… आज अचानक सुमीची गाठ पडली. काॅलेज रोड वरून चालत निघालेली… सोबत तिचा कुंकवाचा टिळा नामक टिक्कोजी राव होता तिच्या संरक्षणाची ढाल बनून असल्यासारखा… दोन वर्षापूर्वी सुमी नि मी एकाच आर्टस काॅलेजातले, मराठी विषय एम. ए. च्या वर्गातले… हाताच्या बोटावर मोजता येणारी वर्गातली ती एकूणच पटसंख्या असलेला तो वर्ग त्यात आम्ही मुलं जेमतेम दोन तीन आणि मुलींचाच भरणा जास्त… अर्थात आम्हा मुलांना चाॅईस भरपूर होता… आमचे मुलांचे आप आपल्या परीने गनिमी काव्याने किल्ले लढवणे सुरू होतेच.. शेवटचे सत्र संपायच्या आत बात पक्की करने के आरमान काफ़ी बुलंद थे.. पण आमच्या तिघां पैकी एकच लकी बाॅय ठरला आणि आम्ही रडवैय्या भारतभूषण चे वारसदार झालो.. प्रियाराधन मनापासून करूनही सुमीने मला नाक मुरडले… आता दैवजात मिळालेली काटकुळी, गहूवर्णीय शरीरसंपदा नि बावळट चेहरा याने माझ्या भावी सुख स्वप्नांचा चुराडा केला होता… एकटी सुमीच काय पण तिच्या अवतीभवती असणाऱ्या साळकाया माळकाया, स्वतःला सो कॉल्ड रुप सुंदरीचं आभासी नि अहंकारी कवचाचे लेपन केलंल असल्याने त्यांनी देखील मला डावललं.. मलाही त्यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हताच म्हणा… पण सुमी नाहीच म्हणाली तर तिच्या नाकावर टिच्चून तीचीच मैत्रीण गटवली तर बरी हा सर्व सामान्य विचार मनात केला.. पण तिथेही माशी शिंकलीच… या अक्करमाशी माझ्याच नशीबाला होत्या… तर एकूणातच काय गळाला एकही मासोळी त्यावेळी लागली नाही ती नाहीच… पण मला फक्त सुमीचं त्यातल्या त्यात बरी वाटायची, आवडली होती.. एक कदम तुम भी चलो एक कदम हम भी चलो या बोधवचनाच्या आधारे मीच पुढाकार घेण्याचे ठरवले… तो दिवस मी या आयुष्यात कधीच विसरणार नाही… त्या काळ्यादिवशी सगळे निचीचे ग्रह, व्यतिपात, आणि अनिष्ट फल देणारा माझ्या भाग्यात न भुतो न भविष्यती आला असल्याने.. माझ्या पहिल्या प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नाला सुमीने अणूबाॅम्म लावून उध्वस्त करून टाकला.. मला चक्क ‘ एकदा आरशात स्वताचं थोबाड बघून ये ‘ असं ती म्हणाली.. ‘आणि पुन्हा जर मागे लागलास तर हेच तुझं थोबाड असं रंगवीन कि कायमची सुमीची आठवण राहील तुझ्या आयुष्यात.. ‘ माझा कोणी कडलोट करेल किंवा हत्तीच्या पायी देईल, फासावर लटकवेल, चालत्या वाहनाखाली,.. निदान बाजारात मिळाणारी जहरची बाटलीने वा या सगळ्या प्रयत्नांपैकी कशाची एकाने मदत केली असती तर बरं झालं असतं.. हा सुमीच्या जीवनातील काटा आपोआप दूर करायला हातभार लागला असता.. या विचारचक्रात माझा कालपव्यय मात्र झाला पण अमंलबजावणी झालीच नाही… सुमीला हत्येचं पाप लागलं नाही… सुमी पुण्यवान, नशीबवान असल्यामुळे लवकरच तिचं पाणीग्रहण कोणी गबाळग्रंथी आयुर्वेदाचार्यशी झालेलं मला उडत उडत समजले… अर्थात मला काही तिने लग्नाला येण्याचं निमंत्रणही हेतूपुरस्सर टाळले होतेच… पण अश्या बातम्या कुठे लपून राहतात.. माझ्या मित्रांची चांडाळचौकडीने तर या संधीचा फायदा साधून माझ्या घायाळ हृदयाची दुखरी जखम जास्त चिघळत ठेवायला आपल्या मैत्रीला जागले… दोस्त दोस्त न रहे प्यार, प्यार न रहा… सुमीच्या त्या साळकाया माळकाया मैत्रीणी पण हुळहुळणाऱ्या जखमेवर मीठ चोळायचा आसुरी आनंदच घेत राहिल्या… आणि मी माझ्या दुभंगलेल्या मनाची नि टुटा फुटा दिल की तू नही तो और सही या समजूतीची मलमपट्टी करत राहीलो… आणि ती और सही च्या शोधात फिरत असताना अचानक सुमी नि तिचा नवरा माझ्या समोरच आलेले दिसले… माझी नि सुमीची नजरानजर झाली… तिचे ते पाण्याने तरारले बोलके डोळे… तीच्या मनातली मला अव्हेरून काय पदरात पडले, या पश्चातापाची अबोल भावना प्रकट करून दाखवत असलेले मला दिसले.. तिची ती केविलवाणी चर्या मला खुप काही सांगून गेली. माझ्या मनात आनंदाची लहर उमटून गेली… मला आरश्यात थोबाड पाहायला लावणारीने असा कोणता जगावेगळा झेंडा लावलाय हे त्या तिच्या सोबत असलेल्या ढेरपोट्या, बेढब आणि डोळ्यावर निळा चष्मा लावून सुमी सोबत निघालेला मला दिसत होता.. सुमीशी केलेलं लग्न हि त्याला लागलेली लाॅटरीच होती… मला त्याच्या भाग्याचा हेवा आणि सुमीच्या नशीबाची किव वाटली… काय पाहिलत त्याच्यात तिने कि जे माझ्याकडं नव्हतं… पण अनहोनी कौन टाल सकता है… चिडीया खेत चुग गई थी… मग मीच मोठं मन करून स्वताशीच गुणगुणत राहिलो.. खुश रहे तू सदा.. ये दुवा है मेरी… सुमीचा तो ढेरपोट्या गबाळग्रंथी नवरा सुमीच्या कानात काहीतरी बोलला.. मला ते ऐकू आलं नाही… पण त्याच्या एकूणच चर्चेवरून मी ताडलं कि.. ‘ तो समोरचा लफंगा बघ कसा प्रेमभंग झाल्यासारखा उध्वस्त झालेला दिसतोय आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या बायका मुलींकडे हसत हसत बघतोय… तो तुझ्याकडे ही तसंच बघतोय… जशी काही तू त्याची पहिली प्रेयसीच असावी.. बघ बघ त्याचं ते केविलवाणं हसणं बघ.. ‘
त्याचं तसलं बोलणं ऐकून सुमी चमकली… आणि नरमाईच्या सुरात… ‘ एकदा अपयश आलं म्हणून थांबत का कोणी!… लवकरच लग्न का करू नये. ?’.. असं मला ऐकू जाईल अश्या आवाजात जाता जाता बोलून गेली. समझनेवाले को इशारा काफ़ी है… सुमी पुढे निघून गेली… कुठूनशी यहूदी सिनेमातले गाण्याची लकेर…. ‘. दिलको तेरी हि तमन्ना… दिलको है तुझसेही प्यार…. ‘ माझ्या कानावर आली… आणि मी तसाच तिथे रेंगाळत राहिलो… सुमीच्या ढेरपोट्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले हासू नि सुमीच्या डोळ्यात लपलेले आसू माझ्या मनाला दंश करत राहीले.
☆ दंगल… — भाग – २ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆
(एक अखेरचा डाव)
(माझा शब्द पवित्र प्रेमाची कसोटी आहे… मी लग्न करणार नाही… तुझ्या आठवणीत हे जीवन एकटं काढायचं ठरवलं आहे…) इथून पुढे —-
आशाच हृदय पिवटळून निघालं, अश्रुधारा बाहेर आल्या….
नाही, नाही बल्लू…
माझ्यासाठी जीवाला वनवास करून घेऊ नको.
माझ्या राज्या… तुम्ही लग्न करा
माझी शपथ आहे तुम्हाला…
माझ्या संसारात मी खूप खूप सुखी आहे. आता तुम्हाला सुखी – संसारात पाहायचा आहे मी तुम्हाला वचनमुक्त करते. तुम्ही लग्न करा ! माझ्या राज्या, मी हात जोडते, तुम्ही लग्न करा, मी तुमची नाही झाले म्हणून तर काय झाले ? तुम्हाला असं झुरतं नाही पाहू शकणार…?
बळवंताने आशाला सावरले,
अगं, चूप रहा… माझं सोडं
तू कशी आहेस…? तू सुखात आहे. माझं सुख, तुझ्या सुखात दडलेलं आहे असं बोलून…
विषय संपवला, कारण जास्त बोलणे शक्य नव्हतं. मैत्रिणी आल्या आणि आशाला सोबत घेऊन गेल्या…. वर्षानंतर आशाची भेट झाली होती. आशाला पाहून बळवंताचा जीव सुखावला, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होतं. आशा संसारात सुखी आहे याचं समाधान होतं त्याला. “आशाने खरं प्रेम केलं पण भीतीपोटी आहुती दिली होती आणि पुन्हा आशा गर्दीत हरवून गेली. यात्रेत आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं. पण एका क्षणात आशा सुखी असल्याचा भ्रम तुटला. तिच्या मैत्रिणीकडून आशाची सत्यता कळली. आशा लग्नानंतर फक्त सहा महिन्यात विधवा झाली होती. तिचा नवरा शेतात पान लागून मेला आणि आशा कायमची वडीलाकडे आली. इतकं दुःख असूनही आशाने जाणवू दिलं नाही. सतत हसून उत्तर दिलं होतं. बल्लूवर दुःखाचा डोंगर कोसळला, डोळ्यात ओलावा दाटला. आशाच्या हसऱ्या चेहऱ्या मागे वेदना लपल्या होत्या”
बल्लूला समजलं आणी आशाला पुन्हा एकदा भेटण्याचा निर्णय केला. दुसऱ्या दिवशी निरोप पाठवून आशाला नागपूरला बोलाविलं. आशा खरंच आणि खरंच दिसायला सुंदर होती. लांब केस, टपोरे डोळे वेड लावत होते. पण तिच दुर्दैव फक्त सहा महिन्यात विधवा होऊन बापाच्या घरी आली. ” मराठा समाजात पुन्हा लग्न करण्याचा रिवाज नव्हता. म्हणून आशाचा पुनर्विवाह होणार नव्हता. दोघांचंही आयुष्य जाळ लागलेल्या ताव्यासारखं करपलं होतं. “
बळवंताने आशाला आपला निर्णय सांगितला. आशा मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता तुला दुःखात पाहू शकत नाही. आपण एकदा चूक केली आणि दूर झालो. आता तुला सन्मानाने घरी आणणार आहो. उद्याच तुझ्या घरी येऊन मागणी घालतो…. मग समोर काय होईल ते पाहू ?
प्र-स्फोटक निर्णय बळवंतने घेतला. दोघांचेही बाप हाडवैरी, विनाकारण रक्तपात नको म्हणून आशाने समजाविले.
“बल्लू,… मी आहे तशी जगेल पण तुम्ही घरी येऊ नका. मी हात जोडते. माझा निर्दयी बाप तुम्हाला गोळी घालायला मागे पाहणार नाही. ” माझ्या राज्या, मी हात जोडते. तुम्ही घरी येऊ नका. मी अशीच जगते, आनंदी आहे. तुम्ही लग्न करा, मी विधवा आहे. ” तुम्हाला छान मुलगी मिळते. तुम्ही माझ्या घरी येऊ नका. खूप तमाशा होईल. माझा निर्दयी बाप आणि दोन भाऊ तुमचा जीव घेतील राज्या. ” मी विनंती करते म्हणून हात जोडते, पाय धरते.. “
पण बळवंताने माघार घेतली नाही. दुसऱ्या दिवशी बळवंत आई – बापाच्या समोर बसला. मला लग्न करायचा आहे. मी पोरगी पण पाहून ठेवली. बाबा तयारी करा. ” आजच मुलीच्या घरापर्यंत जायचं आहे. माय – बाप आनंदाने उसळले. अरे चल, तुझ्या मनासारखं होईल. सांग कुठे जायचं ?
बळवंताने उत्तर टाळले, ” बाबा आधी तयारी करा, बैलबंडी काढा. ”
मारोती पहेलवानने नवा सदरा आणि फेटा चढवला. तीन माणसं आणखी सोबत घेऊन गाडी जुंपली आणि बंडी मौद्यात आली. ” कुणाकडे जायचं आहे सांग. तुझी पसंद, तीच माझी पसंद, कोणत्याही जाती धर्माची असेल तरी चालेल. ”
बळवंत हळूच बोलला,
बाबा, तुम्हाला सांगू कां ? मुलगी तयार आहे पण तिचे वडील लग्नाला तयार नाहीत. ”
मारोतीने बळवंत आला समजावत म्हटलं….
“अरे, तिच्या बापाचे पाय धरतो पण संबंध जोडूनच परत येऊ
आणी बंडी संताजी पाटलाच्या दारात थांबली.
ये, इथं कशाला थांबवली, चल पुढे घे गाडी. ” मारुती झटकून बोलला. बळवंताने बैल कचून धरले. बाबा, आपल्याला संताजी पाटलाच्या घरी जायचं आहे. “
मारोती उसळला काय ?
संताजी पाटलाच्या घरी जायचं आहे. ” मारोतीचा चेहरा लालबुंद झाला. ” इथली मुलगी मागणार आहे. ” अरे, संताजी माझा हाड – वैरी – दुश्मन आहे. माझा खून खराबा होईल. तुला माहित आहे ना. “
“इथे संबंध होणे नाही. चल, बंडी परत फिरव. मी त्याच्या घरात पाय टाकणार नाही. चल, बैल फिरव. ”
बळवंताने बापाचे पाय धरले. ” माझ्यासाठी वैर विसरा, पण मला आशा सोबत लग्न करायचा आहे. नाहीतर मी जिवंत राहणार नाही. ” म्हणून गडगडला.
मारोती नरमला,…
ठीक आहे. पण असा जीव देण्याचं बोलू नको. ” इच्छा नसतांना मारोती तयार झाला. दारावर थाप दिली. नोकराने दार उघडलं. मारोतीने नम्र आवाजात विचारलं…..
संताजी पाटील घरी आहेत कां ? ”
होय आहे, पाटील घरीच आहेत. पूजा करत आहे. या… बसा, बैठकीत ! म्हणत हात जोडले.
मारोतीने नोकराला बोलाविले,
जा आणी संताजी पाटलाला निरोप दे, मारोती गुजर आला म्हणून सांग त्यासनी,…
हो, हो, सांगतो म्हणून नोकर आत गेला…. बैठकीत खुर्च्या लावून होत्या आणि समोरच्या भिंतीवर फोटो टांगला होता.
स्व. पृथ्वीराज संताजी पाटील.
मृत्यू – दिनांक – 10 / 10 / 1965. असं लिहिलं होतं
मारोतीची आठवण ताजी झाली. संताच्या हातून पोरांचा खून होतानी पाहिलं होतं. संताजीचा संताप भारी आहे, सहन करावा लागेल म्हणून संयमाने घ्यायचं ठरवलं होतं. आणि थोड्याच वेळात संताजी आतून गरजला.
“वाड्यातील शांतता भंग झाली. ” आवाज दुमदुमला.
कोण, मारोती ? वैरी माझ्या घरी आला. रागाने फणफणत भिंतीची बंदूक ओढली, वाड्यात खळबळ माजली. संताजीचे पोरं, लखन, प्रताप, आशा, नोकर घाबरून कोपऱ्यात दडले. संताजीच्या बायकोने हातचे काम फेकून देवघरात आली. हाहाकार उडाला….. नेमकं काय झालं काहीच कळत नव्हतं. लखन आणि प्रतापने संताजीची बंदूक हीसकावली….
आबासाहेब, भानावर या…. काय झाले ? कशासाठी ही बंदूक ठासली ? थकलेल्या शरीरात हत्तीचं बळ आलं होतं. चेहरा रागाने फणफणत होता. प्रतापने संताजीला विचारले,
काय झालं,? आबासाहेब.. !
आशाने पाणी दिलं तसंच ग्लास भिंतीला फेकून मारला. आबासाहेब उसळले,
” काय झालं ?
” अरे, माझ्या वैरी मारोती गुजर आपल्या वाड्यात आला, जा, कापा त्याला…
मारोती, नाव ऐकून प्रताप, लखनची जळफळाट झाली, आग मस्तकात गेली. बंदूक घेऊनच माज घरातून बैठकीकडे धावले. आशाला कळून चुकलं होतं. बळवंत घरी आला… आता रक्त सांडणार… म्हणून तिथेच चक्कर येऊन पडली. आईने आशाला सांभाळलं. संताजी, प्रताप, लखन बैठकीकडे धावले. आता बंदूक संताजी कडे होती. आवाजाने बैठकीत खलबल माजली. बळवंता, मारोती आणि सहकारी खळबळून उभे झाले. संताजीने बंदूक ताणली. मारोती पुढे झाला……
“पाटील, तुम्ही खुशाल गोळी चालवा… पण त्याआधी माझं ऐकून घ्या म्हणून हात जोडले”
संताजीचे ओठ थरथरत होते. शत्रु मारोती, घराच्या बैठकीत उभा होता. ज्याच्यामुळे मोठ्या पोराचा खून झाला होता. तो वैरी घरात आला होता. प्रताप, लखन दोघेही भाऊ बदला घ्यायला टपून होते.
मारोतीने पुन्हा हात जोडले.
“आबासाहेब ! झालं ते वैर विसरा… मी काय म्हणतो ? ते एकदा ऐकून घ्या. नंतर खुशाल छाताडात गोळी झाडा. ” सोबतच्या सहकाऱ्यांनी हातपाय जोडून संताजीला शांत केलं. काही वेळेसाठी सर्व शांत झालं. इकडे आशा शुद्धीवर आली आणि आई सोबत बाहेर आली.
कपाळावर आड्या पडलेला संताजी डकारला…
” मारोत्या, बोल…. कशासाठी आला तू ? ”
वाड्यावर एकानं सूचना केली..
आबासाहेब ! एकदा शांततेनं बसा, नंतर बोलु…
संताजी फणफणत खुर्चीवर बसला.. प्रतापने बंदूक घेतली आणि आशाच्या हातात दिली. संताजी पुढे मारोती गुडघ्यावर टेकला आणि हात जोडले….
आबासाहेब, मी तुमचे पाय धरतो, माझं शांत चित्ताने ऐकून घ्या. हा माझा एकुलता एक मुलगा बळवंता, कपडा मिल मध्ये नोकरीला आहे….
” अबे, तू पुढे बोल… माझ्या घरी कां आला ते सांग ? ”
बळवंता पण हात जोडून संताजी पुढे बसला. मारोत्याने डोक्यातली पगडी संताजीच्या पायावर ठेवली…
आबासाहेब, लहान तोंडी – मोठा घास, घेतो पण तुम्ही नाही म्हणू नका. मी हात जोडतो. आशाचा हात बळवंतासाठी मागायला आलो. संताजीने मारोतीच्या पगडीला लाथ मारून फेकली आली उभा झाला. ‘ ये, मारोत्या भानावर आहेस कां ? आशाच लग्न झालं ती विधवा आहे. विसरला काय ? या घराण्यात विधवेच लग्न पुन्हा करण्याची रीत नाही. समजलं आणि ऐकून घे, ” आशा घरात सोडून मरेल पण तुझ्या दारात देणार नाही. ” माझ्या पृथ्वीराज तुझ्यामुळे मेला, जिवंत असेपर्यंत मी विसरणार नाही. उचल पगडी आणि चालता हो…. नाहीतर इथेच बाप-लेकाचे मुर्दे पाडील. ”
बळवंताने संताजीचे पाय धरले. बाबासाहेब राग सोडा, आशा मला द्या ! मी तिला सुखात ठेवील. नाही म्हणू नका पाटील आणि घट्ट पाय धरले तसेच आशाची धिटाई वाढली. तिने पगडी मारोतीच्या डोक्यावर ठेवली. आबासाहेब, ” मी हात जोडते आबा….. मला नव्याने संसार थाटू द्या ! मी तुम्हाला भीक मांगते, नाहीतर मी जीवाचं बरं – वाईट करून मुक्त होते. म्हणून रडत – भुकत घरात गेली. ” पोरीची भावना पाहून दगड पाझरला आणि बळवंतला उभं केलं. पोरीची इच्छा असेल तर विचार करू आम्ही, आम्हाला वेळ द्या ! उद्या नकार – होकाराचा निरोप पाठवतो. म्हणून बैठक सोडून गेला. संताजी आत गेला. ” आशाला नव्याने संसार करू द्या म्हणून आशाच्या मायने संताजीला समजावलं. संताजी तयार झाला पण एक अट घातली
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बाळसेदार पुणे..
रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सांवरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे कडे वळायचा. खिडकी वजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे.
आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो, तर काय! आनंदाने आणि सुगंधान वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दोहो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या सुवासिक, मोहक बकुळ फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायचीचं. अग बाई! नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बाल मनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो! देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय.? आई बेल बागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होत. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्यानें येताना ही नावांची गंमत सांगून आई आम्हांला हंसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर ( माझेवडील )आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूल वरून श्री जोगेश्वरी कडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालतांना आम्ही मुळीचं दमत नव्हतो बरं का!गुरुवारी प्रसादा साठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना सितळा देवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हांहूनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत, छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबित गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची ‘भाचरं ‘सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? हा प्रश्न आम्हाला पडायचा. अगदी नवलच होतं बाई ते एक ! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात, बाळांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दही भाताच्या, सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय! पाराच्या शेजारी वि. वि. बोकील प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हां पुन्हां नवलाईने विचारत होतो”, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहीतांना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. कारण पेपर लिहितानाअक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहीणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे. आमची भाचे कंपनी, मोठी होत होती. विश्रामबाग वाड्या जवळच्या सेवा सदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायच माझं बाळ अगदी अस्स अस्सच बाळसेदार व्हायला हवं ग बाई, ‘ मग काय मोहिमेवर निघाल्या सारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळ गोंडस, गोपाळकृष्णचं दिसायची. आणि मग काय!सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं. बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.
कविराज भूषण यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि शिवरायांविषयी असलेल्या अतीव आदराने रचलेल्या काव्याचे शिवराय आणि त्यांच्या समस्त दरबारी मंडळींना खूपच कौतुक होते. छत्रपतींनी या अभूतपूर्व काव्यरचना निव्वळ ऐकल्याच नाही तर या राजकवीचा वेळोवेळी उचित बिदागी सहित मानमरातब केला. बघू या त्यातीलच कांही निवडक काव्य रचना
शिवरायांच्या युद्धांचे सजीव चित्रण:
गनीमाशी शिवरायांच्या सेनेने केलेल्या घनघोर युद्धाचे सजीव वर्णन करतांना भूषण यांच्या लेखणीचे जणू टोकदार भाले होतात. शब्दांकन असे आहे जणू तोफेचे गोळे आग ओकताहेत. हे वीररसपूर्ण, जोमदार काव्य वाचतांना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. युद्धाच्या उत्साहाने मुसमुसलेल्या सैन्याचे कूच, रणांगणात रणभेरीचा शंखनाद, शस्त्रांची चकमक, शूरवीरांचे मर्दानी शौर्य आणि भ्याडांची भयावह अवस्था इत्यादी दृश्यांचे चित्रण कवीने अतिशय प्रभावीपणे केले आहे. खालील काव्यांशात शिवाजी राजांच्या चतुरंगिणी सेनेच्या प्रस्थानाचे अत्यंत मनोहर चित्रण आहे. कविराज म्हणतात:
साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीतन चलत है,
भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं|
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत है,
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि, थारा पर पारा पारावार यों हलत है॥
अर्थ: ‘सर्जा’ या उपाधीने सुशोभित झालेले अत्यंत श्रेष्ठ आणि वीरवर शिवाजी राजे आपली चतुरंगिणी सेना (हत्ती, रथ, घोडदळ आणि पायदळ हे सैन्याचे चार विभाग असलेली सेना) सज्ज करून आणि शरीराच्या प्रत्येक अंगात उत्साह निर्माण करून युद्ध जिंकण्याची ईर्षा बाळगून होते. त्यावेळी ढोल-ताशे आणि नगारे गर्जत होते. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मदमस्त हत्ती होते आणि युद्धासाठी उत्तेजित झाल्यामुळे हत्तींच्या कर्णरंध्रातून अत्यधिक मद नदी-नाल्यांप्रमाणे वाहत होता.जगाच्या कानाकोपऱ्यात दहशत पसरली होती, कारण शिवाजीचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते. हत्तींच्या धक्क्याने डोंगरही उन्मळून पडत होते. प्रचंड सैन्याच्या हालचालीमुळे बरीच धूळ उडत होती. अति धूळ उडल्यामुळे आकाशात चमकणारा सूर्य ताऱ्यासारखा दिसत होता आणि समुद्र ताटात ठेवलेल्या पाऱ्यासारखा थरथरत होता.
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अन भूषण यांची काव्यप्रतिभा:
आता वळू या कविराज भूषण यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अशा काव्य रचनेकडे! दिनांक ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या एकमेवाद्वितीय राजसी सोहळ्याचे साद्यन्त आणि बारीक सारीक तपशिलांसह वर्णन अनेकानेक तऱ्हेने करण्यात आले आहे. या लेखाच्या विषयाला अनुषंगून आपण बघू या की कवी भूषण सिंहासनाधीश शिवरायांचे कसे ओजस्वी वर्णन करतात. हे हुबेहूब वर्णन वाचतांना कवीची सौंदर्यदृष्टी, उत्तुंग साहित्यिक आणि बौद्धिक भरारी बघून केवळ त्यांच्या काव्यप्रतिभेला त्रिवार मुजरा करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हां सिंहासनावर आरूढ झाले, त्या प्रसंगी त्यांची स्तुती करताना कविराज भूषण यांनी पुढील छंदकाव्य राजदरबारात सादर केले होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वीररसाने भारलेले, उत्कट आणि मार्मिक वर्णन केवळ थोर कवी भूषण यांच्यासारखे त्यांचे मनस्वी प्रशंसकच करू शकत होते. एकापेक्षा वरचढ एक अशा सुंदर उपमालंकारांनी सजलेल्या आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित प्राचीन संदर्भ देत, कवी रसमय वर्णन करतात की छत्रपती म्लेंच्छांवर कसे भारी पडले!
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर सेर सिवराज है ||
अर्थ: ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर रघुकुल राजा (श्रीराम), मेघांवर पवन, रतीचा पती म्हणजे कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहू (कार्तवीर्य) वर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, वृक्षांच्या खोडांवर दावानल, हरिणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर मृगराज (सिंह), तिमिरावर प्रकाशकिरण आणि कंसावर कृष्ण भारी पडतात आणि त्यांच्यावर आरूढ होतात, तसेच म्लेच्छ वंशावर शिवाजी व्याघ्रासमान भारी पडतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करतात.
छंदबद्ध आणि अलंकारिक काव्य
रसाळ परिपोषक असे अर्थपूर्ण छंदबद्ध काव्य रचतांना ते बहारदार तर होतेच, पण अतिरम्य गेय असे काव्य निर्माण झालेले दिसून येते. त्यांच्या काव्यात दोहा, कवित्त, सवैया, छप्पय इत्यादी तत्कालीन छंदांचा प्रामुख्याने उपयोग केल्या गेला आहे. रीतिकालीन कवींचे प्रमुख बलस्थान म्हणजे अलंकारिक भाषा! भूषण यांची काव्यसुंदरी एका पेक्षा एक आकर्षक अलंकारांनी सजलेली आहे. ते अपरिमित सौंदर्य बघतांना रसिक मुग्ध होतात. त्यांच्या काव्यात सर्वच अलंकारांची रेलचेल आहे. अर्थालंकारांपेक्षा शब्दालंकारांना प्राधान्य आहे. त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे यमक अलंकारांनी नटलेले हे एक उदाहरण बघा!
ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।
कंद मूल भोग करैं कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वै तीन बेर खाती हैं।
भूषन सिथिल अंग भूषन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती हैं।
(१) ऊंचे घोर मंदर – उंच विशाल महाल/उंच विशाल पर्वत
(२) कंद मूल – राजघराण्यात खाल्ले जाणारे चविष्ट कंद-मूळ / जंगलातील कंद मुळे
(३) तीन बेर खातीं – तीन वेळा खात होत्या/ तीन बोरे खातात
(४) बिजन – पंखे/ एकाकी
(५) नगन – नग – हिरे मोती इत्यादी रत्ने/ नग्न
कवीराज भूषण म्हणतात: “ज्या शत्रूंच्या स्त्रिया ज्या पूर्वी उंच-उंच-विशाल राजमंदिरांत राहत होत्या त्या आता शिवरायांच्या भीतीमुळे आणि आपला जीव वाचवण्यासाठी भयंकर पर्वतांच्या गुहेत लपून राहतात. ज्या महालातील स्वादिष्ट पदार्थ खात होत्या, त्या आता जंगलात भटकत जंगली कंद, मुळे आणि फळे खाऊन जगतात. जडजवाहिराने जड झालेल्या दागिन्यांच्या वजनामुळे ज्यांचे अंगप्रत्यंग शिथिल असायचे, त्यांचेच अंगांग आता भुकेने कासावीस होत आलेल्या अशक्तपणामुळे शिथिल झाले आहे. ज्या राजस्त्रियांवर शीतल पंखे डुलत असत, त्या आता निर्जन जंगलात एकट्या फिरतात. भूषण म्हणतात, एकेकाळी ज्या मुघल स्त्रिया अभिमानाने हिरे मोती अन विविध रत्न यांनी जडवलेले दागिने घालून मिरवीत असत, त्या आता वस्त्रहीन अवस्थेत हिवाळ्याच्या भीषण शीतकालात थर थर कापत असतात.
स्वाभिमानी महाकवि भूषण
शिवरायांच्या दरबारी रुजू असलेले महाकवि भूषण अत्यंत स्वाभिमानी होते. त्याचेच एक उदाहरण! एकदा दुसऱ्या राज्याचा एक राजा शिवरायांच्या दरबारी आला. कवींचे शिवराय आख्यान ऐकून तो खूपच प्रभावित झाला. तो भूषणला आग्रह करीत म्हणाला, ‘तुम्ही माझ्या दरबारात येऊन माझ्यावर प्रशंसात्मक काव्य करा.” कांही दिवसांनी भूषण त्या राजाच्या दरबारी गेले आणि त्या राजाच्या प्रशंसात्मक काव्यग्रंथातील कांही अंश त्यांनी वाचून दाखवले. सर्वांनी त्यांची स्तुती केली. तेव्हां तो अहंकारी राजा म्हणाला,”या तीन लाख सुवर्ण मुद्रा घ्या, इतके अधिक मानधन देणारा राजा या देशात तुम्हाला कुठेही भेटणार नाही.” भूषण त्याच्या अहंकाराने व्यथित होऊन गप्पच होते. राजा त्यांना म्हणाला, “याहून अधिक सुवर्णमुद्रा हव्या असतील तर तसे सांगा, मी देईन.” कविराजांनी ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली राजाला परत केली आणि त्या गर्विष्ठ राजाला म्हणाले, “तुम्ही माझ्या काव्याची कदर केली नाही. तुम्हाला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे होते. तुम्ही माझा आणि माझ्या कवितेचा घोर अपमान केला आहे.” राजाला तेव्हां आपली चूक कळली व त्यांने कवींची क्षमा मागितली अन आपल्या दरबारी रुजू होण्याची विनंती केली. पण स्वाभिमानी कवी भूषण तडक त्या राजाच्या दरबारातून थेट शिवछत्रपतींच्या दरबारी परतले!
भूषण यांच्या अद्वितीय कवितेमध्ये राष्ट्रीय चेतना ओसंडून वाहत असते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय भावनेने भारलेले कवी आहेत.महाकवी भूषण यांचे हिंदी साहित्यात अनोखे स्थान आहे. रत्नांचा खच पडलेला असतांनाही जसा कोहिनूर आपल्या लखलखणाऱ्या तेजाने उठून दिसतो, तद्वतच रीतिकालात शृंगार आणि हास्यरसाची प्रचुर साहित्य निर्मिती करणाऱ्या कवींच्या गराड्यात कविराज भूषण आपल्या आगळ्यावेगळ्या वीररसाने ओतप्रोत कवितेमुळे अजरामर झालेले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखनातून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचे धडे शिकवले आणि हिंदू संस्कृतीच्या ऐश्वर्याची नव्याने ओळख पटवून दिली. त्यांचे काव्य निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहे आणि तो जपून ठेवणे आपले परम कर्तव्य आहे.
☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन☆
रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ?
जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीड मध्ये इंटरनेटचा वापर होतो. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला ५-६ डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात. तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.
मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास सगळेच जण वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून, यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे.
रात्री वायफाय बंद का केला पाहिजे?
१) जर घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटर मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं.
२) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे धोकादायक आहेत आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.
४) वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.
४) २०१५ च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो हानिकारक आहे.
५) रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.
६) रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.
७) रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.
अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.
माहिती संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण.
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वन बेडरुम फ्लॅट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
माझ्या वडिलांचे स्वप्न होते, की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरिकेत आलो, तेव्हा हे स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते.
आता शेवटी, मला जिथे हवे तिथे मी पोहोचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहून बक्कळ पैसा कमवेन, जेणेकरुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन.
माझे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट अन तुटपुंजी पेन्शन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खूप आठवण यायची. एकटं वाटू लागायचं. स्वस्तातलं एक फोन कार्ड वापरून मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना कॉल करत होतो. दिवस वार्यासारखे उडत होते. दोन वर्षं पिझ्झा- बर्गर खाण्यात गेली. अजून दोन वर्षं परकीय चलनाचे दर पाहण्यात गेली. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.
लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले, मला फक्त दहा दिवसांची सुट्टी मिळेल. त्या दहा दिवसातच सर्व काही झालं पाहिजे. स्वस्तातलं तिकीट पाहून मी दहा दिवसांची सुट्टी घेतली. मी खूश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्या भेटवस्तू घ्यायच्या होत्या, त्याही राहून गेल्या.
घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले. वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडील समजूतदार होते. दोन दिवसांत माझे लग्न लागले. खूप सारे मित्र येतील, असं वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील, इतकेच मित्र लग्नाला आले.
लग्नानंतर काही पैसे आईबाबांच्या हातावर टेकवले. “आम्हाला तुझे पैसे नकोत रे पोरा. पण वरचेवर भेटायला येत जा, ” असं बाबांनी सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते. चेहर्यावरच्या सुरकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करून देत होत्या. शेजार्यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहोचलो.
पहिली दोन वर्षं बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नॅशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होतं. बचत कमी होऊ लागली, पण ती खूश होती. हळूहळू तिला एकाकी वाटू लागलं. कधीकधी ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षांनी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना कॉल करायचो, तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते.
दरवर्षी मी सहकुटुंब भारतात जायचे ठरवायचो. पण पैशाचं गणित काही जुळायचं नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागून वर्षं सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते.
एक दिवस अचानक ऑफीसमध्ये असताना भारतातून कॅाल आला, “मोहन, बाबा सकाळीच गेले रे”. खूप प्रयत्न केला, पण सुट्टी काही मिळाली नाही, अग्नीला तर सोडाच, पण नंतरच्या विधींनापण जायला जमलं नाही. मन उद्विग्न झालं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटीतील लोकांनी विधी केले. नातवंडांचे तोंड न पाहताच आई-वडील ह्या जगातून निघून गेले होते.
आई- बाबा जाऊन दोन वर्षं सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली. आईबाबांची शेवटची इच्छा, इच्छाच राहिलेली.
मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्थिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो, पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घरही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांनापण घेऊन आलो.
मुले मोठी झाली. मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केलं. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो.
मी ठरविले, आता पुरे झाले. गाशा गुंडाळून भारतात आलो. चांगल्या सोसायटीत ‘दोन बेडरुमचा’ फ्लॅट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला.
आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या ‘दोन बेडरुमच्या’ फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेलं आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायचं ठरवलेलं, तिने इथेच जीव सोडला.
कधीकधी मला वाटते, हा सर्व खटाटोप केला, तो कशासाठी? याचे मोल ते काय?
माझे वडील भारतात राहत होते, तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडील गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली.
खिडकीतून बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते. त्या सुंदर आठवणी मनात फेर धरू लागतात.
अधूनमधून मुलांचा अमेरिकेतून फोन येतो. ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात. अजूनही त्यांना माझी आठवण येते, यातच समाधान आहे.
आता जेव्हा माझा मृत्यु होईल, तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांचं भलं करो.
पुन्हा प्रश्न कायम आहे – हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून?
मी अजूनही उत्तर शोधतोय.
फक्त एका बेडरुम साठी?
जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”
दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ “विदूषक: समकालीन व्यंग्य विशेषांक“।)
‘विदूषक‘ पत्रिका के समकालीन व्यंग्य विशेषांक का अतिथि संपादन करने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ। संवेदना की दशा तलाशती, हास्य-व्यंग्य की यह त्रैमासिक पत्रिका जमशेदपुर से प्रकाशित होती थी। इसके संपादक, अरविंद विद्रोही, जिन्होंने मुझे यह दायित्व सौंपा, का आभार मैं आजीवन मानूंगा। उनके जैसा जीवट वाला व्यक्ति मैंने नहीं देखा।
यह बात वर्ष 1998 की है। तब हास्य-व्यंग्य पत्रिकाओं में, मुंबई से ‘रंग’, जयपुर से ‘नई गुदगुदी’ और हिसार से ‘व्यंग्य विविधा’ प्रकाशित हो रही थीं। अधिकतर व्यावसायिक पत्र-पत्रिकाएं व्यंग्य रचनाएं नियमित रूप से प्रकाशित कर रही थीं। अनेक साहित्यिक पत्रिकाओं ने भी व्यंग्यकारों के लिए अपने द्वार खोल दिए थे। कुछ वर्ष पूर्व, अंबिकापुर से प्रकाशित होने वाली पत्रिका ‘साम्य’ ने परसाई पर, और इलाहाबाद से प्रकाशित ‘कथ्यरूप’ ने व्यंग्य पर केंद्रित विशेषांक प्रकाशित किए थे।
हिंदी गद्य में हास्य-व्यंग्य लेखन की शुरुआत भारतेंदु हरीशचंद्र के काल में हुई। तब प्रताप नारायण मिश्र, बालकृष्ण भट्ट और बालमुकुंद गुप्त ने हास्य-व्यंग्य लिखा। ‘अंधेर नगरी’ और ‘शिवशंभू के चिट्ठे’ अंग्रेज़ों के खिलाफ़ लिखे गए साहसी व्यंग्य के नमूने हैं। उसके बाद जगन्नाथ चतुर्वेदी, अन्नपूर्णानंद, विश्वंभरनाथ शर्मा ‘कौशिक’, राधाकृष्ण, गुलाबराय, जी पी श्रीवास्तव, श्रीनारायण चतुर्वेदी और विधान बनारसी ने हास्य-व्यंग्य लिखा।
स्वतंत्रता प्राप्ति के पश्चात, हरिशंकर परसाई, शरद जोशी, श्रीलाल शुक्ल और रवींद्रनाथ त्यागी ने इसे ठोस आधार प्रदान कर प्रतिष्ठित किया। के पी सक्सेना, केशवचंद्र वर्मा, बरसाने लाल चतुर्वेदी, मुद्राराक्षस, मनोहरश्याम जोशी, लतीफ घोंघी, शंकर पुणतांबेकर, कुंदन सिंह परिहार, नरेंद्र कोहली, प्रदीप पंत, सुदर्शन मजीठिया, कृष्ण चराटे, सूर्यबाला, हरीश नवल, प्रेम जनमेजय, सुरेश कांत और ज्ञान चतुर्वेदी ने इस परंपरा को आगे बढ़ाया।
उस समय सक्रिय, ज़्यादा से ज़्यादा व्यंग्यकारों को ‘विदूषक’ के समकालीन व्यंग्य विशेषांक में स्थान मिले, यह मेरा विनम्र प्रयास था। बहुत उमंग और उत्साह से मिशन की शुरुआत की। लेकिन यह क्या? पहले चार मूल्यवान विकेट बिना कोई रन बनाए ही चले गए। उनसे प्राप्त पत्र आपकी सेवा में प्रस्तुत हैं जिन्हें पढ़कर अतिथि संपादक के प्रति आपके मन में करुणा अवश्य जागेगी:
☆☆☆☆
(एक)
लखनऊ, 6/3/98
प्रिय बिष्ट जी,
आपका पत्र मिला। मैं काफी अरसे से कुछ लिख नहीं पा रहा हूं। पत्र-पत्रिकाओं में मेरी अनुपस्थिति आपने खुद लक्षित की होगी। अतः चाहकर भी विदूषक के लिए कुछ भेज नहीं पा रहा हूं। क्षमा करेंगे।
समकालीन व्यंग्य विशेषांक के लिए शुभकामनाएं,
आपका
श्रीलाल शुक्ल
☆☆☆☆
(दो)
देहरादून, 7/2/98
प्रिय भाई,
आपका 30/1 का पत्र मिला। (आपके आग्रह के अनुसार) मैं नए व्यंग्यकारों पर कुछ नहीं लिख सकता। सबका पूरा कृतित्व मैंने नहीं पढ़ा है। ज्ञान चतुर्वेदी शायद सर्वश्रेष्ठ है। मैं गृहयुद्ध में नहीं पढ़ना चाहता। इधर तीन उपन्यास पढ़े जो अच्छे लगे।
सदा आपका
रवीन्द्रनाथ त्यागी
☆☆☆☆
(तीन)
जलगांव, 6/3/98
प्रिय भाई साहब,
सस्नेह अभिवादन। आपका पत्र मिला। मैं ‘विदूषक’ के लिए नहीं लिख सकता। मैने पत्रिका के आरंभ होने के पूर्व ही लिखा था कि नाम ‘विदूषक’ ही रखना चाहें तो मेरा नाम सलाहकारों में न जाए। मैंने तीन बढ़िया नाम भी सुझाए थे लेकिन मसखरा नाम ही उन्होंने कायम रखा।
स्वस्थ-सानंद होंगे।
आपका सस्नेह
शंकर पुणतांबेकर
☆☆☆☆
(चार)
मथुरा, 24/3/98
प्रिय बिष्ट जी,
नमस्कार। मैं मथुरा आ गया हूं इसलिए आपका (दिल्ली के पते पर भेजा गया) पत्र समय पर नहीं मिला। विदूषक का समकालीन व्यंग्य विशेषांक अवश्य भेजने की कृपा करें। अब तो वो निकल भी गया होगा।
आशा है, सपरिवार प्रसन्नचित होंगे।
आपका
बरसाने लाल चतुर्वेदी
☆☆☆☆
ये पत्र तो फटाफट आ गए लेकिन काफी समय बीत जाने पर भी कोई रचना नहीं आई। चिंता का विषय था। फिर लगा कि शायद व्यंग्यकार अपनी श्रेष्ठतम रचना के सृजन में डूबे हुए हैं। वो भी अंततः आने लगीं। सबसे पहले जो तीन रचनाएं प्राप्त हुईं, वो थीं:
प्रदीप पंत की ‘भैयाजी का दहेज’, कुंदन सिंह परिहार की ‘प्रोफेसर वृहस्पति और एक अदना क्लर्क’, और सुरेश कांत की ‘वोट कैचर’।
मैं तब अमलाई (शहडोल) में पोस्टेड था। तुरंत उन्हें देखकर, जमशेदपुर रवाना किया। तब सॉफ्ट कॉपी का ज़माना नहीं था, लेखक रचना की टंकित या हस्तलिखित प्रति भेजता था। अलबत्ता, डेस्कटॉप कंपोजिंग और पब्लिशिंग का आरंभ हो चुका था।
यहां से सिलसिला शुरू हो गया। रचनाओं का प्रवाह धीमे-धीमे बढ़ने लगा। अगले क्रम में प्राप्त रचनाओं के शीर्षक और व्यंग्यकारों के नाम इस प्रकार हैं:
गिरिराज शरण अग्रवाल: अर्थों का दिवंगत होना
सुबोध कुमार श्रीवास्तव: ताबीज में लटका अंगूठी में जड़ा भविष्य
लतीफ घोंघी: दुखी मत होना चुनाव होते रहेंगे
सुदर्शन मजीठिया: डॉक्टर लंबाशंकर
हरीश नवल: किस्सा-ए-डूपलैस
कृष्ण चराटे: अरे क्या यार पापा
मोहनजी श्रीवास्तव: राष्ट्रकवि के अभाव में
मोहनजी श्रीवास्तव बहुत कम लोगों से मिलते थे। गुमनाम-सा जीवन जी रहे थे। एक रविवार हम अमलाई से तीस किलोमीटर दूर, शहडोल में उनके आवास पर गए और उनसे पूरी विनम्रता और दृढ़ता से आग्रह किया कि वे इस अंक के लिए अपना योगदान अवश्य दें। उन्होंने समय मांगा और वादा किया कि दस दिन के अंदर रचना आप तक पहुंच जाएगी। आज उनकी यह रचना हमारे लिए धरोहर है।
इसके बाद, एक-एक कर बहुमूल्य रचनाएँ हमें मिलती गईं। ज्ञान चतुर्वेदी ने राजकमल प्रकाशन, नई दिल्ली से शीघ्र प्रकाश्य उनके उपन्यास ‘बारामासी’ का एक अंश भेजा। फिर दो प्रिय मित्रों की रचनाएं आईं, जवाहर चौधरी की ‘ओहदेदार कला मर्मज्ञ उर्फ़ राजा को जुकाम’ और पूरन सरमा की ‘पत्रकारिता में मेरा योगदान’। डॉ सरोजिनी प्रीतम ने भेजी अपनी रचना ‘भार का बोझ’। हम कृतज्ञ हुए और कृतज्ञता के वजन तले दब गए।
तत्पश्चात् प्राप्त हुई कुछ वरिष्ठ व्यंग्यकारों से रचनाएं जिनका हमने आदरपूर्वक स्वागत किया:
विनोद कुमार शुक्ल: व्यंग्यकार दल का चुनाव घोषणा पत्र
गौरी शंकर दुबे: पर्यावरण सप्ताह
डॉ सी भास्कर राव: अंगों में अंगूठा
हरि जोशी: चुनाव और कर्मचारी का हावभाव
ईश्वर शर्मा: जनरल प्रमोशन
दामोदर दत्त दीक्षित: फार्मूला मेम साहब
अश्विनी कुमार दुबे: भैयाजी की डायरी के चार पृष्ठ
जब्बार ढांकवाला: अफसरियत का अकाल
डॉ गंगाप्रसाद बरसैंया: मोदिनी मर्दिनी मदिरे
गिरीश पंकज: यह देश है वीर जवानों का
रामावतार सिंह सिसौदिया: नीचता – नए सुपर पैक में
डॉ भगीरथ बडोले: महात्मा की आत्मा
अब रचनाओं की आवक गति पकड़ती जा रही थी। मैं भी उसी तत्परता से उन्हें देखकर जमशेदपुर रवाना करता जा रहा था। डॉ स्नेहलता पाठक ने अपनी रचना भेजी जिसका शीर्षक था ‘जनता के नाम मंत्रीजी का बधाई पत्र’, डॉ श्रीराम ठाकुर दादा की रचना मिली ‘शादी कल की और आज की’, और सूर्यकांत नगर की रचना ‘जिसके हाथ लोई, उसके सब कोई’। इनके थोड़ा आगे-पीछे पहुंचे ये लिफाफे:
प्रभाशंकर उपाध्याय: अब प्रवचन परोस प्यारे
कस्तूरी दिनेश: लाश के आसपास रोदन कला
फारूक आफरीदी: ठेके पर चाहिए समीक्षक
बृजेश कानूनगो: कष्ट निवारण पथ
यशवंत कोठारी: समाचारों में आदमी की तलाश
सत्यपाल सिंह सुष्म: जब मैं मर जाऊंगा
सुष्म बहुत ही अच्छे इंसान थे। वे हमारे पारिवारिक मित्र बन गए थे। इस व्यंग्य में, उन्होंने कल्पना की है कि उनके मरने के बाद आयोजित श्रद्धांजलि सभा में व्यंग्यकार क्या-क्या कहेंगे। उन्होंने लिखा है कि जगत सिंह बिष्ट कुछ इस तरह कहेंगे, “मैं सुष्म से दिल्ली के पुस्तक मेले में मधुसूदन पाटिल के अमन प्रकाशन पर मिला था। मैंने उनकी एक-दो रचनाएं ही पढ़ी हैं। व्यंग्य में वे बिल्कुल मेरे कद्दावर ठहरते हैं। मैं सोचता था कि वे अपनी पुस्तक ‘बेवकूफी का कोर्स’ की प्रति मुझे देंगे। पर उन्होंने नहीं दी। इसलिए मैं भी चुप रहा। वे मेरे साथ मीठी-मीठी बातें खूब करते रहे। शायद ‘विदूषक’ के ‘समकालीन व्यंग्य विशेषांक’ में छपने के लिए। उन्हें कहीं से खबर लग चुकी थी कि मैं उसका अतिथि संपादक हूं।”ध्यान रहे, ये शब्द मेरे नहीं, सत्यपाल सिंह सुष्म की कल्पना की उड़ान हैं।
इस बीच कुछ और रचनाएं जो प्राप्त हुईं:
मदन गुप्ता सपाटू: मुझे न ले जाना विद्युत शवदाह गृह
रवींद्र पांडे: भौतिक परिवर्तन
आलोक शर्मा: छाप और आप
श्रवण कुमार उर्मलिया: दिमाग की दरार
ब्रह्मदेव: बात एक पार्क की
अमलाई के ‘पाठक मंच’ के प्रबुद्ध सदस्यों की रचनाएं भी इस अंक में आपको मिलेंगी:
राजेंद्र सिंह गहलोत: किस्सा साढ़े तीन यार
अनिल गर्दे: बफे(लो) सिस्टम
अभय कुमार: घर से श्मशान तक
महेंद्र कुमार वर्मा: बड़े बाबू
जमशेदपुर के नवोदित रचनाकारों की रचनाएं भी शामिल की गईं हैं:
प्रेमचंद मंधान ‘लफ्ज़’: कचरा और हीरा
निर्मल मिलिंद: बड़े दिलवाले
बृजमोहन राय देहाती: रावण की चिट्ठी
हमारी हार्दिक इच्छा थी कि व्यंग्यालोचन खंड में, हास्य-व्यंग्य के बदलते स्वरूप, सैद्धांतिक पक्ष की विस्तृत विवेचना, व्यंग्य की वर्तमान दशा और दिशा, व्यंग्यलोचन के उद्भव और विकास का संक्षिप्त इतिहास, महत्वपूर्ण व्यंग्यकारों से साक्षात्कार, पिछले दो-चार दशकों की उत्कृष्ट कृतियों की समीक्षा भी इस विशेषांक में सम्मिलित करें लेकिन चाहकर भी हम ऐसा नहीं कर सके।
फिर भी, इस अंक के प्रारंभ में, प्रेम जनमेजय का ‘आलोचना का व्यंग्य’ शीर्षक से गहन-गंभीर आलेख है। डॉ तेजपाल चौधरी का विद्वतापूर्ण आलेख ‘व्यंग्य: एक शिल्प सापेक्ष विधा’ भी इसमें शामिल है। विनोद साव की शंकर पुणतांबेकर से बातचीत ‘यदि परसाई व्यंग्यकार हैं तो व्यंग्य एक विद्या है’ और मेरी रवींद्रनाथ त्यागी से बातचीत भी इसमें संग्रहीत है। समीक्षा खंड में, डॉ मधुसूदन पाटिल की समीक्षा ‘अपने परिवेश की विसंगतियां खोजते व्यंग्य’ और मेरे द्वारा की गई समीक्षा ‘पलाश जैसे शोख और चटख हास्य-व्यंग्य’ शामिल हैं।
इस विशेषांक में आपको सुधीर ओखदे दो जगह दृष्टिगोचर होंगे। व्यंग्य रचनाओं के खंड में, अपनी रचना ‘सिगरेट और मध्यमवर्गीय’ के साथ, और अंत में, अपने विचारोत्तेजक आलेख ‘व्यंग्य: कुछ कड़वी सच्चाइयां’ के साथ। ऐसी रचनाओं को अंग्रेज़ी में कहते हैं ‘थॉट प्रोवोकिंग’ – विचार करने के लिए विवश कर देने वाली।
एक बार फिर मैं सभी व्यंग्यकारों और आलोचकों को हृदय की गहराइयों से पुनः आभार व्यक्त करना चाहूंगा जिन्होंने उस समय इस विशेषांक के लिए अपना बहुमूल्य योगदान दिया। हमारे जिन आदरणीय मित्रों का इस दौरान देहावसान हो गया, उन्हें हम विनम्र श्रद्धांजलि अर्पित करते हैं। जो मित्र आज भी व्यंग्य लेखन से जुड़े हुए हैं, उनके उत्तम स्वास्थ्य के लिए प्रार्थना करते हुए, यह कामना करते हैं कि उनकी लेखनी और प्रखर हो!
A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.
The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना घाव करे गंभीर ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 41 – घाव करे गंभीर ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’☆
(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)
कहानी एक छोटे से गाँव की है, जहाँ हम रामू से मिलते हैं, एक साधारण किसान जो सूरज की तपिश में काम करता है, उसके सपने उसके खेतों की तरह विस्तृत हैं। रामू की ज़िंदगी एक प्रकार की दृढ़ता की मिसाल है, जो पुराने कहावत का जीता-जागता प्रमाण है: “मेहनत का फल मीठा होता है।” सरकार, हमेशा एक दयालु देवता की भूमिका निभाने को तत्पर, मुफ्त शिक्षा, वित्तीय सहायता, और कौशल प्रशिक्षण की बौछार करने का वादा करती है। मीडिया इन पहलों का जश्न मनाते हुए, दीवाली की रात के उत्साह के साथ, उन लोगों की कहानियाँ प्रसारित करती है जिन्होंने अपनी ज़िंदगी बदल दी, जबकि रामू सोचता है कि उसकी बैंक की स्थिति क्यों खाली है।
इसी बीच, नौकरशाही का विशालकाय तंत्र, अपने जटिल प्रक्रियाओं के साथ, एक अनसुना खलनायक बनकर उभरता है। फॉर्म ऐसे जटिल होते हैं जैसे किसी नेता का भाषण, रामू की सहायता के लिए की गई आवेदनों का कोई अता-पता नहीं रहता। हर दिन, वह स्थानीय दफ्तर जाता है, केवल यह जानने के लिए कि वहाँ “आपात” बैठकों के लिए बंद है—जो उन अधिकारियों के चाय के अंतहीन कप का आनंद लेने के लिए निर्धारित होते हैं, जबकि आम आदमी बाहर इंतज़ार करता है। “एक दिन,” वे उसे आश्वासन देते हैं, “आप भी ऊंचा उठेंगे।” रामू केवल कड़वा हंसता है, जानता है कि असली उत्थान तो चाय के गहरे कप और अधिकारियों की आरामदायक कुर्सियों में है।
फिर मीडिया का प्रवेश होता है, जो आशा के संदेश वाहक होते हैं, जो जब एक सफलता की कहानी सामने आती है, तब कैमरा और रिपोर्टर लेकर आते हैं। वे एक चमकदार विज्ञापन प्रदर्शित करते हैं जिसमें एक युवा लड़की की कहानी होती है जो अपनी दृढ़ता के माध्यम से तकनीकी उद्यमी बन जाती है। “रगड़ से रौशनी!” वे चीखते हैं, जबकि रामू का दिल थोड़ा और भारी हो जाता है। उसे स्कूल के साल याद आते हैं, जहाँ उसने बॉलीवुड की भूगोल के बारे में तो ज्यादा सीखा, लेकिन अपने देश के भूगोल के बारे में बहुत कम। यह विडंबना उसके लिए छिपी नहीं है: वही मीडिया जो सफलता का जश्न मनाता है, उन अनसुने नायकों की ओर से बेखबर है जो गरीबी के चक्र में फंसे हुए हैं, स्वतंत्रता की लड़ाई लड़ते हुए।
जब रामू चमचमाते हेडलाइनों को देखता है, तो वह “मेक इन इंडिया” अभियान पर विचार करने से खुद को रोक नहीं पाता, एक चमकदार पहल जो देश को विनिर्माण महाशक्ति बनाने का वादा करती है। लेकिन असलियत में, यह अक्सर उन कारखानों का निर्माण करने के रूप में बदल जाती है जो श्रमिकों का शोषण करते हैं, जिन्हें वे खुद को उठाने का दावा करते हैं। रामू जानता है कि जब कारखाने विदेशी बाजारों के लिए उत्पादों का उत्पादन करते हैं, तो वह और उसके साथी किसान अपने आप को केवल सूखे फसलों और बढ़ते कर्ज में फंसा पाते हैं। “अहा, उत्थान का मीठा स्वाद,” वह व्यंग्यात्मक रूप से सोचता है, जब वह अपनी मेहनत के फल को कॉर्पोरेट लालच में गायब होते देखता है।
फिर भी, रामू आशावादी रहता है, नेताओं की प्रेरणादायक कहानियों से उत्साहित होकर, जो गरीबों के कारण का समर्थन करते हैं। “हम गरीबी को मिटा देंगे!” वे अपने मंचों से घोषणा करते हैं, उनकी आवाज़ें पूरे देश में एक सुखद लोरी की तरह गूंजती हैं। लेकिन जब कैमरे चमकते हैं और भीड़ ताली बजाती है, तो रामू यह नहीं देख सकता कि पास में खड़ी लक्जरी कारें, उनकी चमकती बाहरी चमक उस धूल भरी सड़क के विपरीत हैं, जिस पर वह चलता है। उनकी ज़ुबान से निकलने वाले शब्दों की विडंबना उसकी आँखों के सामने खुलती है, जब वे उन लोगों को उठाने का वादा करते हैं, जिनकी नीतियाँ उन्हें नजरअंदाज करती हैं।
इस उत्थान की भव्य कथा में, कथा का प्रवाह चरमोत्कर्ष की ओर बढ़ता है: चुनाव। रामू पर वादों की बौछार होती है, हवा में उम्मीद और निराशा का घनत्व होता है। राजनीतिक नेता उसके गाँव में मानसून की तरह बरसते हैं, प्रत्येक एक रातोंरात उसके जीवन को बदलने का वादा करते हैं। “हमारे लिए वोट करो, और हम सड़कें, स्कूल, और अस्पताल बनाएंगे!” वे चिल्लाते हैं, उनकी आँखों में महत्वाकांक्षा और आत्म-स्वार्थ की चमक। विडंबना यह है? रामू के गाँव की सड़कों की मरम्मत लंबे समय बाद वोटों की गिनती के बाद भी नहीं होती, जिससे उसे यह सोचने पर मजबूर कर दिया जाता है कि क्या वह एक अलग भारत में जी रहा है।
जैसे-जैसे साल बीतते हैं, रामू के उत्थान के सपने सुबह की धुंध की तरह dissipate होते जाते हैं। सरकार द्वारा घोषित आंकड़े गरीबी दरों में कमी का प्रचार करते हैं, लेकिन रामू के लिए, हर दिन भाग्य की लहरों के खिलाफ एक निरंतर संघर्ष की तरह महसूस होता है। उत्थान की जीवंत कहानियाँ एक कड़वी याद दिलाती हैं कि सत्ता की बयानबाजी और अस्तित्व की वास्तविकता के बीच कितना बड़ा फासला है।
एक हताशा की स्थिति में, रामू उन सत्ताधारियों के नाम एक पत्र लिखता है, जिसमें वह अपनी पीड़ा को शब्दों में व्यक्त करता है जो अनगिनत अन्य लोगों की भावनाओं का गूंज करते हैं। “प्रिय नेता,” वह शुरू करता है, “आपके उत्थान की कहानियाँ तपती धूप पर एक मृगतृष्णा के समान आनंददायक हैं। जबकि आप भव्य भोज में बैठते हैं, हम आशा के अवशेषों पर जीवन बिताते हैं।” उसके शब्दों की विडंबना हवा में भारी लटकती है, एक महत्वपूर्ण याद दिलाते हुए कि देश में कितनी बड़ी दूरी है।
इस व्यंग्यात्मक उत्थान की कथा का परदा गिरते ही, कोई भी रामू के दिल में भारी दुःख का बोझ महसूस किए बिना नहीं रह सकता। रगड़ से रौशनी का वादा एक दूर का सपना बना रहता है, जो नौकरशाही, मीडिया की सनसनीखेजी, और राजनीतिक पाखंड के कुहासे के पीछे छिपा है। निष्कर्ष? एक गहरी हानि की भावना, यह एहसास कि जबकि सफलता की कहानियों का जश्न मनाया जाता है, अनगिनत जिंदगियों की वास्तविकता केवल इतिहास के पन्नों में एक फुटनोट बनकर रह जाती है।
अंत में, रामू क्षितिज की ओर देखता है, जहां सूरज रंगों के एक चमत्कारी शो में ढलता है, जो उसके सपनों की याद दिलाता है—चमकीला लेकिन अंततः पहुंच से बाहर। भारतीय उत्थान का मिथक सोने की तरह चमकता हो सकता है, लेकिन रामू और उसके जैसे कई लोगों के लिए, यह एक मृगतृष्णा बनकर रह जाता है, जो हमेशा के लिए सामर्थ्य और उत्थान की तलाश में संघर्षरत रहते हैं। जैसे ही वह मुड़ता है, एक बूँद आंसू उसके गाल पर बह जाती है, जो उन लाखों लोगों की मौन संघर्ष की गवाही है जो अक्सर भुला दिए जाते हैं।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मकर संक्रांति मंगलवार 14 जनवरी 2025 से शिव पुराण का पारायण महाशिवरात्रि तदनुसार बुधवार 26 फरवरी को सम्पन्न होगा
इस वृहद ग्रंथ के लगभग 18 से 20 पृष्ठ दैनिक पढ़ने का क्रम रखें
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