मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जरी आंधळा मी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

जरी आंधळा मी ! श्री संभाजी बबन गायके 

जन्माला झाली असतील पंधरा-सोळा वर्षं. जातीवंत आईच्या पोटी जन्मलो तेव्हा सर्वांनाच आनंद झाला होता. वीसेक एकर शेती, शिवाय इतरांची कसायला, अर्धलीनं घेतलेली तेवढीच शेती…   माझ्या येण्याने शेत-शिवार आणखी फुलून यायला मदतच होणार होती….    लेकरं चार घास आणखी मिळवणार होती.

आईनं दुधाला कमी पडू नाही दिलं. अंगी बळ वाढत होतं आणि लवकरच शेतावरही जाऊ लागलो. माझे मोठे डोळे, काळेभोर. त्वचेवर पांढ-या ढगांची जणू पखरण झालेली. दमदार चाल आणि बैजवार चालणं…   कुणाच्या अंगावर जायचं नाही आणि कुणी अंगावर आलंच तर त्याला आईचं दुध आठवावं असा माझा प्रतिहल्ला…  बाहेरचे शहाणे माझ्यापासून त्यामुळे थोडे अंतर ठेवीत असत. मात्र घरातले सर्व माझ्या अगदी अंगाशी खेळणारे..  लहान मुलं तर माझ्याभोवती निर्धास्त खेळत.

फार काही अंगाला झोंबलं, लागलं, दुखलं म्हणून कधी डोळ्यांतून एक टिपूस पाणी नाही आलं कधी…   पण एके दिवशी उजव्या डोळ्याला धार लागली. डोळ्यांत काहीबाही जातं शेतात कामं करीत असताना म्हणून मी आणि सगळ्यांनीच ही गोष्ट डोळ्याआड केली….    कामाचा धबडगाच इतका असतोय रानात….    आजारा-बिजाराला आणि त्यांचे कोड पुरवायला शेतक-याला कसली आली सवड?

पण मोठ्या दादांच्या ध्यानात आलं दोनच दिवसांत. काहीतरी गडबड आहे म्हणाला…   डॉक्टर साहेबांकडे लगोलग घेऊन गेला. “डोळा वाचणार नाही!” मी ऐकले आणि दादाने सुद्धा. पण माझ्याआधी त्याच्याच डोळ्यांत काळजीचं आभाळ दाटून आलं. डॉक्टर म्हणाले, ”कुठं खर्च करीत बसता! बघा काय निर्णय घेताय ते…   पण याला सांभाळत बसावं लागेल घरीच ठेवलं तर!”

तसं दादा लगबगीने म्हणाले, ” हा आमचाच आहे..  आमचाच राहील. सांभाळू की घरच्या घरी. काय खर्च व्हायचा तो करू…   पण याचा हा डोळा वाचतोय का बघा…   दुसरा डोळा आहेच की अजून शाबूत. ” 

डॉक्टर साहेबाचं मन ओलं झालं…   ”तुम्ही एवढी नुकसानी पदरात घेताय…   तर माझा पण शेर असू द्यात की या कामात. माझी फी बी काही नको. करून टाकू आपण जे काही गरजेचे असेल तेवढं!’ 

मी माझ्या चांगल्या डोळ्याने त्या दोघांकडे एकवार पाहून घेतलं….    दुसरा डोळा त्याच मार्गाला जाणार असं मला आपलं वाटून गेलं! 

दुखलं खूप तो डोळा डॉक्टर टाके घालून शिवत होते तेंव्हा….    पण या देहाला सवय होती सोसायची…   जन्मच तसा दिलाय देवानं…   करणार काय? 

घरी आलो…   पण खूप दिवस बसून राहणं मनाला पटेना. उभारी धरली आणि कामाला जुंपून घेतलं स्वत:ला..  जमेल ते करीत राहिलो…   एका डोळ्याने अजिबात दिसत नाही हे पार विसरून गेलो. देवाची पण काय करणी पहा…   महत्त्वाच्या चीजा एक एक जास्तीच्या दिल्यात त्यांनं…   एक निसटलं तर दुसरं हजर. बघा ना, दोन-दोन कान, दोन-दोन डोळे!

पण हे दान मला नाही पुरलं…   वर्षभरात दुस-याही डोळ्याने पहिल्या डोळ्याची वाट धरली! आता तर कुणाचा काही इलाज असेल असं वाटावं अशी हिंमतच नाही उरली काळजात. पण याही वेळेस दादा, डॉक्टर आणि इतर सर्वच माझ्या पाठीशी उभे राहिले. राहू द्या…   एका कोप-यात पडून राहील जन्मभर…   आम्ही खायला-प्यायला घालू…   शेतकरी आहोत…   घासातला घास देऊ! आमच्यात घरातल्यांना वृद्धाश्रम दाखवला जात नाही…..     उद्या आपली सुद्धा तीच गत होते…   म्हणून आपलं म्हणून जे कोणी आहेत त्यांना घरात आणि उरात जागा करून द्यायची रीत मातीत पावलं रुतवून असणा-या कृषीवलांची.

याही वेळी कुणीच माझ्या दादाकडून एक नवा पैसा घेतला नाही. पुण्य करण्याची अशी एखादी लहानसहान संधी चांगली माणसं बरी सोडतील….    मोठं पुण्य करण्याची ताकद देव देईल तेंव्हा देईल! 

आता उरलेला उजेडही माझ्यासाठी परका झाला…   आणि मी हिरव्या शेताला पोरका झालो….    मातीला पारखा झालो!

दादांची आई होती म्हातारी झालेली. तिने तिच्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी मला घास भरवले…   बाकीची कामांत गुंतले असताना ही माऊली या तिच्या नातवाला गोंजारत राहिली…   दुखलं-खुपलं पाहू लागली. आणि माझ्याही नकळत मी तरुण झालो..  धष्टपुष्ट बनलो! माझा मी मला पाहू शकणार नव्हतो शेतातल्या पाटात वाहत असलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब पडेल पण मी पाहू शकणार नव्हतो….    हो…   दादाच्या डोळ्यांनी मात्र पाहीन..  त्याने शेतात नेलं तर.

एखाद्या लहानग्या पोरांचं करावं तशी माझी काळजी घेतली गेली. येणारे-जाणारे पाहुणे मला बघायला यायचे..  आणि कुणी काही, कुणी काही म्हणून जायचे. या बिनाकामाच्याला नुसतं सांभाळून होणार तरी काय? असा सर्वांचा सवाल होता…   आणि त्यात काहीही खोटं नव्हतं! 

दुसरं कुणी असतं दादाच्या जागी तर माझी रवानगी एव्हाना झालीही असती आणि माझ्या खुणा कायमच्या पुसल्या गेल्या असत्या या जन्माच्या सारीपाटावरच्या! 

गिधाडं आभाळात घिरट्या घालून घालून थकली….    पण मी कोसळून पडलो नाही. कारण बाकीचे अवयव शाबूत..  बुद्धी जागेवर..  आणि मनाची तयारी भरभक्कम होती. एखाद्या चित्रातील सुंदर चेह-यावर चित्रकार डोळे रंगवायचे विसरून गेला असावा..  तशी त-हा! 

जागच्या जागी बसून राहणे…   माझ्यासाठी चांगले नव्हते आणि मलाही ते नकोच होते. शरीर धडधाकट आहे…   का नाही काम करायचं? त्याच्या मनात नसूनही दादाने माझ्या खांद्यावर थोडं ओझं टाकून पाहिलं…   मी नको म्हणालो असतो तर त्याने जबरदस्ती नसती केली…   माझी खात्री आहे! 

पण इतक्या दिवसांच्या आरामाने स्नायू जरा आळसावलेले होते..  त्यांना सरळ करायला पाहिजेच की. लागलो कामाला. इतका का हळूहळू मी आणि सारेच विसरून गेले…   मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे ते! 

डोळ्यांना माती दिसत नसली तरी पावलांना तिची ओळख आधीपासूनची. पण जराशी पावलं चुकली की थांबायचो…   मग दादा म्हणायचा…   सोन्या…   जरा थोडा इकडं सर…   पलिकडं हो…   थांब…   आणि आता चल! बास…   हे चारच शब्द पुरू लागले…   मी आपसूक योग्य रस्ता धरून चालू लागलो. मजबूत खांद्यांना ओझ्याची तमा नव्हती…   पाठीवर दादाचा राठ पण प्रेमाचा हात पडला की दिसत नसलेलं आभाळ समोर येऊन उभं ठाकायचं…   आभाळातली गिधाडं मला तर केंव्हाच विसरून गेली असतील! 

घरातल्या लग्नांना जाताना मी सोबत असायचो…   खळाळून हसणा-या कलव-या, नटलेली बाया माणसं…   नाचणारी पोरं..  आणि लाजणा-या नव्या नव-या…   सारं काही अनुभवलं या शिवलेल्या डोळ्यांमधून….    दिवस गोडीने आणि जोडीने पुढे पुढे चालत होते…   माझ्यासारखे!

दादाचा संसात वाढत गेला…   खाणारी तोंडं वाढत गेली आणि माझं शेतातलं काम सुद्धा. मग कधी दुस-याच्या शेतावर जाऊ लागलो…   वाट दावायला सर्व होतेच सोबत. मला काही पाहण्याची गरज उरली नव्हती. खाल्लेल्या घासाला जागायचं म्हणून जगायचं होतं…   शेवटापर्यंत…   दादाच्या जवळ..  त्याच्या वावरात…   त्याच्या अंगणातल्या झाडाखाली!

खूप दिवस…   नव्हे खूप वर्षे उलटून गेली की माझे काळीज अंधारून गेले होते त्या गोष्टीला…   आता शरीर थकलं! दादाने मला आता शेतावर नेणं बंद केलंय…   पण घरी मन रमत नाही….    धाकल्या-थोरल्या भावंडांना इतरांनी मारलेल्या हाका ऐकल्याशिवाय गमत नाही! मला जायचं असतं…   दादासोबत शिवारात…   पण दादा नको म्हणतोय! किती केलंस आमच्यासाठी…   आता पुरे झालं की रं मर्दा! सुखानं पडून रहा…   गळ्यातल्या घाटी हलवत हलवत…   तो आवाज घुमू दे अंगणात, घरात! नातवंडं-पतवंडं खेळतात की तुझ्या नजरेच्या पहा-यात! 

शेवट दिसत नसला तरी जाणवतोय हल्ली….    देहातली शक्ती क्षीण झालीये…   पैलतीर दिसतो आहे! 

दादा कुणाला तरी सांगत होता…..     याचा देह मातीत गेला तरी याची समाधी बांधीन….    याला नजरेसमोरून हलून देणार नाही….    मी असेतोवर! 

हे ऐकून डोळ्यांच्या आत पाझारलेली आसवं…   थेट काळजात घुसली…   आणि काळीज ओलं ओलं झालं! देवा…   मी गेल्यावर डोळे भरून पाहण्याची एकवार मुभा देशील मला…   माझ्या या शेतकरी दादाला पाहण्याची? 

(गोवंश हा आपल्या मातीचा खरा आधार. आईच्या आणि गाईच्या पोटी जन्मलेलं प्रत्येक लेकरू शेतक-यास प्राणाहुनी प्रिय. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील वाळूज गावात एक शेतकरी दादा राहतोय…   शेती कसतोय. त्यांचं नाव…   इंद्रसेन गोरख मोटे. त्यांच्या कपिलेने एका खोंडाला जन्म दिला. दोन वर्षात हा सोन्या औतकाठीच्या कामाला आला. पण दुर्दैवाने त्याचा एक डोळा निकामी झाला. लोकांनी हा बैल बाजारात विकून टाकण्याचा व्यवहारी सल्ला दिला. पण दादांनी सोन्याला विकले नाही. कालांतराने सोन्याने दोन्ही डोळे गमावले. आता तर सोन्याची कसायाच्या कत्तलखान्यात रवानगी होणं निश्चित होतं..  पण इंद्रसेन आणि त्यांच्या कुटुंबाने सोन्याला शेवटापर्यंत सांभाळण्याचे ठरवले आणि ते करूनही दाखवले. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसूनही सोन्याने शेतीच्या कामांत प्रचंड कौशल्य कमावले! दादांच्या एका शब्दावर त्याला नेमकं कुठं वळायचं, चालायचं, थांबायचं हे सर्व समजू लागलं…   आणि दादांचा संसार चौखूर चालला! 

 सोन्यावर उपचार करणा-या सर्व डॉक्टर साहेबांनी बहुतांशी मोफत उपचार करून मानवतेचा धर्म पाळला. हा सोन्या आता म्हातारा झाला आहे. सोन्या आज न उद्या हे जग सोडून जाईल…   प्राण्यांची आयुष्ये तशी कमी असतात….    पण दादा सोन्याचे स्मारक बांधणार आहेत…   त्याच्या स्मृती जपणार आहेत! महाराष्ट्र टाईम्सच्या इरफान शेख यांनी या सोन्याची आणि त्याच्या शेतकरी मालकाची एक सुंदर विडीओ बातमी केली आहे. ही बातमी पाहून मी सोन्या झालो…   आणि हे शब्द सुचले…… 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे डिसेंबरच्या नाताळापासून आमच्या लहानपणी शाळेला सुट्ट्या लागत त्याला नाताळाची सुट्टी नाही तर हुरड्याची सुट्टी असंच नाव असे. त्यामुळे दहा दिवसाची सुट्टी असे सुट्टी लागली रे लागली की गावाकडे जायचं. 25 किलोमीटर अंतरावर गाव, पण अक्कलकोटवरून बसमधून उतरून दुसरी बस करून जावे लागे. एसटी आमच्या शेतातच थांबत असे. गाव लहान दोन अडीच हजार संख्येचा! पाच मिनिटाच्या अंतरावर घर…   गाडीतून उतरल्यापासून गावाचे अगत्य सुरू होई..  म्हाताऱ्या बायका ‘भगवानरावन मगळू’…   म्हणून आला बला काढित. कुणी हातातलं सामान घेई आणि मग आमची वरात घरी येत असे.

घरी काका काकू अतिशय हसतमुखाने स्वागत करीत. मोठं घर वाटच पाहत असे..  आमची चुलत भावंडं आणि आम्ही दंगा करायला मोकळे. घर मोठं होतं..  समोर मोठी ओसरी, ओसरीच्या पुढे मोठे अंगण..  अंगणाच्या थोडसं पुढे गोठा..  त्यात दोन-तीन दुभती जनावरं..  गोठ्याच्या बाजूला लावलेल्या शिडीवरून माळावर जायला जिन्यासारखा भाग. अंगणात पहिल्या ओसरीवर किंचित वर तुळशी वृंदावन..  तिथेच हनुमानाच्या आणि पांडुरंगाच्या मूर्ती. बाजूला मोठी पडवी..  पडवीच्या बाजूला बंद बाथरूम. ओसरीच्या थोडसं वर पत्र्यात असलेली दुसरी ओसरी त्याच्यावर दगडाने बांधलेला मोठा भाग..  तिथे झोपाळा लावलेला असे. त्याच्या बाजूला चार खोल्या, एक मोठं देवघर, सामानाची खोली आणि दोन बेडरूम. खालच्या ओसरीला लागून भलं थोरलं स्वयंपाकघर..  ज्यामध्ये जेवणाला बसण्याची सोय..  कपाट..  त्या कपाटात दही दूध ताक ठेवण्यासाठी बांधून घेतलेले कट्टे..  तिथे बरोबर ती ती भांडी बसत असत. सरपण ठेवायला एक मोठी खोली आहे. शेगडी चूल वैल आणि त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी वरच्या बाजूला धुराडे ! स्वयंपाकघर शेणानी सारवून लख्ख असे. आत उतरायला दोन मोठ्या आयताकृती पायऱ्या असत. हातपाय धुऊन स्वयंपाक घरात गेलं..  थोडं खाऊन पिऊन झालं की मग शेताकडे रवाना. त्या दिवशी नुसती शेताकडे भ्रमंती व्हायची..  किरकोळ बोर डहाळा शेंगा…   !

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र उठल्याबरोबर तोंड धुतलं की कप घेऊन आम्ही गोठ्यात बसत असू. काका म्हशीची धार काढून आमच्या तोंडावरही ते सोडत असत. आमच्या कपात दुधाच्या धारा यायच्या की त्याचा फेस व्हायचा आणि मग तसा गच्च फेस भरलेला कप आम्ही तोंडाला लावायचा. त्या नीरशा दुधाची गोडी काही और असायची. दूध पिऊन झाले की चटणी मीठ इत्यादीचे डबे घेऊन आम्ही शेताकडे कुच करायचे. आमच्या आधी आमचा वाटेकरी निंगप्पा तिथे हजर असायचा. निंगप्पाची शिस्त भारी..  बंद गळ्याचा शर्ट धोतर..  झुबकेदार मिशा..  डोक्याला लाल मुंडासे..  कानामध्ये आता मुलं घालतात तशा बाळ्या किंवा रिंगा ! तो शेत इतकं उत्तम करायचा..  त्यांनी पाडलेल्या शेतातल्या सरी अगदी मापात असायच्या ! एकदा राजेसाहेब अक्कलकोट येथून शिकारीला आले होते..  सशाच्या. त्यांनी सरीतून बरोबर बाण सोडून मारले ती सरी इतकी सरळ होती त्याबद्दल राजेसाहेबांनी त्याला पारितोषिकही दिले होते..  असा तो पारितोषिक विजेता आमचा वाटेकरी निंगप्पा..  आम्हा मुलांना पाय झटकून पाय पुसून घोंगड्या वरती येऊ द्यायचा…   अगटी पेटवलेली असायची, तिच्या धुरावर मग आम्ही त्याने आणून टाकलेला डहाळा भाजून घेत असू. आगटीमधून बाहेर पडणारा त्या ज्वाला..  तो धूर..  त्या दुधाचा विशिष्ट वास…   एक वेगळेच वातावरण निर्माण करायचा ! धूर कमी होऊन फक्त ज्वाला शिल्लक राहायचे, हळूहळू त्या शांत व्हायच्या आणि मग अगदी फक्त आर उरायचा त्याला सर्व बाजूने राखेने लपेटून.

निंगप्पा कौशल्याने त्यात काढून आणलेली सुंदर कोवळी कणसे खोचायचा..  त्याच्याच थोडे बाजूबाजूने मोठी मोठी वांगी भाजायला टाकायचा. एरंडाची पानं धुवून पुसून तयार असायची. आम्ही अगटीच्या भोवती बसलो की मग प्रत्येकाला एक पान दिले जायचे. त्या पानावर मस्त दाण्याची चटणी, गुळाचे खडे, राजा राणी थोडासा फरसाण, किंवा चिवडा खास आमच्या काकांनी बनवलेले मीठ, त्यात जिरे हिंग वगैरे पदार्थ असायचे. या सगळ्यांच्यासह हुरड्याची पूर्वतयारी व्हायची. मग तो लीलया एकेक कणीस अंदाज घेत अगटीतून बाहेर काढायचा..  एका छकाटीने ते झटकायचा..  फुंकर मारायचा आणि हातावर चोळायचा…   कोवळे कोवळे लुसलुशीत हिरवे गार भाजलेले दाणे कणसातून बाहेर येत..  काळीशार घोंगडी वरती हिरवे कोवळे दाणे..  त्यांचं रूप देखणं दिसायचं ! मग सगळे तो गरम गरम हुरडा खाण्यासाठी तुटून पडायचे. शेजारी बसलेल्या माणसाच्या हातावर आपल्या हातातले कोवळे जाणे अलगद निंगप्पा ठेवत असे ! निंगप्पाच्या हातून आपल्या हातावर हुरडा येणे हे खूप भारी समजले जायचे…   आम्ही या शेताचे मालक आहोत याची जाणीव आम्हाला व्हायची…   काही म्हणा मालक असण्यात रुबाब असतो ! मग एकापाठोपाठ एक कणसं चोळून दाणे काढून तो आम्हाला देत असे ! मीठ लसणीची चटणी – शेंगाची चटणी – गूळ – भाजलेले शेंगदाणे, नुकतंच आगटीतनं काढलेले भाजलेले वांगे – याची चव अहाहा – कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पदार्थाला नाही, न कॉन्टिनेन्टल पदार्थाला आहे..  जगातले ते सगळे ऐश्वर्य भारतीय शेतकऱ्याजवळ आहे !!!

पोटभर हुरडा खाऊन झाला की मग हुरड्याच्या धाटाखालील जाड उसाचा फडशा पडत असे. कारण आम्हाला असं सांगितलं जायचं की हुरड्यानंतर तो धाटाचा ऊस खाल्ला की हुरडा पचतो. आमची पंगत संपेस्तोवर मोठी माणसे हुरड्याला येत असत. वडील असले की दोन-तीन पाहुणे बरोबर असायचे. काकू आणि आई मात्र घरी स्वयंपाक करण्यात मग्न असायच्या. पाहुण्यांची सरबराई होई आणि मोठ्या माणसाचा हुरडा खाऊन होईपर्यंत आम्ही शेतात हुंदडायला मोकळे…   मग शेतातून हिंडताना उभ्या ज्वारीच्या धाटाखाली पाथरीची भाजी, करडीची भाजी अशा रानभाज्या..  लाल भडक टोमॅटो…   कोवळ्या काकडीच्या वेलाला लागलेल्या काकड्या…   एखाद दुसरे पिकलेले शेंदाडे..  तुरीच्या कोवळ्या शेंगा..  असा ऐवज गोळा करून आम्ही झाडाखाली ठेवलेल्या किटलीतून भरपूर ताक पिऊन घरी पळत असू ! 

घरी हे सगळं सामान टाकलं की अगदी घराच्या समोर नदी..  कपडे घेऊन नदीत डुंबायला जायचं..  तिथेच काकू आणि आई धुणं धुवत असायच्या. त्यांना कपडे वाळत घालण्यासाठी मदत करायची. नदी इतकी स्वच्छ होती की खालची वाळू स्पष्ट दिसत असे. पाण्याला फार ओढ नव्हती. बोरी नदी पण हान्नूरला तिचा आकार हरिणासारखा होत असे म्हणून त्या नदीला हरणा नदी असं म्हणत ! नदीत बराच वेळ डुंबून आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत पाण्याचा मुबलक आनंद घेत आम्ही घरी परतत असू ! नदीवरून पाणी आणायचे असल्याने काकू आणि आई एक एक घागर घेऊन पुढे जात आणि आम्ही धुणे डोक्यावर घेऊन येत असू..  अर्थात कपडे वाळल्यामुळे तेव्हा ते हलकेच असायचे पण त्या दोघींना मात्र जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी घेऊन यावे लागे. बाकी पाणी भरायला गडी माणसं असत पण स्वयंपाकाचे आणि पिण्याचे पाणी मात्र घरच्या लोकांना भरावे लागे.

आमच्या आठ दिवसाच्या मुक्कामात दोन-तीन दिवस गावातल्या सरपंच पाटील इत्यादी लोकांकडून आम्हाला शिधा येत असे. त्यात हरभऱ्याची डाळ, गुळ, कणिक, भाजीपाला, आणि दूध यांचा समावेश एका मोठ्या परातीत केलेला असायचा आणि ती परात घरी यायची..  मग त्या दिवशी पुरणपोळीचा बेत केला जायचा आणि दुपारी बारा वाजता त्या घरचा माणूस येऊन ती परत घेऊन जात असे. त्यात तीन-चार पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी आणि भात भाजी त्यांच्या घरी पोहोचती केली जायची. बामणाच्या घरचा प्रसाद म्हणून ते श्रद्धेने खात असत ! 

गावातली सगळीच माणसं फार प्रेमळ होती..  मग कुणाकडे उसाचा गुऱ्हाळ असेल तर गुऱ्हाळावर निमंत्रण असायचे. इतरांच्या शेतावर हुरडा खायला निमंत्रण… 

संध्याकाळी कधीकधी काका आम्हाला नदीपलीकडच्या माळावर नेत असत. तिथे बोरीची खूप झाड होती. त्याच्याखाली एक चादर अंथरुन त्याखाली आम्ही मुले बसत असू आणि काका झाड हलवत असत आमचे बोरन्हाण व्हायचे..  अगदी खऱ्या अर्थाने….    मग ते बोराचे भले थोरले गाठोडे बांधून आम्ही घरी येत असू..  संध्याकाळी अंगणामध्ये पाटीमध्ये अगटी पेटवून काकू आणि आईसाठी स्पेशल हुरडा व्हायचा. आम्ही शेंगाचे वेल भाजून घेत असू. ओल्या हरभऱ्याचा हावळा व्हायचा म्हणजे…   वर येणाऱ्या ज्वालावर तो हरभरा भाजून घ्यायचा फार सुंदर लागायचं !आठ दिवस काका काकूंच्या प्रेमळ पाहुणचारात कसे निघून जायचे कळायचं नाही.

रात्री एका खोलीमध्ये आम्ही सगळी भावंड झोपत असू आणि मग तिथे भुतांच्या गोष्टी रंगत ! बाहेर मस्त थंडी..  पोट गच्च भरलेले..  आणि उबदार खोली..  गाढ झोप लागायची ! अस्सल मातीतले अन्न..  वाहत्या नदीचे पाणी..  शुद्ध हवा..  शेतीतला मन प्रफुल्ल करणारा आनंद ठेवा…   यांनी ते आठ दिवस कसे जायचे कळायचंच नाही. आता पाचशे रुपयांचा..  सहाशे रुपयांचा हुरडा मिळतो. पण तो आनंद पुडीत बांधून विकत घेतला तसा प्रकार आहे. हन्नूरवरून सोलापूरला येताना फार वाईट वाटायचं. येताना सामान प्रचंड वाढलेल असायचे. हरभऱ्याची भाजी, उसाच्या कांड्या, बोरं, वाळलेला हुरडा, शेंगाची चटणी, मसाले, अगदी राखुंडी सुद्धा आई बनवून घेत असे. हे सगळं भरभरून देताना काका काकूंना आनंदच व्हायचा..  साधी गरीब शेतकरी माणसं पण अतिशय प्रेमळ ! 

माझ्या शाळेतल्या शिक्षिका, कॉलेजातले प्रोफेसर, शेजार पाजार, मित्र-मैत्रिणी अशा अनेकानी आमच्या शेताचा आनंद घेतला आहे आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यात आम्हालाही खूप आनंद व्हायचा. एखाद दिवसाची ती त्यांची ट्रीप त्यांच्याही आयुष्यभर लक्षात राहिलीय..  काका काकू आम्हाला स्टॅन्डपर्यंत पोचवायला यायचे. काकू आणि आईच्या डोळ्यात निघताना पाणी असायचे. आमची चुलत भावंडंही आमच्यावर तितकेच प्रेम करणारी होती. त्यामुळे हन्नूरची ओढ आजही आहे.

आता ते तितके मोठे घर, त्यात राहणारी माणसं, सारे हळूहळू वजा झाले..  शेतामधली पीकं पण संपली..  उसाचे गवत शेतात उभे राहिले..  कारण गावाला धरण झाले. सगळे गावच बदलून गेले…..     

तो गाव कुठे हरवला माहित नाही, पण मातीची ओढ मात्र कायम आहे आणि असणार…   !

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…☆ संकलन व प्रस्तुती : जगदीश काबरे ☆

महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार –

1) प्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणतात, “ईशनिंदेबाबत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहितीये) मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरतो. विश्वात कोणी सिद्ध केलं, की देव आहे, तर मी स्वतःचं सर्वस्व त्याला देऊन टाकीन”.

2) तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतात, “ईश्वर हे केवळ शोषणाचं साधन आहे”.

3) तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्सच्या मते ईश्वराचा जन्मच मुळात आपले वर्चस्व राखण्यासाठी हितसंबंधीयांनी केलेला आहे.

4) ”जो देव देवळात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय पाडणार?” अशा शब्दांत संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनांतून लोकांना खडसावतात.

5) शहीद भगतसिंग म्हणतात, “या देशातले आस्तिक तरुण माझ्या नजरेत नामर्द आहेत. “

6) प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मते, “नास्तिक माणसाचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो इतरांवर प्रेम करतो”.

7) डॉ. श्रीराम लागू यांनी तर ‘देवाला रिटायर करा!’ अशी हाळी दिली.

8) बिल गेट भारतीय लोकांविषयी म्हणतात, ”या देशातल्या मंदीरं आणि मस्जीदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. “

9) स्वामी विवेकानंद म्हणतात, ”माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील, अन् तेल दगडावर ओततील!” 

10) “देव दगडात नसून माणसांत आहे. देव-देवळं आणि देवाधर्माच्या नावानं चाललेली कर्मकांडं ही पुरोहितांची रोजगार हमी योजना आहे. देवळात आपलं शोषण होतं, हेच भक्तांना कळत नाही. देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदीरात नाही…   ” हे प्रबोधनकार ठाकरे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवत आले.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

काही महिन्यांपूर्वी माझी पुण्यामध्ये संगीत उपचार करणाऱ्या एका ट्रेनरसोबत ओळख झाली. ते Music Therapy वर रिसर्च करतात आणि लेक्चर्स देतात. संगीत उपचारने आपण बऱ्याच त्रासांवर मात करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. वेगवेगळ्या लोकांच्या वर सध्या पुण्यात खूप ठिकाणी असे उपचार चालू आहेत आणि याचे रिझल्ट्स खूप आश्चर्यकारक आहेत. बऱ्याच लोकांना फरक पडत आहेत. पूर्वी लोकं ग्रामोफोनवर असे बरेच राग ऐकत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहत असे.

खाली दिलेले सर्व राग तुम्हाला YouTube वर मिळतील.

जात्याच संगीताची आवड असणारी मी, एक प्रयोग म्हणून 30 दिवस दररोज 45 मिनिटे हेडफोन लावून शांत ठिकाणी यातील काही राग ऐकले. आणि मलाही आश्चर्यकारक फरक जाणवले. संगीतावर माझा शास्त्रीय अभ्यास नाही; पण संगीत आणि गाणी हा माझा खूप आवडता छंद आहे.

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ:

 १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

 २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

 ३. राग देस – उत्थान व संतुलन साधणारा.

 ४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

 ५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणीव करून देणारा राग.

 ६. राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

 ७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.

 ८. राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.

 ९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

 १०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा, प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

 ११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

 १२. राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग. प्रेमभाव निर्माण करणारा व सांसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

 १३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग. हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.

 १४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यशदायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

 १५. राग भीमपलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

 १६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो. आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

 १७. राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहीशा करणारा.

 विशेष सूचना:-

डॉक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डॉक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

#हृदयरोग

राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )

३) बहुत प्यार करते है, तुमको सनम ( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ( नागिन).

 #विस्मरण

लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों (मेहबूबा)

२) ओ मेरे सनम (संगम)

३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर(ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन(मेरा नाम जोकर )

#मानसिक_ताण_अस्वस्थता

ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.

१) पिया बावरी ( खूबसूरत )

२) मेरे सूर और तेरे गीत (गूँज उठी शहनाई )

३) मतवारी नार ठुमक ठुमक चली(आम्रपाली)

४) तेरे प्यार में दिलदार ( मेरे मेहबूब )

  #रक्तदाब

हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.

  #उच्च_रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ( भाभी )

२) चलो दिलदार चलो ( पाकीजा )

३) नीले गगन के तले( हमराज )

४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ )

 #कमी_रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०)

 #रक्तक्षय_ऍनिमिया

अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म )

३) नदियाँ किनारे ( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की)

#अशक्तपणा

शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय, उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंतीवर आधारित गाणी ऐकावीत.

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त )

 #पित्तविकार_ॲसिसिटी

ॲसिसिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.

१) छूकर मेरे मन को ( याराना )

२) तुम कमसीन हो नादां हो ( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा )

राग केदार:

१) हमको मन की शक्ती देना ( गुड्डी)

२) आपकी नजरो में (घर)

३) पल दो पल के ( द बर्निंग ट्रेन)

४) दर्शन दो घनश्याम नाथ मोरी

राग भैरवी:

१) तुमही हो माता पिता तुमही हो

२) ये गलिया ये चौबरा ( प्रेमरोग)

३) दिल दिया हैं जान भी देंगे ( कर्मा)

४) दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे (तीसरी कसम)

राग यमन:

१) धुंदी कळ्यांना ( धाकटी बहीण)

२) जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा)

३) इक प्यार का नगमा है( शोर)

४) नाम गुम जायेगा ( किनारा)

राग मालकंस:

१) आधा है चंद्रमा रात आधी ( नवरंग)

२) पग घुंगरू बांध मिरा नाचे( नमक हलाल)

३) दिल पुकारे आरे आरे (jewel thief)

४) ये मालिक तेरे बंधे हम ( दो आंखे बाराह हाथ)

राग अहिरभैरव:

१) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

२) अलबेला सजन आयो रे ( हे गाणे हम दिल दे चुके सनम मधले न ऐकता बाजीराव मस्तानी ह्या सिनेमातले ऐकावे)

३) सोला बरस की बाली उमर को सलाम ( एक दुजे के लिये)

४) कोमल काया विमोह माया ( नटरंग)

राग हंसध्वनी:

१) अखेरचा हा तुला दंडवत( मराठा तितुका मिळवावा)

२) अग नाच नाच राधे उडवूया रंग ( गोंधळात गोंधळ)

राग भूप:

१) इन आंखो की मस्ती के ( उमराव जान)

२) देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये (सिलसिला)

३) कांची रे कांची ( हरे राम हरे कृष्ण)

४) सायोनारा ( लव इन टोकियो)

राग आसावरी:

१) इक राधा इक मीरा ( राम तेरी गंगा मैली)

२) मेरे महबूब कयामत होगी ( Mr. X in Bombay)

३) हम तेरे बिन अब रह नही सकते (आशिकी)

४) कौन तुझे यू प्यार करेगा (MS Dhoni)

राग दुर्गा:

१) सावन का महिना, पवन करे शोर ( मिलन)

२) तू इस तरह से मेरे जिंदगी में शामील है ( आप तो ऐसे ना थे)

राग देस:

१) वंदे मातरम्

२) प्यार हुआ छुपके से ( 1942 love story)

३) अजी रुठकर कर के कहा जाईएगा ( आरजू)

४) चदरिया झिनी रे झिनी ( जुदाई)

राग बिलावल:

१) लग जा गले ( वो कौन थी)

२) जय जय संतोषी माता ( जय संतोषी माता)

३) जण गण मन अधिनायक

४) ओम जय जगदीश हरे

राग श्यामकल्याण:

१) शूरा मी वंदिले

राग भीमपलासी:

१) तू चीज बडी है मस्त मस्त ( मोहरा)

२) ये अजनबी तू भी कभी ( दिल से)

३) तू मिले दिल खिले ( Criminal)

४) नैनो में बदरा सावन (मेरा साया)

रागाची चव कळावी म्हणून मी ही सर्वपरिचित चित्रपटगीते दिली आहेत. जेव्हा केव्हा मी माझी काही favourite गाणी ऐकत असते तेव्हा ती कोणत्या रागावर आधारित आहे हे आवर्जून पाहत असते. अजूनही तुम्हाला वरील रागावर YouTube वर खूप गाणी मिळतील.

पण मी म्हणेन प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.

लेखिका : श्रीमती सरस्वती

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निर्वासित” – लेखिका : डॉ. उषा रामवाणी – गायकवाड ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “निर्वासित” – लेखिका : डॉ. उषा रामवाणी – गायकवाड ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – निर्वासित 

लेखिका – डॉ. उषा रामवाणी –गायकवाड

प्रकाशक – उष:काल पब्लिकेशन 

पृष्ठे – 430 

मूल्य – 400 रुपये

‘निर्वासित’ हे डॉ. उषा रामवाणी यांचे आत्मकथन. त्यांच्या जीवन-संघर्षाची कहाणी. प्रस्तावनाकार डॉ. राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ) लिहितात, ‘हे आत्मकथन वाचनीय, प्रांजळ आहे. यात उषाच्या ‘धाडस करण्याला हाक देऊ आणि पुढे जाऊ’ या वृत्तीचा परिचय येतो. अंगावर कोसळलेले प्रसंग धाडसाने टिपताना आणि त्यातून मार्ग काढण्याची पायरी ओलांडताना त्यांना पदोपदी झगडावं लागलं. प्रस्थापित जीवनशैली झुगारून आत्मशोधनाचं धाडस ही त्यांची या आत्मकथनाचा ‘हीरो’ म्हणून प्रमुख भूमिका. ’ ते पुढे लिहितात, ‘आत्मकथा म्हणजे, आपल्याला समजलेल्या जीवनातील, स्वत:ला भावलेल्या अनुभवांचं कथन असतं. ’ 

आपलं ‘मनोगत’ व्यक्त करताना लेखिका म्हणते, ‘मी आत्मकथन लिहिणार असल्याचं शाळेत असल्यापासून ठरवलं होतं. आजवरचं माझं जगणं वाचनीय आहे, असं मला आणि अनेकांना वाटतं, म्हणून मला ते ग्रंथबद्ध करावसं वाटलं. ती श्वासाइतकी उत्कट गरज वाटली. या आत्माविष्काराला सार्वजनिक स्वरुपात ‘न्याय’ दिल्याशिवाय घुसमट थांबणार नव्हती. या लिखाणातून मला जे आत्मिक सुख मिळाले, ते अमूल्य आहे’.

‘हे आत्मचरित्र नाही. उत्कटतेने, उत्स्फूर्तपणे तुमच्याशी मारलेल्या या गप्पा, हितगुज आहे’, असंही लेखिका म्हणते.

आजवर मी मूलभूत गरजांसाठीच जीवघेणा संघर्ष केला आहे. घर, पैसा, प्रेम, आधार वगैरे…   जगण्याच्या मूलभूत प्रश्नाशी इतर प्रश्न भिडत राहिले. जगावंसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळले होते. अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड लढाई चालू होती. लहानपणापासून मी टोकाची अलिप्त, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले होते. स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होता आणि माझीच मी मला नव्याने आकळत गेले.

तिने आपली संघर्षगाथा 2016मध्ये फेसबुकवर पोस्ट केली. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अविनाश धर्माधिकारी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो इ. अनेक जाणकार साहित्यिकांनी कौतुक केले. तिच्या या कहाणीला 5000 तरी लाईक्स आणि कमेंटस मिळाले असतील. मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा, सतीश बडवे यांनी खालील शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय, ‘या लेखनात खूप जागा आशा आहेत, की त्यातून आपली घर नावाची संस्था, विद्यापीठ नावाची संस्था आणि भोवतालचा समाज यातील ताणे-बाणे उलगडले जातात. त्यातही मुलीच्या वाट्याला येणारे संघर्षाचे प्रसंग फारच तीव्र होत जातात. तुम्ही सगळ्यात चांगली निभावलेली गोष्ट म्हणजे लेखनात कुठल्याच गोष्टीचे भांडवल केलेले नाही. घराची श्रीमंती, सामाजिकदृष्ट्या मागासलेले असणे, स्त्री असणे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे वगैरे…   वगैरे…   निखळ माणूस म्हणून तुम्ही हे सलग सांगत जाता. कोणताच अभिनिवेश न बाळगता. संवादी शैलीतील हे प्रभावी निवेदन म्हणूनच भावते. खोलवर रुतते. ’ पुढे असेच काही अभिप्राय लेखिकेने दिले आहेत.

‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली. ’ ललित, कल्पनारम्य लेखनाची लेखिकेला आवड नाही. ती म्हणते, ’माझा पिंड वैचारिक, सामाजिक लेखनाचा. ’ ‘निर्वासित’ हे त्यांचे आत्मकथन, याच दृष्टिकोनातून लिहिले आहे.

नंतरचे प्रकरण लेखिकेने आपल्या सिंधी समाजावर लिहिले आहे. फाळणीनंतर सिंधी लोक भारतात आले. जमेल तिथे, जमेल तसे स्थिरावले. रुजले. या समाजाची वैशिष्ट्ये तिने दिली आहेत. कुशल, व्यवहारी, सरळमार्गी, उदार, दिलदार, पापभीरू असे हे लोक दैववादी नाहीत. मिठास वाणी हा या समूहाचा विशेष गुणधर्म. श्रमांची त्यांना लाज वाटत नाही. सामाजिक आणि वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता, उत्सवप्रियता, चंगळवाद यांसारख्या दोषांबद्दलही तिने लिहिले आहे. ती म्हणते, यांना ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल. परांपरागत व्यवसाय करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. नोकरी करणार्‍यांचं प्रमाण 1%ही नाही. स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प. आपलं शाश्वत सुख, स्वातंत्र्य, आत्मभान याची जाणीव असणार्‍या स्त्रिया अभावानेच आढळतात. आपला जन्म ‘लासी’ नावाच्या तळागाळातल्या जमातीत झाल्याचे ती सांगते. सिंधी समाजाबद्दल बरीच माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने वाचायला मिळते. फाळणीनंतर सिंधी भारतात आले. सिंधी समाजाला आपण निर्वासित म्हणतो. उषाने आपल्या घरातच इतके भोगले आहे, की विनीता हिंगे म्हणतात, ‘’उषा तिच्या स्वत:च्या घरातच ‘निर्वासित’ होती’’. अर्थात, अधूनमधून वडिलांनी तिला किरकोळ आर्थिक मदत केल्याचेही तिने लिहिले आहे. पण तिला पुरेशी आणि हवी त्यावेळी तिला ती मिळालीच असे नाही.

‘बालपण आणि शाळा-कॉलेज’ व ‘माहेरवास’ प्रकरणांत उषाने आपल्या कुटुंबाची माहिती दिली आहे. आई- वडील, चार बहिणी, एक भाऊ, वहिनी, आजी, नानी, एक व्यंग असलेले गतिमंद काका यांची सविस्तर माहिती दिली आहे. आई सत्संगात, गुरूंमध्ये रमलेली. पुढे ती साध्वी झाली. वडील श्रीमंत, पण मुलाच्या म्हणजेच उषाच्या भावाच्या चैनी, उधळ्या स्वभावामुळे पुढे त्यांना खूप कर्ज झाले. मुले-मुली यांना समान वागणूक नाही. घरात शिक्षणाचे महत्त्व तिच्याशिवाय कुणालाच नाही. समाजालाही नाही. शिकावं, स्वाभिमानाने जगावं, आत्मभान जागवावं याची जाणीव कुणालाच नाही, याबद्दल ती खंत व्यक्त करते. तिची धाकटी बहीण 16व्या वर्षी साध्वी झाली. तिला अध्यात्मातलं त्या वयात काय कळत असेल? पण परतीचे मार्ग नाहीत. याबद्दल समाजाने, कायद्याने काही तरी करायला हवं, असं तिला वाटतं. तिच्याही मागे साध्वी होण्याबद्दल तगादा लागला होता, पण पुढे शिकण्याबद्दल ती ठाम होती. दहावीला चांगले मार्क्स असूनही वडिलांनी कॉलेजमध्ये घातले नाही. दोन वर्षांनंतर तिला गुरूंच्या सूचनेनुसार ती परवानगी मिळाली. दोन वर्षे वाया गेली, म्हणून ती हळहळली.

पुढल्या कॉलेजच्या जीवनातील निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नानाविध उपक्रम यांत ती रमून गेली. ती लिहिते, ‘कॉलेजमध्ये वाङ्मयीन जाणिवा विस्तारल्या. अभिरुची संस्कारित झाली. प्रतिभेला वाव मिळाला. ’ कॉलेजच्या जीवनातील आनंदक्षणांबद्दल तिने मनापासून लिहिले आहे. ती पदवीधर झाली, पण एम. ए. होऊ शकली नाही, याबद्दलही तिने विस्ताराने लिहिले आहे. विद्यापीठाच्या 0. 763 क्रमांकाच्या नियमानुसार तिला पीएच. डी. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. विषय कोणता घ्यावा, कसे काम करावे, याबद्दल मार्गदर्शन करणारे तिला कोणीच भेटले नाही. ‘एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ हा तिचा प्रबंधाचा विषय. तिच्या वैचारिक आणि गंभीर प्रकृतीला साजेसाच हा विषय, पण संदर्भ शोधायला कठीण. त्यासाठी खूप भ्रमंती करावी लागली. या काळात नोकरी करणंही अत्यावश्यक होतं. 17 वर्षे अथक परिश्रमानंतर, चिवटपणे परिस्थितीशी झुंज देत, 2006मध्ये तिला पीएच. डी. मिळाली. इतकंच नव्हे, तर उत्कृष्ट प्रबंधाचं प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिकही मिळालं. जीवनातले एक मोठे ध्येय साध्य झाले.

बी. ए. पासून उषा घर सोडून हॉस्टेलमध्ये राहू लागली. वर्किंग वुईमेन्स, हॉस्टेल, विद्यापीठाचे हॉस्टेल, पेईंग गेस्ट इ. अनेक ठिकाणचे अनुभव, त्याचप्रमाणे नोकरी, अर्थार्जन करत असताना आलेल्या प्रसंगांचेही सविस्तर वर्णन तिने केले आहे. यावेळी नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, विचित्र, विक्षिप्त वागणं, स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्ती या सगळ्याशी तिला जुळवून घ्यावं लागलं. तिची वर्णनशैली इतकी प्रत्ययकारी आहे, की हे सारे प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि त्यांच्यातील संवाद प्रत्यक्ष ऐकतो आहोत असे वाटते. ‘माहेरवास’, ‘मुंबई विद्यापीठ आणि माझी पीएच. डी. ’, ‘माझ्या नोकर्‍या वगैरे आणि अर्थार्जन’, माझी घरघर’, ‘माझे मित्रमैत्रिणी’ अशी काही प्रकरणे एखाद्या कादंबरीसारखी झाली आहेत. ती स्वत:च वाचून समजून घ्यायला हवीत.

कधी वाटतं, हे लेखन एकतर्फी तर नाही? पण लगेच जाणवतं, ज्याचं जाळतं, त्यालाच कळतं. अर्थात, काही चांगली माणसेही तिला भेटली. त्यांच्याबद्दल तिने कृतज्ञतेने लिहिले आहे. तिच्यावरील एका परीक्षणाला माया देशपांडे शीर्षक देतात, ‘उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा’.

‘माझं लग्न : माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी‘ हे या पुस्तकातील शेवटचे प्रकरण. ती लिहिते, की जीवनाचा जोडीदार शोधण्याचे काम तिलाच करावे लागले. वयाच्या 21व्या वर्षापासून तिने जाहिराती, वेगवेगळी वधू-वर सूचक मंडळे यांच्याशी संपर्क साधला. याही बाबतीतला तिचा संघर्ष दीर्घकालीन आहे. अनेक ठिकाणी तिला नकार आला, तर काही स्थळे तिने नाकारली. तिचं ’अमराठी’ असणं, तिची पत्रिका ‘चांगली’ नसणं, चष्मा, बेताचं रूप, कमी उंची, थोडासा लठ्ठपणा इ. तिला नकार मिळण्याची कारणे होती. तिच्या नकारामागे, लग्न न करता नुसतीच मैत्रीची अपेक्षा, चुकीची माहिती, फसवणूक, आधीच सेक्सची अपेक्षा इ. कारणे होती. पुढे जाहिरातीद्वारेच दीपक गायकवाड यांच्याशी भेट झाली. तीन-चार भेटी-गाठींनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती 53 वर्षांची होती, तर दीपक 58 वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी तेजस्विनी ही लग्न झालेली मुलगीही होती. ते BPCLमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी होते. पहिल्या पत्नीशी वैचारिक मतभेदांतून घटस्फोट झाला होता. उषाचे व त्यांचे लग्न रजिस्टर पद्धतीने 28 मे 2015ला झाले. आता उषा सुखात नांदते आहे. बर्‍याच वर्षांनी जीवनात, कदाचित प्रथमच, मानसिक स्थैर्य ती अनुभवते आहे. उषाच्या जीवनसंघर्षाची ही साठा उत्तरीची काहाणी, सुखी सहजीवनाच्या पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली आहे.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #266 ☆ ख़ामोशियों का सबब… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख ख़ामोशियों का सबब। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 266 ☆

☆ ख़ामोशियों का सबब… ☆

‘कुछ वक्त ख़ामोश होकर भी देख लिया हमने /  फिर मालूम हुआ कि लोग सच में भूल जाते हैं’ गुलज़ार का यह कथन शाश्वत् सत्य है और आजकल ज़माने का भी यही चलन है। ख़ामोशियाँ बोलती हैं, जब तक आप गतिशील रहते हैं। जब आप चिंतन-मनन में लीन हो जाते हैं, समाधिस्थ अर्थात् ख़ामोश हो जाते हैं, तो लोग आपसे बात तक करने की ज़ेहमत भी नहीं उठाते। वे आपको विस्मृत कर देते हैं, जैसे आपका उनसे कभी संबंध ही ना रहा हो। वैसे भी आजकल के संबंध रिवाल्विंग चेयर की भांति होते हैं। आपने तनिक नज़रें घुमाई कि सारा परिदृश्य ही परिवर्तित हो जाता है। अक्सर कहा जाता है ‘आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड।’ जी हाँ! आप दृष्टि से ओझल क्या हुए, मनोमस्तिष्क से भी सदैव के लिए ओझल हो जाते हैं।

सुना था ख़ामोशियाँ बोलती है। जी हाँ! जब आप ध्यानस्थ होते हैं, तो मौन हो जाते हैं और बहुत से विचित्र दृश्य आपको दिखाई देने पड़ते हैं और बहुत से रहस्य आपके सम्मुख उजागर होने लगते हैं। उस स्थिति में अनहद नाद के स्वर सुनाई पड़ने लगते हैं तथा आप अपनी सुधबुध खो बैठते हैं। दूसरी ओर यदि आप चंद दिनों तक ख़ामोश अर्थात् मौन हो जाते हैं, तो लोग आपको भुला देते हैं। यह अवसरवादिता का युग है। जब तक आप दूसरों के लिए उपयोगी है, आपका अस्तित्व है, वजूद है और लोग आपको अहमियत प्रदान करते हैं। जब उनका स्वार्थ सिद्ध हो हो जाता है, मनोरथ पूरा हो जाता है, वे आपको दूध से मक्खी की भांति निकाल फेंक देते हैं। वैसे भी एक अंतराल के पश्चात् सब फ्यूज़्ड बल्ब हो जाते हैं, छोटे-बड़े का भेद समाप्त हो जाता है और सब चलते-फिरते पुतले नज़र आने लगते हैं अर्थात् अस्तित्वहीन हो जाते हैं। ना उनका घर में कोई महत्व रहता है, ना ही घर से बाहर, मानो वे पंखविहीन पक्षी की भांति हो जाते हैं, जिन्हें सोचने-समझने व निर्णय लेने का अधिकार नहीं होता।

बच्चे अपने परिवार में मग्न हो जाते हैं और आप घर में अनुपयोगी सामान की भांति एक कोने में पड़े रहते हैं। आपको किसी भी मामले में हस्तक्षेप करने व सुझाव देने का अधिकार नहीं रहता। यदि आप कुछ कहना भी चाहते हैं, तो ख़ामोश रहने का संदेश नहीं; आदेश दिया जाता है और आप मौन रहने को विवश हो जाते हैं।  ख़ामोशियों से बातें करना आपकी दिनचर्या में शामिल हो जाता है। आपको आग़ाह कर दिया जाता है कि आप अपने ढंग व इच्छा से अपनी ज़िंदगी जी चुके हैं, अब हमें अपनी ज़िंदगी चैन-औ-सुक़ून से बसर करने दो। यदि आप में संयम है, तो ठीक है, नहीं है, तो आपको घर से बाहर अर्थात् वृद्धाश्रम का रास्ता दिखा दिया जाता है। वहाँ आपको हर पल प्रतीक्षा रहती हैं उन अपनों की, आत्मजों की, परिजनों की और वे उनकी एक झलक पाने को लालायित रहते हैं और एक दिन सदा के लिए ख़ामोश हो जाते हैं और इस मिथ्या जहान से रुख़्सत हो जाते हैं।

अतीत बदल नहीं सकता और चिंता भविष्य को संवार नहीं सकती। इसलिए भविष्य का आनंद लेना ही श्रेयस्कर है। उसमें जीवन का सच्चा सुख निहित है। परिवर्तन प्रकृति का नियम है। इसलिए ‘जो पीछे छूट गया है, उसका शोक मनाने की जगह जो आपके पास है, आपका अपना है; उसका आनंद उठाना सीखें’, क्योंकि ‘ढल जाती है हर चीज़ अपने वक्त पर / बस व्यवहार और लगाव ही है / जो कभी बूढ़ा नहीं होता। किसी को समझने के लिए भाषा की आवश्यकता नहीं होती, कभी-कभी उसका व्यवहार बहुत कुछ कह देता है। मनुष्य जैसे ही अपने व्यवहार में उदारता व प्रेम का समावेश करता है, उसके आसपास का जगत् सुंदर हो जाता है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

23.2.24

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रेम ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – प्रेम ? ?

हरेक ने किया प्रेम,

किसीने भोगी, व्यक्त न

कर पाने की पीड़ा,

कोई अभिव्यक्त होने की

वेदना भोगता रहा,

किसीका प्रेम होने से पहले

झोंके के संग बह गया,

किसीका प्रेम खिलने से

पहले मुरझा गया,

किसीका अधखिला रहा,

किसीका खिलकर भी

खिलखिलाने से

आजीवन वंचित रहा,

प्रेम का अनुभव

किसीके लिये मादक रहा,

प्रेम का अनुभव

किसीके लिये दाहक रहा,

जो भी हो पर

प्रेम सबको हुआ..,

प्रेम नित्य है, प्रेम सत्य है,

प्रेम कल्पनातीत, प्रेम तथ्य है,

पंचतत्व होते हैं, काया का आधार,

प्रेम होता है पंचतत्वों का सार !

?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

 

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Power of Chanting God’s Name… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem Power of Chanting God’s Name We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

?~ Power of Chanting God’s Name… ~ ?

In the life’s turbulent waters that’s so deep,

The God’s name holds the key to keep,

A simple whisper, a divine mantra sweet,

Sets our spirits soaring, ever keen to greet

 *

Like a small raft on the vast ocean wide,

Which carries us along with the gentle tide,

To a dream where peace and love reside,

As our hearts get filled with pure joy inside

 *

The divine names are profound and strong,

Awakens our inner state where it belongs

As drilling into earth, finds springs a few

Chiseling the marble, with divine wings new

May God’s name be a guiding light to share,

Love and wisdom, our hearts’ deepest care,

May we cherish this gift with pure delight

Filling our hearts with a divine love’s light..!

~Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

06 February 2025

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ Meditate Like The Buddha # 9: Experience Your Mind ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Meditate Like The Buddha # 9 : Experience Your Mind 

Lesson 7

After contemplating the body and feelings, the next step in your journey is the contemplation of the mind. This practice should be attempted after spending 20 to 30 minutes watching your breath and experiencing your feelings.

Observing the Mind

  • Be aware of your mind as you breathe in and out.
  • Breathe in, experiencing the mind. Breathe out, experiencing the mind.
  • Always mindful, breathe in; mindful, breathe out.

The mind precedes all things. Everything you say or do first arises as a thought in the mind. A well-trained mind is a treasure, unlocking a profound source of inner happiness through meditation. By cultivating and purifying the mind, you can discover a deep reservoir of joy within.

  • Breathe in, experiencing the mind. Breathe out, experiencing the mind.

Watching Thoughts

The mind is naturally filled with thoughts. These thoughts may be:

  • Wholesome,
  • Unwholesome, or
  • Neither wholesome nor unwholesome.

Simply observe your thoughts dispassionately, as a spectator. Let them come and go without clinging to or labelling them. Watch them as you would clouds passing through the sky. Let them drift away naturally, like clouds in the rainy season.

  • As you inhale, experience your mind. As you exhale, experience your mind.

Experiencing the Mind’s State

Your mind may be agitated, calm, or neutral. Whatever its state, observe it as you breathe in and out.

Practising noble silence for a couple of hours daily can greatly enhance your ability to concentrate. Regular meditation, performed step-by-step—watching your breath, experiencing your body, feelings, and mind—leads to a deeply focused mind.

  • Always mindful, breathe in; mindful, breathe out.

Keep away from distractions and focus your awareness around your nostrils, observing your breath with full attention and mindfulness.

Gladdening the Mind

As your practice progresses, your body becomes relaxed, feelings subside, and your mind attains peace.

  • Breathe in, gladdening the mind. Breathe out, gladdening the mind.

Cultivate loving kindness, compassion, altruism, and equanimity to gladden the mind. This helps nurture a gentle happiness that arises naturally from a calm body and serene mind.

  • As you inhale, experience the gentle happiness of the mind.
  • As you exhale, experience the gentle happiness of the mind.

Concluding the Practice

With tranquillity in your heart, conclude your session by praying for the welfare of all:

  • May all be happy, be peaceful, be liberated.

When you are ready, gently open your eyes and emerge from meditation, carrying forward the joy and serenity of your practice into your daily life.

♥ ♥ ♥ ♥

Please click on the following links to read previously published posts Meditate Like The Buddha: A Step-By-Step Guide” 👉

☆ Meditate Like The Buddha #1: A Step-By-Step Guide ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha #2: The First Step ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha #3: Watch Your Breath ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha #4: Relax Your Body ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha #5: Cultivate Loving kindness ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha # 6: ☆ Mr. Jagat Singh Bisht ☆

☆ Meditate Like The Buddha # 7: Tranquilize Mental Formations☆ Mr. Jagat Singh Bisht ☆   

 

© Jagat Singh Bisht

Laughter Yoga Master Trainer

FounderLifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार #39 – गीत – बलिदानों की पुण्य भूमि… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीतबलिदानों की पुण्य भूमि

? रचना संसार # 39 – गीत – बलिदानों की पुण्य भूमि…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

 बलिदानों की पुण्य भूमि को,

नमन समर्पित भाव करो।

वीर शिवाजी के वंशज हम

दुश्मन का घेराव करो ।।

 **

वीरों की गाथा तुम गाओ,

कुर्बानी को मान मिले।

धरती ये राणा प्रताप की

वीरों की पहचान मिले।।

रहो यहाँ मिलजुल- कर सबसे

नित अच्छा बर्ताव करो।

 *

 बलिदानों की पुण्य भूमि को

 नमन समर्पित भाव करो।।

 **

 वीर सिपाही हो भारत के,

 दुश्मन पे हो वार सदा।

 करते गद्दारी जो हम से

 उनका भी संहार सदा।।

 हमें जान से प्यारी धरती,

 छाती पर मत घाव करो।

 *

  बलिदानों की पुण्य भूमि को

  नमन समर्पित भाव करो।।

 **

 मानवता का पाठ पढ़ाओ,

 सदा शांति उद्घोष रहे।

 कर्मों की गीता समझा दो,

 सच का ही जयघोष रहे।।

जन्म भूमि पर जान लुटादो,

 जीवन में बदलाव करो ।

 *

 बलिदानों की पुण्य भूमि को,

 नमन समर्पित भाव करो।।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- [email protected], [email protected]

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares