मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

एखादी कल्पना सुद्धा कल्पकतेनेच कागदावर मांडताना वास्तवाच्या घटनेची गती वेगळ्या वळणाने वास्तवाचा हात न सोडता ज्याला अंतीम नैसर्गिक सत्यापर्यंत लिलया पोहोचवता येते तोच खरा साहित्यिक बनतो.

पाळलेले कबूतर अवकाशात उंच उंच गिरक्या मारताना नाविन्याचा शोध घेत नाही. किंवा कुठल्याही लक्षाचा वेध घेत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या दाण्यापाण्यची व्यवस्था आपल्या मालकाने आपल्या खुराड्या जवळच करून ठेवली आहे.

पण गरूडाला गगनभरारी घेतच आपलं लक्ष निश्चित करून त्यावर झडप टाकून ते मिळवावं लागत. कारण त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीतच परतायच असतं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणूनच गरूड कबुतर, चिमणी वास्तवतेच्या वेगळ्या साच्यात आपला जीवनक्रम व्यतीत करताना आपापला प्रवर्ग वेगळा वेगळा आहे. हे ओळखून असतात त्यानी आपल्या वेगळ्या वेगळ्या तपसाधनेने वेगळी वेगळी सिद्धी साध्य केलेली असते. विधात्याने ही त्यांना तसेच घडवलेले असते.

हे नैसर्गिक सामर्थ्य आजपावेतो निसर्गाने कठोर साधना करणारानाच स्वखुशीने बहाल केले आहे. म्हणून साधना महत्वाची केवळ उसनवारी करून यातले काही साधता येत नाही. ऊर्जाश्रोत मुळात नैसर्गिक आहे. तो मिळवायला माणसाला निसर्गालाच शरण जावे लागते. स्तुतीचे भाडोत्री डोलारे भाडे थकताच पोबारा करतात आणि आपण उघडे पडलो आहोत याची जाणीव होते. म्हणून निसर्ग दत्त सामर्थ्य हेच अखेरचे वास्तदर्शी सत्य असते. 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हसण्याचे वरदान…… – भाग १ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ हसण्याचे वरदान…… – भाग १ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

ती ख्रिसमसच्या दिवसाची पहाट होती, याच दिवसाची धास्ती होती मिसेस बार्टनच्या मनात. त्या जाग्या झाल्या आणि आणि आपल्या खोलीकडे बघू लागल्या, या पहाटेच्या वेळी त्या परिचित खोलीतील ओळखीच्या सर्व गोष्टी धूसर दिसत होत्या. त्यांनी पटकन आपले डोळे मिटून घेतले आणि अगदी हालचाल न करता पलंगावर पडून राहिल्या. त्यांना ज्या दिवसाचा विचारही नको वाटत होता, तो दिवस समोर येऊन उभा ठाकला होता! तीच तर कटकट होती ख्रिसमसची—- तो लांबणीवर टाकणं अशक्य होतं. तो असा काही येऊन कोसळायचा एखाद्यावर, जसा काही प्रत्यक्ष मृत्यूच, अटळ आणि खात्रीशीर!

कारण मिसेस बार्टनना ख्रिसमसची भीति वाटत होती. त्या जेंव्हा रॅनीला पाठवायच्या ख्रिसमसच्या भेटवस्तूंची खरेदी करायला गेल्या, तेंव्हा त्यांच्या हे प्रथम लक्षात आलं. त्यांना रेड क्रॉसच्या मुख्य कार्यालयातून सांगण्यात आलं होतं, की एक नोव्हेंबरलाच जर त्यांनी पाठवायची बॉक्स आणून दिली, तरच रॅनी जिथे कुठे होता, तिथे त्याला ती वेळेवर मिळू शकेल. त्यांना तो कुठे आहे हे माहित नव्हतंच, पण त्याच्या रेजिमेंटचं नाव माहित होतं, आणि रेड क्रॉस मधल्या कोणीतरी त्यांच्यासाठी साधारणपणे, निदान, ती रेजिमेंट कुठे असू शकेल, एवढं शोधून काढलं होतं. त्यामुळे त्या त्याच्यासाठी ख्रिसमसच्या भेटवस्तूंची बॉक्स वेळेत पाठवू शकणार होत्या.

ज्या दिवशी त्या खरेदीसाठी गेल्या होत्या, तेंव्हा दुकानांमधल्या सगळ्या प्रसन्न आणि मित्रत्वाने वागणाऱ्या विक्रेत्या मुलींना त्या मोठ्या अभिमानाने सांगत होत्या, की त्या ही खरेदी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी करत होत्या, “जो आघाडीवर कुठेतरी लढत आहे, ” त्या वेळी त्या आपली ख्रिसमसबद्दल वाटणारी भीति लपवू शकल्या होत्या.

मागच्या वेळच्या युद्धापेक्षा हे, या वेळचं युद्ध अधिक अवघड होतं, कारण या वेळी एक नाही, तर अनेक आघाड्यांवर युद्ध चालू होतं. मागच्या वेळी, जेंव्हा रॅनीचे वडील युद्ध आघाडीवर लढत होते, तेंव्हा अर्थातच, ते कुठेतरी युरोपमधेच आहेत, हे माहित असायचं, आणि त्या लहान होत्या, त्या वेळी त्या इतक्या वेळी युरोपला जाऊन आलेल्या होत्या, की त्या आपल्या लायब्ररीत भिंतीवर लावलेल्या नकाशावरून सहजपणे रॅनाल्डचा मागोवा घेऊ शकत असत. जेंव्हा सॉम्स येथे तो मारला गेला—तरीही, त्यांना ते ठिकाण ठाऊक होतं. पण हे युद्ध! त्यांनी कधीच न बघितलेल्या ठिकाणी आपला मुलगा युद्ध लढत असल्याच्या विचाराने त्यांचे सुंदर राखडी डोळे पाण्याने भरून येत. त्याच्या वडिलांसारखाच तोही कुठेतरी मारला गेला, तर त्यांना त्याचं थडगं बघायला तरी जाता येईल का, या विचाराने त्या शहारून गेल्या.

ती गोड विक्रेती मुलगी त्यांचे भरून आलेले डोळे बघून, त्यांच्याकडे बघून गोडसं हसली आणि तिने विचारलं, “त्याचे डोळे कुठल्या रंगाचे आहेत?”

मिसेस बार्टनचा चेहरा खुलला. “निळे, ” त्या म्हणाल्या, “कोणी कधी बघितले नसतील, इतके निळे!”

“मग हा स्वेटर त्यांना छान दिसेल, ” ती विक्रेती मुलगी म्हणाली. आणि संभाषण पुढे वाढवत म्हणाली, “मला निळ्या डोळ्यांचे पुरुष फार आवडतात. ”

“मला पण, ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “त्याच्या वडिलांचे डोळे पण निळेच होते. ”

त्यानंतर ते पार्सल पाठवण्याच्या गडबडीत त्या अगदी गुंतून गेल्या होत्या. दुकानांमधे अजुनी ख्रिसमससाठीचे खास पॅकिंग किंवा पाकिटांवर लावायचे विशेष सिल्स* आलेले नव्हते, पण त्यांना आदल्या वर्षी आणलेल्या काही गोष्टी एका बॉक्समधे सापडल्या. आणलेल्या सगळ्या वस्तू पॅक केल्यानंतर खरंच फार सुरेख दिसू लागल्या. आणि त्यांनी काही चॉकलेट्स आणि सुक्या मेव्याचे डबेही आणले होते, जे अगदी गरम हवामानातही चांगले राहतील अशी हमी देण्यात आलेली होती—-पण रॅनी गरम हवेच्या ठिकाणी नव्हताच! एक फ्रुट-केकही त्यांनी त्याच्यासाठी पॅक केलेला होता. शेवटी त्या बॉक्सचा आकार एवढा मोठा झाला, की त्यांना काळजीच वाटायला लागली. समजा, ते म्हणाले, की एवढा मोठा बॉक्स आम्ही नाही पाठवू शकत—नाही, ते एखादे वेळी त्यांना काही सांगणार पण नाहीत—आणि पाठवणारच नाहीत ती बॉक्स! त्या कल्पनेने त्यांना घाबरवूनच टाकलं. आणि मग, घाई घाईने त्यांनी त्या सगळ्या वस्तू काढून तीन छोट्या पॅकेजमधे त्या वस्तू परत पॅक केल्या. या वेळेपर्यंत घरातल्या प्रत्येकालाच त्यांनी कामाला लावलं होतं. बटलर हेन्री, त्याची बायको ॲन आणि ड्रायव्हर डिकन. डिकन सैन्यात भरती होण्याच्या वयाचा होता आणि ख्रिसमसच्या आधीच त्यालाही आघाडीवर जावं लागणार होतं.

“मी तुलाही अशीच एक बॉक्स पाठवीन, डिकन, ” त्यांनी त्याला सांगितलं.

हॅटला हात लावून आदर दाखवत तो म्हणाला, ” धन्यवाद, मॅडम!”

जेंव्हा तो युद्धावर निघून गेला, तेंव्हा त्यांनी दोन्ही गाड्या गॅरेजमधे ठेऊन दिल्या, आता रॅनी येईपर्यंत त्या गाड्या वापरणार नव्हत्या. या दिवसात एक वयस्क स्त्री निदान एवढं तरी करू शकत होती, पेट्रोल आणि रबर (टायरचं) वाचवण्यासाठी! ख्रिसमसच्या आधी दोन आठवडे तो जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा त्या त्याला म्हणाल्या,

“तुझी इथली ड्रायव्हरची नोकरी तुझी वाट बघतेय, हे विसरू नकोस युद्ध संपल्यावर, डिकन!”

परत त्याने आपल्या हॅटला हात लावला, आणि म्हणाला, “ धन्यवाद, मॅडम!”

त्यांच्या हृदयात एक लहानशी कळ उठली! तो अगदी लहान आणि साधा दिसत होता. मग त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.

“तुझं लग्न झालंय का डिकन?” त्यांनी चौकशी केली.

“नाही मॅडम, ” तो अचानकपणे आलेल्या या प्रश्नाने लाजून लालबुंद झाला.

“आई-वडील असतील ना तुला?” त्यांनी हळुवारपणे विचारलं.

“होय, मॅडम, ” तो म्हणाला.

एवढी प्रश्नोत्तरं झाल्यावर दोघांना काय बोलावं ते काही सुचेनासं झालं, जणू एक मौनाची भिंतच दोघांमधे उभी ठाकली, आणि दोघेही लाजाळू असल्याने दोघे पुढे काहीच बोलू शकले नाहीत.

“अच्छा मग, डिकन” त्या आपला हात पुढे करत म्हणाल्या. “मला नेहमी तुझी आठवण येईल आणि मी तुला शुभेच्छा देत राहीन. ”

“धन्यवाद मॅडम, ” म्हणून त्याने घाई घाईने तिच्या हातात दिलेला हात काढून घेतला. त्यांच्या लांब, सडपातळ हातात त्याचा हात मोठा, तरुण आणि जड वाटला.

या ख्रिसमसच्या दिवशी घरात त्यांच्याशिवाय फक्त म्हातारा हेन्री आणि त्याची म्हातारी बायको ॲन हे दोघेच होते. “आणि म्हातारी मी, ” त्यांनी मनातल्या मनात विनोद करायचा प्रयत्न केला! आणि डोळे मिटलेले ठेऊनच उदासपणे हसल्या, आपल्याच विनोदाला!

आता त्यांनी मान्य केलं, की त्यांना या ख्रिसमसच्या दिवसाची भीति वाटत होती. या भितीवर मात करण्यासाठी काहीतरी निश्चित असा दिवसभराचा प्लॅन बनवणं आवश्यक होतं, नाहीतर आपलं काही खरं नाही, असं त्यांना वाटत होतं. कारण त्यांच्या गुप्त अशा संवेदनशील अंतर्मनात त्यांना नेहमीच हे जाणवत असे, की एक दिवस असा येईल, की आपल्या आयुष्याकडे बघून आपल्यालाच असं वाटू शकेल की हे आयुष्य अगदी निरर्थक आहे!

