मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

सुश्री साधना काळबांडे

अल्प परिचय
शिक्षिका
छंद… वाचन, लेखन
पुस्तके प्रकाशित... पाऊलखुणा (काव्यसंग्रह), कातोळा (काव्यसंग्रह), कोचम (कथासंग्रह)

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ “बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

(वऱ्हाडी भाषेतली कथा) 

जनार्दन बाप्पु शाळेत गुरुजी होते. गुरुजी म्हतले की लय धावपय करा लागे. शाळेत लेकराईले खीचळी शिजोया पासून त त्याईले लशीं द्या लोकू. शाळेत गेल्या गेल्या सरकारचा काय कागद इन काई सांगता येना. हे माईती द्या अन् ते माईती द्या. आज राती गुरुजीले काई झोप लागेना. या कळावून त्या कळावर होत. तशी जनी त्याईची बायको जनाबाई संतापली.

“आज जागरन करा लागते वाटते. झपा मुकाट्यानं”.

तशी सकावून झाली. हाती धोतराचा सोगा घेतला अन् निगाले. तसा त्याईच्या बायकोन आवाज देला…

“माय बाई सकावून सकावून कुठी चालले. च्या पानी घ्या लागत नाई काय आज?. तसेत च्या घेतल्या शिवाय कुठी जात ना… आज लय घाई झाली तुमाले. “

गुरुजीन ते आयकल. अन् जरासेक थांबले.

“बिचारे सकावून सकावून टोकू नको मले.. खिचळी शिजोयाले इधन आन्याले चाललो. लय घोर आय माल्या मांग.

गुरूजी बंडीत इधन घिऊन शाळेत गेले. चुल पेटून तांदुई टाके लोकु चुली जोळ बसले. भातान गदगद केल अन् गुरूजी आ पिसात गेले. पायतात त काय सरकारचा एक नवा कागद टेबलावर दिसला. त्याइन तो वाचला अन् डोकंक्ष्याले हात लावला.

“घेंव्व पंधरा दिवसात सरकारले कुटुंब नियोजनाची केस द्या लागते. आता एवळ्या लवकर कुठि भेटीन मले… सारी चिंता जीवाले “

गावात याले त्याले इचारल. जो तो म्हने… “गुरुजी मांगल्या वर्षीच केल राज्या”… अन् कोनी म्हने गुरुजी मले आठ दा दिवसात लेकरु होते पन म्या दुसऱ्याले हो म्हनेल आय… हजार रुपये पयलेच घेतले म्या. दुसरी बाई म्हने हजार रुपयाच्या खाली एक खळकु घेत नाई.

गुरूजी ईचारातच घरी गेले.

तसा त्याईच्या डोक्ष्यात लाईट लागला. त्याईन बायकोले अवाज देला.

“ओ ओम्याची माय इकळे ये व”.

तशी जनाबाई आली.

“तुह्या बयनीले किती लेकर आयत “.

“कोन कमलीले… तीले काय सात पोरी… अन् आठव आता पोटात आय… दा पंधरा दिवसात होईल आता बायतीन ते… आता बाया म्हनत आठवां किस्ना होते तिले पन तुमी काऊन इचारून रायले “.

“मले तिची लय आठोन आली “.

“माय बाई… माल्या बयनीची तूमाले आठोन येते लागे… काई काम अशीन तीच्या संग… “

गुरूजीन जनाबाई जोळ मनातली गोष्ट सांगतली….

“बिचारे सरकारच एक पत्र आलं… पंधरा दिवसात मले एक तरी अपरेशनची सरकारले केस द्या लागते. गावात ईचारल…. कोनी हो म्हनुन नाई रायल.. कमलीले इचार बर अप्रेशन करते काय आठव लेकरु झाल्यावर “.

तसी जनाबाईन बयनीले भेट्याले गेलीं.

“कमले बायतपन जोळ आल तुव…. मी कऱ्याले तयार आव… पन तुले अपरेशन करा लागीन अन् तुया बाप्पूले केस द्या लागीन… सारा खर्च करतात ते. तुले निवून दिऊन आनुन द्या लोकु. “

कमलीन ईचार करुन सांगतो म्हने अन् दोन दिवसात तीन हो म्हतल. गुरूजीले हरिक झाला. त्याईन कमलीच्या हरेक गोष्टीले हो म्हतल. कमली म्हने बाप्पु मले अँटो सईन होत नाई. जीप घिउन या. तसे गुरुजी जीप घीऊन साईले आन्याले गेले. सायीच्या सात पोरी संगच होत्या. त्यातल्या एका पोट्टीन मोठा कल्ला केला… तशी सायी बोलली.

“बाप्पु जीप उभी करा.. हे लायनी पोट्टी वकतो म्हंते. आता तीच पोट रिकाम होईन. हटेलीतून तीले काई खायाले घेजा. एखाद्या किलो चिवळा अन् जिल्ब्बी घिउन या. “

गुरुजीन जीप थांबोली. पोट्टी वकेलोकु हटेलीत गेले अन् खायाले आनल. तेवळ्यात एका पोट्टीन पाय घासन सूरू केल.

“आता ईले काय पायजे बापा कमले”

“बाप्पु तिले पेळे आवळतात.. जिल्ब्बी खात नाई ते. पावंक किलो पेळे आना अन् या शीलीले पापळी आवळते अन् या चौथ्या नंबरच्या पोट्टीले बुंदीचे लाळू आ वळतात. लय दिवस झाले तीन खाल्ले नाईत. “

गुरुजीन डोकश्याले हात मारला. मनात आल… आता पुळे काय काय मांगतात देव जाने. थांबत थांबत जीप घरालोकू पोहोचली. गुरूजी घरात गेले. तशी जनाबाई मांगच आली.

“लय उशीर लावला. पोट्ट्याइन तरास देला वाटते रस्त्यात.. तुमी त लयच सोकले. “

तशी कमली साऱ्या पोट्ट्या घिऊन दनदन घरात आली.

“बाई माल्या साऱ्या पोरीले खायाले दे. सारी भुक लागली. वकु वकू थकल्या माल्या पोरी. बाप्पु बिस्कीट मिस्किटचे पुळे आना डझनभर “.

गुरूजी दुकानात गेले अन् पोरीले खायाले आनल. आता सायीच पोट कदी दुखते याची रोज वाट पायत. पन सायीन त्याईले सांगातल..

“हे पा बाप्पु जर मले आठवी पोरगी झाली त मी अपरेशन करनार नाई. सांगून ठेवतो तुमाले. माल्या नवऱ्याचा निरोप म्या तुमाले सांगतला नाई अजून. ते म्हनत.. जर आपल्याले आता पोरगी झाली त दोन तीन पोरी तुह्या बाप्पुले वागोयाले लावजो. एवळ्या जनाचां खर्च आपल्याकुन होनार नाई. “

हे आयकुन गुरुजींच्या डोयाले डोया लागेना. अन् शाळेत मन लागेना. ते एकच देवाजोळ म्हनत… “देवा सायीले पोरग हु दे “.

दिवस उगयला. गुरूजी सायीले घिऊन दवाखान्यात गेले. तीले पोरग झालं. तिच्या पेक्षात गुरूजीले हरिक झाला. तीच कुटुंब नियोजनाच अपरेशन झालं अन् गुरूजीले केस भेटली. सरकार दरबारी केस सादर केली. त्याईच्या जीवात जीव आला. दवाखान्यातून सायीले घिऊन घरी गेले. पायतात त काय… घरासमोर दोन तीन मोठे अँटो उभे. घर पावन्याईन सट्ट भरेल. सायीच पोरग पाह्याले तिचा नवरा, सासु, जेठानी, जेठ आलत  चुलत सारे दा वीस जन हजर अन् जनाबाई त्याईचा सयपाक करुन राह्यली होती. गुरूजीन डोकशाले हात मारला. तेवळ्यात जनाबाई त्याईच्या जोळ आली.

“तुमाले तिकळे कोनाची अपरेशनची केस भेटली नाई… माल्या भवती पा आता कसा घोर झाला. माल्या अजुन तीन चार ब यनी याच्या राह्यल्या कमलीच पोरग पाह्याले. रोज चुमळीभर दयन लागते आता. “

गुरूजी जनाबाईले म्हनत.. “आता उखयात मुंडक घातल त रट्टे सईन करा लागतीन पावू काय होते पूळे “

सारे पावने दोन दिवसांत गेले पन कमलीचा नवरा काई गेला नाई. सट्ट खाये अन् मस्त पसरे. रोज कमलीचा पोरगा पायाले पावने येतं. दोन मयने झाले तरी कमली घरी जायाच नाव घेना. एकदिवस ते जनाबाई जोळ आली.

“मी काय म्हनतो तु माली मोठी बयीन आयस. तुये जवाई म्हंनतात की सातव्या पोरीवर आपल्याले पोरग झालं. तुह्या बाप्पुले पोराचं बारस कऱ्याले लाव. त्या शिवाय काई आमी अठून जात नाई. “.

गुरूजी शाळेतून आले अन् जनाबाइन त्याईले बयनीचा निरोप सांगतला. तसे गुरुजी मटकन खाली बसले.

“अव मले दुसऱ्या बाईची अपरेशची केस हजार रुपयात भेटत होती. म्या घेतली नाई. मले वाटल तुही बयीन फुकटात पळीन. माला मांगल्या मयन्याचा सारा पगार खलास झाला. उसने पासने घेतले. आता बारश्याले कुठून पैसा आनु. “

कमली घरी जायाच नाव घेना. म्हनुन गुरुजीन बारस कऱ्याच ठरोल. तसा जनाबाई दुसरा निरोप घिऊन आली.

“अव कमली काय म्हनते.. तिच्या पोराले सोन्याचा बायतीळा पायजे. गयात सोन्याचा ओम, हातात सोन्याचे मनी, आंगठी, कानात सोन्याचे डुल पायजात. अन् दोन तीन डीरेस पोराले अन् सातई पोरिले फराक पायजात. “

आता त गुरुजीले गस आली. सोनत लय महाग झाल. एवळा पैसा कुठून आनाव. साठ सत्तर हजाराचा गच्चू अन् खिशाले चाट बसते आता. तेवळ्यात जनाबाई आली.

“अजुन एक कमलीचा निरोप आय. ते म्हंते मले सादी साळी पायजे नाई. म्या बाप्पुच मोठ काम केलं. मले पैठनी पायजे अन् माल्या बॉले कपळे पायजात. बा रश्यात माल्या बॉच्या साऱ्या बयनी, जवाई, सगेसोयरे बलावा. नाईत राग भरतीन ते. माल्या सासूच्या इकळले सारे मायेरचे बलावा. ज्यादा नाई शंभरक होती न. पंगतीत साजर सूजर कऱ्याले लाव. शेव, बुंदीचे लाळु, वरन, भात, पातोळीची भाजी, तोंडी लाव्याले लुंजी ठेवा पंगतीत “.

सारं आयकुन गुरुजीले वाटे. हे धरनी फाटाव अन् त्यात आपून गायप व्हावं. पन इलाज न्होता. तशी सायी घरी तिच्या जात नाई म्हने. कमलींन साऱ्या पोरी गुरूजीच्या मागं कपळे घ्याले लावून देल्या. गुरुजीन साऱ्याइले कपळे लत्ते घेतले. सोन नान आ नल. लिस्ट तयार केली त दोनशे जन बारश्यासाठी झाले. दारात मंडप टाकला. वाजंत्र सांगतल. पंगत ठेवली. दोनशे म्हनता म्हन ता येटायातले सारे, ज्याईले बलावल नाई तेई आले. काई म्हनत गुरूजीले आठोन नशीन रायली बलाव्याची चाला जेव्याले नाईत राग इन.. सारं गावं जेव्याले उलटल. सारं सरत सरत आल. डबल सयपाक करा लागला. गुरुजी हन्याशी आले. पंगता उठता उठता संध्याकाय झाली. शेवटी गुरुजी अन् जनाबाई जेव्याले बसले. ताटात फक्त पोई अन् भाजीच उरली. दुसऱ्या दिवशी गुरुजीले वाटल सायी जाईन. त्याईन जनाबाईले बलावल.

“काव आता ई तूही बयीन जात नाई काय?”

“जातो म्हनते पन तीले पाच दा हजार संग पायजात अन् गवाच एखांद पोत, तुरीची, उळदाची, मुगाची दाय अन् स्पेशल जीप करून पायजे. “

आतात गुरुजींच्या डोयाले धारा लाग्याच्या रायल्या.

गुरुजीन सायीले जीप करुन देली. तिच्या सात पोरी, आठवा पोरगा नवरा तिचं सामान, दायदाना सारं देलं अन् मोठा स्वास बाईर टाकला. जीप दुर जाये लोकु गुरुजी पायत रायले. जनाबाई अन् गुरुजी घरात आले.

“ठेव बर जरासाक च्या. मंग मी हिसोब करतो”.

तसा जनाबाईन च्या ठेवला. दोघाईन च्या घेतला. गुरुजीन हिसोबाची वयी हातात घेतली अन् थंडेच पळले. कुटुंब नियोजनाच अपरेशन लाखाच्या घरात पळल होत. गुरुजीले घेरीच आली. याच्या पेक्षा दुसऱ्या बाईले अपरेशनसाठी हजार रुपये द्याले पुरत होते. सायीच अपरेशन फुकटात पळीन असं वाटल. झाल उलटच. तेवळ्यात शेजारच पोट्ट पयत आल.

“गुरूजी तुमचे पावने गेले ना ते जीप आमच्या वावरा जोळ बंद पळली. त्यातल्या पोरी लय लळुन रायल्या. तुमाले अँटो घीउन बलावल. “

गुरुजींच्या कानाचे जसे परदे फाटले. ते जागीच थंडे पळले. आंगात हिव धसल. खलखल हा लले अन. आंगावर वाकय घिऊन झपून रायले.

© सुश्री साधना काळबांडे

अकोट जि. अकोला पिन. 444101 मो. 9767993827

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

🍃 तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

का कळेना दाटते डोळ्यात पाणी..

मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही..

तेवढा ओल्या सरींनी घात केला…

नाहीतर तशी माझी तक्रार नाही…

— स्पृहाच्या ह्या ओळी वाचताना मनात आलं… खरंच तक्रार करण्यासारखं असतं का खरच काही??आपलं आपल्यालाही जाणवत राहतं… की ही तक्रार नक्की कशासाठी?

अगदी पेपर वेळेवर आला नाही, आजूबाजूचे नीट काम करत नाहीत, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाही.. अगदी साध्या साध्या विषयात आपण तक्रारीचा सूर लावतो… कुणी ऐकलं आणि नाही ऐकलं तरीही….

अगदी घरापासून, सोसायटीपर्यंत… समाजापासून देशापर्यंत… कितीतरी बाबतीत प्रत्यक्ष कृती, प्रयत्न न करता… फक्त नाराजी व्यक्त करत राहतो… कुणीतरी हे पटकन सगळ बदलावं… ही अपेक्षा…

दूध नाही आलं.. लेमन टी चा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?

कचरा उचलला नाही तर एक दिवस आपणच वन टू करत टाकून यावा… कामात बदल हे कितीतरी तक्रारींवरचं औषध आहे… हो ना?

प्रत्येक गोष्ट कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी करावी… ती ही आपल्या मर्जी प्रमाणे… तक्रारीचा जन्म बहुतेक तिथेच होत असावा…

तक्रार.. लाडिकही असू शकते… त्याची वाट पाहून, त्याच्या भेटीसाठी तरसणारी ती… तक्रार करते… किती वाट पहायची?

त्याचीही तक्रार.. रुसवा तो कधीतरी डोकावतोच… किती केलं तरी तुझं आपलं तेच… म्हणून अबोल झालेला तो…

तक्रार… एका पिढीने दुसऱ्या पिढीबद्दल केलेली… जराही चील मारत नाहीत हे मोठे लोक…

आमच्यावेळी असं नव्हतं म्हणत… तरुण पिढीची तक्रार… करून करून गुळगुळीत झालेली….

तक्रार… सौम्य कधी कधी टोकाची… टोचणारी… वादात, भांडणात रुपांतर होणारी…

तक्रार का होते आहे, खरं मुळ शोधून त्यावर नेमका उपाय करणं केव्हाही श्रेयस्कर!!!

खरं सांगू… तक्रार असावी, थोडासा रुसवा.. क्वचित.. लोणच्याच्या खारासारखा.. नात्याला चव यावी इतकाच…

तक्रार करण्याची आणि ऐकण्याची दोन्ही सवयी… घातकच!!!!

सर्वांगानं फुलून यावं वाटत असेल… माणूस आणि नातंही… तर… मनापासून स्वीकार… आणि नो तक्रार…

गुलाब, चाफा, मोगरा 

जुई जाई शप्पथ…

तुझ्यासारखे कुणीच नाही…

आईशप्पथ…

लेखिका : सुश्री तेजस्विनी

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “परतीच्या प्रवासाचा थरार…”  – लेखक – श्री संजय वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.

हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.

‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.

खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.

तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.

सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.

कसा झाला परतीचा प्रवास?

खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.

सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.

फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन – रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश झाला. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.

पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3. 0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.

दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926. 667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.

फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.

वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.

ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.

WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.

ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा भाग वेगळा झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.

भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.

क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम’

अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.

“क्रू नाईन बॅक ऑन अर्थ… वेलकम होम” अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.

ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.

रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या आली.

स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.

यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा ‘साईड हॅच’ उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.

हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.

ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.

क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.

ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना – मित्रमंडळींना भेटतील.

लेखक : श्री संजय वैशंपायन 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘म्हातारपण…’ – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘म्हातारपण… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

हा प्रसंग माझ्या सास-यांच्या बाबतीत मी पाहिलेला आहे. त्यांना जाऊन आता चार वर्ष होतील.

दहा वर्ष झाली, माझी मुलगी दीड दोन वर्षाची असेल. तिला आणि बायकोला आणायला मी निवळीला (रत्नागिरी) गेलो होतो. त्यांना घेऊन आम्ही तसेच पुढे गणपती पुळ्याला गेलो. परतीचा रस्ता तोच असल्यामुळे जाताना परत भेटायचं असं ठरल होतं. हॉर्न दिला की घाटात एका वळणावर ते येणार होते.

आम्ही परत आलो तर ते कोकणातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात, रस्त्याच्या कडेला एका दगडावर थोडी सावली धरून, हातात काठी घेऊन बसून होते. म्हटलं, “आधीच आलात का?” तर सासूबाई म्हणाल्या, दीड तास झाला येउन त्यांना.

आम्हांला यायला दोनेक तास लागणार हे माहित असूनही, चुकामूक होऊ नये म्हणून, चुकामूक झालीच तर नात परत वर्षभर दिसणार नाही या भीतीपोटी असेल, ते तिथे बसून होते.

आधीच ते कमी बोलायचे. मुलीचा पापा घेऊन त्यांनी आभाळ दाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. “आत्ता बघतोय, पुढच्या वर्षी?” हेही त्यात होतंच. निघाल्यावर गाडीचा ठिपका होईपर्यंत ते तिथेच थांबले असणार हे मागे न बघताही जाणवत होतं. खोटं नाही सांगत पण आत्ताही ते दृश्य माझ्या डोळ्या समोर उभं आहे.

म्हातारपण वाईट.

कारण मायेचे पाश तुटत नाहीत. माणसं महिनोनमहिने दिसत नाहीत. ती त्यांच्या कारणांमुळे आणि हे वयोमानामुळे मनात आलं तरी उठून जाऊ शकत नाहीत. मग सुरु होतं ते वाट बघणं. शिक्षाच आहे ती. गणपती, होळी किंवा मे ची सुट्टी याच वेळी येणार हे माहित असतं. अचानक काहीतरी कारण निघावं आणि त्यांनी यावं अशी स्वप्न काही दिवस बघितली जातात. रोज तेच स्वप्नं कितीवेळा बघणार? मग फोनवरून चौकशा चालू होतात, “जमेल का यायला?”, एवढे तीन शब्द जिभेच्या टोकावर तयारच असणार, पण ते बाहेर पडत नाहीत.

असे न उच्चारलेले पण ऐकायला आलेले शब्द फार फार आतवर रुतून बसतात.

म्हातारपण खरच वाईट. झाडावरून आंबा पडला तर, मोगरा अमाप आला तर, काही चांगलंचुंगलं खायला केलं तर, टी. व्ही. वर एखादं छान मूल दिसलं तर, यांना नातींचे चेहरे दिसतात.

“आत्ता इथे असत्या तर?” 

आणि हे सततचं वाटणं सहन झालं नाही की मग अश्रू कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत.

म्हणूनच, रडणारी म्हातारी माणसं मला कधीच दयनीय वाटत नाहीत. ते साठवलेलं रडणं असतं. अनेक महिने थोपवलेलं असतं ते.

खूप जणांना रडू येणं हे कमीपणाच वाटतं, अश्रू थोपवण्यात कसब आहे असं कुणाला वाटत असेल तर वाटू दे. पण मोकळं होण्याचा तो साधा, सोपा, सरळ, बिनखर्चिक उपाय आहे असं मला वाटतं. वेदना झाल्या की रडू येतं आणि संवेदना जिवंत असतील तर दुस-याच्या वेदना दिसल्या, वाचल्या, अनुभवल्या तरी पण रडू येतं.

मराठीत सहानुभूती असा एक सुंदर शब्द आहे. सह+अनुभूती, दुसरा जे काही आनंद, दु:खं किंवा इतर कुठलीही भावना अनुभवतोय, ती त्याच्यासह अनुभवणे, असा खरं तर त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने आपण तो फक्त दु:ख या एकाच भावनेशी चुकीचा अर्थ लावून जोडून टाकलेला आहे.

म्हातारपण गरीब असो वा सधन, मायेचा तुटवडा फार वाईट.

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – मायबोली रंग कथांचे

संपादक – सचिन वसंत पाटील

प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई

पृष्ठ संख्या – १८८

मूल्य – ३०० रुपये

नुकताच एक कथासंग्रह वाचला. ‘मायबोली, रंग कथांचे’. या कथासंग्रहाचे वेगळेपण असे, की या बोली भाषेतील निवडक कथा आहेत. बोली भाषा म्हंटलं, की आपल्याला चटकन आठवतात, त्या म्हणजे वर्‍हाडी, दख्खनी, मालवणी, अहिराणी, कोकणी, ठाकरी, आगरी इत्यादि. पण यात अशा काही बोली भाषेतील कथा आहेत, ज्यांची नावे मी तरी प्रथमच वाचली. उदा. तावडी, पोवारी, झाडी, लेवा गणबोली, गोंडी बोली, तडवी भिल, भीलाऊ या बोली भाषेतील कथाही यात आहेत. या कथांचे संकलक आणि पुस्तकाचे संपादक सचीन वसंत पाटील आहेत आणि प्रकाशक आहेत, शब्दान्वय प्रकाशन, मुंबई.

श्री सचिन पाटील

सचिन पाटील यांनी संपादकीयात लिहिले आहे, असे पुस्तक काढायची कल्पना मनात आल्यापासून सगळी जुळणी करेपर्यंत चार वर्षे गेली. काही मासिकातून, दिवाळी अंकातून आलेल्या कथा वाचून, काही मित्र परिवाराकडे चौकशी करून, काही त्यांचे स्वत:चेच मित्र होते, त्यांच्याशी बोलून त्यांनी कथांचे संकलन केले. गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच हे काम. त्यांनी ते लीलया केले, असे मी मुळीच म्हणणार नाही. त्यांनी त्यासाठी भरपूर परिश्रम केले. बोली भाषेशी संबंधित पुस्तके वाचली. कथाकारांशी आणि मित्रांशी चर्चा केली. गुगलवरून माहिती मिळवली. त्या माहितीवर केवळ विसंबून न राहाता, तज्ज्ञांशी त्याबाबत चर्चा केली. यातून सिद्ध झाले पुस्तक ‘मायबोली रंग कथांचे’.

पुस्तकाची मांडणी अगदी नेटकी आहे. सुरूवातीला संपादकियात बोलीभाषांचे महत्त्व विषद केले आहे. त्यांतर विविध २२ बोलीभाषांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्या भाषेत लिहिणारे महत्त्वाचे लेखक-लेखिका कोणते इ. माहिती येते. नंतर बोली भाषेतील २२ कथा आहेत. प्रत्येक कथेखाली आपल्याला अपरिचित शब्दांचे अर्थ दिले आहेत. अर्थात अनेक शब्दांचे अर्थ द्यायचे राहूनही गेले आहेत. कथांच्या शेवटी ती लिहिणार्‍या कथाकारांचे संक्षिप्त परिचय दिले आहेत. तिथे त्या त्या लेखकांचे फोन – मोबाईल नंबर दिले असते, तर वाचकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया कळवता आल्या असत्या. मलपृष्ठावर मराठी अभ्यासक डॉ. संदीप सांगळे लिहितात, ‘प्रमाण भाषेला समृद्ध करण्याचे काम बोलीभाषा करतात. प्रमाण भाषा ही मुख्य रक्तवाहिनी सारखी काम करते, तर बोली भाषा या तिच्या धमण्या आहेत. आपला खास असा भाषिक ऐवज त्या मराठीला दान करतात. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्यांची विपुल अशी शब्दसंपदा आहे. भाषेला ऐश्वर्यसंपन्न बनवण्याचे कार्य ग्रामीण भागातील बोली करत आहेत. ’ 

पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक, वेधक, समर्पक आहे. वारली शैलीतील हे चित्र आहे. फेर धरून कथानृत्य करणार्‍या भाषा भगिनी वर्तुळ करून नाचताहेत आणि या वर्तुळाच्या मधे तारपा नावाचे वाद्य वाजवणारी स्त्री दिसते आहे. आदिवासी नृत्याच्या वेळी लाकूड आणि कातडे यापासून बनवलेले हे वाद्य वाजवले जाते. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर फेर धरून नाचणार्‍या स्त्रिया आणि तारपा वाजवणारी स्त्री पांढर्‍या रंगात आहे. ते वाद्य जणू म्हणते आहे, ‘आमच्याकडे बघा… आमच्याकडे बघा… ’ प्रतिकात्मक असे हे मुखपृष्ठ वाटले मला.

या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘डफडं’. डॉ. अशोक कोळी हे या कथेचे लेखक. ‘कोरोना’सारख्या जागतिक महामारीमध्ये खेडेगावातील आलुतेदार, बलुतेदार, पुजारी, मागतकरी यांची कशी उपासमार झाली, ते यात सांगितलं आहे. घरादाराच्या पोटासाठी डफडं वाजवून उपजीविका करणारा माणिक. या काळात काही न मिळाल्याने कसा हतबल होतो, त्याचा आक्रोश या कथेत मांडला आहे. कथाशयाबरोबरच त्या भागातील, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीची, प्रथा-परंपरांची माहितीदेखील यात होते. गावात लग्न -समारंभ, नवस फेडणे इतकंच काय मर्तिकाच्या वेळीही मिरवणूक काढायची रीत. त्यावेळी डफडं वाजवून माणिकला पैसे मिळत. तशीच अमोशा (अमावास्या) मागायची पद्धत, या चाली-रीतीही कळून येतात. कोरोनामुळे मिरवणूकीवर बंदी आली आणि माणिकचं डफडं वाजवणं थांबलं. बायकोलाही अमोशा मिळाली नाही. त्याच्या दैन्यावस्थेचं वर्णन यात आहे.

‘ह्या मातयेचो लळो’ ही मालवणी बोलीची कथा सरिता पवार यांनी लिहिलीय. जमिनीच्या कामासाठी पम्याला त्याची आई बोलावून घेते. सकाळी आपणच रुजवलेली, जोपासलेली झाडं-पेडं, त्यांची हिरवाई बघून पम्या हरखून जातो. कामासाठी कणकवलीला जाताना त्याला वड, पिंपळ, चिंचेची झाडे आठवतात. ती रस्ता रुंदीकरणात पाडलेली असतात. हा विकास की विध्वंस? पम्याच्या मनात येतं. परतल्यावर घराभोवतीची बाग- नारळी, पोफळी, वेगवेगळ्या फळांची झाडं त्याच्या मनाला आनंद देतात. कणकवली, सिंधुदुर्ग या प्रदेशातील निसर्गाचं मोठं सुरेख वर्णन यात आहे, तसेच माय-लेकरातील संवादही मोठे चटपटीत आणि वाचनीय आहेत. शेवटी पम्या मुंबईची एका चाळीतली भाड्याची खोली सोडून गावी परतायचे ठरवतो, हे मोठ्या सूचकतेने लेखिकेने सांगितले आहे.

‘लाखीपुनी’ ही अहिराणी बोलीतील कथा लतिका चौधरी यांनी लिहिलेली आहे. लाखीपुनी म्हणजे राखी पौर्णिमा. गंगू शेतात निंदताना (खुरपणी ) गाणी (लोकगीतं) म्हणते. गाणी म्हणताना तिला भावाची आठवण येते. भाऊ मोठा झालाय बंगला, गाडी… त्या धुंदीत बहिणीला विसरला, तिला वाटतं. राखी बांधायला भाऊ नाही, ती कष्टी होते. शानूर, तिची मैत्रीण. दोघी एकत्र काम करणार्‍या. बहिणीसारख्याच. शानूर आपल्या नवर्‍याला सालीमला इशारा करते. तोही शेतात कामाला आलेला असतो. शानूर त्याच्या कानात काही-बाही सांगते. ती गंगूला म्हणते, ‘गंगू मेरी बहेना, यह तेरा धरमका मुहबोला भाई. ले लाखी बांध ले. भाई की याद आ रही है ना?’ गंगू काय करावं, या विचारात पडते. तशी ती म्हणते, ‘जात, रंग, धर्म, भेद इसरी मानवता धर्म देखानी नजर हाऊ सण देस. इतली ताकद या भाऊ बहिननी लाखी बांधनमा शे. ‘ मग गंगूने हसत हसत सालीमला राखी बांधली. हसत हसत दोन अश्रू गंगूच्या गालावर ओघळले. शानूरही खूश झाली. इतक्यात फटफटीचा आवाज आला. कोर्‍या फटफटीवरून गंगूचा भाऊ आला. ‘गंगूताई लाखी भांद. ‘ खिशातून राखी काढत तो म्हणतो, ‘बैन, नोकरी, पैसा, सवसारना लोभमा दूर र्‍हायाणू, पण नातागोताशिवाय जगणं म्हंजी जगनं नै हाई समजनं नी उनू भेटाले लाखीपुनीनं निमित्त देखी. ’ एकूण काय, गोड शेवट. भाषाही मोठी मधुर आहे. त्यावर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो. भाऊ-बहीण उराउरी भेटतात. गंगू राखी बांधते आणि नंतर निंदणीच्या आपल्या कामाला लागते. काम करता करता गाते,

‘आठवला भाऊ परदेशीचा बेईमान, लाखीपुनीले आला चोयी लुगड घेवून मानियेला भाऊ जातीचा मुसलमान, सख्ख्या भावापरीस त्याचं आहे ग इमान बहिणीला भाऊ एकतरी ग असावा, पावल्याचा खण, एक रातीचा इसावा.’

‘बंधे मूठ की ताकद’ या पोवारी बोली भाषेतील कथेत लेखक गुलाब बिसेन यांनी एकतेचे महत्त्व आणि त्यामुळे मिळणारे यश अधोरेखित केले आहे. वैनगंगेच्या खोर्‍यातील सितेपार गावात घडलेली कथा. आमदार फंडातून गावातील मुख्य रस्ता सिमेंटचा करायचे ठरते. रस्ता होतो. आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते आणि महिन्याच्या आत त्यात घातलेल्या सळ्या बाहेर येऊ लागतात. गावातील ‘युवा-शक्ती’ नावाचा समूह, सरपंच, आमदार, ठेकेदारांना जाब विचारतात. पण ते दाद देत नाहीत. आमदार उडवा-उडवीची उत्तरे देतो. सरपंच ‘युवा-शक्ती’त फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. पण ते शक्य होत नाही. त्यांना पोलिसांचा धाक दाखवतो. पण ही बहाद्दर मुले घाबरत नाहीत. पेपर, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा उपयोग करून बातमीचा प्रसार करतात. मुख्यमंत्र्यांना ई-मेल करतात. झाल्या प्रकाराची चौकशी होते. दोषी ठेकेदारावर कारवाई होते आणि ‘बंधे मूठक् ताकदको दर्शन पूर गावाला भयेव. ’ याही बोलीवर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो.

‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य ‘ या पावरा बोलीतील कथेत संतोष पावरा हे लेखक शेवटी म्हणतात, ‘लाखो आये द्रोनचार्य, समय अभी डगमगायेगा नाही. नया एकलव्य आ गया हई, दान अंगठे का अभ होगा नही!’ ते असं का म्हणाले, कथा वाचूनच समजावून घ्यायला हवं.

या संग्रहातल्या ‘आठवण’ – माणदेशी बोली- डॉ. कृष्णा इंगोले; ‘उजाले की ईद’- दख्खनी; उमाळा – कोल्हापुरी – सचीन पाटील; आशा अनेक उल्लेखनीय कथा आहेत. खरं तर सगळ्याच २२ कथा वाचनीय आहेत. त्या प्रत्यक्ष वाचूनच त्याची गोडी, नादमाधुर्य, लय अनुभवायला हवी.

यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास, प्रचार, प्रसार व्हायला हवा. ‘मायबोली रंग कथांचे’ हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. या प्रयत्नाची दखल घेऊन की काय, संपादक सचिन वसंत पाटील यांना नुकताच ‘रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार ‘ सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. सुरेन्द्र रावसाहेब पाटील यांनी प्रदान केला आहे.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 282 ☆ व्यंग्य – कवि की भार्या ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य – ‘कवि की भार्या’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 282 ☆

☆ व्यंग्य ☆ कवि की भार्या

छोटेलाल ‘अनमने’  होलटाइम कवि हैं, 24 गुणा 7 वाले। वे सारे समय कविता में रसे-बसे रहते हैं। नींद में भी कविता उनके दिमाग में घुड़दौड़ मचाये रहती है। नींद खुलते ही सबसे पहले सपने में आयी कविताओं को रजिस्टर में उतारते हैं, उसके बाद ही बिस्तर छोड़ते हैं। सड़क पर चलते भी कविता में डूबे रहते हैं। कई बार एक्सीडेंट की चपेट में आ चुके हैं, लेकिन गनीमत रही कि कोई हड्डी नहीं टूटी।

‘अनमने’ जी कविता पढ़ते अपनी फोटू फेसबुक पर डालते रहते हैं— कभी नदी किनारे, कभी पहाड़ पर, कभी रेल की पटरी पर, कभी पुराने किलों और स्मारकों पर। कोई महत्वपूर्ण जगह उनके कविता-पाठ से अछूती नहीं रहती।

‘अनमने’ जी अपने झोले में अपने कविता-संग्रह की दो-तीन प्रतियां हमेशा रखते हैं। कोई परिचित मिलते ही उसके हाथ में अपनी किताब देकर फोटू खींच लेते हैं और फेसबुक पर डाल देते हैं। कैप्शन होता है— ‘अमुक जी मेरी कविताएं पढ़ते हुए।’ इस मामले में बच्चे भी नहीं बख्शे जाते। वे भी ‘अनमने’ जी के पाठक बन जाते हैं। ‘अनमने’ जी कई राजनीतिज्ञों को भी अपनी किताब पकड़ाकर फोटू डाल चुके हैं। राजनीतिज्ञ भी खुश हो जाते हैं क्योंकि मुफ्त में साहित्य-प्रेमी होने का प्रचार हो जाता है।

चौंतीस साल के ‘अनमने’ जी अभी तक कुंवारे हैं। लड़कियां तो कई देखीं, लेकिन सर्वगुण-संपन्न होने के बावजूद उनमें साहित्य-प्रेम का अभाव ‘अनमने’ जी को हर बार खटकता रहा। अन्ततः एक कन्या उन्हें भा गयी। हिन्दी में एम.ए.। ‘अनमने’ जी ने उससे पूछा, ‘कौन-कौन से कवि पढ़े हैं?’ कन्या  ने निराला, नागार्जुन, केदारनाथ अग्रवाल के नाम बताये तो ‘अनमने’ जी ने पूछा, ‘महाकवि अनमने को नहीं पढ़ा?’ कन्या ने भोलेपन से पूछा, ‘ये कौन हैं?’ ‘अनमने’ जी ने जवाब दिया, ‘पता चल जाएगा। इनको पढ़ोगी तो सब कवियों को भूल जाओगी।’

विवाह हो गया। पति-पत्नी के मिलन की पहली रात को नववधू पति की प्रतीक्षा में कमरे में बैठी थी। ‘अनमने’ जी ने कमरे में प्रवेश किया, हाथ में कविता की पोथी। थोड़ी देर की औपचारिक बातचीत के बाद पत्नी से बोले, ‘तुम भाग्यशाली हो कि तुम्हारी शादी एक बड़े कवि से हुई। अब तुम्हें मेरी हर कविता की पहली श्रोता बनने का मौका मिलेगा। आज मैं बहुत प्रसन्न हूं। इस अवसर पर कुछ बेहतरीन कविताएं तुम्हारे सामने पेश करता हूं। उन्हें सुनकर तुम समझोगी कि तुम्हारा पति कितना बड़ा कवि है।’

वे पोथी खोलकर शुरू हो गये। एक के बाद दूसरी कविता। हर रस की कविता। पत्नी  सुनते सुनते कब नींद में लुढ़क गयी कवि को पता ही नहीं चला।

भोर हो गयी। मुर्गे बांग देने लगे। घर में बातचीत और बर्तनों की खटर-पटर सुनायी देने लगी, लेकिन ‘अनमने’ जी की कविता बिना  रुके  प्रवाहित हो रही थी। अचानक नववधू उठी और तेज़ी से कमरे से बाहर हो गयी। ‘अनमने’ जी अकबकाये उसे देखते रह गये।

थोड़ी देर में पता चला कि नववधू सड़क से ऑटो पकड़कर कहीं चली गयी। उसका मायका लोकल था। घर में हल्ला मच गया। किसी की कुछ समझ में नहीं आया।

डेढ़ दो घंटे बाद वधू के बड़े भाई का फोन आया। बोले, ‘बहन यहां आ गयी है। उसकी तबीयत ठीक नहीं है। अनमने जी ने रात भर कविता सुना कर उसकी तबीयत बिगाड़ दी है। आगे के लिए उनसे बात करने के बाद ही बहन को भेजेंगे। हमने बहन को कविता सुनने के लिए नहीं ब्याहा है।’

तब से ‘अनमने’ जी बहुत दुखी हैं। पत्नी को अपनी कविता का स्थायी श्रोता बनाने का उनका प्लान खटाई में पड़ता नज़र आ रहा है।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – लघुकथा – नामालूम किस्सा… – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा “– नामालूम किस्सा… –” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ — नामालूम किस्सा…  — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

एक आदिम कथा है। पिछले जन्म में एक आदमी की तीन इच्छाएँ अपूर्ण रह गई थीं। पहली इच्छा थी ज़मीन खरीदने की, दूसरी इच्छा थी मकान बनाने की और तीसरी इच्छा थी अपने निर्मित मकान में रहने की। इसके लिए वह अथक परिश्रम करता था। उसे डर लगता था कहीं किसी कारण से बाधित होने लगे और ऐसे में हो कि जो इच्छाएँ अपनी आँखों में चमकती हैं और अपने हृदय में नवजात हिरण की तरह कुलाँचे मारती हैं वे इच्छाएँ कुम्हलाने लगें। तब तो उसकी इच्छाएँ उसके लिए उपास्य हो जाती थीं। खाए तो वह कटौती कर के, ताकि अपनी इच्छाओं की आपूर्ति के लिए कुछ रूपयों की बढ़ोत्तरी हो सके। बोले तो वह शब्दों को घटा कर। झोंपड़ी जैसे मकान में ज्यादा बोलना शोभा भी तो न देता। बोलने के लिए अपनी विशेष संपदा हो। अपनी ज़मीन और अपने मकान से बड़ी संपदा और क्या हो सकती है। अपने आलीशान मकान में रहें और कोई आए तो अपनी अद्भुत शान प्रतिबिंबित हो। ज़ोर से बोलने और खास कर अधिक बोलने में तब कोई तुक हो। सुनने वाले को मानना पड़े कमाया है तभी तो ऐसे बातूनीपन की फसल काट रहा है।

पर विधाता के बनाए हुए जन्म – मृत्यु के बंधन से वह मुक्त तो था नहीं। जन्म से आया था तो मृत्यु से जाने का संदेशा आया। वह मृत्यु से कंधों पर गया तो जैसे अपनी तीन अधूरी इच्छाओं को गिनते हुए। चिता में शरीर का दाह हुआ तो तीनों इच्छाएँ आग की लपटें बन कर आकाश की यात्रा पूरी कर रही हों। यह वही आकाश था जहाँ उसका अगला जन्म निर्धारित था। उसने अगले जन्म में जोर लगाया कि अपनी तीन इच्छाओं का लोक ऐसा हो कि ज़मीन मकान होने में यह भी हो कि अपने मकान में रहने का सुख अर्जित हो जाए। पर इस जन्म में वह मात्र ज़मीन खरीद पाया और उसके जीवन के दिन पूरे हो जाने से उसे जाना पड़ा। एक इच्छा पूरी हो जाने का उसे संतोष था, लेकिन दो इच्छाएँ अधूरी रह जाने का मनस्ताप उसे गहरी आत्मा तक कुरेद कर रख देता था। इसी मनस्ताप ने उसे नए जन्म में ढाला। जन्म था तो इच्छाओं के लिए ही तो था। बेहद स्फूर्ति और लगन से उसने दूसरी इच्छा के अनुरूप पहले से खरीदी हुई अपनी ज़मीन पर अपना मकान बनाना शुरु किया। मकान तो बना, लेकिन मृत्यु ने अपने मकान में रहने से उसे वंचित कर दिया। सच यह था आवागमन का अब वह इतना शौकीन हो गया था कि अगले जन्म का मानो वह स्वयं नियंता हो और भगवान तो बस एक द्रष्टा हो। अगले जन्म में अपने मकान में रहने की उसकी तीसरी इच्छा पूरी तो हुई, लेकिन अब तो इच्छाओं का दास हो जाने से उसने चौथी इच्छा का आविष्कार कर लिया था। उसे धुन थी अपने मकान में अपने बच्चों की शादी देखने की। वह मानता था बहुत ही जोश – खरोश से वह अपनी इच्छाओं का दासत्व निभाता है। पर भगवान जानता था वह कितना थकता टूटता और चिंदा – चिंदा बिखरता है। भगवान ने उससे कहा बच्चों की शादी देखने की इच्छा तुम्हारा एक बहुत बड़ा भ्रम है। उन्होंने तो शादी कर ली है और उनके बड़े – बड़े बेटे – बेटियाँ हैं। बल्कि वे अपने बच्चों की शादी करने की चिंता करते हैं। यह उसके लिए बड़े ही अचरज और धक्के की बात हुई। अपने बच्चों के अपने प्रति इस तरह दुराव कर लेने से उसने जैसे तैसे अपनी इच्छाओं से अपने को मुक्त किया। उसे नए जन्म से अब बहुत विरक्ति हो गई थी। उसकी विरक्ति देखते हुए भगवान सोच में पड़ गया। मृत्यु का जिस तरह सिलसिला था जन्मों का भी तो वही उपक्रम था। इस दृष्टि से उसका पुन: जन्म तो हुआ, लेकिन एक रद्दोबदल के साथ। बल्कि भगवान ने तो सब के लिए एक ही जैसा नियम बना लिया। जन्मों से सदाबहार वसंत की तरह धरती लदती रहे, लेकिन किसी को अपने पूर्व जन्म का हल्का सा भी किस्सा मालूम न होता।

 © श्री रामदेव धुरंधर

10 / 03 / 2018

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 282 – परिवर्तन का संवत्सर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 281 ☆ परिवर्तन का संवत्सर… ?

नूतन और पुरातन का अद्भुत संगम है प्रकृति। वह अगाध सम्मान देती है परिपक्वता को तो असीम प्रसन्नता से नवागत को आमंत्रित भी करती है। जो कुछ नया है स्वागत योग्य है। ओस की नयी बूँद हो, बच्चे का जन्म हो या हो नववर्ष, हर तरफ होता है उल्लास,  हर तरफ होता है हर्ष।

भारतीय संदर्भ में चर्चा करें तो हिन्दू नववर्ष देश के अलग-अलग राज्यों में स्थानीय संस्कृति एवं लोकचार के अनुसार मनाया जाता है। महाराष्ट्र तथा अनेक राज्यों में यह पर्व गुढी पाडवा के नाम से प्रचलित है। पाडवा याने प्रतिपदा और गुढी अर्थात ध्वज या ध्वजा। मान्यता है कि इसी दिन ब्रह्मा जी ने सृष्टि का निर्माण किया था। सतयुग का आरंभ भी यही दिन माना गया है।

स्वाभाविक है कि संवत्सर आरंभ करने के लिए इसी दिन को महत्व मिला। गुढीपाडवा के दिन महाराष्ट्र में ब्रह्मध्वज या गुढी सजाने की प्रथा है। लंबे बांस के एक छोर पर हरा या पीला ज़रीदार वस्त्र बांधा जाता है। इस पर नीम की पत्तियाँ, आम की डाली, चाशनी से बनी आकृतियाँ और लाल पुष्प बांधे जाते हैं। इस पर तांबे या चांदी का कलश रखा जाता है। सूर्योदय की बेला में इस ब्रह्मध्वज को घर के आगे विधिवत पूजन कर स्थापित किया जाता है।

माना जाता है कि इस शुभ दिन वातावरण में विद्यमान प्रजापति तरंगें गुढी के माध्यम से घर में प्रवेश करती हैं। ये तरंगें घर के वातावरण को पवित्र एवं सकारात्मक बनाती हैं। आधुनिक समय में अलग-अलग सिग्नल प्राप्त करने के लिए एंटीना का इस्तेमाल करने वाला समाज इस संकल्पना को बेहतर समझ सकता है। सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा तरंगों की सिद्ध वैज्ञानिकता इस परंपरा को सहज तार्किक स्वीकृति देती है। प्रार्थना की जाती है, “हे सृष्टि के रचयिता, हे सृष्टा आपको नमन। आपकी ध्वजा के माध्यम से वातावरण में प्रवाहित होती सृजनात्मक, सकारात्मक एवं सात्विक तरंगें हम सब तक पहुँचें। इनका शुभ परिणाम पूरी मानवता पर दिखे।” सूर्योदय के समय प्रतिष्ठित की गई ध्वजा सूर्यास्त होते- होते उतार ली जाती है।

प्राकृतिक कालगणना के अनुसार चलने के कारण ही भारतीय संस्कृति कालजयी हुई। इसी अमरता ने इसे सनातन संस्कृति का नाम दिया। ब्रह्मध्वज सजाने की प्रथा का भी सीधा संबंध प्रकृति से ही आता है। बांस में काँटे होते हैं, अतः इसे मेरुदंड या रीढ़ की हड्डी के प्रतीक के रूप में स्वीकार किया गया है। ज़री के हरे-पीले वस्त्र याने साड़ी-चोली, नीम व आम की माला, चाशनी के पदार्थों के गहने, कलश याने मस्तक। निराकार अनंत प्रकृति का साकार स्वरूप में पूजन है गुढी पाडवा।

कर्नाटक एवं आंध्र प्रदेश में भी नववर्ष चैत्र प्रतिपदा को ही मनाया जाता है। इसे ‘उगादि’ कहा जाता है। केरल में नववर्ष ‘विशु उत्सव’ के रूप में मनाया जाता है। असम में भारतीय नववर्ष ‘बिहाग बिहू’ के रूप में मनाया जाता है।  बंगाल में भारतीय नववर्ष वैशाख की प्रतिपदा को मनाया जाता है। इससे ‘पोहिला बैसाख’  यानी प्रथम वैशाख के नाम से जाना जाता है।

तमिलनाडु का ‘पुथांडू’ हो या नानकशाही पंचांग का ‘होला-मोहल्ला’ परोक्ष में भारतीय नववर्ष के उत्सव के समान ही मनाये जाते हैं। पंजाब की बैसाखी यानी नववर्ष के उत्साह का सोंधी माटी या खेतों में लहलहाती हरी फसल-सा अपार आनंद। सिंधी समाज में चैत्र शुक्ल प्रतिपदा को ‘चेटीचंड’ के रूप में मनाने की प्रथा है। कश्मीर में भारतीय नववर्ष ‘नवरेह’ के रूप में मनाया जाता है। सिक्किम में भारतीय नववर्ष तिब्बती पंचांग के दसवें महीने के 18वें दिन मनाने की परंपरा है।

सृष्टि साक्षी है कि जब कभी, जो कुछ नया आया, पहले से अधिक विकसित एवं कालानुरूप आया। हम बनाये रखें परंपरा नवागत की, नववर्ष की, उत्सव के हर्ष की। साथ ही संकल्प लें अपने को बदलने का, खुद में बेहतर बदलाव का। इन पंक्तियों के लेखक की कविता है-

न राग बदला, न लोभ, न मत्सर,

बदला तो बदला केवल संवत्सर।

परिवर्तन का संवत्सर केवल काग़ज़ों तक सीमित न रहे। हम जीवन में केवल वर्ष ना जोड़ते रहें बल्कि वर्षों में जीवन फूँकना सीखें। मानव मात्र के प्रति प्रेम अभिव्यक्त हो, मानव स्वगत से समष्टिगत हो।

आज गुढी पाडवा है। सभी पाठकों को शुभ गुढी पाडवा।💐🙏

[email protected]

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 15 मार्च से आपदां अपहर्तारं साधना आरम्भ हो चुकी है 💥  

🕉️ प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीराम स्तुति, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना कर साधना सम्पन्न करें 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कविता ☆ लापता… ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

सुश्री इन्दिरा किसलय

☆ कविता ☆ लापता… ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

दर्द में लथपथ होकर        

लगभग सभी ने

कविताएं लिखीं

युद्ध पर !

मैंने नहीं लिखी

 

क्या करती

लिखकर !

 

मदांध हाथियों के कान

नहीं सुनते

चींटियों का स्वर !

 

स्याही का रंग

रुचता नहीं उन्हें !

लहू की प्यास है

मर्मान्तक चीखों से

दहल उठी हैं

दिशाएं

 

ऐसे में

तरंगों पर सवार

अमन के एहसास

पहुंचाए हैं मैंने

उन पर लिखा है पता

उस इलाके का

जहां से इन्सानियत है

लापता

बस इतनी सी है

मेरी कविता !!

©  सुश्री इंदिरा किसलय 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of social media # 229 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of social media # 229 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 229) ?

Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.

Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.

He is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..! 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 229 ?

☆☆☆☆☆

रहने दो मुझको यूँ ही उलझा

हुआ सा अपने लोगों में

सुना है सुलझ जाने से धागे

अलग अलग से हो जाते हैं…!!

☆☆

Let me remain entangled like

this only with my own people

I have heard that the threads

get apart when untangled !!

☆☆☆☆☆

तुम्हारे एक लम्हे पर भी

मेरा हक़ नहीं…

न जाने तुम किस हक़ से

मेरे हर लम्हें में शामिल हो..

☆☆

I have no right even on

Any of your moments…

Knoweth not how you keep

Owning all of my moments…!

☆☆☆☆☆

ना जाने क्यों अधूरी सी

लगती है ज़िन्दगी मुझे..

जैसे खुद को किसी के

पास भूल आया हूँ मैं…

☆☆

Do not know why the life

seems incomplete to me

As if I have forgotten

myself with someone…

☆☆☆☆☆

तुमसे तो अच्छे हमारे दुश्मन हैं

जो बात बात में कहते हैं कि

तुम्हें छोड़ेंगे नहीं…

☆☆

My enemies are better than you;

At least they threaten

not to leave me.

☆☆☆☆☆

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares