भी उधर, उधरतम स्तर पर पहुंचकर फिर इधर आ जाईए. दुनिया गोल है. सचमुच. सत्र होरीझोंटल ही नहीं वर्टिकल भी चल रहे थे. बैक-टू-बैक सत्र की खूबसूरती यह थी कि दर्शकों को एक ही लेखक को बहुत देर तक झेलना नहीं पड़ रहा था. अगले टाईम स्लॉट की मॉडरेटर अपने उतावले पेनल के साथ पास ही तैयार खड़ी थी. उसने आज ही अपने हेयर्स स्ट्रेट करवाए थे. उन्हें संभालते-संभालते वह शी…शी… की छोटी छोटी ध्वनियों से स्टेज जल्दी खाली करने के संकेत प्रेषित कर रही थी. यूं तो लेखक संकेत-इम्यून होता है, उसे पीछे से कुर्ता-खींच कर दिए गए संदेशों से निपटने का उसे पर्याप्त अनुभव होता है, मगर यहाँ उसे अगलीबार नाम कट जाने का डर का सता रहा था सो मन मारकर बैठ गया.

लिट्फेस्ट एक अलग तरह का अनुभव था. आप जितना आश्चर्य इस बात पर करते हैं कि आप कहाँ आ गए हैं उससे ज्यादा आश्चर्य इस बात पर होता है कि साहित्य कहाँ आ पहुँचा है! कुछ समय पहले के रचनाकारों ने कथा कविता को आमजन की चौक-चौपालों से उठाकर साहित्यिक संगोष्ठियों में पहुँचाया, वहाँ से प्रायोजकों की बैसाखियों पर चलकर लिटरेचर फेस्टिवल में आ पहुँचा है. सितारा होटलों, वातानुकूलित प्रेक्षागृहों, लकदक सजावट से घिरे अंतरंग कक्षों, रंगीन पर्दों से सजे बहिरंगों में गाँव की, मजदूर की, गरीब की कथा-कविता तो मिली, किसान, मजदूर या गरीब कहीं नहीं दिखा. कथा-कविता में खेत में बहते पसीने की गंध सुनाई दी, मगर उसने नाक में घुसकर हमारा मूड ख़राब नहीं किया. हैवी रूम-फ्रेशनर जो मार दिया गया था, हमने इत्मीनान से गहरी सांसें खींची. आप भी जा सकते हैं वहाँ. इयर-ड्रम्स के चोटिल होने का भी कोई ख़तरा नहीं. अहो-अहो और वाह-वाह के नक्कारखाने में प्रतिरोध की तूती सुनाई नहीं देगी. कुछ आमंत्रित लेखक बुलाए जाने पर सीना फुलाए फुलाए घूम रहे थे. कुछ जाऊँ, न जाऊँ की उहापोह में रहे होंगे, अब जब आ ही गए थे तो कह रहे थे – ‘कोई सुने न सुने तूती बोल तो रही है.’ सफाई भी, जस्टिफाई भी. यही क्या कम है कि निज़ाम ने अभी तक तूती की वोकल कार्ड को मसक नहीं दिया है. खैर, आयोजकों ने भी फेस सेविंग का पूरा इंतज़ाम किया हुआ था, चार अनुकूल रचनाकारों के पैनल में एक विपरीत विचार का रखकर बेलेंसिंग की गई थी. शहरी कुलीनताओं और एलिट अंग्रेज़ी साहित्य के सत्रों के बीच हर दिन एक दो सत्र हिंदी के और हिंद के शोषितों पर केंद्रित कर के भी रखे गए थे.

बहरहाल, अगर आप लिट्फेस्ट में बतौर श्रोता पहलीबार जा रहे हैं तो कुछ मशविरा आपके लिए.

एक तो अपनी पसंद के लेखक को ब्रोशर पर छपे फोटो या उनकी किताब के पीछे छपे फोटो से मिलान करके ढूँढने की गलती मत कीजिएगा. फोटो में वे एम एस धोनी जैसे बालों में हो सकते हैं और हकीकत में गंजे. हमें भी मौसाजी के कज़िन को ढूँढने में परेशानी हुई. फोटो उन्होंने अपनी जवानी का अवेलेबल कराया रहा होगा या शी-कलीग्स की पसंद का. जैसे वे ब्रोशर में थे सच में नहीं, जैसे सच में थे पोस्टर पर नहीं. मिलान करने के लिए आप चैट जीपीटी या डीपसीक की मदद ले सकते हैं. तब तक ऐसा करें कि थोड़े से खाली खाली खड़े लेखक के साथ सेल्फी लेते चलिए और वाट्सअप स्टेटस पर डालते चलिए. रील भी बना सकते हैं. अगर आप किसी लेखिका के संग सेल्फी लेना चाहते हैं तो अलर्ट रहिए और सत्र समाप्ति के दो तीन मिनिट में ही ले लीजिए, उसे मृगनयनी शो रूम से साड़ी खरीदने के लिए भागने की जल्दी जो होगी.

दूसरे, अपने रिश्तेदार से मिलने आप लंच टाईम के आसपास मत जाईएगा. बाउंसर आपको भोजन के तम्बू में बिना ‘पास’  के घुसने नहीं देगा और आपके मेहमान गुलाबजामुन की सातवीं किश्त का लुत्फ़ लिए बगैर बाहर आएँगे नहीं. साहित्य आपके ऑफिस की आधे दिन की सेलेरी कटवा देगा.

वैसे तो इन दिनों सनातन के बिना विमर्श के आयोजन पूरे होते नहीं, सो बजरिए मानस रामचर्चा का सत्र भी रखा गया है. लेकिन अगर आप महज़ मज़े के लिए जाना चाहते हैं तो शाम के सत्रों में पहुँचिएगा. सुबह गंभीर लेखकों से चलकर शाम होते होते विमर्श बॉलीवुड, ओटीटी, पॉपुलर बैंड, मंचीय कविता और स्टेंड-अप कॉमेडी के सेलेब्रिटीज तक पहुँच चुका होगा. मनोरंजन का नया डेस्टिनेशन! लिट्फेस्ट. अगर आप मक्सी, देवास, हरदा, इटारसी या बाबई में रहते हैं तो लिट्फेस्ट तो आप अपने शहर में एन्जॉय नहीं कर पाएँगे. इन शहरों में ये तब तक नहीं आएगा जब तक यहाँ साहित्य का बाज़ार विकसित नहीं हो जाता. लिटरेचर टूरिज्म बाज़ार का नया फंडा है. आप अपने हॉली-डेज जयपुर लखनऊ, भोपाल, दिल्ली, कलकत्ता, चेन्नाई, कोझिकोड के लिए प्लान कर सकते हैं. पूंजी, सत्ता, और बाज़ार का प्रॉडक्ट हैं लिट्फेस्ट. मीडिया मुग़ल, कारोबारी या अफसर उठता है और लिट्फेस्ट नामक जलसा आयोजित कर डालता है. जाने भी दो यारों, एन्जॉय दी फेस्ट.

और हाँ एक झोला लेते हुए जाईएगा. लौटते में आपके हाथों में कुछ पुस्तकें होंगी. कुछ भेंट में, मिलेंगी. कुछ आप उम्दा पसंदगी की नुमाईश करने के प्रयोजन से खरीदेंगे ही. दादू ने तो किताबों के साथ फोटो लेकर प्रोफाइल और स्टेटस पर लगा दी है. आप भी शान से कह पाएँगे – ‘मैं लिट्फेस्ट में गया था, वहाँ…..’

और हाँ, कहते समय शर्ट का ध्यान रखें, सीना फूल जाने से बटन टूट जाने का खतरा रहता है.

-x-x-x-

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४५ –  “सिद्धांतवादी पत्रकार – स्व. महेश महदेल” ☆ डॉ. वंदना पाण्डेय ☆

डॉ. वंदना पाण्डेय

परिचय 

शिक्षा – एम.एस.सी. होम साइंस, पी- एच.डी.

पद : प्राचार्य,सी.पी.गर्ल्स (चंचलबाई महिला) कॉलेज, जबलपुर, म. प्र. 

विशेष – 

  • 39 वर्ष का शैक्षणिक अनुभव। *अनेक महाविद्यालय एवं विश्वविद्यालय के अध्ययन मंडल में सदस्य ।
  • लगभग 62 राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय संगोष्ठी में शोध-पत्रों का प्रस्तुतीकरण।
  • इंडियन साइंस कांग्रेस मैसूर सन 2016 में प्रस्तुत शोध-पत्र को सम्मानित किया गया।
  • अंतर्राष्ट्रीय विज्ञान शोध केंद्र इटली में 1999 में शोध से संबंधित मार्गदर्शन प्राप्त किया। 
  • अंतर्राष्ट्रीय संगोष्ठी ‘एनकरेज’ ‘अलास्का’ अमेरिका 2010 में प्रस्तुत शोध पत्र अत्यंत सराहा गया।
  • एन.एस.एस.में लगभग 12 वर्षों तक प्रमुख के रूप में कार्य किया।
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय में अनेक वर्षों तक काउंसलर ।
  • आकाशवाणी से चिंतन एवं वार्ताओं का प्रसारण।
  • लगभग 110 से अधिक आलेख, संस्मरण एवं कविताएं पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित।

 प्रकाशित पुस्तकें- 1.दृष्टिकोण (सम्पादन) 2 माँ फिट तो बच्चे हिट 3.संचार ज्ञान (पाठ्य पुस्तक-स्नातक स्तर)

(ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है एक बहुआयामी व्यक्तित्व  सिद्धांतवादी पत्रकार – स्व. महेश महदेल” के संदर्भ में अविस्मरणीय ऐतिहासिक जानकारियाँ।)

स्व. स्व. महेश महदेल

☆ कहाँ गए वे लोग # ४५ ☆

☆ “सिद्धांतवादी पत्रकार – स्व. महेश महदेल” ☆ डॉ. वंदना पाण्डेय

दुनियाभर के ज्ञान और जानकारी को मस्तिष्क के गागर में भरे सामान्य सी कदकाठी और  व्यक्तित्व वाले अत्यंत सरलता, सहजता, सादगी पूर्ण, आडम्बर रहित जीवन यापन करने वाले महेश महदेल जैसे लोगों के लिए ही शायद “सिंपल लिविंग हाई थिंकिंग” जैसे वाक्य लिखे गए होंगें । अंतर्मुखी व्यक्तित्व वाले महदेल जी को शायद ही किसी ने प्रवचन, उपदेश, व्याख्यान देते सुना होगा, लेकिन जानकार लोग बताते हैं की अल्पभाषी, शान्त प्रकृति के महदेल जी से जब भी, जिस भी विषय पर जानकारी चाही जाती थी वे उसे समय, स्थान आंकड़ों, घटनाओं सहित इतना विस्तार से बताते थे कि घण्टों चर्चा में बीत जाने का भान ही नहीं होता था। मानो सब कुछ सिलसिले बार उनके मन मस्तिष्क पर अंकित हो।

परतंत्र देश में स्वतंत्र ख्यालों वाले आदरणीय महेश जी का जन्म 1942 में गांव रामगढ़ जिला डिंडोरी मध्य प्रदेश में हुआ था। प्रारंभिक शिक्षा के पश्चात उन्होंने जबलपुर के तत्कालीन रॉबर्टसन कॉलेज से शिक्षा पूर्ण की। उनके लिए शानदार वेतन  वाली शासकीय और अशासकीय नौकरियां बाहें फैलाए खड़ी थीं, किंतु ज्ञान पिपासु प्रबुद्ध महदेल जी ने अर्थ (धन ) को महत्व न देकर जीवन के मानवीय मूल्य के अर्थ को ही महत्व दिया । वे जानते थे कि सुख सुविधा और सिद्धांतों के रास्ते अलग अलग होते हैं। जीवनपर्यंत धन-दौलत, सुख-सुविधा, ताम-झाम से दूर रहे । कहा जाता है कि जिम्मेदारियां के बाजार में ऐसा संभव नहीं है किंतु इन सब के बावजूद उन्होंने अपनी पारिवारिक जिम्मेदारियों का निर्वहन करते हुए भाई-बहनों और परिजनों की मदद की, मार्गदर्शन किया । उन्हें पढ़ाने-लिखाने, स्वावलम्बी बनाने का पूर्ण दायित्व निभाया। आपने अविवाहित रहकर अपना संपूर्ण जीवन पत्रकारिता को समर्पित किया। पत्रकारिता उनके जीवन का हिस्सा बन गई सांध्य दैनिक जबलपुर से पत्रकारिता की प्रारंभ हुई यात्रा हितवाद, ज्ञानयुग प्रभात, देशबंधु आदि अखबारों से होती हुई ‘स्वतंत्र मत’ पर समाप्त हुई। जहां उन्होंने लगभग 20 वर्ष सेवाएं दीं। पत्रकारिता का लंबा और गहरा अनुभव उन्हें रहा। जिस नीर क्षीर परीक्षण विश्लेषण के साथ उन्होंने पत्रकारिता की वह अपने आप में विशिष्ट है। उनकी पत्रकारिता में वस्तुपरकता, तथ्यों की सच्चाई, शुद्धता, नवीनता, अनोखापन होता था। संतुलित,गरिमापूर्ण शब्द, निर्भीकता, निष्पक्षता, उत्कृष्ट अभिव्यक्ति उनकी लेखनी में परिलक्षित होती थी। उनके सहयोगी पत्रकार बताते हैं कि  अखबारों का चाहे अंतरराष्ट्रीय पृष्ठ हो, नगर समाचार का हो, व्यापार या कृषि समाचार का हो, विज्ञापन, सराफा बाजार या खेल का पृष्ठ हो सभी पृष्ठों को व्यवस्थित, सुसज्जित करने में उनका पूर्ण दखल था । उनके लेखन का कमाल उनकी संपादकीय में देखने मिलता था । अत्यंत सारगर्भित, धारदार शब्द, स्पष्टवादिता, रोचकता से भरी संपादकीय दिल पर छाप छोड़ने वाली होती थी । उत्कृष्ट साहित्य संपन्न उपयोगी पुस्तकों की समीक्षा और समालोचना भी उन्होंने बहुत लिखीं। ‘बाल विकास की डिक्शनरी’ के नाम से मेरी पुस्तक ‘मां फिट तो बच्चे हिट’ की उनके द्वारा लिखी समीक्षा भी लोगों द्वारा अत्यंत सराही गई। पत्रकारिता के विभिन्न आयामों को गहराई से जानने समझने वाले भले ही कई हों किंतु उसे सिखाने, बताने और समझाने वाले लोग कम ही होते हैं। उन्होंने अपने साथियों- सहयोगियों को बहुत कुछ सिखाया और अनुकरण हेतु सादगी, ईमानदारी, कर्तव्यनिष्ठा, कर्मठता, कार्य के प्रति जुनून का सबक भी कार्यशीलता से देते रहे। पत्रकारिता में जबरदस्त पैठ रखने के कारण सहयोगी उन्हें “लार्ड” के नाम से पुकारते थे वहीं अगली पीढ़ी उन्हें प्रेम आदर और अपनत्व के साथ कक्काजी कह कर आदर देती थी।

स्वभाव में फक्कड़ माननीय महदेल जी ने कभी संग्रह किया ही नहीं न धन का, न वस्तुओं का और तो और अपने लेखन का भी नहीं । उन्होंने अपनी मर्जी से जीवन जिया और मर्जी से ही जाते-जाते शरीर का दान देकर परोपकार की एक इबारत भी लिख गए।अहम, अहंकार से सैकड़ों कोसों दूर निराभिमानी महेश जी के शब्दकोश में आत्मावंचना, आत्म प्रदर्शन जैसे कोई शब्द ही नहीं थे। अपने चिंतन मनन और कार्य में समर्पित साहित्य प्रेमी महदेल जी साहित्यिक सम्मेलनों,  संगोष्ठियों में इतने सहजता, सादगी और निर्विकार रूप से सम्मिलित होते थे कि किसी का ध्यान उनकी ओर जा ही नहीं पाता था। नेपथ्य में कार्य करने की प्रवृति के कारण उनकी योग्यताओं, प्रतिभाओं को वैसा प्रचार-प्रसार नहीं मिल पाया जिससे वे प्रत्यक्ष रूप से जनसामान्य तक पहुंच सकें । पत्रकारिता के इस शहंशाह के लिए अब  केवल यही कहा जा सकता है..

वह ऊंचे कद का मगर झुक कर चलता था

 जमाना उसके कद का अंदाज न लगा सका।

पत्रकारिता में दधीचि की तरह उनके त्याग-समर्पण को कभी भुलाया नहीं जा सकता।

हजारों मंजिलें होंगीं हज़ारों कारवां होंगे मगर

ज़माना उनको ढूंढेगा न जाने वो कहाँ होंगे ..।

शत-शत नमन …

डॉ. वंदना पाण्डेय 

प्राचार्य, चंचलबाई पटेल महिला महाविद्यालय, जबलपुर

संपर्क : 1132 /3 पचपेड़ी साउथ सिविल लाइंस, जबलपुर, म. प्र. मोबाइल नंबर :  883 964 2006 ई -मेल : [email protected]

संकलन – श्री प्रतुल श्रीवास्तव

संपर्क – 473, टीचर्स कालोनी, दीक्षितपुरा, जबलपुर – पिन – 482002 मो. 9425153629

आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १ ☆ कहाँ गए वे लोग – “पंडित भवानी प्रसाद तिवारी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २ ☆ डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३ ☆ यादों में सुमित्र जी ☆ श्री यशोवर्धन पाठक ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४ ☆ गुरुभक्त: कालीबाई ☆ सुश्री बसन्ती पवांर ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ५ ☆ व्यंग्यकार श्रीबाल पाण्डेय ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ६ ☆ “जन संत : विद्यासागर” ☆ श्री अभिमन्यु जैन ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ७ ☆ “स्व गणेश प्रसाद नायक” – लेखक – श्री मनोहर नायक ☆ प्रस्तुति  – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ८ ☆ “बुंदेली की पाठशाला- डॉ. पूरनचंद श्रीवास्तव” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ९ ☆ “आदर्श पत्रकार व चिंतक थे अजित वर्मा” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ११ – “स्व. रामानुज लाल श्रीवास्तव उर्फ़ ऊँट बिलहरीवी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १२ ☆ डॉ. रामदयाल कोष्टा “श्रीकांत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆   

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १३ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, लोकप्रिय नेता – नाट्य शिल्पी सेठ गोविन्द दास ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १४ ☆ “गुंजन” के संस्थापक ओंकार श्रीवास्तव “संत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १५ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, कविवर – पंडित गोविंद प्रसाद तिवारी ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १६ – “औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆ 

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १७ – “डॉ. श्री राम ठाकुर दादा- समाज सुधारक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १८ – “राजकुमार सुमित्र : मित्रता का सगुण स्वरुप” – लेखक : श्री राजेंद्र चन्द्रकान्त राय ☆ साभार – श्री जय प्रकाश पाण्डेय☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १९ – “गेंड़ी नृत्य से दुनिया भर में पहचान – बनाने वाले पद्मश्री शेख गुलाब” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २० – “सच्चे मानव थे हरिशंकर परसाई जी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २१ – “ज्ञान और साधना की आभा से चमकता चेहरा – स्व. डॉ कृष्णकांत चतुर्वेदी” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २२ – “साहित्य, कला, संस्कृति के विनम्र पुजारी  स्व. राजेन्द्र “रतन”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २३ – “मेरी यादों में, मेरी मुंह बोली नानी – सुभद्रा कुमारी चौहान” – डॉ. गीता पुष्प शॉ ☆ प्रस्तुती – श्री जय प्रकाश पांडे ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २४ – “संस्कारधानी के सिद्धहस्त साहित्यकार -पं. हरिकृष्ण त्रिपाठी” – लेखक : श्री अजय कुमार मिश्रा ☆ संकलन – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २५ – “कलम के सिपाही – मुंशी प्रेमचंद” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २६ – “यादों में रहते हैं सुपरिचित कवि स्व चंद्रकांत देवताले” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २७– “स्व. फ़िराक़ गोरखपुरी” ☆ श्री अनूप कुमार शुक्ल ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २८ – “पद्मश्री शरद जोशी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २९ – “सहकारिता के पक्षधर विद्वान, चिंतक – डॉ. नंद किशोर पाण्डेय” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३० – “रंगकर्मी स्व. वसंत काशीकर” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३१ – “हिंदी, उर्दू, अंग्रेजी, फारसी के विद्वान — कवि- शायर पन्नालाल श्रीवास्तव “नूर”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३२ – “साइकिल पर चलने वाले महापौर – शिक्षाविद्, कवि पं. रामेश्वर प्रसाद गुरु” ☆ डॉ. वंदना पाण्डेय” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३३ – “भारतीय स्वातंत्र्य समर में क्रांति की देवी : वीरांगना दुर्गा भाभी” ☆ डॉ. आनंद सिंह राणा ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३४ –  “जिनके बिना कोर्ट रूम भी सूना है : महाधिवक्ता स्व. श्री राजेंद्र तिवारी” ☆ डॉ. वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३५ – “सच्चे मानव – महेश भाई” – डॉ महेश दत्त मिश्रा” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३६ – “महिलाओं और बच्चों के लिए समर्पित रहीं – विदुषी समाज सेविका श्रीमती चंद्रप्रभा पटेरिया” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३७ – “प्यारी स्नेहमयी झाँसी वाली मामी – स्व. कुमुद रामकृष्ण देसाई” ☆ श्री सुधीरओखदे   ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३८ – “जिम्मेदार शिक्षक – स्व. कवि पं. दीनानाथ शुक्ल” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३९ – “सहृदय भावुक कवि स्व. अंशलाल पंद्रे” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४० – “मानवीय मूल्यों को समर्पित- पूर्व महाधिवक्ता स्व.यशवंत शंकर धर्माधिकारी” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४१ – “प्रखर पत्रकार, प्रसिद्ध कवि स्व. हीरालाल गुप्ता” ☆ श्री यशोवर्धन पाठक ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४२ – “जिनकी रगों में देशभक्ति का लहू दौड़ता था – स्व. सवाईमल जैन” ☆ डॉ. वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४३ – “संवेदनशील कवि – स्व. राजेंद्र तिवारी “ऋषि”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४४ – “कर्णदेव की दान परम्परा वाले, कटनी के पान विक्रेता स्व. खुइया मामा” ☆ श्री राजेंद्र सिंह ठाकुर ☆

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  ≈

Please share your Post !

Shares