मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

आमची सोळा वर्षाची लेक मृण्मयी, कन्या-लक्ष्मी आहे. असंच समजा नां, आमच्या घरातली दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणजेच देवीच्या अनेक रूपातली ती एक अंश आहे. धोक्याच्या वयातही ती कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही, उलट इतरांना धोक्यातून वाचवते.

खडकवासला धरणाचं पाणी सोडल्याचा तो काळाकुट्ट दिवस, आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. खडकवासला धरणातून सुटलेले पाणी थेट आमच्या घरांत शिरल होत. सन सिटी रोड वरच्या, उतारावरच्या, एकता नगर, निंबज नगर सोसायटी, धोक्यात असल्याच्या बातम्या टी. व्ही. वर झळकल्या. बऱ्याच जणांची घरे धुवून निघाली. पाणी आमच्याही घरांत शिरल. आम्ही गांगरलो. बायको माहेरी गेली होती. माझी वयस्कर आई तर मटकन् खालीच बसली. प्रसंगावधान राखून मृण्मयीने पदर बांधला आणि ती अष्टभुजा झाली. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, कपडे तिने साडीच्या गाठोड्यात बांधल्या. आजीच्या पोथ्या आणि मुख्य म्हणजे तिची औषधे गोळ्यांची पुरचुंडी आजीच्या ताब्यात देतांना नातीनें बजावल, ” आजी ही तुझी इस्टेट नीट सांभाळ”.

थोडी आवराआवर झाल्यावर तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, ” बाबा आता इकडचं आणि आजीचं मी बघते. तुम्ही आता आपल्या दुकानाकडे बघा. ” 

“अरेच्चा ! खरंच की ! दुकानांत पण पाणी शिरलं असेल. बापरे! मी विसरलोच होतो. वास्तवाचं भान मला आल आणि कापरंच भरलं. अगदी कालच मी दुकानात लोखंडी सामानाचा 80 हजाराचा माल भरला होता. वाटेतला चिखल तुडवत मी दुकान गाठल. तर खालचा कप्पा पूर्ण पाण्यात होता. मी हताश झालो, डोळ्यात जमा झालेले अश्रू ओघळले. आणि पाण्यात मिसळले. दिलाश्याची थाप पाठीवर पडली. आणि लेकीचा आवाज कानावर पडला, ” बाबा दुकानात शिरलेल्या पाण्यात तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची भर कशाला ? ऐका ना! शेजाऱ्यापाजाऱ्यांची, मुलाबाळांची, आजीची व्यवस्था करून आमची टीम आता आपल्या दुकानाकडे वळली आहे. ” इतक्यात उत्साही मुला-मुलींच्या मेळाव्यातून पुढे येत यशपाल हसत म्हणाला, ” काका शांत व्हा. इथे आरामात खुर्चीवर बसा बरं! आणि हे खडकवासल्याहूनच आलेलं पण शुद्ध, आणि घरचं पाणी प्या. आता सगळं आमच्यावर सोपवायचंय. आणि हो! अहो काका, सकारात्मक विचार करायला तुम्हीच तर शिकवलंत ना आम्हाला ?अर्धा पेला रिकामा झाला तरी अर्धा भरलेला आहे, ते बघायचं असत. असं तुमच्याकडूनच शिकलोय आम्ही हो ना? ” घोळक्यातली एक मैना चिंवचिंवली, “अय्या खरंच की! दुकानातला अर्धा माल पाण्यात आहे पण वरचा कप्पा अगदी कोरडा ठणठणीत आहे. काका बघा तर खरं! आपलं खूप नुकसान नाही झालं ” असं म्हणत उड्या मारत ती वानरसेना पुढे सरसावली. इतर कामांचा फडशा पाडून आबाल वृद्धांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था लावून ही ‘गॅंग’ आता आमच्या मदतीसाठी पुढे धावली होती.

पाणी ओसरल. बोल बोलता भिजलेल्या मशीनचे भाग सुट्टे झाले. पुसायला कोरडी फडकी मिळेनात. एक दोघांनी तर मशिन पुसायला अंगातला शर्ट काढला, आणि मशीन्स साफ केली. काही तासातच ओला कारभार कोरडा झाला. आता लोखंडी मालाला गंज चढण्याची भीती नव्हती. नुकसान टळलं होतं, ते वेळीच धाऊन आलेल्या या समाजसेवक तरुणांमुळे, हे मान्य करावेच लागेल. पाण्यामुळे मशीनचा काही भाग निकामी झाला होता, तो मित्रांच्या मदतीने, माझ्या कन्येने गाडीवर घालून जुन्या बाजारात विकला. तिजोरीच्या गल्ल्यात भर पडली. काही दिवसातच दुकान पहिल्यासारखं चकचकीत झालं. आता आलं नवरात्र, नंतरच्या दसऱ्यादिवाळीला मृण्मयी दुकान सजवणार आहे. ती म्हणाली, “बाबा आपण यावेळी फुलांच्या माळा सजावटीसाठी नको आणायला” वर्धमान ओरडला, “अगं मार्केट यार्ड मधून आणूया की आपण फुलं, स्वस्त आणि मस्त मिळतील. ” त्या तरुणाईत इतका सळसळता उत्साह संचारला होता की, मला वाटलं, हा आत्ताच मार्केट यार्ड गाठतोय की काय, त्याला खाली बसवत मृण्मयी म्हणाली, ” ऐक ना वर्धमान! आपण यावेळी लोकरीचेच तोरण आणि माळा आणूया. फुलं काय लवकर सुकतात. आणि कचऱ्यात जमा होऊन डासांची भरती होते. फुलं कुजल्यावर प्रदूषणही वाढतं त्यापेक्षा लोकरीच्या माळा टिकतातही हो कीनाही? आणि अरे आपली संस्कृती, आपली पारंपारिक कलाकुसर, काळा आड लोप पावतीय ना!तिला उजाळा तरी मिळेल. आणि हो लोकरीच्या माळा धुताही येतात. शिवाय प्रत्येक टाक्यात जिव्हाळा असतोच असतो, पण करणारीच्या हाताची उबही त्यात सामावलेली असते आणि निर्मितीचा आनंद असतो तो वेगळाच. ” 

तिचा बोलण्याचा धबधबा आवरतांना, मिस्किल संकेतला चेष्टेची लहर आली तो म्हणाला, ” बरं राहयलं! नाही आणत आम्ही फुलं आणि कागदाच्या माळा सुद्धा नाही आणत. मी बापडा तुळशीबागेतून लोकर आणि सुयांचे बंडलच आणतो. मग आमची मृण्मयी विणकाम शिकेल नंतर मग सावकाश विणत बसेल, आणि मग थोड्या दिवसांवर आलेल्या दसरा दिवाळीसाठी विणकामाच्या सुयांशी लढाई करत करत, माळा विणेल. क्या बात है” l त्याच्या चेष्टेच्या सुरात सगळ्यांचा सूर मिसळला आणि मग काय!हास्याची कारंजी उसळली. मी हा सगळा गंमतीचा मामला कान देऊन ऐकत होतो. नाकाचा शेंडा उडवत गाल फुगवून संकेतला चापट मारत, आमचं कन्यारत्न काहीतरी बोलणार इतक्यात छोटया गजुनी मुक्ताफळ उधळली,

” झाssल! मृण्मयी ताई लोकरीच्या माळा विणायला बसल्यावर, मग काय! पुढच्या वर्षीचाच दसरा दिवाळी उगवेल. “आणि मग पुन्हा हास्याची कारंजी उसळली.

काही वेळापूर्वी निराश झालेला मी खळखळून हंसलो. मित्र-मैत्रिणींना दटावत बाईसाहेब उत्तरल्या, ” ऐका ना बाबा! शेजारच्या सोसायटीतल्या वझे काकू लोकरीच्या माळा खूप छान करतात. त्यांच्या घरातही पाणी शिरलं होतं पण त्यांच्या तयार माळा वरच्या कप्प्यात असल्यामुळे वाचल्या. बाकी इतर नुकसान खूप झालंय त्यांच. त्यामुळे बाबा खूप निराश झाल्यात हो त्या. आपण मदत म्हणून त्यांच्याकडूनच माळा घेऊयात का हो बाबा ?त्यांची थोडीशी नुकसान भरपाई पण होईल आणि नर्व्हस झालेल्या वझे काकू खुशही होतील. बघा पटतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी डोळे विस्फारून मृण्मयी कडे बघतच राहयलो कालपर्यंत शाळकरी असलेली माझी ही साळुंकी, मनानी, विचारांनी मोठी कधी झाली?ह्या सुखद प्रश्नचिन्हातच मी अडकलो, काही तासांपूर्वी निराशेच्या काळोखात अडकलेल्या माझ्या मनानी, खुशीनें होकार भरला. खडकवासला धरणाच्या पुराच्या पाण्याबरोबर माझी निराशा वाहून गेली. आणि हो! हे सगळं माझ्या लाडक्या लेकीमुळे आणि तिच्या चिरउत्साही चिरतरुण अशा मित्रमैत्रिणीमुळेच घडलं होत. प्रत्येक घराघरांत जाऊन ही ‘गॅंग ‘आशेचा दिवा लावते आणि अंधाराला पळवते. आता दसरा दिवाळी सगळेजण उत्साहाने साजरी करतील. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पुराच्या पाण्याने चिखलमय झालेला मार्ग त्यांनी त्यांच्या कृतीने सुकर केला होता. आता नव्या उमेदीने आम्ही दसरा दिवाळी आणि पुढील येणाऱ्या वर्षांची वाट पाहत आहोत. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आणि त्याबरोबर धन्यवाद.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा… कोणतेही काम सांगा, हिच्याकडे त्यावर उत्तर तयार असते… बरं, यात तिला मोठेपणाही नको असतो… पण मदत करण्याची भारी हौस— 

हसू येईल सांगितले तर,.. पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?…… ऐका तर.

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता. सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच, विशूने, आपल्या हौसेने घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, “ मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी. ” 

…. झाले. एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही. ती इतकी भाबडी आहे ना, की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, “ बाई ग परवा केळवण करणार आहे, १0 माणसे यायची आहेत. , काही सुचत नाही बघ, काय मेनू करू, आणि कसे करू. ” 

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.

वीणा म्हणाली, “ अग हे काय,. मी आहे ना इथे, मला विचार की. पैसे मी देणारे ना… आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते “.

ते विशूच्या गावीही नव्हते..

हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत. आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा. भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

…. तिलाही फटके कमी नाही बसत.. या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली. ४ दिवसात मालकाचा हिलाच फोन. “ बाई कसला मुलगा दिलात–. गेला की काम सोडून. ” 

हिने विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण पाचव्या मजल्यावर राहत्यात. पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.

…. विशू हतबुद्ध झाली.

शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते. विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले. दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू. ”

…. बिचारी विशू.

आनंदी गुणी आहे विशू.

मागच्याच महिन्यात तिच्या नातवाची मुंज होती. मुलगा सून विशूकडे आले. म्हणाले, “ आई, कृपा कर. पण आम्हाला तुझी कोणतीही मदत नकोय. आमचे आम्ही समर्थ आहोत सगळं करायला. तुम्ही दोघे फक्त मुंजीला आणि सगळ्या कार्यक्रमाला या. ”…. थोडक्यात, तू अजिबात लुडबूड करू नकोस ही गर्भित धमकीच होती.

विशूला वाईट वाटलं. आमच्या कट्टयावर हिरमुसून बसलेली विशू बघून इतर मैत्रिणींनी विचारलं,

“काय ग काय झालं? “

विशूने घडलेली हकीगत सांगितली. आमची दुसरी मैत्रीण माया म्हणाली,

“आता तरी शहाणी हो ग बाई. तू चांगल्या भावनेने करायला जातेस पण लोकांना तुझी मदत आवडत नाही.

करू देत ग सून मुलगा हवी तशी मुंज. तू फक्त गप्प बस आणि त्यांच्या आनंदात सहभागी हो. अजिबात लोकांना यापुढे नको असलेली मदत करायची नाही. जमेल का एवढं?”

विशू म्हणाली, “ हो ग. मी हे पथ्य नक्की पाळेन. बघालच तुम्ही. ” 

आश्चर्य म्हणजे आता आमची विशू खरोखर सुधारली. कोणी विचारलं तरी सुद्धा ती हल्ली न मागितलेली मदत करत नाही की सल्ले देत नाही…

… त्यामुळे तिला सुख झाले. विशूची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मरणाची घाई… लेखिका : सौ. विदुला जोगळेकर☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मरणाची घाई… लेखिका : सौ. विदुला जोगळेकर☆ श्री सुनील देशपांडे

फार मरणाची म्हणजे खूप घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहीजे म्हणुन घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणुन लगेच गळे काढायची पण घाई…

*

माझ्याजवळ काही आलंय की जे अजुन मलाही नीट नाही उमगलय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

*

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

*

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

*

मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

विचारांना अविचाराने बाजुला सारायची घाई….

*

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…

*

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

*

मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई… !

*

चिमखड्या आवाजांना लता /किशोर व्हायची घाई.

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई….

*

तर काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य / लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

*

प्रसंग ऐकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई… !

*

मुक्कामाला पोहचायची घाई….

*

कामावरुन निघायची घाई…

सिग्नल संपायची घाई….

*

पेट्रोल / डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

सगळंच पटकन उरकायची घाई…

*

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

*

महीनाभरात वजन वाढवायची देखील घाई…. !

पाच मीनिटात गोरं व्हायची घाई…

*

पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई…

एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

*

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यानां दमवायची घाई…

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमुन जाई…

*

भवतालचा काळ / निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई… !!!

*

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षाही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

लेखिका : सौ विदुला जोगळेकर.

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.

त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.

सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.

तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.

साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.

(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).

माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.

(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)

लेखक : श्री दिगंबर देशपांडे

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “

तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.

मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.

पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.

जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,

फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.

आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.

दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..

त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.

घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !

शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

निसर्ग निर्मित सुंदर पेले

उमललेत तुमच्यासाठी

सदगुणांचे पेय भरूनी

हे चषक लावा ओठी

*

या पेयाची धुंदी देईल

नवचैत॔न्याची अनुभूती

करीता प्राशन पेया होई

सदविचारी ती व्यक्ती

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ छूटी सिगरेट भी कम्बख़्त” – लेखक : श्री रवींद्र कालिया ☆ साभार – श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ पुस्तक चर्चा ☆ “छूटी सिगरेट भी कम्बख़्त” – लेखक : श्री रवींद्र कालिया ☆ साभार – श्री कमलेश भारतीय ☆

पुस्तक : छूटी सिगरेट भी कम्बख़्त

लेखक : रवीन्द्र कालिया

प्रकाशक : सेतु प्रकाशन, नोएडा

मूल्य : 275 रुपये

☆ “पीढ़ियों के आरपार साफगोई से लिखे संस्मरण” – कमलेश भारतीय ☆

जब एक माह पहले नोएडा सम्मान लेने गया तब समय तय कर प्रसिद्ध लेखिका ममता कालिया से मिलने गाजियाबाद भी गया । बहुत कम समय में बहुत प्यारी रही यह मुलाकात ! जालंधर मेरा पुराना जिला है पंजाब में और इस नाते वे हमारी भाभी ! उन्होंने सबसे अमूल्य उपहार दिया रवींद्र कालिया की तीन किताबें देकर ! इनमें सबसे ताज़ा किताब है -छूटी सिगरेट भी कम्बख्त ! गालिब छुटी शराब तो बहुचर्चित है लेकिन यह संस्मरणात्मक पुस्तक भी धीमे धीमे चर्चित होती जा रही है, इसमें पंद्रह संस्मरण शामिल हैं जिनमें इलाहाबाद, मुम्बई, दिल्ली में बिताये समय व जिन लोगों से मुलाकातें होती रहीं, उन पर बहुत ही दिल से और दिल खोलकर लिखा गया है बल्कि कहू़ं कि संसमरण लिखने का रवीन्द्र कालिया का खिलंदड़ा सा अंदाज सीखने का मन है !

इस पुस्तक में कृष्णा सोबती, राजेंद्र यादव, उपेंद्रनाथ अश्क, कमलेश्वर, खुशवंत सिंह, जगजीत सिंह, टी हाउस, ओबी, अमरकांत, आलोक जैन पर इतने गहरे पैठ कर लिखा है कि ईर्ष्या होने लगती है कि काश ! मैं ऐसा इस जन्म में लिख पाता ! सच में ममता कालिया ने मुझे बेशकीमती उपहार दे दिया जो नोएडा में मिले सम्मान से पहले ही सम्मान से कम नहीं ! कोई इतनी कड़वी सच्चाई नहीं लिख सकता कि कुमार विकल ने टी हाउस के बाहर रवीन्द्र कालिया को थप्पड़ मार दिया क्योंकि उन्हें यह शक था कि नौ साल छोटी पत्नी उनकी शादी को लेकर लिखी गयी है और वे लुधियाना से गुस्सा निकालने दिल्ली के टी हाउस तक पहुंच गये ! इसी तरह मोहन राकेश पर चाकू से हमले का जिक्र भी है । रवीन्द्र कालिया मोहन राकेश के जालंधर के डी ए वी काॅलेज में छात्र भी रहे थे और हिसार के दयानंद काॅलेज में हिंदी प्राध्यापक भी रहे थे । कमलेश्वर जिस रिक्शेवाले को इलाहाबाद में रवीन्द्र कालिया के घर के बाहर खड़ा रहने को बोलकर आये थे, वह राशन‌ और दवाइयों समेत भाग निकला ! कैसे कमलेश्वर ने नयी कहानियां पत्रिका में नयी पीढ़ी को खड़ा किया और कैसे इलाहाबाद ने धर्मवीर भारती, कमलेश्वर और रवीन्द्र कालिया को कितनी ऊंचाइयों तक स्पूतनिक की तरह उड़ान दी, ऊंचाइयां दीं ! कैसे खुशवंत सिंह जितने ऊपर से अव्यवस्थित दिखते हैं, वैसे वे हैं नहीं !

कितना खुलकर कहते हैं कि अपनी प्रेमिकाओं को याद कर रहा हूं। ऐसे अनेक प्यारे संस्करणों के लिए यह पुस्तक बार बार पढ़ी जा सकती है! ममता कालिया जी ! इस अनमोल उपहार के लिए मेरे पास कहने को शब्द नहीं !

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ संवेदना (शताधिक काव्य रचनाएँ) – कवि : श्री सुरेश पटवा ☆ साभार – डॉ. साधना बलवटे ☆

☆ पुस्तक चर्चा ☆ “संवेदना (शताधिक काव्य रचनाएँ)” – कवि : श्री सुरेश पटवा ☆ साभार – डॉ साधना बलवटे ☆

पुस्तक : संवेदना (शताधिक काव्य रचनाएँ)

लेखक : श्री सुरेश पटवा 

प्रकाशक : समदर्शी प्रकाशन 

पृष्ठ संख्या : 206 

मूल्य : 320 रुपये

☆ “सम+वेदना की कविताएँ” – डॉ साधना बलवटे ☆

संवेदन से अनुभूति होती है या अनुभूति के कारण संवेदना जन्म लेती है यह प्रश्न बड़ा जटिल है। यदि हमारा मन संवेदनशील है तो वह अनुभूति कराता है किंतु कई बार किसी की पीड़ा या हर्ष  की अनुभूति करने के बाद संवेदना जन्म लेती है।  दोनों ही स्थितियों में संवेदना का अनुभूति से गहरा संबंध है। संवेदना अर्थात सम्+वेदना!  किसी की वेदना को समान रूप से अनुभव करना है संवेदना है। साधारण तौर पर वेदना का अर्थ केवल पीड़ा से लिया जाता है। किसी के ह्रदय में  उठे हर्ष, विषाद ,पीड़ा, आनंद, करुणा, उल्लास को देखकर आपके ह्रदय में जो सामान भाव उठते हैं वह सभी  वेदना है।  किसी पराए के मन में उठे भावों की अनुभूति आपके हृदय में समान रूप से होती है,  इसीलिए वह सम्वेदना कहलाती हैं।

डॉ साधना बलवटे

आचार्य रामचंद्र शुक्ल अपनी पुस्तक “हिंदी साहित्य का इतिहास” के पृष्ठ 407 पर जयशंकर प्रसाद के कामायनी के “आशा सर्ग” के चिंता उपसर्ग संदर्भ में लिखते हैं कि

*

मनु का मन था विकल हो उठा,

संवेदन से खाकर चोट। 

संवेदन जीवन जगती को,

जो कटुता से देता घोट।

*

आह कल्पना का सुंदर यह,

जगत मधुर कितना होता।

सुख-स्वप्नों का दल छाया में,

पुलकित हो जगता-सोता।

*

संवेदन का और हृदय का,

यह संघर्ष न हो सकता।

फिर अभाव असफलताओं की,

गाथा कौन कहाँ बकता।

*

इन पंक्तियों में संवेदन बोध वृत्ति के अर्थ में व्यवहृत जान पड़ता है। बोध के एकदेशीय अर्थ में भी यदि संवेदन को लें तो उसे भावभूमि से ख़ारिज नहीं कर सकते। आगे चलकर संवेदन शब्द अपने वास्तविक या अवास्तविक दुख पर कष्ट अनुभव के रूप में आया है –

हम संवेदन शील हो चले,  यही मिला सुख,

कष्ट समझने लगे बनाकर निज कृत्रिम दुख।

श्री सुरेश पटवा जी का काव्य संग्रह “संवेदना” इसी प्रवृत्ति की परिणति है। समाज के प्रत्येक दुख, अभाव और आनंद उनके हृदय में वेदना पैदा करते हैं। अनुभूति की गहराइयां उन्हें प्रत्येक स्थिति में कलम चलाने को विवश करती है, इसीलिए उनका यह काव्य संग्रह विषय वैविध्य से परिपूर्ण है। गीत ग़ज़ल जैसी अनुशासित विधा पर लेखनी चलाने वाले सुरेश पटवा जी मुक्त छंद में भी उसी सहजता के साथ अभिव्यक्त होते हैं। सहजता और सरलता उनकी कविता की विशेषता है। सरल शब्दों में व्यक्त की गई भावनाएं पाठकों तक सरलता से पहुंच जाती हैं। सरल होना एक कठिन कार्य है, जबकि कठिन होना सरल। सरल होने का कठिन कार्य पटवा जी ने किया है। एक ओर  वे जीव विज्ञान की विस्तृत समझ रखते हैं, वहीं दूसरी ओर अध्यात्म से भी उनका गहरा नाता है।

वे जीवन के जटिल विषयों पर लेखन करते हैं, नर्मदा यात्रा जैसे महत्वपूर्ण विषय पर भी लेखन करते हैं। कुल मिलाकर सभी विषयों पर समान अधिकार रखते हैं। विषय वैविध्य, विचार वैविध्य, विधा वैविध्य को अपने ज्ञान वैविध्य से साधते हैं। संग्रह की कविताएं समाज का मुखपत्र हैं। एक संवेदनशील मन जो अपना सामाजिक दायित्व निर्वहन करते हुए मुखरता से जो कुछ कहना चाहिए वह सब अपनी कविताओं में कहते हैं, किंतु इस कहन की विशेषता यह है कि उसे कहते हुए  वह अपनी करुणा या दुख का प्रदर्शन नहीं करते, उनकी कविताएं रोती चीखती चिल्लाती नहीं है, वरन दृढ़ता के साथ शिकायती लहजे में अपनी बात कहती है। ये शिकायती कविताएं जिम्मेदारों पर तंज भी करती है उलहाने भी देती है और चेतावनी देने के साथ सावधान भी करती हैं। कविता का यही धर्म है और सुरेश पटवा जी का ये काव्य संग्रह उस धर्म का बखूबी पालन करता है एक अच्छे संग्रह के लिए हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

© डॉ साधना बलवटे

निदेशक, निराला सृजन पीठ, राष्ट्रीय मंत्री, अखिल भारतीय साहित्य परिषद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मातृरेखा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मातृरेखा ? ?

उसके विश्वास के आगे

मेरी उम्र की रेखा

बचपन पर ठहरी रहती है,

मेरे बीमार पड़ने पर

‘बेटे को नज़र लग गई’

जब मेरी माँ कहती है!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा 💥

 🕉️ इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

 

Please share your Post !

Shares