त्यांच्या वडिलांनी ते साठ वर्षांचे होण्याआधीच, कोणाच्या लक्षात येईल असे काहीही कारण नसताना एकाएकी आत्महत्या केली होती. त्या लहान असताना त्यांना ते अनाकलनीय वाटलं होतं. पण जसजसा काळ पुढे जात गेला, तसतसं, त्यांनी ते का केलं असावं ते त्यांच्या अधिकाधिक लक्षात येत गेलं. आयुष्य असह्य वाटू लागण्यासाठी एखाद्या मोठ्या आपत्तीची अथवा अरिष्टाची गरज नसते. साधंसं निराशाजनक प्रसंगाचं किंवा अपेक्षाभंगाचं साठत जाणंही जीवन असह्य करू शकतं. एक असा क्षण येऊ शकतो, की जेंव्हा मनाचा तोल त्या दिशेला ढळू शकतो. केवळ रॅनीमुळेच त्यांच्या जीवनाला काही अर्थ होता. रॅनीचा जन्म झाल्यापासून त्यालाच वाहिलेलं होतं त्यांचं आयुष्य, आणि आता या युद्धाने त्याला त्यांच्यापासून दूर नेलेलं होतं. हं! हे युद्ध अशा एकुलता एक मुलगा असलेल्या त्यांच्यासारख्या आईसाठी सर्वात जास्त क्रूर होतं!

त्यांच्या मनात त्यांच्या मैत्रिणींचा विचार आला आणि त्यांचं मन कचरलं. त्यातल्या तिघी-चौघी त्यांच्याच सारख्या एकट्या होत्या. जर मी खरोखरच दयाळू असते, तर गरीब बिचाऱ्या मार्नी लुईस आणि बाकीच्यांना ख्रिसमससाठी इथे बोलावलं असतं. पण त्यांना हे माहित होतं, की त्या काही बोलावणार नाहीत. आपल्या एकटेपणात त्यांच्या एकटेपणाची भर घालण्यात काही अर्थ नव्हता. त्यापेक्षा स्वतःच स्वतःला सांभाळणं सोपं होतं. आपण उशिरा उठावं, चर्चला जाऊन यावं आणि मग रॅनीला पत्र लिहून सांगावं, आपल्याला किती एकटं वाटतं ते, असं त्यांनी ठरवलं.

आता त्यांची भीति एकाच बिंदूवर जाऊन स्थिरावली —आज चर्चला जाऊन आल्यावर, जेवण करून, रॅनीला पत्र लिहून झाल्यानंतर त्या काय करणार? निश्चितपणे, प्रत्यक्ष काय करणार त्या? त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांआडून येणाऱ्या अश्रूंनी त्यांचे डोळे चुरचुरू लागल्याची जाणीव होऊन त्या थरथरल्या. मग सावकाशपणे त्या उठल्या आणि पायात स्लीपर घालून बाथरूममधे जाऊन आंघोळ करून, केस विंचरून आल्या. परत पलंगाकडे येताना त्या खिडकीपाशी थांबल्या आणि त्यांनी बाहेर बघितलं. दिवस अगदी स्वच्छ आणि थंड वाटत होता. बर्फ पडलेला किंवा पडताना दिसत नव्हता. रॅनी लहान असताना नेहमी, ख्रिसमसच्या वेळी बर्फ पडू दे अशी प्रार्थना करत असायचा. मोठा झाल्यावरही, अगदी लहानपणासारखी प्रार्थना नाही, पण ख्रिसमसमधे बर्फ असावा अशी त्याची अगदी मनापासून इच्छा असायची, आणि त्या सकाळी बर्फ नसेल पडलेला तर त्याची निषेधात्मक प्रतिक्रिया असायचीच! त्यांच्या चेहऱ्यावर त्या आठवणीनी हसू आलं, आणि ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन तेंव्हाच आलेल्या ॲनला ते दिसल्यावर ती पण त्यांच्याकडे बघून हसली.

“मेरी ख्रिसमस मॅडम, ” ती म्हणाली. तिने ट्रेमधे हॉलीची छोटीशी फांदी ठेवली होती. पुढच्या दारापाशी लावलेली हॉलीची दोन झाडं चांगलीच मोठी झाली होती आणि या वर्षी फळांनी लगडून गेली होती. ती झाडं रॅनीच्या जन्माच्या वेळीच लावलेली होती, बरोबर 27 वर्षांपूर्वी!

“आज सकाळी बर्फ न दिसल्यामुळे रॅनी कसा चिडला असता, याचा विचार करत होते मी, ” त्या हळुवारपणे म्हणाल्या.

“खरंच बाई!”ॲनने त्यांच्या बोलण्याला संमती दर्शवली.

तिने पिवळा सॅटीनचा पलंगपोस त्या मोठ्या पलंगावर नीट घातला आणि ब्रेकफास्टचा ट्रे त्याच्यावर ठेवला.

“ती हॉलीची डहाळी किती सुंदर दिसते आहे!” मिसेस बार्टन म्हणाल्या.

“आनंददायक आणि उत्साहदायक!” ॲन म्हणाली.

“अगदी खरं!” मिसेस बार्टन म्हणाल्या.

स्वतःवरच खुश होत ॲन निघून गेली. आणि मिसेस बार्टननी खायला सुरवात केली. त्यांना फारशी भूक नव्हती, पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कर्तव्य भावनेने त्या सावकाशपणे, एकेक घास बत्तीस वेळा चावत खात राहिल्या. आजच्या दिवशी रॅनी त्यांना काही निरोप पाठवू शकेल, हे अशक्यच होतं. पण त्याच्या गेल्या वेळच्या पत्रात त्यानी त्यांना बजावलेलंच होतं, की त्याच्याकडून बराच काळ काही पत्र, निरोप आला नाही, तरी त्यांनी काळजी करू नये. तो अगदी सुरक्षित असेल—जरी बराच काळ काही कळलं नाही, तरी तो सुरक्षित नाही, असा विचार त्यांनी करू नये. “बराच दीर्घ काळ, कदाचित, मी तुला पत्र लिहू शकणार नाही, आई!” पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना त्याचं एक कार्ड आलेलं होतं, त्यामुळे आज काही कसली अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता.

 – क्रमशः भाग पहिला

मूळ कथा: पर्ल बक

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज निराच्या घराची चौकट उभी करण्याचा मुहूर्त होता. नुकताच नीराने- माझ्या मैत्रिणीने एक प्लॉट घेतला होता. त्यावर घर बांधायचे ठरवले होते. आर्किटेक्ट कडून प्लॅन काढून घेऊन त्याची मान्यता आहे मिळाली होती त्यामुळे नीरा आणि तिचे पती नीरज यांनी घर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. पाया, चौथर्‍यापर्यंत बांधकाम आल्यावर आज प्रमुख चौकट बसवायची होती. चौकट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासाठी असलेला भक्कम आधार! त्यानंतर बाकीच्या दारांच्या, खिडक्यांच्या चौकटी बसवायचे काम सोयी सोयीने होत राहते पण मुख्य चौकट महत्वाची! त्यामुळे आम्ही दोघेही तिच्या या चौकटीच्या मुहूर्ताला आवर्जून गेलो. तिथे कॉन्ट्रॅक्टर, कामगार लोक आलेले होतेच. तसेच तिचे जवळचे नातेवाईक “गारवा”घेऊन आले होते. अजूनही लहान गावातून घरासंबंधी कामे करताना नातेवाईकांकडून म्हणजे माहेरून, नणंदे कडून किंवा इतर बहिणी यांच्याकडून गारवा आणण्याची पद्धत आहे. ‘ गारवा’ म्हणजे जेवण घेऊन येणे. खेड्यातून हे जेवण एका टोपलीतून, बुट्टीतून घेऊन येतात. त्यामध्ये पुरणपोळ्या, पुऱ्या, गावरान भाज्या, भाकरी, ठेचा, दहीभात, वेगवेगळ्या चटण्या वगैरे जेवणाचे पदार्थ घर बांधणाऱ्यांसाठी घेऊन येतात..

कदाचित घर बांधत असलेल्या माणसाला सर्वांचे करण्याची तसदी पडू नये म्हणून हे सर्व कार्यक्रमासाठी घेऊन यायची प्रथा पडली असेल! तो ‘गारवा’ शेजारीपाजारी तसेच सर्वांना वाटला जायचा आणि ‘चौकट’ उभारण्याचा सोहळा व्हायचा.

अशा या प्रथांमुळे नवीन शेजाऱ्यांची ओळख आणि माणसे जोडण्याची एक प्रक्रिया सुरू होत असे. चौकट हे घराचा मुख्य आधार त्यामुळे घर बांधायच्या पद्धतीची जी चौकट किंवा रुढी रूढ असेल त्याप्रमाणे

ही प्रथा चालू असते. अलीकडे एकत्र कुटुंबाच्या चौकटी बऱ्याच प्रमाणात निखळून पडल्या आणि विभक्त छोटी छोटी कुटुंबे आपल्याच चौकटीत राहू लागली. त्याचे काही फायदे आणि काही तोटे आपण पाहत आहोतच!

चौकट समारंभ उरकून घरी आले आणि माझ्या मनात विविध प्रकारच्या चौकटी उभ्या राहू लागल्या. मुख्य म्हणजे वागण्याची चौकट! समाजात राहताना आपण विशिष्ट चौकटीत राहत असतो. काही नीती नियम समाजाने आखलेले असतात. कोणीही उठावे आणि काहीही करावे ही सुसंस्कृत समाजाची चौकट नसते. उदा.

कारण नसताना घरात, घराबाहेर मोठमोठ्या आवाजाने बोलणे, स्पीकर लावणे, भांडणे करणे हे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. नीती नियमांची चौकट ही नेहमी लिखितच असते असे नाही, पण ती एक समाज पद्धती असते. रस्त्यातून जाताना जोरजोरात खिदळणं, मोठ्या आवाजात बोलणं, भांडणं हे चौकटी बाहेरच असतं! त्यासाठी कायद्याची चौकट असतेच, पण त्या चौकटीचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हाच केला जातो.

काही वेळा आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट चौकट असते. काही कुटुंबात जुन्या पद्धतीचे संस्कार असतात म्हणजे कपडे वापरण्याची पद्धत, सणवार, व्रतवैकल्य करण्याची आवड, साधी राहणी, कोणत्याही प्रकारचा भपका न दाखवणारी अशी साधी माणसे असतात. अशा घरात जर एकदम मॉडर्न वागणारी सून आली तर ती बरेचदा चौकटी बाहेरची वाटते. तिचे वागणे, केसांच्या स्टाईल्स, कपडे हे सर्व जर त्या घराच्या चौकटीत नसेल तर ते इतरांच्या दृष्टीनेही वेगळे वाटते- विसंगत वाटते! म्हणून तर आपण घराला अनुरूप अशी मुलगी घरात आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आपली मुलगी देतानाही दुसऱ्या घराच्या संस्कृतीचा विचार करतो.

ही चौकटीची व्याप्ती केवळ कुटुंबापुरतीच असते असे नाही तर त्या चौकटीची व्याप्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते! प्रथम आपल्या कुटुंबाची चौकट, तिचा आपण विचार करतो. मग समाजाची, राज्याची, राष्ट्राची आणि सर्व व्यापक जगाची! आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा हे थोडं फार लक्षात येतं.. चुकून कोणी आपल्यासारख्या राहणीचे दिसले किंवा मराठी बोलताना आढळले की लगेच हा महाराष्ट्रीयन आहे हे लक्षात येते आणि तो ‘आपला’ वाटतो. त्यावरून आठवले की, आम्ही प्रथम जेव्हा दुबईला मुलीकडे गेलो होतो, तेव्हा एका मोठ्या मॉलमध्ये फिरताना एक बाळ रडत होते आणि त्याचे आजी- आजोबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. बाळाची आई काही खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती, त्यामुळे बाळाला रडू येत होते. त्यांच्यातील संवाद सहज कानावर पडला तो मराठीत! त्यामुळे आम्ही थबकलो. त्यांनाही आमच्याकडे बघून आम्ही भारतीय आणि मराठी माणसे आहोत हे लक्षात आले. आम्ही आपोआपच एकमेकांशी बोलायला उत्सुक झालो आणि बोललो. तेव्हा कळले की ते दोघेही महाराष्ट्रीयन असून आमच्याच भागातील होते. आपोआपच जात, भाषा, प्रांत, देश सर्व भिंतीच्या चौकटी गळून पडल्या आणि आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो !बाळाला खाऊ देऊन शांत केले आणि नंतर तिथून निघालो. हेच जर चौकट सोडून आपण बोललो नसतो तर तो जिव्हाळा आम्हाला लाभला नसता!

अशीच दुसऱ्या एका कुटुंबाची आमची एका बागेत भेट झाली. ते एक मुंबईचे आजी- आजोबा ह त्यांच्या नातवाबरोबर बागेत आलेले आणि आम्हीही आमच्या लेक आणि नातवाबरोबर बागेत आलो होतो. ते मराठी भाषिक आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि आता त्यांची आणि माझ्या मुलीच्या कुटुंबाची घट्ट मैत्री आहे!

‘मी कशाला बोलू?’ अशा विचाराने जर एकमेकांशी बोललंच नाही तर संबंध कसे जोडले जाणार? चौकटीच्या विचारा बाहेर पडले की मैत्रीची व्याप्ती अधिक वाढते हे मात्र खरे!

आपल्याकडे पूर्वीपासून जातीपातीच्या चौकटीत फार घट्ट होत्या. त्यामुळे एक प्रकारचा दुरावा कायमच असे. कोणाची जात उच्च, कोणाची खालची, यामध्ये भली मोठी दरी असे. काळाबरोबरच आता हे दुरावे थोडे कमी झाले आहेत. शिक्षणामुळे जातीची चौकट मोडली नसली तरी ढिली झाली आहे एवढे मात्र निश्चित!

परदेशात राहताना तर अशा वेगवेगळ्या चौकटी च्या नियमांनी माणूस बांधला गेलेला असतो. कायद्याचीही एक अशी चौकट असते. कायद्याच्या चौकटीनेही मनुष्य बांधला गेलेला असतो. परदेशात तर कायद्याच्या विरोधी वागले तर शिक्षा होऊ शकते..

चौकट ही अशी माणसाच्या रोजच्या जीवनाला ही व्यापून असते. काही कुटुंब चौकटीत राहतात, असं विधान करतो तेव्हा एखाद्या कुटुंबाच्या एकमेकांसोबत राहण्याच्या पद्धतीचा उल्लेख होतो. असे लोक चटकन बाहेर मिसळत नाहीत. ट्रीप ला गेले तरी ते आपल्या चौकटीतच राहतात. कोणाला सामावून घेत नाहीत आणि कुणामध्ये जात नाहीत. पु. ल. देशपांडे यांचा एक प्रसिद्ध लेख आहे त्यात त्यांनी अशा चौकोनी कुटुंबाचा उल्लेख केला आहे. नवरा, बायको, एक मुलगा, एक मुलगी असे ते चौकोनी कुटुंब! ज्यांचे वागणे आखीव – रेखीव, सुंदर, चित्रासारखे अगदी इस्त्रीचे परीट घडीचे कपडे, सौम्य वागणे, मोठ्याने न बोलणे, न हसणे, अशा अती व्यवस्थित कुटुंबातही आपला जीव गुदमरतो! अशावेळी वाटते की चौकट असावी पण ती इतकी घट्ट नसावी की, तिचा सर्वांना ताण वाटावा, सुटसुटीत, लवचिक चौकटीत माणसाने जगावे. सतत घडयाळाच्या काट्यावर राहणारी जर चौकट असेल तर त्यांना मुक्त जीवन म्हणजे काय ते कळणारच नाही!

 महाराष्ट्रीयन परंपरांचे एक चौकट असली तरी आपला पूर्ण भारत देश विविधतेत एकता अनुभवतो आपल्या देशाच्या सर्व राज्यातील लोकांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आढळते. सणवार, रिती भाती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या असतील तरीही आपली कुटुंब पद्धती, प्रदेशानुसार खाण्यापिण्याच्या पद्धती, इतरांबरोबर सन्मानाने आचरण करण्याची पद्धती हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच आहे. आत्ता बनारसच्या कुंभमेळ्याला संपूर्ण भारतभरातून लोक एका श्रद्धेने येत आहेत. गंगेत स्नान करत आहेत. देवतांची पूजा करत आहेत. तेव्हा जाणवते की ही एक मोठी संस्कृती चौकट आहे! त्या चौकटीत आपली हिंदू संस्कृती वसलेली आहे तिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

 निराच्या घराच्या चौकट कार्यक्रमाचा विचार करता करता माझ्या मनातील विचार खूप दूरवर गेले! माणसाच्या मूलभूत गरजा आणि आवडी या साधारणपणे समान असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच माणसाला एकत्र समाज करून राहणे, नीती नियमांच्या चौकटीत आणि आचार विचारांच्या चौकटीत राहणे हे आवडते. आपल्या भारत देशाची चौकट माझ्या डोळ्यासमोर आली. तिचा आणखी विस्तार केला तर जगभरातील माणसांची जी विविधतेने नटलेली चौकट आहे तिचाही आपण स्वीकार केला पाहिजे. या सर्व मानव जातीच्या चौकटीचा मनाने स्वीकार केला तरच ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

भगवान विष्णूची शेषशय्येवर, विश्रांती घेत असलेली मूर्ती… 

  • आता येणारी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. विष्णु समुद्रात शेष शय्येवर चार महिने चातुर्मास विश्रांती घेतात.
  • गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेली ही श्री भगवान विष्णूंची १४ फुटी दगडी मूर्ती.
  • काठमांडूपासून ९ कि. मी. अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे.
  • एवढी मोठी एकसंध दगडी मूर्ती गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगते आहे, हा ईश्वरी चमत्कारच !

माहिती प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर 

“ठकी”- कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली !

पूर्वी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असत. भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील विटी दांडू आणि चेंडू, सुमारे ५००० वर्षांपूर्वी मोहेंजोदारो मध्ये सापडलेली मातीची खेळणी, एका इटालियन बेटावर ४००० वर्षांपूर्वी सापडलेली दगडी बाहुली, ग्रीस – चीन – रोममध्ये सापडलेली खेळणी ही माणसाच्या या अशा क्रीडा प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडवितात.

आपल्याकडे पूर्वी प्रत्येक घरातील स्वयंपाक या विभागाचे प्रमुखपद हे नात्याने, वयाने ज्येष्ठ असलेल्या स्त्रीकडे आपोआपच यायचे. शालेय शिक्षणाचा प्रसार कमी होता. पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञान हे घरातूनच मिळायचे. मुलींना ते घरातील स्त्रियांबरोबर वावरतांना मिळत असे. खेळामध्ये मातीची भांडी, लाकडी बोळकी – बुडकुली असायची. या खेळण्यांच्या साहाय्याने घरातील मोठ्या स्त्रिया जशा वागतात तसे वागण्याचा प्रयत्न म्हणजे पूर्वीचा भातुकलीचा खेळ ! आपल्याकडे पूर्वी घरोघरी ठकी नावाची, लाकडाची एक ओबडधोबड बाहुली असायची. एका लाकडाच्या त्रिकोणी ठोकळ्यातून ही ठकी कोरली जात असे. अनेकदा ही ठकी ठसठशीत कुंकू लावलेली, लुगडे नेसलेली, नाकात नथ व डोक्यात फुलांची वेणी घातलेली असे. तरीही या बाहुलीला अंघोळ घालणे, कपडे घालणे, दूध पाजणे, भरविणे, झोपविणे हा त्यावेळच्या मुलींच्या खेळण्याचा भाग असे. कांही ठिकाणी ही ठकी रंगविलेली असायची. ठकी, ठेंगणी – ठुसकी, ठकूताई, ठमाबाई, ठेंगाबाई अशी मराठीतील ठ वरून सुरु होणारी नावे आणि विशेषणे या बाहुलीसाठी कायमची राखीव असत. ठकी ही फारशी स्मार्ट वगैरे न वाटता कांहीशी गावंढळ, मंद, ढ वाटत असे. त्या काळात शिक्षणामध्ये फारशी गती नसलेल्या मुलींचे लग्न लवकर उरकून टाकत असत. सर्वात महत्वाचे म्हणजे अस्सल मराठी बाहुलीचे रुप ल्यालेली ही ठकी बाहुली अशा मुलींचे एक प्रतीक ठरले होते. पुलंचे चितळे मास्तर हे त्यांच्या वर्गातल्या गोदी गुळवणीला गोदाक्का म्हणून हाक मारीत असत. तिचे वर्णन या ठकीला साजेलसे आहे. अशा ठक्या संसार मात्र चांगला करीत असत. ठकीची घराघरातील एकच बाहुली ही अनेक वर्षे लहान मुलींना खेळायला पुरत असे. पण ती फारच तुटकी फुटकी झाली तर तिचा उपयोग जात्याचा खुंटा ठोकणे, कुणाला तरी फेकून मारणे असल्या हलक्यासलक्या कामांसाठी केला जात असे. परंपरांच्या चाकोरीतच अडकलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून ठकीचे छायाचित्र अनेक पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर पाहायला मिळते. दूरदर्शनवरील वृत्त निवेदिका आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दिपाली केळकर यांनी ठकी, भातुकली, भातुकलीची विविध छोटी भांडी, खेळणी इत्यादींवर आधारित, ” खेळ मांडीयेला ” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.

भातुकली या खेळात केव्हांतरी एकदा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होत असे. फक्त मुलींच्या या खेळात मग अशा वेळी भटजी, वऱ्हाडी म्हणून मुलगेही सामील होत असत. या ठकीला नवरा म्हणून मग एक तितकाच ओबडधोबड बाहुला असायचा. त्याचे नावही देवजी घासाड्या, ठोंब्या, ठक्या असे काहीतरी असायचे.

आपली आई, आजी, आत्या, मावशी या दिसायला रूपवान असणे कधीच अपेक्षित नसते. तसेच या ठकीचे सुद्धा होते. ती भलेही सुंदर नसेल पण तिचे अस्तित्वच खूप सुंदर होते, भावपूर्ण होते. अनेक मुलींना तिने मोठे होताना पाहिलेले होते. ठकी ही केवळ एक बाहुली नसून ती अनेक पिढ्या, मुलींशी गुजगोष्टी केलेली एक संस्कृती होती.

अशा या ठकीची गरज आणि अस्तित्व जगभर होते, असे दिसते. भारतातच अनेक प्रांतांमध्ये अशा त्रिकोनी आकारात साकारलेल्या अनेक बाहुल्या आढळतात. (सोबतचे फोटो अवश्य पाहा). पण ठकीच्या तुलनेत त्या सौंदर्यवती दिसतात. रशियन बाहुली मातृष्का या नावाने ओळखली जाते. तर ९ मार्च १९५९ रोजी जन्माला आलेली अमेरिकन सुंदर बार्बी बाहुली आता ६७ वर्षांची होईल.

अशा सुंदर, रूपवान, फॅशनेबल आधुनिक बाहुल्यांपेक्षा ठकी म्हणजे मायेच्या आई, आजी, आत्या, मावशी यांच्यासारखी वाटते. पण तिची कायमची रवानगी आता पुरातन वस्तू संग्रहालयात झाली आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर 

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कशास मागू देवाला…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कशास मागू देवाला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

क्षणो क्षणी तो देतो मजला,

श्वासामागुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

क्षितिजावरती तेज रवीचे,

रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या,

नक्षत्रांचे लक्ष दिवे..

निळ्या नभावर रांगोळीसम

उडती चंचल पक्षी-थवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

वेलींवरती फुले उमलती,

रोज लेऊनी रंग नवे..

वृक्ष बहरती, फळे लगडती,

 गंध घेऊनी नवे नवे..

हरिततृणांच्या गालिच्यावर,

दवबिंदूंचे हास्य नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

प्रसन्न होऊनी निद्रादेवी,

स्वप्न रंगवी नवे नवे,

डोळ्यांमधली जाग देतसे,

नव दिवसाचे भान नवे,

अमृत भरल्या जीवनातले,

मनी उगवती भाव नवे,

कशास मागू देवाला,

मज हेच हवे अन् तेच हवे?

 *

कोणी आप्त तर कोणी परका,

उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे,

नाम तयाचे नित घ्यावे..

नको अपेक्षा, नकोच चिंता,

स्वानंदाचे सूत्र नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हीच तर तैलबुद्धी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ हीच तर तैलबुद्धी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कोयंडा दूर 

कुलुपासाठी

कल्पकतेने

केले काम

*

ज्या डोक्यातुन

सुचली कल्पना

तया बुद्धीला

करू सलाम

*

सुरक्षितता

महत्वाची तर

हतबल होऊनी

नसते चालत

*

तैल बुद्धीची 

विचारशक्ती

आचरणातून

असते बोलत

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ साहित्य से दोस्ती : विकास नारायण राय ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – साहित्य से दोस्ती : विकास नारायण राय ☆ श्री कमलेश भारतीय ☆

आज एक ऐसे व्यक्तित्व को याद करने जा रहा हूँ, जिन्होंने अपने दम पर ‘ साहित्य से दोस्ती’ जैसी मुहिम चलाई ।इसी के अंतर्गत कभी ‘ प्रेमचंद से दोस्ती’ तो कभी अम्बेडकर, तो कभी छोटूराम से दोस्ती जैसे अभियान चलाये और पूरा हरियाणा नाप दिया, पाट दिया साहित्य से दोस्ती के नाम पर !

इनसे मुलाकात तो हिसार के पुलिस पब्लिक स्कूल में हुई, जब मुझे बच्चों द्वारा लिखित कथा प्रतियोगिता के सम्मान समारोह में छोटी बेटी प्राची के चलते जाना पड़ा और पूरा समारोह ऐसे आयोजित किया गया, जैसे वरिष्ठ लेखकों को पुरस्कार बांटे जा रहे हों ! तभी कुछ कुछ हमारी भी दोस्ती इनसे हो गयी थी । उन दिनों वे करनाल के शायद मधुवन में उच्च पुलिस अधिकारी थे और अपने कड़क स्वभाव के लिए जाने जाते थे लेकिन साहित्य के लिए उनका दिल बहुत ही संवेदनशील था और आज भी है।

साहित्य से दोस्ती से पहले सन् 1992 -1993 के आसपास श्री राय ने ‘साहित्य उपक्रम’ नाम से एक प्रकाशन शुरू किया था और इसके तुरंत बाद ‘साहित्य से दोस्ती’ मुहिम भी चला दी । इसमें प्रेमचंद, भगत सिंह, छोटूराम व अम्बेडकर से दोस्ती जैसे अनेक अभियान चलाये । एक वैन किताबों से भरी चलती थी, जिसमें इनके मिशन के अनुसार सस्ते मूल्य पर अच्छी साहित्यिक किताबें उपलब्ध रहती थीं। जैसे कभी एनबीटी और रुसी साहित्य की पुस्तकें आसानी से मिलती थीं ।

आखिर ऐसा अभियान क्या चलाया ?

हमारे समय में कितनी ही समस्याएं हैं , जैसे कन्या भ्रूण हत्या, साम्प्रदायिक और प्रकृति को बचाने जैसी अनेक समस्याएं हैं ओर नयी पीढ़ी को इनके प्रति संवेदनशील बनाना ही इन दोस्तियों का मूल उद्देश्य रहा और आज भी है। किताबें आम आदमी की पाॅकेट को देखकर ही प्रकाशित की जानी चाहिएं और उपलब्ध होनी चाहिएं।

जब इनसे करनाल के पाश पुस्तकलय के बारे में पूछा तब श्री राय ने बताया कि आतंकवाद के दौरान हरियाणा पुलिस के दो अधिकारी और दो सिपाही पटियाला में शहीद हो गये थे । इनकी स्मृति में यह विचार चला कि या तो अस्पताल बनाया जाये या फिर पुस्तकालय ! आखिरकार फेसला पाश पुस्तकालय बनाने का हुआ ।  बहुत संवेदना और भाव से यह पुस्तकालय बनाया गया लेकिन समय के साथ साथ इसकी उपयोगिता पर सवाल उठे और आखिरकार इसे बंद कर दिया गया पर इससे हमारा अभियान खत्म नहीं हुआ । ‘साहित्य उपक्रम’ प्रकाशन आज भी चल रहा है ! आजकल श्री राय फरीदाबाद रहते हैं और वही कुछ न कुछ लिखते पढ़ते रहते हैं। यह साहित्य से दोस्ती पता नहीं हरियाणा में कितने लोगों को साहित्य से जोड़ने का काम करती आ रही है ! यह दोस्ती ज़िदाबाद ! लोगों के बीच किताबें लेकर जाते रहेंगे ! यह विश्वास दिलाते हैं वी एन राय ने ताकि बच्चे अपने समाज और अपनी समस्याएं को समझ सकें!

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क : 1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ सुमित्र संस्मरण ☆ आत्मकथ्य – श्री संतोष नेमा “संतोष” ☆

 ☆ पुस्तक चर्चा ☆ 

☆ सुमित्र संस्मरण ☆ आत्मकथ्य – श्री संतोष नेमा ‘संतोष’ ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में सतत प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. ई-अभिव्यक्ति पर आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार को ‘साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष’ के अंतर्गत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है स्मृतिशेष डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ जी के जीवन से संबन्धित विद्वतजनों के आत्मीय संस्मरणों पर आधारित आपकी पुस्तक सुमित्र संस्मरण पर आपका आत्मकथ्य।)

कौन कहता है कि सुमित्र जी हमारे बीच में नहीं रहे वह सदियों तक हम सभी के दिलों में जीवंत रहेंगे उनकी सहजता, सरलता, मिलन सारिता, प्रेम सहयोगात्मक रवैया एवं साहित्य एवं पत्रकारिता के प्रति उनका अनुराग और समर्पण स्मरणीय है. उन्होंने, रूस आदि देशों में जाकर संस्कारधानी का नाम साहित्य जगत में अंतर्राष्ट्रीय क्षितिज पर गौरवान्वित, एवं रोशन किया है सुमित्र जी के साथ आचार्य भगवत दुबे जी एवं स्वर्गीय गार्गी शंकर मिश्रा हर कार्यक्रम में साथ-साथ रहे हैं. उनकी यह त्रिमूर्ति साहित्य जगत में अपनी एक विशिष्ट उत्कृष्ट पहचान रखती है. पाथेय साहित्य अकादमी का गठन आपने किया, जिसके गठनोंपरांत सैकड़ो कृतियां पाथेय प्रकाशन से प्रकाशित हो चुकी हैं. आपसे जो भी मिला आप का होकर रह गया. हम जैसे नवोदित साहित्यकारों के लिए तो संजीवनी का काम करते थे और हमेशा समुचित मार्गदर्शन, आशीर्वाद और सानिध्य प्राप्त होता रहा है. मेरी प्रकाशित कृतियों में उनकी भूमिका एवं मार्गदर्शन मुझे प्राप्त होता रहा है.

साहित्य के गंभीर अध्येता, अद्भुत रचनात्मकता, माधुर्य व्यवहार के चलते उनके हजारों चाहने वाले हैं जिनके दिलों में राजकुमार की तरह राज करते हैं. इस बात से अंदाजा लगाया जा सकता है कि उनकी श्रद्धांजलि सभा में भीड़ में उपस्थित हर एक आदमी अपनी भावांजलि देने के लिए आतुर था. जब मैंने यह देखा तब उसी क्षण मेरे मन में यह विचार आया की क्यों ना एक सुमित्र संस्मरण का प्रकाशन किया जाए जिसमें उनके प्रति सभी साहित्यकारों के संस्मरण एवं भाव समाहित किए जा सकें. क्योंकि श्रद्धांजलि सभा में सभी को अपनी भाव अभिव्यक्ति का अवसर देना संभव नहीं होता है. तब हमने श्री सुमित्र जी से जुड़े सभी साहित्यकारों से अपने-अपने संस्मरण आमंत्रित किए. आज उन्हीं के आशीर्वाद से यह सुमित्र संस्मरण का प्रकाशन आपके सामने है.

जब हम सुमित्र जी की बात करते हैं तो भाई हर्ष की भी बात करना बहुत जरूरी है। आज के इस दौर में उनके जैसा पुत्र बमुश्किल देखने में नजर आता है। भाई हर्ष ने अपनी मातोश्री के साथ पिताजी की स्मृतियों को अक्षुण्ण बनाए रखने के लिए गायत्री एवं सुमित्र सम्मान बड़े ही गौरव गरिमा के साथ स्वयं बाहर लोगों के स्वागत के लिए खड़े होकर संयोजित करना प्रणम्य एवं प्रसंसनीय है. साथ ही इस अवसर पर विभिन्न क्षेत्रों में ख्याति लब्ध हस्तियों को उनके द्वारा सम्मानित भी किया जाता है.

सुमित्र जी का एक दोहा मुझे बहुत ही प्रिय लगता है –

बांच सको तो बच लो आँखों का अखबार

प्रथम पृष्ठ से अंत तक, लिखा प्यार ही प्यार

इस एक दोहे से उनके व्यक्तित्व का स्पष्ट दर्शन होता है उनके दिल में सभी के लिए प्यार था.! हमने भी उनके जन्मोत्सव पर कुछ एक दोहे लिखे थे जो …

राज करें हर दिलों में, राजकुमार सुमित्र

सबको अपने ही लगें, ऐसा मधुर चरित्र

*

यथा नाम गुण के धनी, सबके हैं वो मित्र

मिले सदा स्नेह हमें, जीवन बने पवित्र

*

मित्रों के भी मित्र हैँ, राजकुमार सुमित्र

मिलते सबसे प्रेम से, उनका हृदय पवित्र

*

ज्ञान सुबुद्धि विवेक ही, होते सच्चे मित्र

संकट में जो साथ दें, होते वही सुमित्र

*

जिनकी आभा से हमें, मिलता सदा प्रकाश

लेखन में गति शीलता, उनका दे आभास

सुमित्र जी का आकस्मिक निधन समूचे साहित्य जगत के लिए एक अपूरणीय क्षति है. उनके प्रति हम अपनी भावभीनी श्रद्धांजलि भावांजलि प्रस्तुत करते हैं. डॉ हर्ष तिवारी, डॉक्टर भावना शुक्ला, श्रीमती कामना कौस्तुभ, चाचा श्री आनंद तिवारी एवं समूचे परिवार के प्रति उनके द्वारा प्रकाशन में दिए गए भावनात्मक सहयोग के लिए हम अत्यंत आत्मीयता के साथ आभार एवं कृतज्ञता ज्ञापित करते हैं.

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

वरिष्ठ लेखक एवं साहित्यकार

संस्थापक मंथनश्री

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मुरारी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मुरारी ? ?

काल बावरा,

मेरी देह में

मुझे तलाशता रहा,

मुरारी की मानिंद

मेरा शब्द संसार,

काल के माथे पर

नाचता रहा!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

 

Please share your Post !

Shares