मराठी साहित्य – विविधा ☆ स्थलांतर… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्थलांतर… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

सगळ्यात दूरवरचं स्थलांतर

अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट दिशेकडे तोंड करून स्थलांतर करतात. या सर्वांमध्ये आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी सगळ्यात दूरवरचा पल्ला गाठतात. याबाबतीत त्यांना स्थलांतर बहाद्दर किंवा उड्डाण बहाद्दरच म्हंटलं पाहिजे. आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी स्थलांतर करतात, कारण उन्हाळी ऊबदार वातावरण वर्षभर त्यांच्याभोवती असावं असं त्यांना वाटतं. त्यांना दिवसभर प्रकाश असावा, असं वाटतं. दरवर्षी स्लेंडर, काळे-पांढरे पक्षी ३५२००कि. मी. चा वर्तुळाकार प्रवासकरतात. ही म्हणजे, जगाभोवती केलेली प्रदक्षिणाच असते.

उन्हाळ्याच्या दिवसात अगदी उत्तरेच्या प्रदेशात ते घरटी करतात. यावेळी उत्तर धृव सूर्याकडे कललेला असतो. सूर्य जवळ जवळ पूर्ण वेळ डोक्यावर असतो.

या प्रदीर्घ सूर्यप्रकाशाच्या काळात त्यांना व त्यांच्या छोट्या पिलांना समुद्रातील भरपूर मासे दिसतात आणि पकडता व खाता येतात.

उन्हाळा संपत येता येता दिवस लहान होऊ लागतो. थंडी वाढत जाते आणि ऑर्टिक टर्न आपला प्रवास सुरू करतातआणि अंटार्टिकाला जातात. अलास्कन टर्न उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक सागराच्या किनारपट्टीवरून जातात. इतर अनेक टर्न उत्तरेकडच्या इतर घरटी बांधण्याच्या क्षेत्राकडे उडतात आणि ब्रिटीश बेटांमध्ये भेटतात. तिथून ते दक्षिणेकडे आफ्रिकन किनारपट्टीकडे झडप घेतात.

प्रवासाला सुरुवात करायची वेळ झाली, हे आर्टिक टर्नना कसंकळतं? तापमानातील बदल, सूर्यप्रकाशातील बदल यामुळे बहुदा त्यांना ते कळतं. पण हे प्रवासी पक्षी इतकी भली मोठी आश्चर्यकारक राउंड ट्रीप दरवर्षी काघेतात, ते कुणालाच कळले नाही. जलचरांचं स्थलांतर –

१. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात. सीलची मादी जवळ जवळ ९६००कि. मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला घालतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्याबेटा पासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि. मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळतं. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९, २००कि. मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिक महासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला, दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍यापाण्याच्या सरोवरांकडे ते जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सनडिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून ते सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचेस्थलांतर – ईल आणि सालमन गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लार्व्हा असं म्हणतात.

या छोट्या लार्व्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशा कडे वाहू लागतात. या माठ्या होत जाणार्‍या ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना२/३वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लार्व्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात. त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाणे ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला, त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात. त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो? नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं, त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

४. डाल्फिन-

स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डिल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.

५.  अलास्कन कॅरिब्यू –

सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६००कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.

नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग तेजवळच्या तळ्याकाठी, पाण्याचा साथ असेल, तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहे येणार्‍या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात.

पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.

मगर आणि सुसर मगरी आणि सुसरी त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली, की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्‍यावर येते. गवत रानटी झुडुपाच्या वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.

६. समुद्री कासव

हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे, पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी. चा प्रवास करून तिथे पोचतात. मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्‍यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं. अर्थात अनेकजण अन्य भुकेल्यांचं भक्ष बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले, म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतातआणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावरती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंत सापडलेले नाही.

अशी ही प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर यांच्या स्थलांतराची रंजक माहिती.

– समाप्त –  

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉ बाबासाहेब जयंती चिंतन… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ डॉ बाबासाहेब जयंती चिंतन… ☆ श्री सुनील देशपांडे 

असाध्य ते साध्य , करिता सायास ।

कारण अभ्यास ! तुका म्हणे।।

 या विश्वगुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय डॉ बाबासाहेब आंबेडकर!

विद्यार्थीदशे पासूनच शिक्षणासाठी  किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासासाठी किती सायास केले हे त्यांच्या चरित्रावरून साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याजवळ कोणतीही साधने असोत किंवा नसोत. कोणाचेही पाठबळ असो किंवा नसो. प्रत्यक्ष शिकवणारा असो किंवा नसो. ग्रंथ हेच गुरु मानून आणि अभ्यासाचा प्रचंड सायास करून त्यांनी जे करून दाखवले ते खरोखरच असाध्य होते परंतु ते साध्य करून दाखवले.

विशेषतः त्यांच्या घटना समितीच्या शब्दांकन विभागाच्या प्रमुख पदाच्या कामगिरीबद्दल हे मोठेपण विशेष करून जाणवते.

वकील झाल्यानंतर त्यांनी विशेष आवड म्हणून अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करणे हा छंद म्हणून जोपासला होता. त्यामुळे घटना समितीमध्ये त्यांना सामावून घेताना त्यांच्या या अभ्यासाचा मान राखून त्यांना या शब्दांकन उपसमितीचे प्रमुख बनवले.

तरीसुद्धा त्यांचे खरे मोठेपण पुढेच आहे.

या शब्दांकन उपसमिती मध्ये त्यांचे शिवाय आणखी काही सदस्य होते. परंतु वेगवेगळ्या कारणाने ते सदस्य ही उपसमिती सोडून गेले. शेवटी शब्दांकन समितीचे ते एकमेव सदस्य त्या समितीत शिल्लक राहिले. तरीसुद्धा त्यांनी या समितीमध्ये माझ्या मदतीसाठी आणखी कोणी सदस्य मला द्या. सोडून गेलेल्या सदस्यांबद्दल कोणी पर्यायी सदस्य माझ्या मदतीला हवेत. अशी कोणतीही मागणी न करता. नेटाने एकट्याने रात्रंदिवस खपून आणि अभ्यास करून घटना समितीच्या शब्दांकन उपसमितीची जबाबदारी सर्वोत्कृष्ट पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण केली. हे त्यांचे कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे.

आज त्यांच्या जयंतीदिनी या सर्व सायासातून घडलेल्या आणि आपल्या देशाची घटना घडवलेल्या या महान तपस्वी अभ्यास विभूतीला माझा साष्टांग प्रणिपात!

परंतु या व्यक्तीच्या या सर्व सायासांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र आज कुणाच्याही खिजगणतीतही नाही.

स्व बाबासाहेबांनी राज्यघटनेनुसार आम्हाला एखाद्या न्याय्य मागणीसाठी किंवा हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे एवढेच आमच्या लक्षात आहे. परंतु ते आंदोलन करताना त्यातून हिंसात्मक उद्रेक किंवा बेकायदेशीर नुकसानकारक कृत्य किंवा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याची राष्ट्र विघातक कृती घडू नये यासाठी जे नियम आहेत ते मात्र आम्ही पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्ही जर वागू लागलो तर त्यात स्व. बाबासाहेबांच्या सायासांचे आम्ही विडंबन करतो आहोत असे नाही का वाटत?

ज्या जातीअंताची लढाई स्व. बाबासाहेबांनी आरंभली आहे त्या जातींअंताकडे आमचा प्रवास चालू आहे की त्या विरुद्ध दिशेने चालू आहे याचा कोणी विचार करतो आहे का? व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेले किती कार्यकर्ते समाजात दिसतात?

कोणत्याही चांगल्या कृतीमध्ये कालांतराने विकृती घुसत जातात हे जगात सगळीकडेच दिसून येते. परंतु लोकशाही सारख्या चांगल्या विचारांमध्ये घुसलेल्या सामाजिक विकृती विरोधात कार्य करण्यासाठी सायास करणारे व स्व. बाबासाहेब यांच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील का? या प्रश्नाचिन्हावर भविष्याकडून काही आशादायक घडावे एवढी प्रार्थना करून आज स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक नंबर शिवणार… भाग-१ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एक नंबर शिवणार… भाग-१ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे

रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली, तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.

मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, “साहेब, नमस्कार. मी राजाराम. ” 

“सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. ” मी म्हणालो.

“अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं. “, त्याने स्पष्टीकरण दिलं.

बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,

“या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. “

“साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे. ” राजाराम म्हणाला.

“बरं, बस राजाराम. मी आलोच” असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.

“साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्ही पण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडे पण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो. ” राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.

त्याचं म्हणणं खरं होतं. मी देखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाही तर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.

“आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूममध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो. ” मी म्हणालो.

“दुपारनंतर? ” तो चाचरत पुढे म्हणाला, “साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?

अंबरनाथला राहतो? अरे बापरे! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, “बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का? “

“हो साहेब” तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं, “हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये. ” 

राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.

तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती.

ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, “साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडा वेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का? “

राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं.

आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.

“एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन. ” तो म्हणाला.

वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा, नाश्ता करुन पुन्हा तासा दीडतासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खूश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.

आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. “साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते. ” तो म्हणाला.

मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाही तर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी ‘राहू दे’ म्हटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, ‘परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार’, हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही.

पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हटलं, पण तेही राहूनच गेलं.

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : श्री राजेंद्र परांजपे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/२  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वासंती

(भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.) – इथून पुढे 

सुरुवातीला तिची दबक्या आवाजातली भाऊशी कुरबूर सुरू झाली. भाऊ दुर्लक्ष करायचा म्हणून मग मोठ्या आवाजात खोलीच्या बाहेर भांडणं आली. सारं घर हादरलं.

वासंतीला वेगळं व्हायचं होतं. तिच्या मनासारखं घर तिला थाटायचं होतं. इथे राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं पण भाऊ असहाय्य होता. एक तर कुटुंबावर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा म्हणजे स्वतंत्र घर घेण्यापासून ते चालवण्यापर्यंत लागणारं आर्थिक सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. इथे कमावणाऱ्या पाठच्या भावांच्या साथीने एकत्र राहणं नक्कीच अवघड नव्हतं. शिवाय एकमेकात जिव्हाळा होता. नाना तर्‍हेने त्याने वासंतीला हे पटवण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं एकच, ” तुमच्याच जीवावर तुमचे भाऊ मोठे झाले ना मग आता त्यांनी तुम्ही त्यांच्यावर खर्च केलेले धन द्यावं की परत तुम्हाला! या निमित्ताने त्यांनी त्याची परतफेड करायला हवी. ” भाऊच काय वासंतीच्या या बोलण्याने सारं घर कळवळलं. वासंतीने नात्यातला सारा गोडवाच शोषून घेतला. त्यानंतर सगळंच हळूहळू तुटत गेलं. वासंतीने कुठल्याच नात्याचा, कुणाच्या वयाचा आदर बाळगलाच नाही. तिच्यासाठी ते घर, घरातली माणसं म्हणजे जणू काही एक उकिरडा होता, नरक होता. ती केव्हाही कुणालाही मनाला येईल ते जिभेला बांध न घालता, वारेमाप बोलत सुटायची. भाऊ तर तिच्यासाठी एकदम फोडणीतून बाजूला काढलेल्या कढीपत्यासारखा होता. येता जाता ती त्याला म्हणायची, ” मुलांना जन्म देताना तरी विचार करायचा? त्यांचं भविष्य घडवण्याची क्षमता नाही तुमच्यात तर कशाला संसार मांडलात? भावांचेच संसार ओढायचे होते ना आयुष्यभर! उपयोग काय हो तुमच्या हुशारीचा? पुढे येण्यासाठी काही मेहनत केलीत का? यापुढे तरी कराल का? माझ्या आई बापाने काय पाहिलं तुमच्यात कोण जाणे! अशा अडाणी, स्वार्थी कुटुंबात त्यांनी मला ढकलून दिलं! ”

मग दिवस असो, करकरीत संध्याकाळ असो, तिथे फक्त भांडण, रडणं, अबोला आणि भयाण मौनातील अमंगल, अशुभ शांतता!

एकंदरच दिघे कुटुंबाची स्वस्थता हरपली. चार भिंतीतली प्रतिष्ठा पणाला लागली. घर म्हणजे असतं एक विसाव्याचं स्थान. थकूनभागून आल्यानंतर सुखसंवाद घडवणारं ठिकाण असतं पण ते सारं उध्वस्त होत होतं. कुणालाच घरी परतावंसं वाटत नव्हतं. जिथे एकेकाळी सुखद वारे वाहत होते तिथे तप्त लाव्हा रसाचीच धग जाणवायला लागली होती. केवळ एका व्यक्तीमुळे. भाऊने पसंत केलेली ही शंभरावी सुंदर मुलगी वासंती हिच्यामुळे. वासंती आमच्या घराची खलनायिका ठरली. माणसं, नाती पर्यायाने कुटुंब पार दुभंगलं. जिजीचं दुसरं भाष्यही खरं ठरलं. “चापू चापू दगड लापू. ”अतिचिकित्सेचं कडू फळ!

भाऊचं वासंती वर फार प्रेम होतं ते जाणवायचं पण तो तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरा ठरला. एक हुशार, देखणा, कुटुंब बांधून ठेवण्यासाठी धडपडणारा भाऊ अखेर व्यसनाधीन झाला. नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला. वासंतीचे माहेरी जाणं, तिथेच मुलांना घेऊन महिनो नि महिने राहणं आताशा वाढलं होतं. ती माहेरच्या आधाराने भाऊला धमक्याही द्यायची म्हणे!

एकदा भाऊ माझ्या आईजवळ म्हणाला होता, ” मालू वहिनी तू आमच्या घरातली आदर्श व्यक्ती! तू तर एका श्रीमंत बापाची मुलगी पण आमच्या “जनाचा” संसार कसा छान सांभाळलास! आज “जना” जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळे. जिजी आमची मावशी असूनही तू आम्हाला जवळची वाटतेस.

माझंच नशीब असं फुटकं का ग? ” तेव्हा आई त्याला म्हणाली होती, ” असं बोलू नकोस. आपल्याही काही चुका असतील. वासंतीला समजावून घेण्यात आपणच कमी पडत असू. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि वासंतीतही अनेक गुण आहेत रे! कला आहेत. दिवाळीत ती रांगोळ्या किती सुंदर काढते! तुमचे “जना” तर तिच्या हातच्या पोळ्या आणि वालाच्या बिरड्याचं इतकं कौतुक करत असतात! नीटनेटकं कसं राहावं ते तिच्याकडूनच शिकावं. संसाराच्या तिच्या काही वेगळ्या कल्पना असतील. तुमच्यातल्या मतभेदामुळे आणि भिन्न वृत्तीमुळे नात्यांमध्ये या दर्‍या निर्माण झाल्यात. त्या बुजण्यापेक्षा अधिक खोल होत आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही भाऊ. खरं म्हणजे तुझी जबाबदारी आहे हे सारं नीट करण्याची. सगळ्याच काही मराठी चित्रपटातल्या सुलोचना नसतात हे लक्षात ठेव. “ त्या दिवशी भाऊने आईला अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला आणि तो मुकाटपणे निघून गेला.

आज मी जेव्हा या घटनांचा दुसऱ्या बाजूने विचार करते तेव्हा मला आईचे हे शब्द आठवतात. बालमनावर असे मी म्हणणार नाही कारण त्यावेळी आम्ही अर्धवट वयात होतो.. आमच्यावर हेच रुजले होते की वासंती म्हणजे भांडकुदळ, बेलाभांड, शिवराळ, घरभेदी स्त्री. प्रथम दर्शनी तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या आम्हाला नंतरच्या भागात मात्र ती परीकथेतील कुरूप, दुष्ट, चेटकीण भासायला लागली होती. आमच्या घरातला “वासंती” हा एक अत्यंत नकारात्मक घटक ठरला होता. जिने भाऊचं जीवन उध्वस्त केलं होतं.

पुष्कळ दिवस, महिने, वर्ष सरली. खूप बदल झाले. पपी, बाळू चतुर्भुज झाले. त्यांचे संसार मार्गाला लागले. आमच्या लाडक्या कुमुदआत्याचं निधन झालं. वासंतीचं अस्तित्व जरी ठिगळ लावल्यासारखं विसंगत होतं तरी तेही कायमस्वरूपी राहिलं. स्टेशन रोडवरचं त्यांचं घर रीडेव्हलपमेंटला गेलं आणि कालांतराने प्रत्येक भावाला स्वतंत्र दोन-तीन खोल्यांचे असे मोठे फ्लॅट्स मिळाले. वेगळं होण्याचं वासंतीचे एकेकाळचं स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. या व्यवहारात कुमुदआत्याच्या परिवाराची मात्र होरपळ झाली. ज्या जावयाने आप्पांवर शेकलेल्या गंभीर प्रकरणातून त्यांची सहीसलामत सुटका केली आणि आयुष्यभर पत्र्याचे छत असलेल्या माळ्यावर आनंदाने राहण्याचे पत्करले त्यांची मात्र घराच्या या व्यवहारात दखल घेतली गेली नाही हे गैर झाले. गुलाबमावशी आणि आप्पांचीही वाटणी झाली. बाळूने आणि बाळूच्या बायकोने मात्र डीमेन्शिया झालेल्या गुलाबमावशीला मरेपर्यंत सांभाळले.

वासंती बदलली की नाही माहीत नाही पण निवळली असं वाटायचं पण तरीही वासंतीची “घरभेदी” प्रतिमा कुटुंबीयांच्या मनावरून पुसली जाणं जरा अशक्यच होतं. कुटुंबाचे तुकडे तिच्यामुळेच झाले हा दगडावरचा ठसा ठरला.

माझ्या लग्नानंतर मी माहेरी आले असताना वासंतीला भेटायला गेले होते. भाऊ घरात नव्हताच पण ती होती. वयानं थकलेली जाणवत होती. तिच्या देहावरच्या लावण्य खुणा विझलेल्या दिसत होत्या. डोळ्याखालची काळी वर्तुळं त्यात भर घालत होती. तिला भेटायला जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे किरण, संजय, अमिता. आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी उपजत ओढा होता. अखेर ती आमची भावंडच होती ना!

माझं पहिलं लक्ष गेलं ते वासंतीच्या दारात रेखलेल्या सुरेख रांगोळीवर. रांगोळी.. छोटीशीच पण कलात्मक. दारावर तोरण होतं. वसंतीने माझं अगदी प्रेमाने स्वागत केलं. तिने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक माझ्यासाठी रांधला होता. तिच्या हातच्या साध्या वरण-भातालाही काय स्वाद होता! मी तिला तसं म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले. म्हणाली, ” तुझ्या पप्पांना मी केलेला प्रत्येक पदार्थ आवडायचा आणि ते तोंडभरून कौतुक करायचे. ”

मी काही बोलले नाही पण मला एक सहज आठवलं. त्यावेळी पप्पा वासंतीचे कौतुक करत असताना गुलाब मावशी एकदा म्हणाली होती, ” चांगलं न व्हायला काय झालय? तेल बघा केवढं घातलंंय! ” असो!

ता तो साराच भूतकाळ होता.

वासंतीकडून परतताना तिने माझी ओटी भरली. तिने स्वतः गुंफलेला मोगर्‍याचा गजरा माझ्या केसात माळला आणि म्हणाली, ” अशीच येत जा बरं का! पुढच्यावेळेस जावईबापूंना घेऊन ये. ”आज हे सारं तुम्हाला सांगताना, लिहिताना माझे डोळे भरून आलेत. अनेक घटनांची प्रतिबिंबे त्या पाण्यात तरळत आहेत. आयुष्याचे इतके टप्पे ओलांडल्यानंतर, नानाविध अनुभव घेतल्यानंतर, अनेक व्यक्तींचे स्वभाव, जीवनं जवळून, लांबून पाहिल्यानंतर मनाच्या पातळीवर परिपक्व झाल्यानंतर एकच वाटतं आपण कुणाही बद्दल पटकन इतके निर्णयात्मक का होतो…?

का नाही थांबत? का नाही वाट पहात?

अलिप्तपणे का विचार करू शकत नाही…?

– समाप्त –

– क्रमश: भाग ३७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिल ढूंढता है… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ दिल ढूंढता है… ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर

“मौसम” चित्रपटातील संजीवकुमारवर चित्रीत झालेलं हे गुलजार लिखित गाणं, मला फार भावलं…. चित्रपटातील नायक तीस वर्षांपूर्वी जिथं जिथं नायिकेसोबत फिरलेला असतो, तिथं तिथं उतारवयात जातो तेव्हा त्याला नायिकेसोबत, तारुण्यातील तो स्वतः देखील दिसू लागतो… वर्तमानात तो भूतकाळातील एकेक गोष्टी अनुभवतो…

आज मी वयाची पासष्टी पूर्ण करुन सहासष्टीमध्ये पाऊल टाकलंय.. माझीही अवस्था, पडद्यावरील संजीव कुमारसारखीच झालेली आहे… वयाच्या पाचव्या वर्षापासूनच्या घडून गेलेल्या गोष्टी, प्रसंग व घटना मला आजही स्वच्छ आठवताहेत…

मी चालू लागतो.. भरत नाट्य मंदिराजवळचं पावन मारुतीचं छोटं मंदिर दिसतं.. इथंच माझं बालपण गेलं. एक वर्षाचा असल्यापासून ते माझं लग्न होईपर्यंतची आयुष्यातील माझी सत्तावीस वर्षं याच परिसरात गेली..

मी चार वर्षाचा असताना आई बाहेर गेली होती म्हणून ती कुठे दिसते आहे का? हे पाहण्यासाठी फिरत फिरत मी महाराष्ट्र मंडळापर्यंत पोहोचलो.. माझा रस्ता चुकलेला पाहून, एका हवालदाराने मला पेरुगेट पोलीस चौकीत नेऊन बसविले… काळजीपोटी माझी आई शोधत शोधत त्या चौकीत पोहोचली.. तेव्हा मी निवांत स्टुलावर बसलेलो होतो.. मी आत्ता चौकीत डोकावलं तर, कंठ दाटून आलेल्या आईने मला उचलून कडेवर घेतलेलं दिसत होतं…

भावे प्राथमिक शाळेत मी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होतो.. परवा सकाळी तिथून जाताना मला तिसरीच्या वर्गातील मुलं व मुली रांगेनं रस्त्याच्या कडेने, विजय टाॅकीजकडे ‘देवबाप्पा’ चित्रपट पहाण्यासाठी जाताना दिसली.. त्यात मी देखील होतो… मोठा झाल्यावर मी चित्रपटांच्याच जाहिराती करणार असल्याची ती ‘नांदी’ होती…

मी चालत चालत टिळक रोडवरील माझ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पोहोचलो.. सहावीत असताना मी आजारी पडलो होतो.. बरा झाल्यानंतर मी शाळेत गेलो तरी आई मला घरुन डबा घेऊन येत असे.. वर्गात तास चालू असताना मित्रांनी माझ्या आईला पाहिलं की, सरांना ते सांगायचे.. मग मी बाहेर येऊन ग्राऊंडच्या बाजूला फरशीवर बसून डबा खात असे.. येताना तिने गरम पाणी भरुन तांब्या व फुलपात्रही आणलेलं असे… आज ती माउली या जगात नाही.. मात्र आता, तिच्यासमोर मला जेवताना पाहून, माझे डोळे भरुन आलेले आहेत…

शाळा झाल्यानंतर बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला.. मित्रासोबत परवाच्या रविवारी काॅलेज जवळून जाताना त्याला मी थांबवलं.. तो गाडी स्टॅण्डला लावून मोबाईलमध्ये हरवून गेला.. मी काॅलेजच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो… समोर पाहतो तर ‘मंथन’ या हस्तलिखित मासिकाचे संपादक मंडळातील सर्वजण, माझ्यासह फोटोसाठी उभे राहिलेले दिसत होते.. त्या फोटोनंतर मी मित्रांचे फोटो काढू लागलो.. माझ्या ‘पाॅंचवा मौसम’ या कथेतील नायिका, ‘रेवती’ इथेच मला भेटली होती…

काॅलेजनंतर नाटक, चित्रपटांच्या जाहिराती करण्याचा व्यवसाय, मी खालकर तालीम जवळील ‘गुणगौरव’ या इमारतीत सुरु केल्यावर अनेक ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांशी जवळून संपर्क आला.. काही दिवसांपूर्वी मी तिथून जाताना, माझ्या टीव्हीएस फिफ्टीवरुन शरद तळवलकरांना चिमणबागेतील त्यांच्या घरी सोडताना स्वतःलाच पाहिले…

अरविंद सामंत यांनी ‘थरथराट’ चित्रपटाचे काम करुन घेतल्यानंतर त्यांनी, त्यांच्या लक्ष्मी रोडवरील ऑफिसमध्ये बसून इथेही काम करत जा असे मला सांगितले होते.. गेल्या आठवड्यात मी त्या ऑफिसवर गेलो… तेव्हा अरविंद सामंत खुर्चीवर बसलेले दिसले.. त्यांच्या समोर मी बिल घेऊन उभा होतो.. त्यांनी त्यांची व्हीआयपीची सूटकेस बंद केली व मला पुढच्या शुक्रवारी आल्यावर मी बिलाचा चेक देईन असे सांगितले… मला मनातून त्यांचा खूपच राग आला होता, ते ओळखून अरविंद हसले व म्हणाले.. ‘चिडका दोस्त’…

माझा मुलगा भावे स्कूल शाळेत शिकला.. काही दिवसांपूर्वी मला घरी जाण्यास उशीर झाला होता.. रात्रीचे साडेदहा वाजले होते.. सहलीला गेलेल्या मुलांची बस अजूनही आलेली नव्हती.. पावसाची रिपरिप चालू होती व शाळेच्या फाटकापाशी मी छत्री घेऊन मुलाची वाट पाहताना दिसलो….

काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो तेव्हा संस्कृती प्रकाशनाची इमारत दिसली… इथे मी काही वर्षे अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली… मी पहात होतो, मानपत्रांच्या दोन फ्रेम्स घेऊन मी संस्कृतीचा जिना चढत होतो…

गेल्या महिन्यात मी टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या बसस्टाॅपवर उभा होतो.. मागे वळून पाहिलं तर मसापच्या सभागृहात माझ्याच विवाहाचा स्वागत समारंभ चालू होता… गावाहून आलेले नातेवाईक, सदाशिव पेठेतील शेजारी व बरीच मित्रमंडळी दिसत होती…

पंधरा दिवसांपूर्वी केके मार्केट समोरील ‘वाशिष्ठी’ बिल्डींग जवळून जाताना माझे लक्ष गॅलरीकडे गेले.. कोरोनाच्या काळात ‘फेसबुक लेखक’ म्हणून घडणारा, एकाग्र चित्ताने मोबाईलवर टाईपिंग करीत असलेला मी दिसलो….

गेल्याच महिन्यात माझ्या उजव्या डोळ्याचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं.. एक महिनाभर नारायण पेठेतील ऑफिस बंद होतं… नेहमीच्या ग्राहकांना महिन्यानंतर काम करु शकेन, असं व्हाॅट्सअपवर कळवलं होतं… कालच मी नवीन चष्मा करुन घेतला व ऑफिसमध्ये येऊन बसू लागलो… दिवसभरात कुणी आलं नाही की, नैराश्य यायचं… अशावेळी आतापर्यंत मला दिसणारा ‘तो’ समोर आला व म्हणाला, ‘सुरेश, हा महिनाभराचा काळ खरं तर स्वल्पविराम होता.. पूर्णविराम नक्कीच नव्हता, पुन्हा तुझी कामं चालू होतील…. All the best!!!

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती…☆ श्री जगदीश काबरे ☆

सस्तन प्राण्यांमध्ये जसे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी वनस्पती असतात. आश्चर्य वाटले ना! पण हे खरे आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे ‘जिवो जीवस्य जीवनम्’…

कीटकभक्षी वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या कीटक आणि इतर प्राण्यांना खाऊन स्वतःचे पोषण मिळवतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे मातीमध्ये पुरेसा नायट्रोजन नसतो.

अशा काही कीटक भक्षी वनस्पतींची उदाहरणे पाहूया…

1) व्हीनस फ्लायट्रॅप (Venus flytrap): या वनस्पतीची पाने सापळ्यासारखी असतात आणि कीटक येताच ती लगेच बंद होतात.

2) पिचर प्लांट (Pitcher plant): या वनस्पतींच्या पानांचे रूपांतरण भांडे किंवा घडासारखे होते, ज्यात कीटक अडकतात.

3) सनड्यू (Sundew): या वनस्पतींवर चिकट रोम असतात, जे कीटकांना पकडतात.

कीटकभक्षी वनस्पतींची वैशिष्ट्ये:

1) या वनस्पती नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीतून पुरेसे शोषू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कीटकांकडून पोषण मिळवण्याची गरज भासते.

2) या वनस्पती विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर करतात, जसे की चिकट रोम, बंद होणारी पाने, किंवा भांडे किंवा कीटकांना पकडण्यासाठी घडासारखे रचना असते.

3) या वनस्पती कीटक आणि इतर लहान प्राण्यांना खाऊन त्यांना आवश्यक असलेला पोषणयुक्त आहार मिळवतात.

4) या वनस्पती दमट वातावरण आणि भरपूर प्रकाश असणाऱ्या ठिकाणी वाढतात.

खालील व्हिडिओत कीटक भक्षी वनस्पतींची पाने कीटकांना कसे पकडतात हे दाखवले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, मानव प्राणी सोडल्यास जगात कोणीही शाकाहाराचे स्तोम माजवत नाही. जगण्यासाठी आवश्यक असेल त्या सगळ्या मार्गांचा प्राणी आणि वनस्पतींकडून उपयोग केला जातो. कारण ते खानपानाच्या संबंधात आहाराला माणसासारखे देवाधर्माचे, माणुसकीचे व भूतदयाचे भंपक लेबल लावण्याएवढे ढोंगी नसतात.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आणि नातवंडं…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

आजी आणि नातवंडं यांच्या नात्यावरची श्री संदीप खरे यांची सुंदर कविता आणि तिला दिलेलं उत्तर:

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

*

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही… 

– श्री संदीप खरे

 

ह्या  कवितेला नातवाने दिलेले  उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण… आज्जी होती का कृष्णाची?

*

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आज्जी

देई न त्या लोण्याचा गोळा?

*

बांधून ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चून त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आज्जी त्याला सोडविण्याला?

*

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

*

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आज्जी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना …

कृष्णापेक्षा मीच लकी

*

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आधुनिक भस्मासुर  

… अकाली जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय

लेखक : मंदार गद्रे 

 (औषधांपासून मुक्ती देणारा ‘डॉक्टर’)

पृष्ठे: १८४

मूल्य: २७०₹ 

लेखकाचे मनोगत

जीवनशैलीचे आजार जगभरात धुमाकूळ घालतायत. आज जवळपास प्रत्येक घरामध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, पीसीओडी, फॅटी लिव्हर, किडनीचे विकार, विस्मरण बळावले आहेत. या सर्व आजारांशी लढताना जगभरातच सामान्य माणूस आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. आणखी एक चिंतेची बाब अशी की हे सर्व चित्र दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

या आजारांमागचं जीवशास्त्र स्पष्ट समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. त्याशिवाय ‘हा पदार्थ खा किंवा तो टाळा’ या प्रकारच्या वरवरच्या सल्ल्यांपेक्षाही मूलभूत असं मानवी आहाराचं शास्त्र मांडण्याची नितांत गरज आहे.

हे आजार जिथून निर्माण झाले, तिथेच ते सोडवण्याची उत्तरंही शोधावी लागतील. नाहीतर, कुठेतरी रानात हरवलेली वस्तू, केवळ उजेड आहे म्हणून रस्त्यावरच्या दिव्याखाली शोधण्याचीच चूक आपण करू खरं तर करतोच आहोत.

जीवनशैलीच्या आजारांवरची औषधं ही मुख्यतः लक्षणांवर तात्पुरता उपाय करणारी आहेत. म्हणजे आग लागलेली आहे, त्यातून काळा धूर येतो आहे, तर तो धूर इकडे-तिकडे पसरवून त्याचा त्रास कमी करणे असलं काम ही औषधं करतात. अश्या पंख्यांचा एक मर्यादित उपयोग जरूर असतो, पण म्हणून आपण असे पंखे लावून आग तशीच ठेवत नाही! ती विझवण्याच्या मागे लागतो! त्याचमुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की जीवनशैलीच्या आजारांशी लढण्यासाठी, औषधं-शस्त्रक्रिया ही मुख्य उत्तरं नाहीतच!

‘जीवनशैलीत योग्य बदल करा’ हे आपण शेकडो वेळा ऐकलं असेल. पण म्हणजे नक्की काय, आणि महत्त्वाचं म्हणजे तसं का-याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतच नाही. मतप्रदर्शनाच्या मार्गाने हे सल्ले आपल्याला दिले जातात, आणि विज्ञानाचा विद्यार्थी ह्या नात्याने माझं त्यामुळे कधीही समाधान झालं नाही. माझी ही जिज्ञासा मला मानवी उत्क्रांती, जैव रसायन, आंतरिक आरोग्य अश्या अनेक वाटांनी घेऊन गेली. ह्या प्रवासात जे सापडलं ते सुसंगतपणे मांडावं, ह्या सर्व विषयातलं सौंदर्य बाकीच्यांपर्यंत पोचवावं अश्या तीव्र इच्छेने हे पुस्तक लिहून झालं आहे.

आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी मी अश्या दृष्टिकोनाच्या शोधात होतो ज्यातून योग्य उपाय सहज समजून यावेत. हे उपाय विज्ञानाचा मजबूत आधार असलेले, आणि रोजच्या आयुष्यात करण्याजोगे असावेत. पण हे उपाय नुसतेच न सांगता त्यामागचा दृष्टिकोन आणि विचारसंगती सांगावी म्हणून हा लेखनप्रपंच!

मानवी आहार आणि वर्तनातली मूलभूत आणि चिरकाल टिकणारी अशी काही तत्त्वं आहेत आणि ती वापरून जीवनशैलीच्या रोगांची आगच मुळातून विझवता येते! आपलं जैव-रसायन समजावून घेऊन, आहार आणि वर्तनात योग्य बदल करून, शरीराला अश्या स्थितीला नेता येतं की जिथे हे रोग शरीरात राहू शकत नाहीत! रोग परतणं, आणि त्यामुळे लक्षणांवर दिलेली औषधं सुटणं हे केवळ परिणाम आहेत. मुख्य काम हे शरीराला आतून स्वस्थ-सुदृढ करण्याचं आहे! या विषयाचा खोलवर अभ्यास करून आता हेच काम मी करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे डॉक्टर मंडळीही त्यांच्या शरीरातली अशी आग विझवायला येतात! आंतरिक आरोग्याचा अभ्यासक म्हणून मी डॉक्टरांचाही डॉक्टर झालोय-औषधांपासून मुक्ती देण्याचं काम करतोय. आरोग्यावरच्या पुस्तकाचा लेखक माझ्यासारखा अभियंता कसा याचं खरं उत्तर हेच आहे.

अनुक्रमणिका ::: 

१. सत्यकथा

२. आपली नेमकी समस्या काय आहे?

     पहिली अडचणः जीवनशैलीच्या आजारांचं भयानक वास्तव 

     दुसरी अडचणः माहितीचा भडिमार तिसरी अडचणः मूलभूत विचाराचा अभाव

३. आरोग्य म्हणजे नक्की काय?

आंतरिक आरोग्याची कसोटी

. शरीराकडे आपण कसं पाहतो? संप्रेरकांची निरोगी क्रिया आणि बिघडलेली क्रिया

. ग्लुकोज, इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध

     शरीरातली समस्थिती (Homeostasis) इन्सुलिन विरोध

. रोगांच्या मुळाशी जातांना 

७. इन्सुलिन आणि जीवनशैलीचे आजार

. इन्सुलिन आणि लठ्ठपणा

. आपण इथवर कसे आलो?

१०. इन्सुलिन विरोध आणि उच्च रक्तदाब

११. कोलेस्टेरॉल बद्दल थोडंसं..

१२. इन्सुलिन आणि हृदयविकार

१३. इन्सुलिन आणि थायरॉईड

१४. इन्सुलिन आणि पीसीओडी

१५. इन्सुलिन आणि मूत्रपिंडांचे आजार

१६. इन्सुलिन आणि फॅटी यकृत (Fatty Liver)

१७. इन्सुलिन आणि अल्झायमर्स, विस्मरण

१८. इन्सुलिन आणि अकाली वृद्धत्व

१९. मानवी आहाराचा मूलभूत आराखडा

२०. आपण अन्नाकडे कसं बघतो?

२१. अ) काही प्रमुख गैरसमज : स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, आणि कर्बोदकं 

     आ) काही प्रमुख गैरसमज मीठ, तंतुमय पदार्थ, फळं

२३. काही तंत्र आणि मंत्र

२४. दीर्घ आजारांचं (आणखी!) व्यापक चित्न कीटोजेनिक (कीटो) डाएट म्हणजे काय?

२५. धोक्याची घंटा आणि काही चांगल्या बातम्या! हळूहळू बदलणारे जागतिक चित्र

भारतातील आंतरिक आरोग्याच्या चळवळीचे जनक : dLife चे अनुप सिंग!

– – – अनुपचा कमी-कर्बोदकं (Low-Carb) पॅटर्न! dLife चा प्रवासः आज आणि उद्या!

शेवटी – माझ्या काही केसेस!

….

वर मुद्दामच पुस्तकाची अनुक्रमणिकाही दिलेली आहे जी पुस्तकातल्या तपाशीलाबाबत पुरेशी बोलकी आहे.

या पुस्तकात लेखक मंदार गद्रे यांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा वेगळा परिचय करून देण्याची गरजच उरत नाही असं मला खात्रीने म्हणावसं वाटतं.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 97 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 3 ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

इस सप्ताह से प्रस्तुत हैं “चिंतन के चौपाल” के विचारणीय मुक्तक।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 97 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 3 ☆ आचार्य भगवत दुबे ✍

महापुराण कहानी दादी, 

हैं ममतालु सुहानी दादी, 

इनकी सेवा मंगलकारी, 

शुभ चिन्तक वरदानी दादी।

0

सबल भुजा का बल भाई है, 

धड़कन की हलचल भाई है, 

देता है खुशियों की फसलें 

धरा, गगन, बादल भाई है।

0

हरा-भरा परिवार जहाँ है, 

ममता प्यार दुलार जहाँ है, 

सुख का सिन्धु वहीं लहराता 

बच्चों का संसार जहाँ है।

0

बेटी है वरदान सरीखी, 

संस्कृति की पहचान सरीखी, 

माता-बहनें पूज्य रही हैं 

भारत में भगवान् सरीखी।

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Company of ‘God and Godly’… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Company of ‘God and Godly’ ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

? ~ Company of ‘God and Godly’??

In the  company  of God  and Godly, we find our way,

To ignite  the  spark, that  burns throughout the day

The fire  of truth, that  keeps flickering  deep inside,

Guides us on our journey, with a gentle, loving stride

 *

In the God’s sacred space, where saintly people reside,

We find our inner  light, and  a loving,  peaceful Guide

The  divine enlightenment,  shines  like  morning  dew,

Illuminating our path, showing what is eternally true

 *

In the company  of  Godly, hearts take cosmic flights,

And the flame of pure love, that burns within, ignites

May we seek Godly company, to bask in its loving light,

And may our souls, be filled with peace & pure delight

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune
23 March 2025

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares