मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.) – इथून पुढे —- 

 ज्ञानेश बापूसाहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. केरबा सारखी प्रामाणिक माणसं आता क्वचित. पण मला सांगा हा केरबा राहतो कुठे?

बापूसाहेब इथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे, तेथील बाजूच्या जंगलात याची झोपडी आहे. याची म्हातारी मेली. आता हा आणि त्याचा मुलगा म्हदबा दोघेच राहतात. बरं तर मग असं म्हणून ज्ञानेश उठला आणि आपल्या हॉटेलवर गेला.

ज्ञानेश च्या लक्षात आलं आता केरबाचा मुलगा  म्हदबा याला गाठावं लागणार. त्याने त्याच्या कंपनीचा सेल्समन अजय याला बोलावले आणि ताबडतोब हॉटेलकडे बोलावले.

ज्ञानेश अजय एक कंपनीचे महत्त्वाचे काम आहे. आणि तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. येथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे हे तुला माहित असेलच. त्या गावात जायचं. तेथे केरबा धनगर नावाचा माणूस राहतो. अर्थात तो जंगलात झोपडीत राहतो. शेळ्या मेंढ्या राखत असणार. त्याचा मुलगा आहे महादबा. त्याची माहिती काढायची. त्याला जास्त काय आवडते हे चौकशी करायची. पण लक्षात ठेव. त्याची चौकशी करत आहोत हे  म्हदबाला कळता कामा नये. तू हे महत्त्वाचे कंपनीचे काम आहे, ते व्यवस्थित केलेस तर मी तुझी शिफारस करीन.

अजय मोटार सायकलने भडगाव मध्ये गेला.  भडगाव मधील केमिस्ट मनोहर त्याच्या खास ओळखीचा.

अजय मनोहर तुला या गावातला केरबा धनगर माहित असेल. त्याचा मुलगा म्हदबा याला ओळखतॊस का, कसा आहे आणि कसले व्यसन वगैरे आहे का?

मनोहर केरबा हा सरळ माणूस आहे, दारूच्या थेंबालाही शिवत नाही, पण त्याचा मुलगा महादबा हा पक्का बेवडा आहे. दिवस-रात्र दारूच्या नशेत पडून असतो. आता थोड्यावेळाने या देशी दारूच्या दुकानात येईल.

आणि खरंच थोड्या वेळाने म्हदबा देशी दारूच्या दुकानाकडे जाऊ लागला. अजयला अंदाज होताच म्हणून जाताना त्याने पाच सहा इंग्लिश दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या होत्या. त्याने म्हदबाची ओळख काढली दारूच्या बाटल्या दाखवून त्याला गाडीवर बसवले आणि ज्ञानेश च्या हॉटेल कडे घेऊन आला. एवढं मोठं हॉटेल बघून म्हदबा बावचाळून गेला. खोलीत आल्यावर ज्ञानेशने त्याला आपल्याकडच्या बाटल्या दाखवल्या.

म्हदबा मला इत कशाला आणलंय?

ज्ञानेश दारू प्यायला! पी हवी तेवढी दारू.’

ज्ञानेशने दारूची बाटली उघडली आणि ग्लासात ओतली, म्हडबाने एका दमात ग्लास रिकामा केला. दुसरा भरला दुसरा रिकामी, असे पाच ग्लास पटापट रिकामी केली.

ज्ञानेश मादबा लेका, एक काम होत, तुझ्या बाबाकड एक औषधाची मुळी आहे, त्याच्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. ती मुळी कोणत्या झाडाची हे फक्त तू आम्हाला सांगायचे. तू जर ते सांगितलेस तर तुला हवी तितकी दारू देतो. आणि भरपूर पैसे देतो. ज्ञानेशने पैसे भरलेली सुटकेंस दाखवली. तुझा बाबा तसा मुळी द्यायला ऐकायचा नाही, जर ऐकला नाही  तर त्याला हे दाखवायचं, अस म्हणून ज्ञानेशने एक सुरा म्हडबाच्या हातात दिला. हा सुरा मानेवर ठेवलास की तो घाबरून ती मुळी तुला दाखवेल. त्या मुलीचे झाड आम्हाला दाखवायचे. मग तुला हे सगळे पैसे हवी तेवढी दारू  “.

दारू पिऊन पिऊन तोल जाणाऱ्या म्हदबाला अजय ने त्याच्या गावात सोडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेब घरी हॉलमध्ये चहा घेत होते. एवढ्यात ” बापूसाहेब, बापूसाहेब चला माझ्याबरोबर ” असं म्हणत केरबा धावत धावत बापूसाहेबांच्या घरी आला,

” अरे कुठे?

” बापूसाहेब, माझ्या जीवाचं मला काय खरं वाटत नाय, माझा पोरगा राती सुरा घेऊन माझ्या मागे धावत होता. त्या मुळीच झाड मला दाखव म्हणूंन सांगत व्हता. बापूसो, तुमास्नी त्ये झाड दाखवितो आणि जबाबदारीतून मोकळा होतो. “.

” कसली जबाबदारी?’

“माझ्या आजानं मला सांगितलं व्हतंमुळीचा बाजार करायचा न्हाई, झाड कधी दाखवायचं असलं तर फकीत राज वैद्यना दसखवायचं. कारण त्या घराण्याने आमच्या राजाला बर केल व्हतं.’.

” आरो पण मी त्या मुळीच झाड बघून काय करू?

” बापूसो, तुमी राज वैद्यसाच्या घराण्यातले, परत एकदा दवा तयार करा, “.

आर, पण तू त्याचा बाजार करायचा नाही असं म्हणतोस ना?”.

“तुमी सोडून कुंनी नाही करायचं, फक्त तुमी करू शकत “. चला चला बापूसाहेब घाई करा “.

 बापूसाहेबांनी आपला मुलगा दिलीप ला सोबत घेतला. दिलीप ने गाडी बाहेर काढली  आणि केरबा आणि बापूसाहेब मागे बसले. किरबा दाखवत होता त्या रस्त्याने दिलीप गाडी चालवत होता. वीस पंचवीस किलोमीटर गेल्यावर कीरबानी गाडी थांबवायला सांगितली. आणि खूप उभ्या चढणीवर तो चालायला लागला. बापूसाहेबांना एवढं चढणे शक्य नव्हते म्हणून फक्त दिलीप त्याचे बरोबर गेला.

केरबाने तेथेच दिलीप ला ती झाडे दाखवली. त्याची मुळी कशी काढायची हे पण दाखवले. बापूसाहेब केरबाला आपल्या घरी चल आज तिथेच रहा म्हणून आग्रह करत होते, पण केरबा ने  मानले नाही.

त्याच रात्री दारूच्या नशेत केरबाच्या मुलाने म्हडबाने केरबाचा सुरा पोटात खुपसून खून केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेबांना ही बातमी कळली, बापूसाहेब मुलगा दिलीप सह धावले, केरबाचे प्रेत झाडीत टाकून दिलेले होते. आणि बाजूला दारू पिऊन म्हडबा पडला होता. बापूसाहेबांनी दोन-तीन माणसांना बोलावून केरबाचे प्रेत आपल्या गाडीत घेतले आणि दोन किलोमीटर वरील आपल्या स्वतःच्या जमिनीत त्याचे पुढचे विधी केले.

बापूसाहेब कित्येक दिवस सुन्न सुन्न होते, आपल्यामुळे केरबा हकनाक मेला असे त्यांचे मत झाले. मुंबईच्या शिर्के साहेबांना किरबाच्या मरण्याची बातमी कळली. ते मुद्दाम बापूसाहेबांना भेटायला आले. बापूसाहेबांनी त्या दिवशी मुद्दाम केरबा धावत धावत आला आणि त्या मुळीची वनस्पती दाखवली हे पण सांगितले.

शिर्के साहेब बापूसाहेब तुम्ही राजवैद्य आहात. तुम्ही पुन्हा औषधाच्या व्यवसायातउतरायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान आहे आणि आता ही मुळी आणि तिची वनस्पती पण तुम्हाला कळली आहे, मग आता वाट कसली बघता?

बापूसाहेब शिर्के साहेब, आम्ही राजवैद्य असलो तरी आमच्याकडे पैशाची कमी आहे, आमच्याकडे दाम नाही आम्ही एवढी वर्ष गप्प आहोत.

शिर्के साहेब बापूसाहेब, . तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तेवढे कर्ज बँक देईल. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था मी करतो. आणखी काही रक्कम कमी पडत असेल तर मी तुमच्या मागे आहे. पण तुम्ही आता आयुर्वेदिक कंपनी सुरू करायलाच हवी. केरबाचीमुळीचा लोकांना फायदा व्हयला हवा “.

आणि शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका बँकेचा मॅनेजर सकाळीच त्यांच्या घरी हजर झाला. शिर्के साहेबांनी तुम्हाला हवे तेवढे कर्ज द्यायला सांगितले आहे, जामीन स्वतः शिर्के साहेब राहणार आहेत, तुम्हाला किती कर्ज हवे ते मला सांगा ‘. बापूसाहेबांनी मुलगा दिलीप याला हाक मारली. दोघांनी म्हणून विचार केला आणि कर्जाच्या अर्जावर सही केली.

ज्या ठिकाणी केरबाचे अंत्यविधी केले गेले, त्याच्या शेजारीच ” केरबा फार्मा ‘ उभी राहिली. गेटमधून आत गेल्यावर केरबा धनगरच पुतळा तुमचे स्वागत करेल, त्याला नमस्कार करून आत गेल्यावर  केरबा फार्मा ची भली मोठी फॅक्टरी आणि दिलीप रावांचे मोठे सेल्स ऑफिस भेटेल.

दिलीप रावांनी आपल्या मित्रमंडळींची मदत घेऊन केरबा फार्मा चा व्यवसाय खूप वाढवला. यावर्षी केरबा फार्माने शंभर कोटीचा व्यवसाय पुरा केला.

आपले राज वैद्य बापूसाहेब नवीन नवीन आयुर्वेदिक संशोधनात मग्न आहेत, हे सर्व केरबा धनगराच्या कृपेने याची जाणीव राजवैद्यन आहे.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

What a level of confidence !

माझ्या स्कुटरचा हेड लाईट ७ – ८ दिवसांपासून बिघडला होता. रोज बावधनहून घरी परत येतांना अंधार झालेला असतो, त्यामुळे हेड लाईट शिवाय गाडी चालवणे, जरा किंवा चांगलेच रिस्की वाटायचे. आळस केंव्हातरी अंगाशी येतोच – येतो, असं आपण मानतो. कल करे सो आज कर, वगैरे, अशा सगळ्या म्हणी मला पाठ आहेत. तरीही रिपेअर करायला मुहूर्त लागत नव्हता. आणि टाळाटाळ करण्याचं शुल्लक कारण होतं, आणि, ते म्हणजे, माझ्या नेहेमीच्या मेकॅनिकचे दुकान, माझ्या रोजच्या जाण्या – येण्याच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला होते.  

त्यामुळे, लाईट दुरुस्त करायचा, म्हणजे सकाळी त्याच्याकडे गाडी न्यायची, तो म्हणणार, साहेब तासाभरानी या, करून ठेवतो. चालत घरी यायचं. तो वेळेत करून ठेवेल, यावर आपला कधीच विश्वास नसतो. म्हणून आपण त्याला फोन करणार, ‘झालीय का’.  मग चालत जाणार आणि गाडी आणणार.  दिव्यासारख्या किरकोळ कामाकरता इतके सोपस्कार नकोत, म्हणून, ‘आज करे सो कल कर, आणि कल करे सो परसो कर ’ असा माझा उलटा प्रवास सुरु होता.

काल रविवार होता. दुपारी आमचे युरोप मित्र श्री नेरकर यांच्याकडे गेलो होतो. घरी परत येतांना लक्षात आलं, की, मेकॅनिकचे दुकान याच रस्त्यावर आहे. विचार केला, की, गाडी त्याच्याकडे टाकू, रिपेअर होईपर्यंत इकडे -तिकडे बघू, टाईम पास करू. बायको घरी चालत जाईल.  ‘कल करे सो आज कर, आणि आज करे सो अभी’, असा  विचार पक्का झाला. कार्पोरेशन बॅंकेजवळ पोहोचलो आणि लक्षात आलं, की, इथे एक स्पेअर पार्टचं दुकान आहे आणि तिथे मेकॅनिक पण असतो. विचार बदलला. इथेच गाडी टाकली तर काम लवकर होणार, हे नक्की. 

बायको चालत घराकडे निघाली, मेकॅनिकला लाईटबद्दल सांगितले. त्यानी चेक केले आणि म्हणाला स्विच बदलावा लागेल. मी पैसे विचारले आणि दुकानात पैसे देईपर्यंत, यानी स्विच काढला – नवीन बसवला, म्हणाला साहेब गाडी झाली, घेऊन जा. जुना स्विच त्यानी माझ्या हातात दिला. 

मी : (सवयीप्रमाणे विचारलं) गाडी चालू करून लाईट लागतो, हे चेक केले ना ? 

मेकॅनिक : साहेब, त्याची काही गरज नाही. गाडी चालवतांना अंधार पडला, की, बटन ऑन करा. लाईट लागणार 

मी : एकदा चेक तर करून घ्या 

मेकॅनिक : साहेब, दुकानात सगळा  माल ओरिजिनल असतो. त्यामुळे मालावर माझा पूर्ण विश्वास आहे. काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी कधीच मनात आणत नाही. त्यामुळे Always do it right, first time हा माझा मोटो आहे. काम चुकायची गुंजाईश – झिरो. 

मी (मनांत)  : हा माणूस आपल्यापेक्षा खूपच वर पोहोचलेला दिसतोय. 

मी मेकॅनिक ला थँक्स म्हणालो आणि गाडी सुरु केली. अजून लख्ख उजेड होता, पण सवयीप्रमाणे, माझा अंगठा लाईटच्या बटनावर गेला, की, निघण्यापूर्वी लाईट लावून बघावा म्हणून. पण लगेच विचार आला, की, मेकॅनिक ला बटणाच्या क्वालिटीवर आणि स्वतःच्या कामावर इतका विश्वास आहे, तर मला त्याच्या कामावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. माझा अंगठा आपोआप मागे आला. तेवढ्यात एका जवळच राहणाऱ्या मित्राचा फोन आला, थोडावेळ घरी येऊन जा, एक स्पेशल डिश आहे. 

मित्राकडून निघतांना चांगलाच अंधार पडला होता. गाडी सुरु केली. लाईट चे काम झाले आहे, हे माहित होते. बटन सुरु केलं आणि लाईट सुरु. मेकॅनिक बद्दल तोंडातून आपोआप शब्द आले – What a level of confidence !

घरी आल्यानंतर, मेकॅनिकचे, “काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी मनात आणत नाही”, “Always do it right, first time हा माझा मोटो आहे. त्यामुळे काम चुकायची गुंजाईश – झिरो”, हे शब्द मनात घुमायला लागले. आणि मी भूतकाळात गेलो —

* कुणाच्या खात्यात बँकेत चेक भरायचा असेल, तर चेक लिहिल्यानंतर मी २-३ वेळा सगळे बरोबर आहे ना ! हे चेक करतो आणि बँकेत चेक बॉक्स मध्ये टाकण्यापूर्वी पुन्हा बघतो, कि, काही चुकले तर नाही ना !

* घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे असेल, तर ५-६ वेळा तरी कुलूप ओढून बघतो. नंतर गाडीत बसल्यानंतर काही वेळा मनात रुख-रुख राहते, की, कुलूप बरोबर लागलय ना, कार्पोरेशन चा पाण्याचा नळ बघायचा राहिला आहे – सुरु राहिला असेल तर काय होणार 

* कार लॉक करून आपण घरात येतो आणि मनात पाल चुकचुकते कि पार्किंग लाईट ऑन तर नसतील 

* एकदा आम्ही मित्र कारनी बाहेरगावी निघालो. थोडं पुढे गेलो आणि एक जण म्हणाला, गाडी मागे घे. दाराला बाहेरून कुलूप लावले आहे का नाही, आठवत नाही. संध्या चोऱ्या खूप होतायत. एक जण म्हणाला, बाहेरून एक्स्ट्रा कुलूप लावणे जास्त अनसेफ आहे. चोरांना खात्री असते, की, आत कुणी नाही आणि आपला मार्ग मोकळा आहे. लॅच चे कुलूप जास्त सेफ आहे, काळजी करू नको. पण मित्राला ते पटले नाही. आम्ही कार वळवली. घरी गेलो. कुलूप व्यवस्थित होते. तरी मित्रानी २-३ दा ओढून बघितले आणि आम्ही निघालो. 

* बऱ्याच वेळा आपण छोटा मोठा प्रवास करून, एखाद्या जागृत देवस्थानाला जातो. आत जातांना काहीतरी इच्छा घेऊनच आत जातो. मुद्दाम पूजेचे साहित्य विकत घेतो, फुलं घेतो. आत गेल्यावर व्यवस्थित दर्शन होतं. प्रसन्न मनानी आपण बाहेर पडतो. आणि मंदिराच्या बाहेर पडल्यावर लक्षात येतं, की, अरे, देवाकडे जे मागण्याकरता आपण इथपर्यंत आलो होतो, ते तर मागायचंच राहीलं .  

अशी भली मोठी यादी नजरेसमोरून जायला लागली. माझ्यासारखे अजून बरेच ‘मी’ नक्कीच असतील. आणि सगळ्यांचे असेच वेगळे वेगळे अनुभव पण असतील. या आपल्या अशा सवयीमुळे, वेळ तर वाया जातोच जातो आणि ताणतणाव पण वाढतात. जेवतांना कधी जोरदार ठसका लागतो, कधी पाय घसरून पडायला होतं, कधी भाजी चिरतांना चाकू हाताला लागतो, अपघात होतात, तब्येत बिघडते वगैरे, वगैरे.  

आणि या सगळ्याचं कारण काय? तर, कहींपे निगाहे – कहींपे निशाना आणि  Not doing things Right, at first time. ‘जहापे निगाहे – वहींपे निशाना’ हे जर जमवलं, तर काहीच कठीण नसतं. ह्याच आधारावर  स्वयंवर जिंकल्याचं महाभारतामधलं उदाहरण आहेच. आणि त्याकरता गरज आहे – मन लावून काम करण्याची – हातातले काम आणि मी यामध्ये इतर विचार न आणण्याची. असं म्हणतात, आंघोळ करत असाल तर – फक्त मी आणि आंघोळ यावर लक्ष ठेवा, जेवत असाल तर – समोरचे चविष्ट अन्न चावून खाणे आणि  मिळणारा आनंद यावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही बघत असाल तर फक्त टीव्ही एन्जॉय करा. टॉयलेट ला गेला असाल तर फक्त तेच – फोन नाही / फेस बुक नाही.  एका वेळेस एकच काम आणि ते पण मन झोकून. 

मी मनात खूणगाठ बांधली, की, या क्षणापासून Do it right – First time चा अवलंब करायचा. रोज सकाळी उठल्यावर मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे. रोज रात्री झोपण्यापूर्वी मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे, म्हणजे ते अंतर्मनात रुजतील. असं सांगतात, की, एखादी गोष्ट सतत ३० दिवस केली, तर ती सवय लागते आणि ६० दिवस केली, तर तो स्वभाव बनतो. 

आणि मग एक दिवस, आपलेच अंतर्मन, आपल्या कामाकडे बघून म्हणेल – What a level of confidence!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

(दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!) – इथून पुढे —-

पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई… दया, करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही… यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते…

तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो… आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा, माया आणि प्रेम नावाच्या भावना…! यातलंच एक नाव श्री. दानिश भाई…!!!

आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? 

आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो…. असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे. 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण) –

वैद्यकीय, त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे ) हे आमच्या पथ्यावर पडले…! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत.

अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला “निर्माल्य” म्हटले जाते…. अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला “कचरा” म्हटले जाते… आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं …! आपण “निर्माल्य” की “कचरा”… ? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो. 

* आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 

* ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे 😊) वर्गवारी करतील. 

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 

* यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. 

यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत… जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला  सेंचुरी एन्का कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 

तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत…. रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं… आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 

माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई… लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती…  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो…. आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली… आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे… या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे… आईच ती… नाही म्हणेल कशी…. ? 

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. 

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही‌)

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 

Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे.

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे… ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे… ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे… 

भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी…  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती… जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा… अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं… विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं… या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले… डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला… !

ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल… सन्मानाने ! 

दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात…. ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात… आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील…. आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… ते स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!

ठरलं… आता ठरलं…. 

आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य…!!!” हेच ठेवायचं ठरलं… 

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो…. आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल…

सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे 25 लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून …

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 150 प्रतिदिन.
  2. सकाळचा चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  3. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा.

अंदाजे रुपये 300 दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे…  25 लोकांसाठी रुपये 7500 प्रति दिवस… सुट्ट्या वगळता 25 दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये 1, 87, 000 (एक लाख सत्याऐंशी हजार)… यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 

आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे… रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील…! असो…

हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 

चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात 30 मार्च 2025  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची “मनीषा” आहे…! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन…

प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे… इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल… हि श्रद्धा आहे… आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे…

मला काही नको… फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा…!!!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे ||

 *

रवि जरासा अवखळ भारी

एका जागी स्थिर नसे

एका जागी नित्य उगवणे

हेच तया मंजुर नसे  ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

मजला येईल कंटाळा   ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायाचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

पश्चिमेस जा अस्ताला  ।।

 *

परि उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

जागा बदले नित्याची  ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे ।


कवी :ॲड .समीर आठल्ये

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ☆ सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ? सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

सुश्री नीलांबरी शिर्के

हिरवा चुडा हातात लेऊन

झाड हळदुले नवरी झाले ..  की ..  

रविराजाने विसरून जाऊन

सुवर्ण घडे इथे ओतले

*

रखरखत्या उन्हात फिरता

दृश्य असे दृष्टीस पडता

निसर्ग संपन्नतेपुढे आपला

आपसुक झुकतोच ना माथा  

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

डॉ.सोनिया कस्तुरे

निसर्गाची गुढी | उभी उंच नभी 

तम, प्रखरता | नाही तमा मनी

*
डौलदार बांधा | हळद पिऊनी 

सोनेरी झुंबर | जणू नभांगणी

*

कोवळी नाजुक | हिरवी पालवी

अंगीखांदी कशी | मधून डोकावी

*
रुणझुण तिला | पवन डोलवी

गाणे सुखे गाते | रणरणत्या उन्ही

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

( ३ )

श्री आशिष बिवलकर   

ऋतू चक्राचा

घेऊन सांगावा |

चैत्र पावलांनी,

फूलला बहावा |

*
ग्रीष्माचा कहर,

तापले माळरान |

पिवळ्या फुलांनी,

सजला तरु छान |

*
उकाड्याने हैराण,

जीवास लागे उमासा |

रंगांची चाले उधळण,

दृष्टीस मिळे दिलासा |

*
तरुवर लटकली झुंबरे,

तरुतळी गालिचा सुवर्ण |

उष्ण गंधीत समीर,

डुलती तालावर पर्ण |

*
रंगांनी रंगला बहावा,

नादच त्याचा खुळा |

निरंतर चालत असे,

निसर्गाचा सोहळा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

मड व्होल्कॅनो 

व्होल्कॅनो अर्थातच ज्वालामुखी हा तसा परिचित शब्द. पण मड व्होल्कॅनो हा काहीसा वेगळा शब्द. आमचं कुतूहल चांगलंच चाळवलं गेलं होतं. आज अंदमानच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. रामनं, (आमचा टूर लिडर) रात्री झोपताना निक्षून सांगितलं होतं की भल्या पहाटे तीन वाजता आपण हॉटेल मधून बाहेर पडणार आहोत. जो बरोबर तीन वाजता बस मध्ये नसेल त्याला न घेता बस निघेल.पावणेतीन वाजताच आम्ही सगळे हॉटेल लाऊंजमध्ये हजर होतो. 

वीर सावरकरांना मानवंदना करून, बाप्पाच्या जयजयकारात प्रवास सुरू झाला. आमच्या हॉटेलपासून साधारण अडीच तास प्रवास करुन आम्ही मध्य अंदमानला आलो. इथं जलडमरु बॉर्डरवर बाराटांगला जाण्यासाठी गेट आहे. हे गेट सकाळी सहा वाजता व नऊ वाजता उघडते. दुपारी तीन वाजता ते बंद होते. बारटांगला जाणारा रस्ता जंगलाच्या अशा भागातून जातो जेथे आदिवासी लोकांचा भाग आहे. जारवा जातीच्या या आदिवासींच्या सुरक्षिततेकरता हा भाग प्रतिबंधित आहे. गेटवर आधारकार्ड (परदेशी प्रवाशांना पासपोर्ट ) दाखवावे लागते. मगच प्रवेश करता येतो. 

आपण फार लवकर आपली झोप सोडून आलोय.  गेटवर आपलीच बस पहिली असेल हा भ्रमाचा भोपळा तिथं पोचतात फुटला. आमच्या पुढे एकशे छत्तीस गाड्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे स्टॉल्स होते. गरमागरम मेदूवडे आणि डाळवडे तयार होते. पट्टीचे खाणारे मात्र हवेत. 

आदिवासी पाड्यातील जारवा लोक रस्त्यात दिसण्याची शक्यता होती. ते लुटारू आहेत असं ऐकलं होतं. या रस्त्यावर बसच्या वेगाला मर्यादा आहे. कारण क्वचित एखादा प्राणी रस्त्यावर आलेला असू शकतो. जारवांना बघून उत्साहित होऊन काही करायचं नाही. हात हलवायचा नाही. थांबायचं नाही. फोटो काढायचा नाही. त्यांना काही खाऊ द्यायचा नाही. अशा सूचनांचे फलक रस्त्यावर लावलेले आहेत. आम्हाला कोणताच वाईट अनुभव आला नाही. परतीच्या प्रवासात आम्हाला जारवांचे बच्चू दिसले. एक दोन नाही तर सहा बच्चू. काळीकुळकुळीत, उघडबंब, कोरीव शिल्पासमान ती सहा कोकरं रस्त्याच्या कडेला ओळीनं उभी होती. हसरे चेहरे, काळेभोर टप्पोरे डोळे बसकडे मोठ्या आशेनं बघतायत का? 

खूप कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या पाळल्या. 

जारवा ही आदिवासी भागात राहणारी जमात. दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवरील जंगलात यांची वस्ती आहे. बांबू, नारळाच्या झावळ्या, काठ्या यापासून घरं बांधून राहतात. घर नव्हे खरंतर झोपडीवजा आडोसा म्हणावा. हे निसर्गाशी एकरूप होऊन गेले आहेत. निसर्गाचे नियम त्यांना मान्य आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. त्सुनामी मध्ये हे लोक मृत्युमुखी पडले नाहीत. या संकटाची कल्पना त्यांना आधीच आली असावी. फळं कंदमुळं मासे हे त्याचं प्रमुख अन्न. न शिजवता कोणतीही प्रक्रिया न करता हे लोक अन्न खातात. मीठ मसाला तेल यांचा वापर न करता आपण ज्याला ब्लाण्ड म्हणतो तसं अन्न ते घेतात. आपल्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहेत हे लोक. त्यांना त्याची काही गरजही नाही. पण भारत सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलिकडेच एकोणीस जारवांना त्यांचे ओळख पत्र दिले गेले आहे. 

जेटीवर पोचतात आम्ही बसमधून उतरलो आणि एका मोठ्या क्रूझ मध्ये चढलो. आमची बस आणि काही गाडय़ा या क्रूझमध्ये चढवल्या गेल्या. चारशे पाचशे माणसं बसू शकतील अशी क्रूझ अर्धा पाऊण तास प्रवास करुन बारतांग बेटाला लागली. तिथून पुढे आम्ही छोट्या छोट्या जीपनं बॅरन बेटावर गेलो. जाताना वाटेत आदिवासी आणि त्यांची वस्ती दिसत होती. आता साधारण पंधरावीस मिनिटांचा ट्रेक होता. टेकडीवजा रस्त्यानं चढ चढून आम्ही माथ्यावर पोचलो. आजूबाजूला चढताना थोडी झाडी होती. पण दाट जंगल नव्हते. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र स्तंभित झालो आम्ही. कारण समोर ठिकठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी दिसत होते. हे ज्वालामुखी सक्रिय नव्हते. तरी त्यातून हळुहळू बुडबुडे येताना दिसत होते. काही लहान काही मोठे. चिखलाचे लहान मोठे डोंगर किंवा ढीग म्हणावेत . आणि प्रत्येक डोंगराच्या टोकावरून हलकेच येणारे बुडबुडे. निसर्गातला हा चमत्कार बघताना मन थक्क होतं. निसर्ग पोटात काही ठेवून घेत नाही. काही सजीवांचे निर्जीव घटकांचे पृथ्वीच्या पोटात खोल कुठेतरी विघटन होत आहे. त्या विघटनात उत्सर्जित होणारे काही वायू बाहेर पडताना स्वतःबरोबरच तिथला थंड झालेला चिखलाचा ज्वालामुखी घेऊन बाहेर पडतात. विश्वंभरानं किती विचार करून हा खेळ मांडला आहे. किती जटील आणि गुंतागुंतीची रचना केली आहे. आणि ती जटीलता सोपी करण्याचे मार्ग देखील तयार केले आहेत. गुंतागुंतीची कोडी तितक्याच हलक्या हातानं नाजूक बोटांनी कुशलतेने सोडवली आहेत. म्हणूनच तर आपण सुरक्षित आनंदी जीवन जगत आहोत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची… 

– क्रमशः भाग चौथा

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “विश्वास…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “विश्वास…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

वे हमारे पडोसी थे। महानगर के जीवन में सुबह दफ्तर के लिए जाते समय व लौटते समय जैसी दुआ सलाम होती, वैसी हम लोगों के बीच थी। कभी कभी हम सिर्फ स्कूटरों के साथ हाॅर्न बजाकर, सिर झुका रस्म निभा लेते।

एक दिन दुआ सलाम और रस्म अदायगी से बढ कर मुस्कुराते हुए वे मेरे पास आए और महानगर की औपचारिकता वश मिलने का समय मांगा। मैं उन्हें ड्राइंगरूम तक ले आया। उन्होंने बिना किसी भूमिका के एक विज्ञापन मेरे सामने रख दिया। मजेदार बात कि हमारे इतने बडे कार्यालय में कोई पोस्ट निकली थी। और उनकी बेटी ने एप्लाई किया था। इसी कारण दुआ सलाम की लक्ष्मण रेखा पार कर मेरे सामने मुस्कुराते बैठे थे। वे मेरी प्रशंसा करते हुए कह रहे थे – हमें आप पर पूरा विश्वास है। आप हमारी बेटी के लिए कोशिश कीजिए। मैंने उन्हें विश्वास दिलाया कि मैं इसके लिए पूरी कोशिश करूंगा। नाम और योग्यताएं नोट कर लीं।

दूसरे दिन शाम को वे फिर हाजिर हुए। मैंने उन्हें प्रगति बता दी। संबंधित विभाग से मेरिट के आधार पर इंटरव्यू का न्यौता आ जाएगा। बेटी से कहिए कि तैयारी करे।

– तैयारी? किस बात की तैयारी?

– इंटरव्यू की और किसकी?

– देखिए मैं आपसे सीधी बात करने आया हूं कि संबंधित विभाग के अधिकारी को हम प्लीज करने को तैयार हैं। किसी भी कीमत पर। हमारी तैयारी पूरी है। आप मालूम कर लीजिएगा।

मैं हैरान था कि कल तक उनका विश्वास मुझमें था और आज उनका विश्वास…?

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कथा-कहानी ☆ अधूरी बात… ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)

☆ कथा-कहानी ☆ अधूरी बात… ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

‘ऐ ठहरो!’ गढ़वाल राइफल्स का फौजी गौण सिंह थपलियाल की आवाज़ कड़क हो गई, ‘देख नहीं रहे हो बोट भर चुकी है ?’

‘मगर मेरे सारे घरवाले तो उसमें बैठ गये। मेरे अब्बा, अम्मीं, मेरे बच्चे और मेरी बीवी -।’ वह आदमी हाथ में एक भारी सा बैग थामे गिड़गिड़ा रहा था।

‘तो क्या? बाद में आना। अगली पारी में।’ गौण सिंह मानो किसी बेजान दीवार से बात कर रहा है। उसकी आवाज़ को कोई संवेदना छू तक नहीं जाती।

नाव में बैठी उसकी बीवी उठ खड़ी हो गई, ‘सा‘ब जी, उसे हमारे साथ आने दो। वरना मुझे भी यहाँ उतार दो।’

‘ऐ औरत, चुप मारके बैठो। वरना सभी को उतार देंगे। फिर डूब मरना बाढ़ के इन सैलाबों में।’ आवाज़ में मिलिट्री रोब की तल्खी उतर आयी।

उस आदमी की बूढ़ी माँ अपनी आँखें पोंछती जा रही थी। डोगरी में उसने भी कुछ कहने की कोशिश की। मगर होठों के शब्द मुँह के अंदर ही गुम हो गये। उसके बच्चे और अब्बा असहाय सा इधर उधर देख रहे थे।

किया क्या जाए? यह काम ही ऐसा है कि सख्त होना पड़ता है। वरना बाढ़ के पानी में अगर मिलिट्री रेसक्यू बोट ही डूब जाए तो ऊपरवालों को जवाब देना नहीं पड़ेगा ? और अखबार में जो छी छी होगी – वो ?

करे तो क्या करे गौण सिंह ? उसका मिजाज तो ऐसे ही खट्टा है। चार दिनों से घर पर बात भी जो न हो सकी। क्या सोच रहे हैं बाबूजी, अम्मां, ? और रामबाला ? बस, यह बात करने के लिए ही तो थपलियाल ने आते समय बीवी को मोबाइल खरीद कर दिया था, ‘रोज एकबार मुझसे बात कर लिया करना। बार्डर की पोस्टिंग पर तो इससे बात नहीं हो पायेगी। तब तो छावनी के टेलिफोन से ही मैं बात कर लूँगा। बस, जब यूनिट स्टेशन पर रहेगा तो इससे जब चाहे बात कर लेना।’

मगर चार दिन हो गये मोबाइल एकदम गूँगा बना बैठा है। धत तेरी की। जम्मू कश्मीर में बाढ़ क्या आयी चिनाब झेलम के सैलाब में गांव, कसबे तो क्या शहर की इमारतें भी डूबने लगीं। साथ साथ ले डूबी सेना के जवानों की इस खिड़की से आती जाड़े की धूप सी मुठ्ठी भर खुशी को भी। ज़ाहिर है थपलियाल का मिजाज चिड़चिड़ा हो गया है।

फिर राजस्थान से जब उसका ब्रिगेड कश्मीर के लिए रवाना हुआ तो फोन पर यह बात सुनकर अम्मां तो क्या बाबूजी भी रो पड़े थे, ‘सारे देश में पोस्टिंग के लिए और कोई जगह नहीं मिली? वहाँ तो आये दिन बम और धमाके और फायरिंग -’

मोबाइल पर मेसेज में एक ‘जोक’ आया था। कश्मीर और खूबसूरत बीवी में क्या समानता है? दोनों पर पड़ोसी नजर गड़ाये रहते हैं। कैंटीन में जवान उसे पढ़कर खूब हँस रहे थे। लेकिन नौकरी नौकरी है। और आर्डर आर्डर। इससे छुटकारा कहाँ ? तो चलो …….

फिर, सूबेदार शिवपाल यादव गाली देते हुए कह नहीं रहा था ? ‘ये कश्मीरी साले सब बेईमान हैं। खायेंगे हिन्दुस्तान का और वफ़ादारी निभायेंगे पाकिस्तान से। सब के सब आईएसआई के एजेंट।’

उधर जब मिलिट्री का कारवाँ ट्रकों पर गुजरता है तो गौण सिंह ने सड़कों पर खड़े लोगों में – खासकर नौजवानों की निगाहों में देखा है – एक धिक्कार! एक घृणा!

बार बार गढ़े मुर्दे उखाड़े जाते हैं – मिलिट्री के काले करतूतों का पर्दाफाश होता है और मुँह पर कपड़े बांधे किशोर वय के लड़के सड़क पर आकर जवानों पर ढेला पत्थर फेंकते हैं। उन्हें खदेड़ने के लिए जम्मू कश्मीर पुलिस लाठी भाँजने लगती है। अंत में फिर फौज को बुलायी जाती है। और अगर कहीं गोली चल जाए, और कोई हादसा हो जाए तो फिर से वही चक्र चलने लगता है।

अपने लापता बेटों की तस्वीर लेकर मायें निकल आती हैं – सड़कों पर। मिलिट्री बूटों तले रौंदी गई इज्जत के चिथड़ों को लेकर माँ, बाप और बहनें वादिओं की सरज़मीं को ग़मज़दा बना देती हैं।

मगर हस्तिनापुर की जनता कितनी भी रोये, मना करे, द्रौपदी का चीरहरण होता रहता है। इंद्रप्रस्थ के कानों जूँ तक नहीं रेंगती। कुरुक्षेत्र के मैदाने जंग में किसान और मामूली जनता की औलादों की लाशों का अंबार अठ्ठारह रोज तक लगते रहे। तो आज भी दिल्ली अपनी कुंभकर्णी नींद से जागती नहीं …..

जखम के सिक्के के भी दो पहलू हैं। एक तरफ अगर पुलिस मिलिट्री के प्रति कश्मीरी अवाम का आक्रोश है, तो दूसरी ओर चस्पाँ है धर्म के नाम पर अपने घर से खदेड़े गये कश्मीरी पंडितों का दर्द। राजनीति के सिक्के के भी दो पहलुएँ हैं। एक तरफ अगर है – हिन्दुस्तान पाकिस्तान के बीच की जन्मावधि खटास, तो दूसरी तरफ है यह सवाल – क्या पाकिस्तान बन जाने से वहाँ के अवाम बहुत खुश हैं? तर्जे जफा और दर्दे जिगर तो दोनों तरफ बराबर है। तो?

करीब तीन महीने से ज्यादा हो गया है जब अबकी बार गौण सिंह थपलियाल घर से वापस आया था। मोबाइल पर रामबाला से तो हर रोज बात होती रही। कभी कभी दिन में दो दफे। रात के सोते समय भी गौण एकबार हरे बटन को दबा लिया करता था, ‘क्या कर रही है …..?’

‘चुप रहिए जी। बाऊजी का खाना लगा रही हूँ।’

‘अभी तुम लोगों ने खाना नहीं खाया? यहाँ तो रात भी बूढ़ा गई है।’

‘हम मिलिट्री ड्यूटी पर थोड़े न हैं।’

मोबाइल पर आती गिलास और लोटे की खनक, माँ की खांसी की आवाज सुनते सुनते थपलिआल की नाकों में माँ के आँचल की महक आने लगती। इतने में बाबूजी की आवाज आती, ‘बहू, एक रोटी और दे जाना। आज चने की दाल किसने बनायी? तू ने या तेरी सास ने….?’

उधर से माँ की आवाज आती, ‘ मैं कबसे ऐसी दाल बनाने लगी ?’

‘हाँ, जभी मैं सोचूँ – इतनी जायकेदार कैसे बन गयी?’

शायद मोबाइल को आँचल में छुपा कर रामबाला यहाँ से वहाँ दौड़ती रही। और बीच बीच में फुसफुसाकर बात कर लेती, ‘थोड़ी देर बाद फोन नहीं कर सकते?’

‘तुझसे बात किये बगैर जो नींद नहीं आती।’

तब तक बाबूजी शायद फिर से कहते, ‘पता नहीं अपना बेटा वहाँ क्या खा रहा है। हाँ, सुना तो है मिलिट्री में फल, मेवे, मटन सब रोज़ रोज़ मिलै।’

इधर से गौण कहता, ‘मगर माँ या बीवी के हाथ का खाना नहीं मिलता रे। और तू भी नहीं मिलती ….।’

‘धत्!’कितनी बार मारे गुस्सा और शर्म के रामबाला ने मोबाइल के लाल बटन को झट से दबा दिया। और थपलियाल को फिर से हरी झंडी लहरानी पड़ी, ‘हैलो, तू ने लाइन काट क्यों दिया?’

घर से लौटने के शायद डेढ़ महीने बाद रामबाला ने उसे वो बात बतायी थी। एक रात जब दोनों बात कर रहे थे …..

‘सुनिए जी, आप से एक बात करनी थी।’

‘क्या ?’

मगर उधर से सिर्फ खामोशी। गढ़वाल की हवा हिमालय में दौड़ रही थी। उसी की साँय साँय ……

‘अरे बोल न। क्या बात है?’

फिर भी रामबाला चुप रही।

‘इस तरह से तो तुझे मुझे और उलझन में डाल देगी। घर में सब ठीक है न? बाऊजी ….अम्मां ?’

‘सब ठीक है। वो बात नहीं है-।’

‘तो फिर क्या हुआ ? तेरे पीहर में ?’

‘वहाँ सब ठीक है जी।’

अब थपलियाल को गुस्सा आ गया, ‘अरे तो बोलती क्यों नहीं – बात क्या है? मुझे कन्फ्यूज कर रही है।’

‘आप न – आप न – बाप बननेवाले हैं -’

बस गढ़वाल ने लाल बटन दबा दिया।

तब से रोज़ रात को जबतक उसकी हालचाल ठीक से न ले ले, थपलियाल को चैन नहीं आता। इसी लिए आज चार दिनों से उसका मिजाज ट्रिगर पर उँगली धरे बैठा है। कितना कुछ पूछने बताने की चाह है, मगर सारी बातें अधूरी रह गई।

पता नहीं दोस्तों के कहने पर या कहाँ से उसे पता चला था तो बड़ी समझदारी दिखाते हुए उसने पूछ लिया था, ‘वो कुछ हिलता डुलता है ?’

उधर से खिलखिलाने का फव्वारा फूट पड़ा, ‘अरे डाक्टरनी ने कहा है – वो तो चार महीने बाद ही होता है, जी।’

‘ओ -!’गौण सिंह थपलियाल बहुत निराश हो गया था।

वज़ह तो सभी ज़गह करीब करीब एक ही होती है। इंसानी काली करतूत। भले बेचारी प्रकृति के मत्थे सारा दोष मढ़ दिया जाता है – कि यह कुदरत का कहर है ! उत्तराखंड में अगर होटल, आश्रम और बाँध बनाने के चक्कर में पहाड़ की छाती को खोखला कर देने से जल प्लावन आता है, तो यहाँ भी अमुक एस्टेट और लैंड प्रापर्टी बनाने के चक्कर में झीलों का गला घोंट दिया जाता है। नतीज़तन जब पहाड़ की बर्फ पिघल कर बहने लगी तो चेनाब और झेलम में उसे फैलने की ज़गह ही न मिली, क्योंकि झीलें तो गायब थीं। तो सैलाब घुस गया गली मुहल्ले में। हर आशियाना उजड़ कर रह गया।

कुदरत ने कहर बरपाया तो क्या हुआ, भारतीय मिलिट्री को मौका मिल गया – इन्सानियत का हाथ बढ़ाने। उनके खिलाफ यहाँ की मिट्टी में जो जहर घुल गया है, उसी में अमृत घोलने का प्रयास होने लगा। अपनी जान हथेली पर रखकर फौजी जवान बचाव कार्य में जुट गये। बाढ़ पीड़ितों की मदद के लिए पहुँच गये हर गली मुहल्ले में।

तो आपात सेवा में फौजिओं को तैनात कर दिया गया। गढ़वाल रेजिमेंट्स के लोग कूपवाड़ा में दो बोट, भोजन के पैकेट्स और दवाई लेकर हाजिर हो गये।

बड़ी बड़ी इमारतों में जहाँ पहली मंजिल तक पानी पहुँच गया था और सारे लोग दूसरी मंजिल पर जाकर बैठे रहे, वहाँ तो भोजन सामग्री बाँट कर वे आगे बढ़ गये, मगर जिन झीलों की बगलवाले मुहल्लों में जहाँ निरन्तर पानी का दबाव था, या जहाँ गरीब जनता का एक मंजिला आशियाना पूरी तरह डूब चुका था, उन लोगों को बोट पर बैठाकर करीब तीन किमी दूर तक पंचायत भवन में ठहराया जा रहा था। उम्रदराज मरीजों को मिलिट्री अस्पताल में पहुँचाना तो था ही। इधर गैस्ट्रोएंटराइटिस का भी प्रकोप होने लगा। सरकारी व्यवस्था के लिए यह समस्या भी – एक तो करैला ऊपर से नीम चढ़ा – की स्थिति हो गई।

विद्या नौटियाल बोट को चला रहा था और गौण सिंह पतवार को सॅँभालते हुए दूसरे छोर पर बैठा था। सामान कुछ बॅँट गये थे। अभी काफी बोट में पड़े हुए थे। लालबाग चैराहे के पास आकर विद्या आसपास के मकानों की छत पर खड़े लोगों से पूछ रहा था, ‘ इधर सब खैरिअत है न? किसी को कोई जरूरत हो तो बताना। कहीं कोई परिवार मुसीबत में हो तो हमें बताओ। हम भर सब मदद करेंगे।’

औरतों ने उन्हें देखते ही नकाब नीचे कर लिया था। उनकी आँखों की पुतलियां घूम फिर कर इन पर ठहर जातीं।

इतने में एक मोटा थुलथुल आदमी गली की सीढ़िओं पर खड़े उन्हें आवाज देने लगा, ‘यहाँ नूरानी मस्जिद में हमारे आदमी हैं। दो दिनों से उन्होने उन्होने कुछ खाया नहीं है। आप इधर बोट लगाइये।’

‘आपकी तारीफ?’ नौटियाल ने बोट की मशीन बंद करते हुए पूछा।

‘अरे मुझे नहीं पहचाना? मैं हूँ – बिलाल भट्ट गिलानी। रूलिंग पार्टी का सेक्रेटरी।’

बस, यह राजनैतिक पैंतरा तो वेदव्यास ने ही लिख दिया था। कुरूक्षेत्र के युद्ध में गुरु द्रोण के शौर्य के आगे जब पांडव परेशान थे, तो वे सोचने लगे कि क्या किया जाए कि द्रोण अस्त्र त्याग करने में मजबूर हों। उसी समय अश्वत्थामा नाम का एक हाथी रणभूमि में मारा गया। द्रोण के बेटे का नाम भी अश्वत्थामा ही था। तो सबने मशविरा करके युधिष्ठिर को भेजा। द्रोणाचार्य के पास जाकर उसने कहा, ‘ अश्वत्थामा मारा गया।’ फिर धीरे से बोला, ‘जो गज है।’ यानी समूचा सच भी नहीं, झूठ भी नहीं। बेटे की मौत की गलत खबर से दुखी होकर द्रोण ने हथियार त्याग दिया और पांचालीका भाई धृष्टद्युम्न ने उनका सर धड़ से अलग कर दिया।

बिलाल भट्ट ने कह दिया कि वह रुलिंग पार्टी का सेक्रेटरी है। वर्तमान या भूतपूर्व – किसे मालूम? प्रादेशिक सेक्रेटरी, या शहर का, या मुहल्ले का? खैर, नूरानी मस्जिद में देने के लिए ढेर सारे फुड पैकेट्स लेकर बोट से उतरते ही नौटियाल और थपलियाल ने देखा कई आदमी और औरतें उनके बोट के पास खड़े होकर चिल्ला रहे थे, ‘सा‘ब, आपलोगों ने हमें कुछ नहीं दिया। और उन लोगों के देने जा रहे हैं ?’

‘क्यों क्या बात है? तुम लोग मसजिद में जाकर भट्ट साहब से अपने पैकेट्स क्यों नहीं ले लेते?’गौण सिंह ने कहा।

‘वो हमें कुछ नहीं देंगे साहब। चाहे हम भूखों मर जाएँ।’एक आदमी ने दोनों हाथ उठाकर कहा।

‘मगर क्यों ?’

‘क्योंकि हम शिया हैं। वो सिर्फ सुन्निओं की पनाहगाह है।’

इतने में वो आदमी हाँफते हुए फिर से सीढ़ी पर हाजिर हो गया, ‘क्या बात है जनाब? उनलोगों से क्या बात कर रहे हैं? आइये, यहाँ सामान देते जाइये।’

नौटियाल ने ऊपर जाकर मस्जिद में झाँक कर देखा। वहाँ खास कोई न था। उसने कड़क कर पूछा, ‘बात क्या है? यहाँ तो कोई है ही नहीं। तो फिर किसके लिए आप फुड पैकेट्स यहाँ रखवाना चाहते हैं? उधर तो वे लोग खुद पैकेट्स लेने आये हैं।’

‘मैं ने कहा न – मैं सब बाँट दूँगा। आप यहाँ सामान रखिए और जाइये न।’उसका बात करने का अंदाज ही बहुत अक्खड़ था।

‘वो तो मदद के सामान बाजार में बेच देता है।’एक औरत, जिसकी गोद में एक बच्चा चीख रहा था, ने बताया।

‘ऐ बीवी।’डोगरी में गाली देते हुए बिलाल भट्ट गिलानी चिल्ला रहा था, ‘अपने बेटे का मुँह बंद रख। तब से भौंकता जा रहा है।’

विद्या नौटियाल और गौण सिंह की आँखें मिल गईं। आँखों ही आँखों में दोनों नें ने तय कर लिया। बोट के पास खड़े लोगों में फुड पैकेट्स बँटने लगे। उधर मस्जिद के सामने हो हल्ला मच गया। बिलाल भट्ट ने आवाज देकर अपने आदमिओं को बुला लिया, ‘ये इंडियन मिलिट्री हमारी मदद के लिए नहीं आते हैं। सब दिल्ली के एजेंट हैं। यहाँ हमारे जख्मों पर भी पाॅलिटिक्स कर रहे हैं।’

‘यह क्या बक रहे हैं?’गौण सिंह को गुस्सा आ गया, ‘हम तो जरूरतमंदों में ही जिन्स बाँट रहे हैं।’

बात बढ़ गई। और सात आठ लोग उधर खड़े हो गये। बिलाल चिल्ला रहा था, ‘गो बैक इंडिया। हमें आजादी चाहिए।’

स्थिति बिगड़ न जाए, इसलिए दोनों वहाँ से जल्दी जल्दी रवाना हो गये।

रास्ते में कई लोगों को बैठाकर वे सबको को टिकानेवाले उसी पंचायत भवन में ले जा रहे थे, तो रास्ते में वो परिवार उन्हें मिल गया। वह आदमी अब तक गिड़गिड़ा रहा था, ‘सा‘ब, दो दिनों से हमारे बच्चों को हम कुछ खिला न सके। खुदा के लिए, इन्हें लेते जाइये।’

नौटियाल ने कहा था, ‘देख लो भाई, अब जगह कितनी बची है। कितने लोग और बैठ ही सकते हैं ?’

एक एक करके उसका अब्बू, उसकी अम्मीं, एक बहन और बीवी और दो बच्चे – सभी बैठ गये। बोट में अब जगह कहाँ थी ?

तभी गौण सिंह थपलियाल को कहना पड़ा था, ‘नहीं जी, हम तुम्हें ले नहीं जा सकते।’

उसकी औरत चीख उठी, ‘उसे भी बैठा लो, साहिब।’

‘और बोट डूब जाए तो ? तुम जिम्मेदार होगी?’ घर पर बात न होने के कारण, और अभी इस झमेले से उसका दिमाग खट्टा हो गया था।

वो आदमी जाने क्या बुदबुदा रहा था। उसकी बीवी बोट पर खड़ी हो गई।

‘ऐ बैठ जाओ। सबको पानी में डुबोना है क्या?’विद्या नौटियाल की घुड़की से उसकी आँखों से आँसू की धार फूट पड़ी।

बाकी लोग गूँगी निगाहों से सबकुछ देख रहे थे। मन ही मन सब अपनी किस्मत से शायद शिकायत कर रहे होंगे।

चार दिनों से मेरी कोई खबर न पाकर रामबाला भी ऐसे ही रो रही होगी! सबकी नजर बचाकर रसोई में, या पानी भरते समय। खास कर कल जब राहत कार्य में लगे एक फौजी का सैलाब मे बह जाने की खबर टीवी में आ चुकी है। थपलियाल के मन में भादो कुहार के मौसम की तरह भावनाओं के बादल उमड़ पड़े। उसने दोस्त की ओर देखा, ‘क्यों विद्या, यह नहीं हो सकता कि तू इसे लेकर चला जा, मैं यहीं रुक जाता हूँ।’

‘पागल हो गया है क्या? तेरी ड्यूटी बोट पर है। वहाँ जवाब कौन देगा? सूबेदार तो हर समय डंडा लिये खड़ा रहता है।’

‘अगर लोगों को बचाने में मैं भी उसी तरह बह जाता तो? सुन, इन्हें उतार कर दूसरी खेप लेकर इधर ही चले आना। चल कर्नल साहब को समझा लेंगे।’

‘तू भी न यार, बड़ा जिद्दी है साले।’विद्या ने मुँह फेर लिया, ‘पतवार कौन सँभालेगा?’

वह औरत बोली, ‘मेरा खाविंद कर लेगा, सा‘ब।’

जगह की अदला बदली हो गई। गौण सिंह थपलियाल बोट से उतर कर वहीं खड़ा है, वह आदमी बोट पर पतवार सँभाले बैठा है। बोट चल पड़ा ……

उस औरत की आँखों में एक अलग सैलाब उमड़ पड़ा है …….वह क्या बुदबुदा रही है ?

उसकी ओेर देखते हुए गौण के मन में यही होता है – हम तो यहाँ इनके आँसू पोंछने के लिए आये थे, मगर यह आँसू ……? इसको कौन सा नाम देंगे? उसे लगा यह आँसू कोई नोनाजल नहीं बल्कि एहसान की भावना की अमृत धार है।

उसे लगा भले ही टावर न मिलने से मोबाइल का कनेक्षण नहीं हो पा रहा है, मगर रामबाला से उसकी अधूरी बात पूरी हो गई …

 ♥ ♥ ♥ ♥ ♥

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी

पताः फ्लैट नं. 301, चैथी मंजिल, टावर नं 1, मंगलम आनन्दा, फेज 3 ए,  रामपुरा रोड, सांगानेर, जयपुर, 302029 मो. 9455168359, 9140214489.

ईमेल: asrc.vns@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रश्न ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – प्रश्न ? ?

मैं हूँ

मेरा चित्र है;

थोड़ी प्रशंसाएँ हैं

परोक्ष, प्रत्यक्ष

भरपूर आलोचनाएँ हैं,

 

मैं नहीं हूँ

मेरा चित्र है;

सीमित आशंकाएँ

समुचित संभावनाएँ हैं,

 

मन के भावों में

अंतर कौन पैदा करता है-

मनुष्य का होना या

मनुष्य का चित्र हो जाना…?

 

प्रश्न विचारणीय

तो है मित्रो!

?

© संजय भारद्वाज  

शुक्रवार, 11 मई 2018, रात्रि 11:52 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Memoir ☆ दस्तावेज़ # 25 – The Alchemy of becoming ☆ Shri Jagat Singh Bisht ☆ 

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(This is an effort to preserve old invaluable and historical memories through e-abhivyakti’s “दस्तावेज़” series. In the words of Shri Jagat Singh Bisht Ji – “The present is being recorded on the Internet in some form or the other. But some earlier memories related to parents, grandparents, their lifetime achievements are slowly fading and getting forgotten. It is our responsibility to document them in time. Our generation can do this else nobody will know the history and everything will be forgotten.”

In the next part of this series, we present a memoir by Shri Jagat Singh Bisht Ji The Alchemy of becoming.“)

☆ दस्तावेज़ # 25 – The Alchemy of becoming ☆ Shri Jagat Singh Bisht ☆

As I sit quietly today, looking back at the journey I have lived, I see life not as a straight line but as a river—sometimes placid, sometimes tumultuous—always flowing. At a distance, it may appear a seamless continuum, but if you wade into its waters with care, you notice the whirlpools and tributaries, the rocks and banks, the many confluences that shaped the course. My own life has followed such a river’s path—like the Ganga, shaped by many turns, contributions, and inner transformations.

Like the holy Bhagirathi emerging from the Gangotri glacier, I too had a modest beginning. I was born in Ranjhi, a quiet suburb of the then sleepy town of Jabalpur. My early years flowed gently, in a world bounded by simplicity and schoolbooks, unaware of the larger world waiting beyond the next bend.

At sixteen, a turning point came—like the Bhagirathi meeting the Alaknanda at Devprayag and becoming the Ganga. It was my encounter with Brother Frederick, my Chemistry teacher and mentor, who first recognised the spark within me. He urged me to appear for the National Science Talent Search Examination, saying with conviction, “You have it in you.” His words became a catalyst, and when I secured a national ranking, my life took a decisive turn.

That achievement opened doors I hadn’t imagined—summer schools in Jaipur, Chennai, and Mumbai, rubbing shoulders with brilliant minds like Arunava Gupta, Pradip Mitra, and Rajiv Joshi. I began to see the world through the lens of science, logic, and curiosity. It was a time of identity formation—a scholar in the making.

But the river does not always follow the course we expect. Life, with its own currents, steered me into banking—a practical harbour for livelihood. Yet even there, destiny had something rich in store. I was selected to be a Behavioural Science Trainer. This was no ordinary role; it was a calling. The faculty at State Bank Staff College—Ravi Mohanty, Srinivasan Raghunath, and Santanu Banerjee—were not merely teachers; they were alchemists.

If my early years were a gentle river, this was the blast furnace stage of life. I was the raw iron ore—unshaped, full of potential—and they smelted me, transformed me, refined me. Alongside my dear colleagues Raghu Shetty and Prakash Divekar, I emerged stronger, sharper—like forged steel. It wasn’t just a change of skill but a transformation of being.

I conducted sessions on self-awareness, relationships, emotional intelligence—helping bank staff serve not just with efficiency but with empathy. But in teaching others, I learned the most about myself. My inner self, once a quiet stream, now bubbled with awareness, reflection, and the heat of change.

That transformation created a bridge to the next big chapter—my deep dive into the science of happiness and well-being. Positive Psychology gave me a new language to understand joy, fulfilment, and human potential. It reoriented my compass from achievement to meaning.

As retirement approached, one might think the river would slow. But rivers are strange—they gather force before meeting the sea. My wife and I became Laughter Yoga Master Trainers, mentored by the joyful duo Dr Madan and Madhuri Kataria. We found in laughter not just therapy but a sacred connection with others. It was like the Sangam at Prayagraj—where Ganga, Yamuna, and the invisible Saraswati meet. We were becoming whole.

Adding yoga and meditation to our lives, we were no longer just flowing—we were now merging with the ocean, carrying with us the essence of every experience, every person who shaped us, every soul we touched.

Looking back, it is clear—no achievement stands alone. Each is a ripple that causes another, building towards a life well-lived. From a curious boy in Ranjhi to a torchbearer of emotional intelligence and laughter, the river of my life has flowed through many lands. It has nurtured me, challenged me, and above all, made me more human.

Like Ganga, I hope I’ve left a trail of nourishment behind—and like the blast furnace, I hope I’ve emerged not just stronger, but purer.

Life is good. Life is meaningful. And if lived with awareness, even its small achievements can shape something truly vast.

♥♥♥♥

© Jagat Singh Bisht 

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares